----- ॐ गायत्री ------
अमेरिकेतील एक शास्त्रज्ञ हावर्ड डी स्टॅगल (Haward D Stagle) यांना भारतीय मंत्रातील शक्तीची उकल करायची होती. म्हणून त्यांनी प्रयोगशाळेमध्ये एक प्रयोग केला. त्यात अनेक लहान-मोठ्या मंत्रांचा समावेश करण्यात आला. “नवार्ण”, “ॐ मणी पद्मे हुम” व “गायत्री”इ. अंतिम निर्णयानुसार २४ अक्षरी गायत्री मंत्राद्वारे सर्वात अधिक २,५०,००० ध्वनिलहरी (प्रकाश लहरी) त्यांना आढळल्या आणि हा जगातील सर्वोच्च मंत्र म्हणून जाहीर करण्यात आला. त्यासाठी त्यांनी अंतर्बाह्य स्वच्छता आणि स्पष्ट उच्चारण एवढ्याच अटी ठेवल्या होत्या.
कोणतेही शब्द किंवा शब्दाच्या समूहा पूर्वी ॐ लावल्यास तो मंत्र बनतो. मग आपले नाव सुद्धा घेतले तरी चालेल. मंत्र १,३,५,९,११ ते २० पर्यंत लघु असतात. मंत्र २० शब्दाच्या पुढील ही मोठी मंत्र असतात. गायत्री मंत्र हा २४ अक्षराचा बनलेला आहे. अनेक ग्रंथ ‘भगवद्गीता’, ,'गुरु-चरित्र', ‘नवनाथ स्तोत्र’, ‘ज्ञानेश्वरी’ हे सर्व मंत्रच आहेत.
महर्षी विश्वामित्रांना पौरात्य पदास विरोध करून त्यांचा अपमान केला होता. म्हणून ते तपश्चर्येसाठी निघून गेले. ध्यान-साधना करीत असता काही दिवसानंतर एके दिवशी सकाळी पुष्कर सरोवरावर ध्यान व चिंतन करीत असताना अचानक त्याचे मुखातून आकस्मिकपणे अस्खलित छंद स्पष्टपणे स्फुरण पावले. ते म्हणजे ‘तत्सवितुर्वरैण्यं | भर्गो देवस्य धीमही | धियो यों न: प्रचोदयात् ||
हाच तो गायत्री मंत्र आहे,
या मंत्राला नंतर तीन व्याह्त्ती जोडण्यात आल्यात, त्या म्हणजे
भू:, भुव:, स्व:
ओमकार सहित गायत्री मंत्र स्वाध्याय व प्रार्थना आहे. गायत्री आत्मोन्नति आणि शुभकामनांच्या उपलब्धी प्राप्तिचा महामंत्र आहे.
गायत्र्या$स्तु परं नास्ति शोधनं पापकर्मणाम् |
महाव्याह्रति संयुक्ता प्रणवेन च संजपेत || || संवर्त स्मृती ||
ह्या पेक्षा श्रेष्ठ असा कोणताही मंत्र नाही पाप कर्माचे शोधन तसेच प्रायश्चित करण्याकरिता हा सर्वश्रेष्ठ मंत्र आहे. प्रणव ॐकारा व यांच्या ३ महाव्याह्त्तीसह गायत्रीचे जप करावयास हवे. महर्षी विश्वामित्राला जी बुद्धी प्राप्त झाली तेच दाखले ऋग्वेद, यजुर्वेद व सामवते सांगत आहे. आपली बुद्धी व चित्ताच्या एकाग्रतेसाठी उत्तम असा हा मंत्र आहे. हा सर्व नर-नारीना समान हक्क देतो. तेच ऋग्वेदात १०-१९१-३ मध्ये सांगितले आहे.
समानो मंत्र समिती समानी समान मनः सहचित्तमेषान् |
समान मंत्र भि मंत्रये वर समाने नवोहविषाजुहोमी ||
हा सर्व स्त्री-पुरुषांसाठी असून, हा सर्वांसाठी मंत्र आहे. याचा समान हक्क असून, ह्या साठी आपले समान विचार असावयास हवे.
गायत्री तेज, सद्बुद्धी चा महामंत्र आहे. सद्बुद्धी ही मानव जीवनाची सर्वात मोठी संपदा आहे. ज्यांचे जीवनात संपदा आहे. त्याला कोणत्याही वस्तूची कमतरता भासत नाही. प्रसंगावश निर्माण होणा-या संकटाचे परिहार होत असते. गायत्री ह्या जीवनाची जननी आहे, तिच्यापासून साधकांना दिव्य शक्ती प्राप्त होत असतात. ती आपणास अंतर्बाह्य स्वच्छ करून पवित्र बनविते. निर्हेतुक भावनेने जप करावयाचा असतो. पवित्र साधनाने मन शुद्ध होऊन तेज व सद्बुद्धी प्राप्त होत असते. दिव्य शक्ती प्राप्त होतात. गायत्री ही सर्व संसाराची जननी आहे.
गायत्री मंत्र मूलतः गुरूमंत्र आहे. असे सिद्ध करण्याची आवश्यकता नाही.गायत्री शस्त्र व तत्व आहे. ती स्त्री व पुरुष दोन्ही आहे. गायत्रीच्या ईश्वरी पुल्लिंग रूपात अभिवंदन केले जाते. तर मातेच्या स्त्रीलिंगी स्वरूपात प्रार्थना होत असते. अज्ञान रूपी अंधकार दूर करून बुद्धीला प्रखर करते. संसारी-सुख, शांती व समृद्धी प्रदान करते. दीनता, दरिद्रता, दुःख, पद आदिचे निवारण करते. म्हणून प्रत्येक स्त्री-पुरुषाने याचा लाभ घेऊन, सर्व क्षेत्रात ज्ञान प्राप्त करून आपले सामर्थ्य वाढवावे.
गायत्री मुळे प्रणव तत्वाचे लाभ प्राप्त होते. संसारात व्यय झालेली शक्ती पुनर्स्थापन करून, आत्मबल वाढविते.
गायत्रीचा अभ्यास करताना आपणास तीन प्रकारातून अभ्यास करावा लागतो. १) गायत्रीच्या व्याह्रत्ती २) गायत्रीचे पंचमुखाचे रहस्य. ३) गायत्रीचे दशभुजा
- गायत्रीच्या तीन महाव्याह्री- भू’, भुव: व स्व: आहेत. ह्या देहरूपी छोट्या जगताचे तीन भाग होतात. कमरेपासून पायापर्यंत पृथ्वी कमरेपासून कंठा पर्यंत अंतरिक्ष व कंठाच्या वरती स्वर्ग (ब्रम्हांड) म्हणजेच मस्तिष्क ह्या तिघांना प्रकाशमय करणारा सूर्यनारायणाच्या सर्वश्रेष्ठ तेजा मध्ये ध्यान करीत आहे. व जो आमच्या बुद्धीला प्रेरणा देत आहे.
- गायत्रीच्या पंचमुखी चे रहस्य:-
आपले शरीर पंचमहाभूतांनी बनलेले आहे. पृथ्वी, जल, अग्नी, वायू व आकाश. याचाच दुसरा अर्थ असा की आपल्या आत्म्याचे पाच कोष आहेत. या आत्म्यावर पाच कोषाचे (आवरण) वेष्ठन केलेले आहे. ते म्हणजे १) अन्नमय कोश २) प्राणमय कोष ३) मनोमय कोश ४) विज्ञानमय कोश आणि ५) आनंदमय कोश. शरीर रुपी जीव या किल्ल्यात बंदिस्त असतो. ज्यावेळी ह्या कोशातून शारीरिक व आध्यात्मिक दृष्टीने अभ्यास केला जातो. तेव्हा या किल्ल्याच्या दारातून शरीर रुपी आत्मा बंध मुक्त होतो.
गायत्री हीच योगाची जननी आहे.
जो या पंचकोशाला जाणतो, तो स्वतः या भवसागराला पार करून दुसऱ्याला सुद्ध्दा तारुन नेतो.या पंचकोशाची शुद्धी खालील प्रकारे होते. १) अन्नमय कोश:- अन्नाद्वारे शरीर बनते आणि स्वास्थ लाभ होतो. आहार-विहार, आचार-विचार आसन, उपवास, तत्त्वशुद्धी आणि तपस्या याद्वारे अन्नमय कोशाची शुद्धी होते.
- प्राणमय कोष:- प्राण शक्ती मुळे मानवाचे ऐश्वर्य, पुरुषार्थ, तेज, ओज आणि सर्व प्रकारचे कार्यामध्ये सुयश निश्चितपणे मिळत असते. ५ महाप्राण (१.प्राणवायू २.अपान वायु ३.समान वायू ४.उदान वायू ५.व्यान वायू) आणि ५ लघुप्राण (१.नागवायु २.कुर्म वायू ३.कृकल वायू ४.देवदत्त वायू ५.धनंजय वायू) यांच्या अभ्यासाने उत्तम प्राणकोश बनत असतो. बंध (तीन बंध) व मुद्रा (दश मुद्रा) आणि प्राणायाम साधनेद्वारे प्राणमय कोष विकसित होत असतो.
- मनोमय कोश:- मानवाच्या चेतनेचे केंद्र मन आहे. त्याला वश करण्यासाठी महान अंतर्शक्ती निर्माण केल्या जाते. त्यासाठी ध्यान, त्राटक, तन्मात्रा आणि गायत्री जप इत्यादी साधनेने मनोमय कोश उज्वल होतो.
- विज्ञानमय कोश:- आपल्या स्वतःचा तसेच संसाराचे पूर्ण ज्ञान होणे यास विज्ञानमय कोश म्हणतात. ॐ सोह$म ची साधना, स्वर-संयम आणि ग्रंथी-भेद याचे प्रयत्नशील अभ्यासाने साधकाचे विज्ञानमय कोश पुर्ण होत असते.
- आनंदमय कोश:- आनंदी वातावरणाच्या उन्नतीसाठी अत्यंत शांतीमय, शांती देणारी तुर्यावस्था प्राप्त होते. नाद, बिंदु आणि कला यांच्या साधनेमुळे आनंदमय कोश जागृत होतो. हेच पंचमहाकोश म्हणजेच अष्टांग योग आहे.
विद्वानांनी दशभुजा गायत्रीला समस्त योग साधकांची मूलाधार शक्ती मानली आहे.
- पंचमुखी गायत्रीच्या दशभुजा:-
मानवी जीवनाच्या महा तापदायक अशा 10 शुल (दोष) पुढील प्रमाणे आहेत.—१.पापदृष्टि २.परावलंबन ३.भय ४.क्षुद्रता ५.असावधानी ६.स्वार्थ ७.अविवेक ८.क्रोध ९.आळस १०.तृष्णा यांचे संहार करण्यासाठी कल्याणकारी हातातल्या दशभुजांचा संदर्भ देण्यात येतो.
गायत्री मातेचे १० हात आणि त्यातील १० शस्त्रे हीच दशभुजा आहेत.
गायत्री मंत्राच्या शब्दाचे विश्लेषण:-
ॐ भूर्भुव: स्व: तत्सवितुर्वरेण्यं भर्गो| देवस्य धीमहि| धियो यो न: प्रचोदयात्|
अर्थ:- ॐ विश्वाची मूळ उत्पत्ती, स्थिती व लय होत असते. असे ब्रह्म वाचक एक शब्द आहे. यामुळे आपण ईश्वराला बोलावू शकतो आणि त्यांचे उत्तर ॐ या शब्दात प्राप्त होत असते.
भू: भुव: स्व: ह्या व्याह्रत्ती आहेत.
भू: =पृथ्वी, भुव:=अंतरिक्ष व स्व:=स्वर्ग
ह्या देहरूपी छोट्या जगताचे तीन भाग- कमरेपासून खाली पृथ्वी , कंबर ते कंठा पर्यंत अंतरिक्ष व कंठ ते व वरती डोक्यापर्यंत स्वर्ग या तिघांना प्रकाशमान करणारा तेजस्वी सूर्यनारायण सर्वश्रेष्ठ तेजाचे मी ध्यान करतो. जो आमच्या बुद्धीला प्रेरणा देत आहे.
तत्- त्या, सवितु- सूर्याचे, वरेण्यं- श्रेष्ठ, भर्ग- तेज, देवस्य- प्रकाशमान, धीमहि- ध्यान करणे, धि: - बुद्धी, या:- जो, न: - आमचे, प्रचोदयात्- प्रेरणा दे.
वेदाचे जितके मंत्र आहेत त्यांच्या प्रतिवादी देवता त्या गायत्री चे बालक आहेत. माता संतुष्ट झाल्यावर ‘बालक’ साधक जवळ पाठवू शकते. गायत्री चे ध्यान फक्त सूर्य मंडळातच होते कारण सृष्टिकर्ता सविता देव हीच त्याची प्रतिपाद्य आहे.
गायत्रीचे तीन अक्षर म्हणजेच प्रकृतीचे तीन गुण:- ,
गायत्री सत्व, रज व तम ह्या तीन गुणांनी पूर्ण आहे. ज्याप्रमाणे वात-पित्त-कफ हे तीन तत्व शरीरात समसमान राहिल्यामुळे स्वास्थ्य ठीक रहाते. त्याचप्रमाणे हे तीन गुण मनाचे क्षेत्रात आवश्यक प्रमाणात असल्यास ते योग्य प्रकारे काम करीत असते. गायत्रीचे हे तीन गुण विशिष्ट 3 देवीचे रूपामध्ये प्रगट होतात. सत्वगुण प्रधान सरस्वती (बुध्दी), रजोगुण प्रधान महालक्ष्मी (संपत्ती) आणि तमोगुण प्रधान कालिका माता (शक्ति) ह्या नावाने सुद्धा ओळखले जातात. संसारात तीन गुणांची आवश्यकता असते. दत्तात्रयाचे सुद्धा तीन मुख ब्रह्मा विष्णू व महेश हे वरील तीनही गुणाचे द्योतक आहेत.
गायत्रीचे वाहन हंस याचा अर्थ काय?
ह्रदयाची चैतन्यज्योती गायत्री ब्रह्मरूप असते. तेथे पोहोचण्यासाठी पंचमहाभूतांचे (प्राण, अपान, उदान, समान, व व्यान) किंवा त्यांच्या द्वारपालास वंश करावे लागते. त्यामुळे आपल्या हृदयात गायत्रीरुपी ब्रह्माची प्राप्ती होऊ शकेल. आपले श्वास आणि प्रश्वासासह सूक्ष्म सोह$म चा ध्वनी होत असतो. त्यास
‘हंस' तथा ‘सोह$म’ हेच गायत्रीचे तत्व बनते. माळ जपण्याचे स्थान श्वास_प्रश्वासच घेतात. यासच ‘अजपा’ संबोधतात. इडा (चंद्र/डावी) व पिंगला (सूर्य/उजवी) या नाडीचे आरोहन-अवरोहन माळा जपण्याचं काम करू लागतात ५४ ग्रंथी आरोहन व ५४ ग्रंथी अवरोहन च्या मिळून १०८ अशी सूक्ष्म ‘जपमाळा’ सुरू होऊन जातात. सुष्मुनेस सुमेरू म्हटले आहे. हाच सोह$म जप साधकांच्या पातत्रेनुसार व प्रदीर्घ साधनेने ‘गायत्रीचे आसन' बनते. प्रकल्प साधने सोबत साधकांना बेशुद्धी मध्ये वीणेची झंकार ऐकू येऊ लागते. त्यालाच मातेच्या हातातील विणेचे प्रतीक रूप दिलेले आहे.
गायत्री ही प्राण विद्या आहे
गायत्रीचे उपासकांना प्रथम जप, अनुष्ठान द्वारे आपली मनोभूमी तयार करावी लागते. त्यामुळे आंतरिक कु-संस्कारांचे निर्मूलन होत असते. आणि उपासनेचे बीज पेरले जाते. प्राण हेच बीज आहे, ज्यामुळे उपासकाला जीवनात शक्ती आणि सिद्धी प्राप्त करून देतो. ॐकाराचे स्पष्ट अक्षरोच्चारणाच्या साधनेला गायत्री ची सगुन साधना म्हणतात. अशा प्रकारे गायत्रीची सगुन साधना करता करता मानस जप करीत रहाणे या साधनेस निर्गुण साधना म्हणतात. ओंकार चा स्पष्टाक्षर उच्चारण म्हणजे ‘नाद’. नाद बाह्य वातावरणावर नियंत्रण आणतो व नादयुक्त धून च्या साधनेमुळे पिंडी ते ब्रम्हांडी पर्यंत म्हणजे मूलाधार ते सहस्त्रदल चक्रापर्यत मानसिक वातावरण शुद्ध आणि आनंदमय बनवून प्राण-अपानच्या क्रियेस स्वाभाविक क्रिया बनविते.
धुन लगाओ हरि ओम की ||ध्रु||
सगुन साधना गायत्री की |
गायत्री ही जननी योग की|
महिमा गाऊ योगाग्नि की|
सफर पिंड से ब्रम्हांड की ||ध्रु||
धून लगाओ हरि ओम की |
गायत्री म्हणजे प्राण त्यांचा उत्कर्ष करण्याची प्रक्रिया आहे. जो या प्रकारे साधना करीत असतो त्यास ब्रह्मसत्तेची प्रचंड अध्यात्मिक शक्ती मिळत असते. त्यासच ब्रह्म-शक्ती म्हणतात. साधक प्राणवान तसेच आत्मसपन्न बनतो. ‘श्रुती’ मध्ये प्राणास ब्रह्म म्हटले आहे. व त्याचे अभिनंदन केले आहे. ‘वायू त्वं प्रत्यक्षं ब्रह्मास्मि' ब्रह्म-उपनिषदात म्हटले आहे. प्राण हेच अग्नी रूप धारण करून तापत असतो. तोच सूर्य, मेघ, इंद्र, वायू आहे. तोच देव, ईश्वर, पृथ्वी आणि रयी आहे. प्राण हेच अमृतस्वरूप परमात्मा, जगतकारण ब्रह्म आहे. मंत्रज्ञान हे वरील पंचकोश प्राणाचे आधारावर आधारित आहे. आणि अन्य शास्त्र सांगतात की ‘अमृत वै प्राण:' (शतपथ ब्राह्मण) म्हणजे प्राण हेच निश्चित रूपाने अमृत आहे.
गायत्री जप आणि ध्यान:-
कोणताही जप तीन अवस्थांमध्ये केला जातो. वैखरी, उपांशु आणि मानस. वरील प्रकारे गायत्रीचे पंचपाद वैखरी पासून प्रारंभ करुन उपांशु आणि शेवटी मानस मध्ये केले जातात. (वैखरी म्हणजे शब्दोच्चारण, उपांशु म्हणजे ओठांमध्ये आणि मानस म्हणजे मनामध्ये उच्चार करणे) गायत्री निर्गुण साधना म्हटली जाते वैखरी पासून जेव्हा सुरुवात केली जाते. आपला वेळ आणि शक्तीनुसार मानस जपापर्यंत आल्यावर, मानक जपाचा १-२ मिनिटाचा संकल्प करून केल्या जातो, तोपर्यंत भृकुटीमध्या मध्ये अर्ध-सूर्याच्या किरणांचा प्रकाश पाहत असतात. माणूस १ मिनीटाचा संकल्प पूर्ण होऊन आपली अंतर्दृष्टी मातेच्या चरणावर घेऊन जावी. मातेच्या चरणापासून ते मातेच्या हास्यवदना पर्यंत धारणेचा प्रवास करावा लागतो. मातेने पायामध्ये घातलेले नुपूर, पैजन, अनेक अलंकार हे वेदांत उपनिषद, श्रुती, स्मृती यांचे प्रतीक मानलेले आहे. मातेने घातलेले लाल महावस्त्र साधकाचे संरक्षणाचे प्रतीक आहे. मातेने कंबरपट्टा इत्यादी घातलेले आहे. हे मूलाधार पासून निघणाऱ्या देवता रुपी नाडी बंधनाचे प्रतीक सांगितले जाते. मातेचे दुसरे आसन काही शास्त्रांनी कमळाचे फूल सांगितलेले आहे. नाभी स्थानावरील त्याच कमळावर माता विराजमान झालेली आहे. संसार रुपी चिखलामधील आदर्श संसार बनविण्याचे हे प्रतीक आहे. दुसऱे आंसन ‘हंस’. आता नाभीकमलाच्या वरती चला. मातेने आपल्या गळ्यामध्ये अनेक प्रकारचे अलंकार घातलेले आहेत.
या अलंकारात पेक्षा अंतर्खजाना दैदिप्यमान आहे. हे याचेच प्रतिक आहे. याचा अर्थ मातेच्या या जपामुळे बंद पडलेले प्राणवायूचे क़ोष्ट उघडू लागतात. ह्यालाच आत्मिक खजाना म्हणतात. मातेने गळ्यामध्ये मंगळसूत्र घातलेले आहे. ते सत्य वाचेचे प्रतीक आहे. (कंठस्थ भूषणं सत्यम्) तसेच हस्तालंकार, हाताने दान करण्याचे प्रतीक आहे. (हस्तत भूषणं दानमं) माताच्या दशभुजेत अनेक प्रकारचे शस्त्र धारण केलेले आहेत. ते आमचे दोष (शुल) नष्ट करण्याचे प्रतीक आहे. जे या प्रकारच्या साधनेने दूर करू शकतो.आता माताच्या स्मितवदनावर आंतरिक लक्ष केंद्रित करा. येथे १ मिनिटिचे संकल्प करून सतत प्रसन्न स्मितहास्याचे प्रतिक समजुन ॐकारा मध्ये विलीन करा. शेवटी ॐकार दोन प्रणव करून दोन्ही हातांचे घर्षण करून डोळ्यावर, चेहऱ्यावर फिरवा. डोळे उघडून सुखासना मध्ये बसा.
सूचना:- वरील जप वैखरी ते मानस पर्यंत २१ वेळा करावा. जसे- थेंब थेंब पाण्यामुळे तलाव भरतो.
मुंगी १-१ कण गोळा करून कोठार भरते.१-१ अक्षर जोडून ग्रंथ बनतो. १-१ पाऊल चालून आपल्या ध्येयापर्यंत पोहोचतो. १-१ पैसा जमा करून तिजोरी भरते.१-१ धागा जोडून दोरखंड किंवा नाडा बनतो. त्याचप्रकारे सोह$म रूपी श्वासासोबत जप केल्यामुळे मानवाचे कल्याण होईल. यामुळेच योग ग्रंथांमध्ये यालाच योग-यज्ञ म्हटले आहे. अध्यात्मिक मार्गात जाणार्यां व्यक्तीना हे विशेष रूपांमध्ये प्रतिपादन केलेले आहे. गीतेचे १० अध्याय मध्ये यज्ञात, जप यज्ञ हे सर्वश्रेष्ठ मांनलेले आहे्. मनाला वश करण्यासाठी एक प्रभावी अस्त्र आहे. नित्य जप म्हणजेच एक अध्यात्मिक व्यायम आहे्. यामुळे सूक्ष्म शरीर बलवान होते.
*****”””””””*****”
No comments:
Post a Comment