आशा-आहार
आपणास स्वस्थ रहावयाचे आहे काय?
तर खालील बिंदू लक्ष्यात घ्या. -- डॉक्टर आशा मने, अमरावती
- कर्बोदके (Carbohydrate) कमी करा:- गव्हाची पोळी आणि भात यामुळे ग्लायसेमिक इंडेक्स जास्त होतो. (आपण ४ पोळ्या खातो तर ते २ वर आणावे.) आणि प्री डायबेटिक कंडिशन्स निर्माण होते म्हणून त्याचे प्रमाण कमी करून ज्वारी, बाजरी, जव (Barley) (९ प्रकारचे मल्टीग्रेन चा उपयोग करावा)
- प्रथिने (Protien) वाढवा:-
शरीराच्या बांधणीसाठी प्रथिनांची खूप आवश्यकता असते. शरीर वाढीसाठी मदत होते. भूक चांगली लागते. वजन प्रमाणात राहते.
म्हणून प्रथिनांचा उपयोग अधिक करावा. प्रोटीन इंडेक्स वाढवा. रोजची आवश्यकता (१ किलो= १ ग्रॅम) प्रमाण असावे.
प्रथिने भिजवलेले सूकामेवा, मोड आलेली कडधान्य, शेंगदाणे, तेलबिया, शिजवलेली अंडी यातून प्राप्त होतात. सकाळी भिजवलेले कडधान्य, दुपारी तेलबिया ची चटणी व दही तर रात्री साधे दूध न घेता हळद किंवा अन्य पदार्थासह घ्यावे.
- पालेभाज्या व फळे:-रोज पालेभाज्या ३०० ग्रॅम (त्यात १०० ग्रॅम हिरव्या) चे सेवन करावे. गडद रंगाच्या भाज्यांचा समावेश करावा. फळे रोज ३००-५०० ग्रॅम असावीत. त्यामुळे रोगप्रतिकारशक्ती वाढविण्यास मदत होते. गडद रंगाची व जंगली फळांचा समावेश असावा. जसे आवळा, पेरू, जांभूळ इत्यादी. (रोज २ केळी, पंपई खाल्ले तरी चालेल.) शरीर फिट होण्यास मदत होते. चरबी कमी होईल.
यामध्ये सर्व प्रकारचे Anti-oxidant, Anti-inflammatory, Anti-bicterial, Anti-viral, Anti-fungle असतात आणि फ्री रॅडिकल्स ( Freed Radicles) ला प्रतिबंध करतात. यात Vit-A व Vit-C अधिक असतात. ORAC हे फुफ्फुसाठी व हृदयासाठी अतिशय महत्वाचे घटक आहे. ORAC मसाल्याच्या पदार्थात जसे- लवंग इलायची इ. भरपूर प्रमाणात उपलब्ध असतात. मेथी, जि-यांचा पावसाळ्यात जास्त उपयोग करावा.
- काय टाळावे ?
- साखर:-रासायनिक प्रक्रिया न केलेली साखर चांगले असते. परंतु बाजारात मिळणारी साखर २३ केमिकल युक्त असल्यामुळे ती सोडून द्यावी. त्याऐवजी धाग्याची खडीसाखर, मिस्री, बताशे, गोडव्यासाठी खजूर, अंजीर, किसमिस, जर्दाळूचा उपयोग करावा. गुळ उत्तम आहे. मात्र तोसुद्धा केमिकल्स युक्त नसावा.
- मीठ:- बाजारात मिळणारे पांढरे मीठ अजिबातच खाऊ नये. त्याऐवजी शेंदे मीठ, काळे मीठाचा (Rock salt) उपयोग करावा. सामान्य माणसाला मिठाची गरज ५ ग्रॅम तर हृदयाचा विकार ३ग्रॅम असते. ताटात, सॅलडवर किंवा वरून मीठ अजिबात घेऊ नये.
- तेल:- घाणीचेच वापरावे. फिल्टर तेल हानिकारक आहे. असते प्रत्येकास २० ml तेलाची आवश्यकता असते. प्रोसेसिंग ओईल, वनस्पती तुप अजिबात घेऊ नये. गाईचे तूपाचा उपयोग करावा. या तेलामुळेच आपण आजारी पडतो. सोयाबीन चांगले परंतु सोयाबीन पासून काढलेले फिल्टर तेल अतिवाईट आहे. खाण्यासाठी तीळ, खोबरेल, शेंगदाणे, जवस, सरसो ही उत्तम तेल आहेत. सरसोपासून omega-३ प्राप्त होते.
- मूल्यवर्धित पाणी:- ( Value Added) ही नवीन संकल्पना आहे. मूल्यवर्धित पाणी सकाळी आणि दोन जेवणाच्या मध्ये घ्यावेत. साध्या पाण्यामध्ये अश्वगंधा, तुळशी, गिलोह, लिंबू, सहद, तेजपान, कल्मी, गुलाबाची फुलं, अंबाड्याची फुलं, डाळिंबाचे फूल टाकून तसेच आयुर्वेदिक जडीबुटी चा उपयोग केल्यास ते मूल्यवर्धित पाणी तयार होते.
- जेवणाच्या वेळा:- रात्रीचे सूर्यास्तापर्यंत किंवा ६-७ वाजेपर्यंत आटपावे. दिवसाच्या जेवनापेक्षा रात्रीचे जेवण कमी प्रमाणात घ्यावे. दुसऱ्या दिवशी सकाळी सकाळील्या नंतर नाश्ता केल्यास आपले Intermittent Fasting सुद्धा घडते. त्यामुळे आपण रोगमुक्त होऊ शकतो. पित्त प्रवृत्तीच्या लोकांना दोन पेक्षा अधिक वेळा खाण्याची आवश्यकता भासू शकते.
- विरुद्ध आहार:- आपण सगळ्या गोष्टी पाळत असतो. मात्र विरुद्ध आहाराकडे लक्ष देत नाही. केळीची कालवण तर नेहमीच घेतो. दुधा सोबत फळ घेऊ नये. दूध-दही, दूध-उडीद दूध-काकडी, दूध-मीठ हे विरुद्ध आहार आहेत. दह्यासोबत उडीद-डाळ घेऊ नये. कारले-भेंडी ह्या एकत्र खाऊ नये. विरुद्ध आहारामुळे स्कीन डिसीज (Skin Disease) डायरिया, पोट दुखण्याचे आजार होऊ शकतात.
- स्वयंपाकाची भांडी
अ) ॲल्युमिनियम ची भांडी असू नये. आपण ॲल्युमिनियम फाईल मध्ये टिफिन बांधून बांधून देतो. त्याचा उपयोग टाळावा. ॲल्युमिनियमच्या पात्रात आपण आंबट वस्तू ठेवत असतो ते चुकीचे आहे. रोज आपल्या पोटात ५० गरम जातो व आपणास न्यूरोलॉजिकल, पॅरालिसीस व स्मरणशक्ती चे विकार जडतात.
आ) प्लास्टिक प्लास्टिकचा उपयोग आपण फार मोठ्या प्रमाणात करतो. त्यामुळे बरेच विकार होतात. महिलांचे नपुसकता इत्यादी आजार होऊ शकतात. प्लास्टिकचा उपयोग पाणी पिणे, फ्रिज मध्ये व जेवणात टाळावा.
- फ्रिजचा उपयोग कमीत कमी करण्यात यावा. त्याचे अनेक दुष्परिणाम आपणास भोगावे लागतात.
- स्वयंपाकाचा (कापड) फडका स्वयंपाकाचा फटका हा स्वच्छ असावा. एकच फडक्याचा उपयोग टेबल पुसणे, ओटा व ताटे पुसण्या साठी उपाय केला जातो.
आपणाला जगण्यासाठी रोग प्रतिकारशक्ती ची नितांत आवश्यकता असते. वरील साधे नियम पाळल्यास आपण हे सहज साध्य करू शकतो. आत्तापासून याचा अवलंब करण्यात यावा डॉ. आशाताई मने, अमरावती यांच्या आज दिनांक ८ जुलै २०२० च्या भाषणाचा थोडक्यात सारांश देत आहे.---- योगाचार्य श्री रामकृष्ण ठावकर
सुचना:- आपणास आहारावरील काही प्रश्न असल्यास कृपया व्हाट्सअप ग्रुप वर आज रात्रीपर्यंत पाठविण्यात यावेत.
No comments:
Post a Comment