Sunday, June 28, 2020

■BK महिला सखी मंच व ◆ कविता दि.१जून ते ३० जून २०२० पर्यंत


दिनांक 26/05/2020
विषय- स्वरचित चुटकुले

 🌳झाडे लावू ,झाडे जगवू🌳

आपण सृष्टीचे रक्षक होऊ,
सृष्टीची अन्नसाखळी पुर्ण करु
हिरवी वने, हिरवे शिवार
न्याहाळू सृष्टीचे सौंदर्य अपार
झाडे लावू,झाडे जगवू

मृग-नक्षत्राच्या बरसतील धारा
शेतकरी पिकविल मोती, चारा (धान्याच्या रासा)
गीत गातील किलाबिल पाखरे, 
खळखळ वाहतील नद्या झरे.
गुरे-वासरे पक्षी-प्राणी
नांदतील आनंदी या अवनी 
रक्षण त्यांचे आपण करू
झाडे लावू, झाडे जगवू

एक तरी झाड लावू दारी, 
संगोपन करु मुलांपरी, 
नाही मिळाली फळे-फुले तरी,
सावली देईल वाटसरु
हाच संदेश सगळ्या देऊ,
निसर्गाचा समतोल राखू
झाडे लावू ,झाडे जगवू

                       सौ.प्रतिभा सोपान वाठ
                       अकोला
                       दि. 01-06-2020
[6/1, 4:15 PM] Smj Bhand__Mangala Dahake Bhandara: 🌳🎄चला झाडे लावू या🌱🌴
झाडे लावू या गं ,झाडे लावू या.
झाडांचे गं हिरवे हिरवे रान वाढवू या गं
रान वाढवू या.
हिरव्या झाडी रान पाखरे
कलाकुसरीची त्यांची निवारे
पाहून घेवू या गं,झाडे लावू या.

झाडांमध्ये घुमतो वारा
 झरझर बरसती जलधारा
ओलीचिंब होई धरा,झाडे लावू या

विहंग मेळा होई गोळा
कुहू कुहू गायी कोकीळा
ऐकू या गं स्वर सोहळा,झाडे लावू या.

हिरव्या रानी कुसूम कमानी
रसाळ फळे घेती मनमोहूनी
फुले फळे घेऊ वेचूनी,झाडे लावू या

हिरवी माया हिरवी काया
वाटसरूला देई छाया
निसर्गाची अद्भूत किमीया,झाडे लावू या.

हिरव्या वनी सारे प्राणी
आनंदाचे गाती गाणी
सुजलाम सुफलाम होई भूमी
झाडे लावू या,

झाड अमुचा खरा सोबती
किती गायची त्याची महती
त्या विना श्र्वास न जगती
झाडे लावू या.
झाडे लावू या गं झाडे लावू या.

सौ.मीरा शेबे भंडारा.
[6/1, 4:15 PM] Smj Bhand__Mangala Dahake Bhandara: चला झाडे लावूया--

निसर्गाने केले गोड देणं बहाल
सुंदरतेचे गीत गाऊया
ऋण फेडण्या धर्तीचे
चला झाडे लावूया ।।
ऑक्सिजन ते देती जगण्या
पर्यावरणाचे संतुलन राखुया
विश्व हे सुदृढ होण्या
चला झाडे लावूया ।।
असमंतांच्या डोळ्यातील
सर सर शिरवे साठवूया
इंद्रधनूच्या कमानीसाठी
चला झाडे लावूया ।।
कष्टाच्या घामाने ओली माती
बळी राजाला मदत करूया
ओंजळीत मोत्याचे पीक येण्या
चला झाडे लावूया ।।
परंपरांनी नटलेला भारत
एकतेच बीज रोऊया
अभिमानाच्या उंबऱ्यावरी
चला झाडे लावूया ।।
--------------------------
        मंगला डहाके, भंडारा
[6/1, 4:15 PM] Smj Bhand__Mangala Dahake Bhandara: झाडे लावूया

झाडे लावू झाडे लावू
झाडाचे महत्त्व पटवून देऊ
आरोग्य आपुले सुदृढ ठेवू
आयुष्यमान आपुले वाढवू

झाडे लावूनी धूप थांबवा
जमिनीला मीळे ओलावा
जल साठा हा मुबलक राहावा
यासाठी तुम्ही झाडे लावा

झाडे लावू आॅक्सिजन  घेऊ
आबालवृद्धाना आनंदात ठेवू
घेवूया वसा जन्मो जन्मीचा
प्रत्येकानी एक झाड लावण्याचा

फुला पानांनी नटली धरती
झाडावरती वेल बहरती
किलबील करती पशु पक्षी
फळे रसाळ चाखण्या मिळती

                नंदा भोयर
[6/1, 10:20 PM] Smj Bhand__Mangala Dahake Bhandara: ।। चला झाडे लावू या ।।

निसर्गाचे श्रृण फेडूया ।
चला झाडे लावूया ।।
     हिरव्या कंच छायेसाठी,
     थंडगार मायेसाठी।
     चला झाडे लावूया ।।
रोप,रोप लावूया ,
दररोज पाणी घालूया । 
चला झाडे जगवू या ।।

दिवसा गणिक रोप वाढे,
हिरवी,हिरवी पालवी फुले।
  पालवीचे स्वागत करु या।
        चला झाडे लावू या ।।
रोपटे झाले झाड,
वाढले ताडमाड।
त्याच्या छायेत,
विसावा घेवूया ।।
   चला झाडे लावूया ।।

झाडावरती भरे!
पक्ष्यांचा मेळावा ।
संगीत मैफिलीची, 
मजा घेऊया ।।
चला झाडे लावूया ।"
       भरपूर आॅक्सीजन घेऊया।
        पर्यावरण संतुलन राखूया।
           चला झाडे लावूया ।।

सौ.के. बी. सार्वे भंडारा.

दिनांक 26/05/2020
विषय- स्वरचित चुटकुले

[6/2, 8:19 PM] Smj Bhand__Mangala Dahake Bhandara: *मजूर*

कधी प्रसंग येतो बाका
खस्ता खातो येता जाता 
मिळेल कशी मीठ-भाकरी
हीच तळमळ ज्याच्या अंतरी 
परिस्थिती करते ज्याला मजबूर
तो असतो मजूर.

मळले कपडे घाण वस्ती
या जगती कुणी न पुसती, 
भुक,आजार,महामारी
ज्याच्या पाचवीलाच पुजली 
ऊन,वारा,पाऊस झेलीत 
फाटक्या संसारा लावतो ठिगळ.

मजूराची नसते जातपात
कष्ट आणि कष्ट, 
हाच असतो जीवनाचा भाग 
कधी न मिळे निसर्गाची साथ.

नसतो कोणी त्याचा वाली
हास्य नसते ज्याच्या गाली
दुर्भाग्याच्या रेषा, असती भाळी 
होईना मुलांचे संगोपन, शिक्षण 
गरीबी असते मोठी भीषण.

कष्ट करुनी हाती न काही
म्हणुन कधी फासावर जाई .
फासावर जाणे नसते उत्तर 
पण, त्याच्या विवंचनेपुढे सारे निरुत्तर 
प्रश्न पडतो माझ्या मनी
खरचं! गरीबी असेल का शाप
की,मागील जन्माचे कोणते पाप?

                       सौ.प्रतिभा सोपान वाठ
                       अकोला
                       दि. 02-06-2020
[6/2, 8:19 PM] Smj Bhand__Mangala Dahake Bhandara: मजूर--

संसाराचा रथ रेटण्यासाठी
मजूर कष्ट करत आहे
सर्वाना खूष ठेऊन
शर्टाला ठिगळं लावत आहे ।।

बायकोचे लाड पुरवण्या
पैशासाठी लढत आहे
एक एक पैसा वाचवून
धोतराला गाठी पाडत आहे ।।

मुलांच्या शिक्षणासाठी
पै पै जमा करत आहे
घरच्यांच्या हसऱ्या चेहऱ्यासाठी
ओल्या मातीत तो राबत आहे ।।

सकाळी काम, दुपारी काम
शिदोरी वाट पाहत आहे
खाण्याची उसंत नाही
मजुरांची ही व्यथाच आहे ।।
----------------------------------
          मंगला डहाके, भंडारा
[6/2, 8:19 PM] Smj Bhand__Mangala Dahake Bhandara: ।। मजूर ।।

पोटाच्या खळगीसाठी
चारही दिशा फिरतो
घेऊनी बिर्‍हाड पाठीवरती 
काम दया मज काम ।।

   शेती झाली विराण,
   गावे पडली ओसाड ।
   शोधू कुठे मी काम
   काम दया मज काम ।।

अठरा विश्व दारिद्र,
परि हरलो नाही इमान ।
कष्ट करुनी घेतो दाम,
काम दया मज काम ।।
     
रडगाणे कुणी ऐकाया नाही,
मरणावर माझ्या करिती राजकारण ।
वैतागुन करतो मरणाजवळ ,
काम दया मज काम ।।

       काम मिळेल ते धाम माझे,
        आनंदाने घालवितो मी शाम 
        स्वाभिमानाने घेतो दाम।
        काम दया मज काम ।।

कुटूंब माझे माझ्या दिमतीला,
कष्ट माझे पुजले पाचवीला ।
काम देणार्‍याला करीतो सलाम,
काम दया मज काम ।।

सौ.के.बी.सार्वे भंडारा.
[6/2, 8:19 PM] Smj Bhand__Mangala Dahake Bhandara: 🛠️मजूर 🛠️⚙️

पोट खपाटीस गेलं 
घामेजलं सारं अंग 
आग ओकत्या सूर्याशी 
मजूराचा आहे संग .

दारिद्र्याच्या साऱ्या झळा 
मजूराच्या घरावर 
कसं जगावं जीवनी ? 
पोट तळहातावर .

काय नशीब फुटकं ! 
जेवणाचे सारे वांधे
आपल्याच घरासाठी 
' पैज ' नशीबाशी बांधे .

कधी उगेल पहाट ? 
कधी थांबेल ' रहाट ' ? 
जित्यापणी मरणाची 
कधी थांबे खटपट ? 

कुणी म्हणे ' धनरेषा ' 
आहे हातावर ' मस्त ' 
मग कष्ट सोसूनिया 
कसे जीवन हे व्यस्त ? 

हातावरच्या या रेषा 
ठरलेल्या आहे वांझ .
नशीबाची ती पहाट 
नित्य ठरलेली ' सांज ' 

मजूराच्या कष्टावर 
ठरे देशाचा विकास .
भाग्य जीवनाचे त्याच्या 
नको ठरावे उदास ! 
🔩⚙️⛏️🧰🪓🔫
  सुभाष धांदे सर 
यवतमाळ 
दिनांक -02/06/2020
[6/2, 8:19 PM] Smj Bhand__Mangala Dahake Bhandara: *मजुर*
राब राब राबत़ो
मजुर दादा माझा
आयुष्यातील दिवस 
होऊन राहिले वजा

डोक्यावर ओझं 
हातात असतो विळा
टाळत असतो नेहमी
संसाराची पिडा

पोटासाठी इथं
रानोरान फिरतो
नाही फिरला तर
उपाशी मरतो

चीले पीले घरातच असतात
टक लावुन दारात बसतात
भुकेने व्याकूळ ह़ोवून
असतात ताट घेऊन

मजूराच्या खांद्यावर ओझं
असतं भारी
कुठला चहा आणि
कुठली न्याहारी

              नंदा भोयर
[6/3, 1:39 PM] Smj Bhand__Mangala Dahake Bhandara: मजूर
  
गरीबी च्या भाळावरती श्रमाचा‌ तू लाव‌ टिळा.
तुझ्याचं श्रमाच्या जोरावर उभारली जाते शिळा.
तुझ्या दोन करांना विश्वकर्माचे आहे वरदान.
तुझ्यापेक्षा या जगती नाही कुणी महान.
तुझ्या प्रत्येक पावलांवर पडाव्या कुसूमांच्या राशी
कारण तुझ्याच‌अढळ चरणांवर उभी जगाची काशी.
तू नसता थांबतील प्रगतीची चाके
ना कोट्याधीश, ना गर्भश्रीमंत सारे तुझ्या मागे.
ओळख तू स्वतःला, नाही तू मजबूर
स्वकष्टाची खाशी भाकर,असा तू मजूर.
उपाशी राहशील पण फुकटाचे खाणे नाही तुज मंजूर.
कर्तव्याप्रती एकनिष्ठ,सोशीक आहे मजूर.
गरीब आहे तू पण नाही लाचार.
राखेतून फुलण्याचा कर एकच विचार.
तुझ्या ‌उरातील राखेचा होऊ दे‌ भडका
घामाच्या थेंबांनी नको सजवू बंगला पडका.
हो मी तुला सांगते,कळू दे तुझे अस्तीत्व जगाला.
तुझ्या रक्ताळलेल्या जखमांना आणि तुझ्या त्यागाला.
जो तो उठून कां असा हिणवितो तुला
सांग त्यांना,माझ्याच श्रमाने तू मोठा झाला.

सौ.मीरा शेबे भंडारा.

दिनांक 26/05/2020
विषय- स्वरचित चुटकुले

[6/3, 2:42 PM] Smj Bhand__Mangala Dahake Bhandara: बळीराजा--
अरे बळीराजा तू
जगाचा पोशिंदा
तरी तुझ्या जीवनाचा
नेहमीच होतोय वांदा ।।
ऊन, वारा, पाऊस
याची नसे तुला तमा
शेतात तिफन चालवून
सतत लागतो कामा ।।
तुझ्या ओल्या घामानं
काळी माती भिजते
दिवस भर कष्ट करून
कधी पोरं उपाशी निजते ।।
येतं रे पीक चांगलं
शेत हिरवेगार
कधी रोग येतो
अन लागतो ओल्या पिकावर ।।
मोत्याचे पीक येऊनही
मालाला नाही भाव
ढवळ्या पवल्या असे साथीला
धीराने तू जगतो राव ।।
पाऊस ही कधी
भरमार येतो
ओला दुष्काळ,कधी
सुका दुष्काळ असतो ।।
आलेलं पीक निसर्ग
भर्रकन घेऊन जातो
डोळ्यात धारा सतत
तुला देऊन जातो ।।
कर्जबाजारी तू
अभिमानाने जगतो
कधी गळफास तर
कधी विष घेऊन मरतो ।।
हुशार मुलं तरी शिक्षण,
नोकरीचे मार्ग मिळत नाही
आरक्षण नाही,तर
यशाची दिशा गवसत नाही ।।
तुझ्या जीवनाची
हीच दैना आहे
पोशिंदा तू जगाचा
सारा भार वाहे ।।
       मंगला डहाके, भंडारा
[6/3, 7:00 PM] Smj Bhand__Mangala Dahake Bhandara: 🌾🌾बळीराजा🌾🌾

काळी काळी माती
खण खण खणती
रतदिन बळीराजा
शेतात राबती.

               पाऊस ,ऊन,वारा
  ‌‌.             अंगावर घेतो सारा
                 कष्टाच्या तनातून
   ‌.            घामाच्या वाहती धारा

नाही त्यास भिती
काळोखाच्या राती
राखण, पाणी,बांधासाठी
निघे रातोराती.

                     साप,विंचू,खेकडे
               त्यांच्याशी नाही वाकडे
                   मैत्री करुनी त्यांची
              वावर असतो चोहीकडे

पिक डोले शेतात
हर्ष होई‌ मनात
श्रमाचं सोनं झालं
पिक येई हातात.

                  मोद भरे नाचे गायी
             ‌.   घरा आले रूखमाई
  .             भोगीले अनंत त्रास
                क्षणात विरून जाई.

दिन हीन येता घरा
देई अन्नपाणी निवारा
नाही भेदभाव मनी
सर्वांचीच भरे गोणी.

             ‌‌.  असा माझा बळीराजा
              नाही त्याचा गाजावाजा
             ‌ आभाळाचं काळीज 
   ‌ ‌‌.    ‌‌. ‌   मनाचाही आहे राजा.

  सौ.मीरा नरेंद्र शेबे भंडारा.


                  ‌‌
[6/3, 7:00 PM] Smj Bhand__Mangala Dahake Bhandara: 🌳बळीराजा ...
पावश्या म्हणतो , ' पेर्ते व्हा ' .
पाऊस म्हणतो , ' आलो 
पहा ' .
धरती म्हणते , ' बळीराजा तु ' .
पेरणीसाठी सज्ज रहा । 

संदेशाचे सारे वारे 
बळीराजाच्या कानी पडे .
पुन्हा उठोनी नव्या दमाने 
तो मातीसंगे नाते जोडे .

डोंगरदऱ्या अन कड्याकपारी 
शांत अशा त्या 
नदीकिनारी .
बळीराजाची सांगून जाते 
' कडू कहानी ' त्या 
मृगसरी .

निळ्या नभाशी मेघ 
दाटता , 
वीज नर्तन करूनी 
जाते .
बळीराजाच्या मनी 
फुलोर 
स्वप्नं हिरवे पेरून जाते .

स्वप्नं फुलू दे या राजाचे 
संगीत घुमू दे या राजाचे 
बळी न जावो पुन्हापुन्हा 
आयुष्य लाभो ऐश्वर्याचे .

👍👍👍💐💐💐
सुभाष धांदे , यवतमाळ दिनांक 03/06/2020
[6/3, 10:20 PM] Smj Bhand__Mangala Dahake Bhandara: ।।बळीराजा (२)।।

बळीराजा  तु खराचं राजा 
या भुमीवरी,
घेसी अवघ्यांचा भार शिरावरी
तुझी किमया किती रे न्यारी ।। 

काळ्या मातीस, सजवी श्रुंगारी 
उगवसी धन-धान्य मातीच्या गर्भातूनी
अंकुरले रोप सांभाळसी लेकरांपरी ।
बळीराजा तुझी किमया किती रे न्यारी ।।

आम्हा सर्वांचे उदर तुझ्या हाती,
कधी नाही तु,कष्टास पाठ दाखविसी
स्वतः उपाशी राहुन,चिंता करतो जगाची 
बळीराजा तुझी किमया किती रे न्यारी ।।

तुझे उपकार किती या विश्वावरी,
लाभु दे बरकत तुला या संसारी ।
ईडा-पीडा जाऊन, बळीचे राज्य येवो भुवरी,
हीच विनवणी माझी धरणीमातेसी ।
लाभो, सुख-शांती माझ्या बळीराजासी,
बळीराजा रे तु किमयागार या भूवरी ।।


                       सौ.प्रतिभा सोपान वाठ
                       अकोला
                       दि. 03-06-2020

दिनांक 26/05/2020
विषय- स्वरचित चुटकुले

[6/3, 10:20 PM] Smj Bhand__Mangala Dahake Bhandara: बंद देवळा बाहेरून मी
देवाला फुले वाहिली.
हळूच दारा आडून त्याने
भीती माझी पाहिली.

भजन नाही, नाही प्रार्थना
ना म्हंटली कुठली गाणी.
जे सांगायाचे होते मजला
वदले डोळ्यांतील पाणी.

कुठून आला आवाज कानी
चपापून जरा मी पाहिले.
लक्षात आले नैवेद्याचे
ताट आणायचेच राहिले.

घेऊन निघालो होतो देवा
रस्त्यात भेटला भुकेला.
नैवेद्याचा घास तुझा मी
त्याला मग देवू केला.

चेहऱ्यावरती दाटून आले
भाव तयाचे भोळे.
उपकाराची जाणिव त्याचे
बोलत होते डोळे.

हळूच दिली तृप्तीची ढेकर
त्या खंगलेल्या पोटाने.
अस्फुट आशीर्वादही दिले
रखरखीत त्या ओठाने.

क्षमस्व देवा नैवेद्य तुझा
आणू न शकलो इथे.
अरे वेड्या, देव म्हणाला
ग्रहण केला मीच तिथे.

येवू नको मंदिरात माझ्या
तू घरामध्येच थांब.
आयुष्याची दोरी तुझ्या
बघ होते कशी लांब.

लहान मुलांत शोध मला
असेन मी फुला पानांत.
सापडेन तिथेच तुला मी
दिन दुबळ्यांच्या मनांत.

मलाही झालाय नकोसा
ह्या मंदिरातला थाट.
गरिबांच्या रुपात तुझी
मी बघत राहीन वाट.
मी बघत राहीन वाट.
[6/3, 10:20 PM] Smj Bhand__Mangala Dahake Bhandara: ।। बळीराजा ।।

जगाला भरवी घास,
नाही कशाची आस ।
घामातून पिकवी मोती
      माझा बळीराजा ।।

नभाकडे नजर रोखून,
घेई नक्षत्रांचा अंदाज ।
ढवळ्या,पवळ्या सोबत,
       माझा बळीराजा ।।

नैसर्गिक संकटाचा,
सदैव करीतो सामना ।
ऊन, पाऊस झेलत ,
      माझा बळीराजा ।।

रणरणत्या उन्हात,
धो,धो पावसात ।
राबतो शिवारात,
       माझा बळीराजा ।।

नाही कपड्याची शान,
नाही शामियाना मान ।
राखी मातीशी ईमान,
     माझा बळीराजा ।।

शिवार पिक पाहून,
ठरे चेहर्‍याच्या लहरी ।
घरी आणतो रास,
     माझा बळीराजा ।।

सर्वांचे आयोग ठरे,
सर्वांचे गुणगाये शासन ।
"स्वामिनाथन" चे करते काय?
वाट पाही।।
      माझा बळीराजा ।।

सौ. के. बी. सार्वे  भंडारा.

दिनांक 26/05/2020
विषय- स्वरचित चुटकुले

[6/4, 11:10 PM] Smj Bhand__Mangala Dahake Bhandara: गुरुवारचे आध्यात्मिक महत्व --
गुरुवार म्हणजे साधला
असे तो गुरूंचा वार
दया, क्षमा, शांतीचा
संदेश देऊन विश्वमभर ।।
गुरुवार--उष्ट्या पत्रावळ्या तील
      खाऊन होती तृप्त
झुणका भाकर करुनी
गजानन भक्तीने ,आनंदी भक्त ।।
गुरुवार--स्वामी समर्थ
    करुणा करा, दयेच्या सागरा
ध्यानसाधना देई वर मज
परमेश्वरा चरणी ठेवून माथा
धैर्याचे मागणे मागते तुज ।।
गुरुवार--मार्गशीर्ष मासातील
    गुरुवार, दत्तगुरूंचा वार
महालक्ष्मी वसे तिथे
पूजती सारे हृदयभार ।।
गुरुवार असे संतांचा वार
गुरुवार असे भक्तीचा वार
गुरुवार असे लंघन वार
गुरुवार असे मायछत्र वार ।।
          मंगला डहाके, भंडारा


दिनांक 26/05/2020
विषय- स्वरचित चुटकुले
6/5, 9:44 PM] Smj Bhand__Mangala Dahake Bhandara: उखाणे---
   1-आसमंताच्या धारा, धरतीवर बरसल्या
रावांच्या सहकार्याने, यशाच्या वाटा गवसल्या ।।
2- साहित्याचा आगळा वेगळा, आहे मला छंद
रावाना सुखी ठेवणे, हाच ध्येयगंध।।
3- अंगणातील वृक्ष वेली, आनंदाने घेतात झोके
झिंगरराव वाढदिवसाला, मला देतात मोठा बुके ।।
4- झाडांवरील चिमण्यांचा, सकाळी असतो चिवचिवाट
झिंगररावाचं प्रोत्साहन, हीच माझी प्रकाशवाट ।।
5- काव्यसंग्रह निघाला माझा,नाव आहे कोंदण
झिंगररावांच्या हृदयावर, गोंदल विश्वासाचं गोंदण ।।
          मंगला डहाके, भंडारा
[6/5, 9:44 PM] Smj Bhand__Mangala Dahake Bhandara: 🌳 *वटपौर्णिमेनिमित्त उखाणे*🌳

१)हळद वाहते,कुंकू वाहते,वडाची पूजा करते,आंबा गव्हाची ओटी भरून,
सोपनरावांच नाव घेते तुम्हा सर्वांचा मान राखून🙏🏻🙏🏻.

२)वडाच्या वनाजवळ नाग-नागिणीची वस्ती,
सोपानरावांना आयुष्य मिळो माझ्यापेक्षा जास्ती.

३)वटपौर्णिमेनिमित्त वसा घेते सत्यवान सवित्रीचा,
सोपानरावांबरोबर संकल्प करते वृक्षसंवर्धनाचा🌳🌱.

४)सोपानरावांच्या आयुष्यासाठी वडाला फेऱ्या मारते सात,
वडाप्रमाणे कुटुंबावर सावली असावी हीच मागणी देवाजवळ आज🙏🏻🙏🏻.

                       सौ.प्रतिभा सोपान वाठ
                       अकोला
                       दि. 05-06-2020
[6/5, 9:44 PM] Smj Bhand__Mangala Dahake Bhandara: 🌳🌳वटपौर्णिमा🌳🌳
सावित्रीने यमाकडे मागितले
सत्यवानाचे प्राण.
आपण सदैव घेऊ या
वृक्षसंवर्धन करण्याची आण.
वटपौर्णिमा आठवण
करून देते वचनांची
आज कोणी हमी देईल
मानवाच्या जीवनाची.
वटपौर्णिमा सणानिमित्त
लळा लागला वृक्षराज
वृक्ष तोड करणाऱ्यांना
धडा शिकवूया आज.
वडा ,आंबा,चिंच, पिंपळ
दिर्घायुष्यी झाडे
पर्यावरणाचं समतोल राखण्या
वाढवू या सगळीकडे.
आज नाही केले आपण
वृक्ष संवर्धन.
नस्तनाबूत होईल
मानवाचं पृथ्वीचं जीवन
वटपौर्णिमा एक परंपरा
वृक्षारोपणानं करुया सण साजरा.
वटवृक्षाला बांधूनी धागा
हरीत धरा सदैव असू दे, असं वर मागा .
आंबा वाहू या वट पूजेत
तरुराजी वाढवू जगू या मजेत
ओटी भरूया देऊनी गहू
आजीवन पर्यावरण रक्षणार्थ वाहू.
      सौ.मीरा नरेंद्र शेबे भंडारा.
[6/5, 9:46 PM] Smj Bhand__Mangala Dahake Bhandara: ‌‌     🌳उखाणे🌳
१) वडाचं झाड लाविले अंगणी
रोज घालते तांब्याभर पाणी
वृक्षारोपण करून सण साजरा करते, नरेंद्र रावांची राणी.
२) वटवृक्षाला बांधला चिरेबंदी ओटा.
नरेंद्र रावांचा मान चारचौघात मोठा.
३)सत्यवान सावित्री ची जोडी शोभे भूवनी
अखंड सौभाग्य असावं नरेंद्रराव माझ्या जीवनी.
४) सावित्रीने यमास मागितलं सत्यवानाचं प्राण,
मागणं मागेन नरेंद्ररावां सोबत,
सदैव असूदे हिरवं रान.
५)गडद सावली वटवृक्षाची
कायली कमी करते उन्हाची,
पूजा बांधूनी. वृक्षराजी ,कामना करते नरेंद्र रावांच्या दिर्घायुष्याची.
   सौ.मीरा नरेंद्र शेबे भंडारा.
[6/6, 9:46 PM] Smj Bhand__Mangala Dahake Bhandara: ।। जगावे कशासाठी ।।

मातेच्या या ऊदरातून।
मिळाला हा नजराणा ।
तिलाच समर्पित करावा।
हा नजराणा।
जगावे तिच्याचसाठी ।।

करावे नामस्मरण प्रभुचे।
त्रिभुवनी नाम जयाचे ।
श्रृणबंध फेडीत जावे ।
भूवरी सर्वांचे।
जगावे त्याच्यांचसाठी ।।

दीनदुबळ्यांना दयावा आधार।
भुकेल्यांना दयावे अन्रपाणी ।
सर्वच जगती वितभर ।
पोटासाठी।
    जगावे त्यांच्याचसाठी।।

खळखळूनी हसावे।
भडभडूनी रडावे ।
क्रोधावर सयंम।
प्रेम अर्पावे।
जगास ।
जगावे प्रेम वाटण्यासाठी ।।

सौ. कमल सार्वे भंडारा.

दिनांक 26/05/2020
विषय- स्वरचित चुटकुले

6/6, 9:46 PM] Smj Bhand__Mangala Dahake Bhandara: ‌    ✍️जगावे कशासाठी?✍️
जगण्याचे नसावे मापदंड
सर्व सजीवांना आयु लाभो उदंड
सकलांवर प्रेम करावं प्रचंड
हा प्रेमाचा झरा वाहतो अखंड
नको व्यवहार पाखंड
त्यासाठी जगावे आकंठ.

माय बाप देव अन् गुरू
कोणासही नको अंतरू
बुडत्या जीवास आवरू
पडत्या पंगुस सावरू
आपण भूई चे लेकरू
हे कधी नको विसरू
त्यासाठी जगावे स्मरू.

नको कुणाचा द्वेष भारी 
मत्सर,क्रोध, अविचारी
मानव जन्म लाभला भूवरी
पाहावे समान पशू,पक्षी,नर,नारी
करावी सेवा जमेल त्या परी
त्यासाठी जगावे सर्वोत्यापरी.

हिन,दिन,लाचार, जाणूनी
घालावा कवळ त्या वदनी
पुसावे अश्रू गळती नयनी
त्यासाठी जगावे तुम्हा स्मरावे अवनी.
     सौ.मीरा नरेंद्र शेबे भंडारा.
[6/6, 9:46 PM] Smj Bhand__Mangala Dahake Bhandara: 💐जगावे कशासाठी ? 

जगावे मी कशासाठी ? 
हा प्रश्न माझ्या ओठी .
जन्म -मरणाच्या कुणी , 
कशा बांधल्या या गाठी ? 

प्रश्न मनाशी पडता 
मन झाले सैरभैर .
उत्तराच्या शोधासाठी 
शोधी हृदयाचे घर .

जगायची वाट आता 
ज्याने त्याने शोधायची .
जगायचे कशासाठी ? 
उत्तरे ती शोधायची .

आला आतून आवाज 
व्हावे माणूस आपण .
द्यावा आकस फेकून 
प्रेम करावे जतन .

स्वतःसाठी जगणारे 
कोष घेती गुंडाळून .
घर आहे त्याच्यासाठी , 
डबक्याचे आवरण .

शेणामधला हा किडा 
शेणातच मरणार .
जगायचे कशासाठी ? 
प्रश्न नसे उरणार .

आहे आपले जीवन 
महाभारता समान .
कर्तव्याशी जागणारा 
होऊ अर्जुन आपण .

स्वतः जगता जगता 
देशासाठी जो जगतो 
ध्येय ठरलेले त्याचे 
देही आनंदे डोलतो .
💐💐💐💐💐
सुभाष धांदे , यवतमाळ .
दिनांक :06/06/2020
[6/6, 9:46 PM] Smj Bhand__Mangala Dahake Bhandara: जगावे कशासाठी

जगावे कशासाठी,
शिकवून जाई सृष्टी आम्हासी ।
तप्त होई स्वतः सूर्य,
जीवन देई जीवभुतास ।
नाही कोणता भेदभाव ।
सरिता वाही सर्वदूर ।
शितल जल देई,मागेल त्यास ।
मागे वळून न पाहे कुणास,
हेच अध्यात्माचे सार।
घेणे स्वार्थ,तर देणे परमार्थ ।
पाप पुण्याचा नाही विचार ।
दुसऱ्यांचे होऊन जगावे,कुणा न दुखवावे,
हसावे आणि हसवावे ।
जातांना इतरांच्या हृदयी वसावे ।
फुलासारखे काट्यातून फुलावे,
सुगंधापरी दरवळावे

                       सौ.प्रतिभा सोपान वाठ
                       अकोला
                       दि. 06-06-2020

दिनांक 26/05/2020
विषय- स्वरचित चुटकुले

[6/7, 10:30 PM] Smj Bhand__Mangala Dahake Bhandara: बाहुलीचे लग्न

चला, चला लगीनघाई ,
आज माझ्या बाहुलीचे लगीन बाई .
सनई चौघडा हिरव्यामंडपी ,
हार फुलांचे दारी सडे,वाजंत्री वाजती चहुकडे .
आजोबा -आजी ,मामा-मामी काका-काकु ,
आत्या मावशी सारे ,बहिण भाऊ 
आणिकही येती सगे सोयरे ,
बघा ना हो ,जरा त्यांकडे !
बाहुली माझी एकुलती एक ,
जावाई मिळाला लाखात एक .
दिसायला सुंदर, नोकरी छान ,
बंगला-गाडी ,शेतीवाडी, घरचे सगळे संस्कारी .
बाहुली माझी कशात  नाही मागे ,
रूप, शिक्षण सगळ्या कामात पुढे .
जोडीला जोड मिळाला छान ,
आभाळहि वाटे ठेंगणे आज .
 कुठेच आम्ही कमी ना ठेवली ,
वऱ्हाड्यांचे स्वागत, मानपान,
जेवणाचा तर, विचारु नका घाट .
नटणे-मुरडणे, सगळ्यांचा मोठा थाट .
सगळी कशी झाली झकपक तयारी ,
 पण आई बाबांची का नाराज स्वारी .
बाहुली जाईल तीचे घरी ,
पाठवणी करायची केली घाई .
आठवणी तिच्या साठविल्या मनात ,
चटकन पाणी आले डोळ्यात .


                       सौ.प्रतिभा सोपान वाठ
                       अकोला
                       दि. 07-06-2020
[6/7, 10:30 PM] Smj Bhand__Mangala Dahake Bhandara: बाहुलीचे लग्न (२)

बाहुलीच्या लग्नाला सतराशे विघ्न ,
करोनाचे संकटात ,लग्न आगळ वेगळ . 
मुलाकडल्यांनी केली घाई , तयारीला लागले बाबा-आई .
SOCIAL DISTANCING चे करून पालन ,
लग्नासाठी अवघे 50 जण .
बाहुलीचे लग्न HI-TECH झाले ,
सनई चौघड्यां ऐवजी घरचेच DJ आले .
सगळ्यांनी घेतली विशेष काळजी ,
तोंडाला MASK आणि SANITIZER भारी .
घरच्याघरी जेवणाची तयारी ,
खाऊन पिऊन खुश झाले वऱ्हाडी .
साध्या सरळ पद्धतीने झाले लग्न ,
वेळ वाचला,वाचला पैसा ,
पैशाचे योग्य नियोजन करू .
हीच पद्धत आपण रुजवू .
जुन्या रूढी मोडीत काढू .
नव्या गोष्टींचा अवलंब करू .
सुखी संसाराचा आशिर्वाद देऊन ,
त्यांच्या प्रगतीला हातभार लावू .

                       सौ.प्रतिभा सोपान वाठ
                       अकोला
                       दि. 07-06-2020
[6/7, 10:30 PM] Smj Bhand__Mangala Dahake Bhandara: बाहुलीच लग्न--
आषाढ मास आला
लागते हुरहूर मनाला
नवीन लग्न झालेल्या
त्या ललयेला ।।
    झाडांच्या पारंब्याचे
मन झोके घेते
आपल्या बाहुल्यांचे
लग्न मस्त लागते ।।
    मैत्रिणींचा तो
खेळ बाहुल्यांचा
तुझी बाहुली, माझा
बाहुला,एकच विषय चर्चेचा ।।
    दिन उगवतो लग्नाचा
हलकेच सजवून बाहुली
आईची साडी नेसून
उगाच मंडपी लाजली ।।
चुरमुर्यांचा भात अन
तुळशीच्या पानांची भाजी
बाबांनी आणले चिरंजीचे दाणे
हळूच ठेवते आजी ।।
मंगलाष्टक म्हणतो दादा
साऱ्यांची असते घाई
बाबा चिडवतात मेंदीसाठी
गाल फुगवून बसते ताई ।।
   काका म्हणतात चला चला
जेवण वाढा पानावर
मिठीत येते ताई
खळी उमटते गालावर ।।
   साऱ्या आठवणींचा महिमा
आषाढीतच दडला
हृदयाचा एक कप्पा 
कसा काय उघडला ।।
सासरी गेल्यावर तिला
बाहुलीच्या लग्नाची झाली आठवण
पतीच्या घट्ट मीठी तही
माहेरची गोड साठवण ।।
--------------------------------
          मंगला डहाके, भंडारा
[6/7, 10:30 PM] Smj Bhand__Mangala Dahake Bhandara: बहुलीच लग्न ---
       आमच्या बहुलीच लगीन
   वऱ्हाडी कोण कोण ।।
तोऱ्यात आली आई
छोटी वरमाई
मंडपी येऊन
केली लग्नाची घाई ।।
तावातावाने म्हणाला आजा
माझ्या नातीच्या बहुलीच लग्न
मी वाजवून बाजा
होईन कामात मग्न ।।
ठुमकत ठुमकत आली आत्या
दिला तिनं आहेर
म्हंटली ,मी करते पात्या
गोड माझं महेर ।।
मान डोलत आला मामा
पाणी देई साऱ्यांना
रुसवा, फुगवा नसे
तो सांभाळी वऱ्हाडयाना ।।
चला चला लग्न लावू
आहे कुठे नवरदेवाची आई
येताच ती लागले लग्न
डोळा भरून सुनेला पाही ।।
लगीन लागले
बहुलीच मस्त
पोटात कोकलले कावळे
जेवण क्षणात केले फस्त ।।
माझा बाहुला,तुझी बाहुली
भांडू लागल्या मुली
भांडण सोडवण्यासाठी 
आई बाबांनी मध्यस्थी केली ।।
------------------------------------
           मंगला डहाके, भंडारा
[6/7, 10:30 PM] Smj Bhand__Mangala Dahake Bhandara: ।। बाहुलीच लग्न ।।

माझ्या बाहुलीच लगीन बाई।
आषाढाच मुहूर्त बाई,
आताच ऊरकवू या,आताच ऊरकवू या।।

माझ्या बाहुलीच लगीन बाई।
हिरवा मंडप दारी सजला,
सनई,चौघडा वाजू लागला।
वाजत गाजत वरात आली,
माझ्या बाहुलीच लगीन बाई।।

बाहुली माझी गोरी पान,
शिक्षण,संस्कार आहे छान,
संयुक्त कुटूंबाचा ठेवील मान।
बाहुली माझी घराची शान।।
    माझ्या बाहुलीच लगीन।।

बाहुला आला नटून भारी।
पांढर्‍या घोड्यावर आली स्वारी।
काळ्या चश्मयातून नजर चौफेरी।
माझ्या बाहुलीच लगीन बाई।।

माझ्या बाहुलीच लगीन बाई!
वर्हाडी कोण कोण।।
मीरा,प्रतिभा,जयश्री,प्रिया, नंदा
आपल्याच तालात।
सुभाष,दशरथ,मंगेश,ओम गजानन
भलत्याच तोर्‍यात।
विहीण माझी मंगलाबाई,
आपल्याच थाटात।
ओवाळते यांना मी बी.के.च्या
वाड्यात।।
माझ्या बाहुलीच लगीन बाई।।

अंतरपात धरी सुभाषदादा,
मंगलाष्टक गाई अतकरीदादा
मंगेश वाटी अक्षदा।
बोला शुभमंगल सावधान।।

सौ.के.बी.सार्वे भंडारा.

आज लगीन घाईत मला बरोबर जमली नाही.वराड्यांनी नाराज होऊ नये.

[6/8, 9:39 PM] Smj Bhand__Mangala Dahake Bhandara: आवडत्या पक्षाची चारोळी---
       चिमणी---
झाडावरी चिमण्यांचा थवा
गोंधळ, किलबिलाट करुनी
येती दाणे खाया
चोचीतले पिलास देऊनी ।।1

दोरा, कापूस, काड्या
चिमणा चिमणी गोळा करती
अपुले घरटे बांधण्या
जिद्दीने कामा लागती ।।2
--------------------------
     मंगला डहाके, भंडारा
[6/8, 9:39 PM] Smj Bhand__Mangala Dahake Bhandara: आवडत्या पक्षाची चारोळी--
      मोर ---
कडकडाट हा विजांचा
गडगडाट हा ढगांचा 
आसमंताच्या धारा बघता
थुई थुई नाच तो मोरांचा ।।1
इंद्रधनुचा नयनरम्य पंखा
विविध रंगानी नटला
मयुराचे थुई थुई नाच बघता
क्षितिज मनोहर सजला ।।2
--------------------------------
       मंगला डहाके ,भंडारा
[6/8, 9:39 PM] Smj Bhand__Mangala Dahake Bhandara: ।।आवडत्या पक्ष्यांच्या चारोळ्या।।

१.मोराचा पिसारा पाहुन,
  प्रियेशी झुरते मनान,
  सावरु कसा मी
  निसर्गाच देण ।

२.लहाणशा घरट्यात,
चिमणी जागा देई।
तेही घरटे माणूस,
फेकाया नेई।।

३.कोकीळ साद घालतो,
कोकीळा मनी हर्षते ।
बघवेना प्रेम मानवा,
वृक्षावर घाव घालतो ।।

४.राघो म्हणे मैनेला,
चल जाऊ रानाला।
मैना म्हणे नाही,
पाहील तो आपल्याला।।

सौ. के. बी. सार्वे भंडारा.
[6/8, 9:39 PM] Smj Bhand__Mangala Dahake Bhandara: मैत्री

मैत्रीच एकच झाड
लावलं होतं दारी
खुप पारंब्या फुटल्या त्याला
दिसतंय लय भारी

खत नाही पाणी नाही
वाढत गेलं आपोआप
नाजुक नाजुक शब्दाने
बहरलं कसं छान

जिव्हाळयाच खत त्याला
सारखं  सारख घालत होते
फोनच्या माध्यमातून 
पाणी त्याला मिळत होते

एकमेकांच्या सहवासाने
वाढलं अगदी छान
माझ्या दारी मैत्रीच
झाड आहे याचाच मला अभिमान

सौ नंदा  भोयर
[6/8, 9:39 PM] Smj Bhand__Mangala Dahake Bhandara: चारोळी

कोकीळा
घनदाट वनराई मध्ये
गान तुझं ऐकावं
मन माझं थुद व्हाव
मला मी विसरून जावं
वेडयापरी तु
भुरळ मला घालावी
या फांदीवरून त्या
फांदीवर उडून तु जावी


चिमणी

चिव चिव चिमणी
अंगणामध्ये ये 
बाळाला माझ्या
तुझ्या सोबत खेळु दे

चपळ तु किती 
तुला वाटते भिती
पटकन दाना टिपून 
भुर्र उडून जाती
[6/8, 9:39 PM] Smj Bhand__Mangala Dahake Bhandara: 🦚मोर

1.मोराचे सौंदर्य अपार दिसे मोरपिसावर .
कधी शोभे मुकुटावर हरीच्या ,
कधी बासुरीवर .
कधी फिरे अंतरी मनीच्या , होऊनि कुणाची आठवण.

2.सौंदर्य खुलवी गालावरी ,
घालिता नक्षीदार पैठणी .
पदरावरती फुलवी पिसारा नाचता मोर
मनही नाचे घेऊन गिरकी आनंद विभोर.
-----------------------------------------------------------------------

कोकीळ

1.कोकीळ गातो गीत मधुर
वसंत ऋतूत ,
आंबाहि मोहोरून फुलतो ,
ऐकून तयाची तान .

2.सृष्टीचे आगळेपण
कुणा ना दिले पूर्णत्व .
सुंदर न दिसे कोकीळ जरी ,
कुहुकूहु गीत मोहविते मन .

                       सौ.प्रतिभा सोपान वाठ
                       अकोला
                       दि. 08-06-2020
[6/8, 9:39 PM] Smj Bhand__Mangala Dahake Bhandara: 1) प्रेम द्यावे प्रेम घ्यावे 
आपुलकिचे नाते जपावे 
एेकमेकांस सहाय्य करावे 
म्हणुन जगाला प्रेम अर्पावे
     🌷🌱 🙏🌷🌱
*यशस्वी हाेण्याकरीता* 👇

1) तेरी मंज़िल बडी लंबी है। 
काटाें काे पार करके जाना है। 
बस, तु हौंसला रख मेरे बंदे। 
तुझे कामयाब बनके ही आना है। 

2) स्वप्नांच्या दिशेने धरावा अट्टहास 
क्षणाेक्षणी जपावे मनी ताेची ध्यास 
स्वप्नपुर्तीची योद्ध्याने धरावी हि आस 
कारण प्रत्येकाला बनवले आहे परमेश्वराने खास. 

- *प्रिया गाेमाशे* 
*(आकाशवाणी नीवेदीका), चंद्रपूर*
[6/8, 9:40 PM] Smj Bhand__Mangala Dahake Bhandara: नंदा भोयर
[6/8, 9:45 PM] Smj Bhand__Mangala Dahake Bhandara: मैत्री

मैत्रीच एकच झाड
लावलं होतं दारी
खुप पारंब्या फुटल्या त्याला
दिसतंय लय भारी

खत नाही पाणी नाही
वाढत गेलं आपोआप
नाजुक नाजुक शब्दाने
बहरलं कसं छान

जिव्हाळयाच खत त्याला
सारखं  सारख घालत होते
फोनच्या माध्यमातून 
पाणी त्याला मिळत होते

एकमेकांच्या सहवासाने
वाढलं अगदी छान
माझ्या दारी मैत्रीच
झाड आहे याचाच मला अभिमान

सौ नंदा  भोयर
[6/9, 10:08 PM] Smj Bhand__Mangala Dahake Bhandara: 🤤आवडत्या खाद्यपदार्थाच्या चारोळ्या:

बासुंदी
बासुंदीचा नखरा भारी,
काजुबदाम किसमिस चारोळी,होईना तिची पूर्ण तयारी.
जायफळ विलायची सुगंधकारी,
खाणारा म्हणतो लय भारी!!!👌🏻👌🏻

कांदा-भजी
नैवैद्य असो वा पाहुणचार,
ज्याशिवाय होत नाही पूर्ण पान.
पहिला पाऊस असो वा टाईमपास,
कुरकुरीत कांदा-भजी लज्जतदार.🤪🤪

                       सौ.प्रतिभा सोपान वाठ
                       अकोला
                       दि. 09-06-2020
[6/9, 10:08 PM] Smj Bhand__Mangala Dahake Bhandara: *चारोळी*
पुरणपोळीची अलगच तऱ्हा 
पाहूण्यांना पाहूणचार हाच खरा
पुरणपोळीचा थाट आहे न्यारा
तुपा सोबत असतो तीचा नखरा


            ‌शिरा
रवा आणि तुप
एकजिव होतात
शिरा म्हणून
आवडीने खातात
मग तो मीच तर आहे शिरा
देवाच्या प्रसादाला माझाच मान खरा 

              सौ नंदा भोयर
[6/9, 10:08 PM] Smj Bhand__Mangala Dahake Bhandara: आवडता पदार्थ----
           श्रीखंड
          -----------
श्रीखंडाचा बेत आगळा
जायफळ विलायचीचा सुगंध
बदामाचे काप घातले की
श्रीखंड पुरी खाण्यात व्हावे बेधुंद।।
--------------------------------
2--- पुरणपोळी--
    ----------------
गरम गरम पुरणपोळी
वरून तुपाची धार
मिटक्या मारीत खायला
मला आवडते फार ।।
----------------------------
       मंगला डहाके, भंडारा
[6/9, 10:08 PM] Smj Bhand__Mangala Dahake Bhandara: आवडीचे पदार्थ चारोळी

उन,उन खिचडी
साजूक तूप
पापड लोणच
खायच सुख।।


केळीच कालवण
दुधाची धार
हटके खाण्याची
मजाच फार।।

रस्सा मटणाचा
पानगे सोबतीला
शिवारातील जेवणाच्या
बसा पंगतीला।।
(रास जेवण)

सौ. के.बी.सार्वे भंडारा.
[6/9, 10:10 PM] Smj Bhand__Mangala Dahake Bhandara: सोहळा सुखाचा✍️✍️
चिमणा चिमणी दोघे घरट्यात
पिलांचा करी सांभाळ
दूर उडून आणी चारा
भरली इवल्याशा चोचीत.
मन विभोर होऊन जाई
पाहुनी सोहळा सुखाचा.

हंबरती वासरे धेनुस्तनपानाला
हंबरत येई माय चाटी वासराला
दुग्ध प्राशन करता वर करी शेपटी
वात्सल्याने गाय वासरा चाटी.
हृदयी झंकार क्षण तो मायेचा
पाहुनी सोहळा सुखाचा.

हरीत तृणाच्या मखमलीवर
तृण सुमनांचा नाच वाऱ्यावर
इवले इवले फुलपाखरे त्यांवर
क्रिडा करीती उडून जातील
नयन सुख देऊन जाई
पाहुनी सोहळा सुखाचा.

रिमझिम बरसती श्रावणसरी
खग सावरूनी पंख  तरुवरी
अवचित येती रवी किरणे भूवरी
इंद्रधनू रंग उधळी निलांबरी.
नजारा हा सारा निसर्गाचा
पाहुनी सोहळा सुखाचा.

    सौ.मीरा शेबे भंडारा.
[6/10, 8:42 PM] Smj Bhand__Mangala Dahake Bhandara: माझी आवडती कवयित्री
   🙏बहीणाबाई🙏
अडाणी अशिक्षित असूनही
तिची समज मोठी
जे भल्या भल्याला कळलं नाही
ते सहज सोपं तिच्या ओठी
रोजच्या जीवनातील साध्या घटना
खानदेशी बोलीत मर्म संवेदना
उलगडले हळूच कितीतरी पदर
मानवाला करून टाकले निरुत्तर.

मानवाच्या जगण्याचे 
नियम आणि मार्ग
अनुसरण करून मिळवा
पृथ्वी वरील स्वर्ग
भाषा साधी सोपी होई
पण मनाचा ठाव घेई.
अशी माझी बहीणाबाई
मनाची लिलया सांगून जाई.

सौ.मीरा शेबे भंडारा.
[6/10, 8:42 PM] Smj Bhand__Mangala Dahake Bhandara: *चारोळी*
माझी. आवडती कवयत्री
मंगलाताई डाहाके
   
साधी सरळ ताई
शिक्षणाचा गर्व नाही
प्रत्येकाला स्फुर्ती देई
अशी आमची ताई प्रीय मंगलाताई
[6/10, 8:42 PM] Smj Bhand__Mangala Dahake Bhandara: ।।जागतिक दृष्टीदान दिनानिमित्त।।

दान कर ते दृष्टिचे।
पाहण्या रंग सृष्टिचे।
समजून घे भावना।
नेत्रहिनांच्या वेदना।।

    मेल्यावर येई कामा।
    कर पुण्य काही तरी।
    बन अंधाचा कैवारी।
    पाहू दे दुनिया सारी।।

       नजरेचा नजराणा।
       दृष्टिहिनांना दिलासा।
       बघ कर्तव्य पूर्तीचा।
       आनंदाचा तो जलसा।।

सौ के.बी.सार्वे भंडारा.
[6/10, 8:42 PM] Smj Bhand__Mangala Dahake Bhandara: नेत्र दान--श्रेष्ठदान
---------------------
देवाने हरित सुंदर
सृष्टी निर्माण केली
सजीवा आनंद लहरी
घेण्या दृष्टी दिली ।।

दृष्टीतच सारी 
किमया लपते
हृदयाचे तरंग 
नेत्रीच उमगते ।।

हसणे रडणे सारे
चक्षुत दडते
आनंदाचे वारे ही
पापण्यातून वाहते ।।

माणूस जीवनाचे आहे
डोळे महत्वाचे अंग
अंधारात राहून उपभोगत
नाही आनंद तरंग ।।

पण जे जन्म अंध
काढती कसे जीवन
सूर्य, चंद्र, तारे काळोख
समान, जाणूया आपण ।।

आता करूया
प्रतिज्ञा सारे
नेत्र दान करुनी
वाहती प्रकाश हर्षाचे वारे ।।

नेत्र दान हेच
आहे श्रेष्ठ दान
अंधार दूर सारून
राहील प्रकाशाचा मान ।।
--------------------------------
        मंगला डहाके, भंडारा
[6/10, 8:42 PM] Smj Bhand__Mangala Dahake Bhandara: माझा आवडता कवी--
              सुरेश भट
कवी भट सुरेशा, ऐकले मी
तुला असेही जगावे लागले
अरे तू दुःख इतके भोगले
त्यालाच सुख म्हणावे लागले ।।
-----------------------------------
   कुसुमाग्रज----
लाडके कवी कुसुमाग्रज
महाराष्ट्राच्या कवितेचा कणा
अनमोल नजराणा दिला
पाठीवर हात ठेवून फक्त लढ म्हणा ।।
           मंगला डहाके, भंडारा
[6/10, 8:42 PM] Smj Bhand__Mangala Dahake Bhandara: ।।चारोळी ।।

माझी बहिणाई अशिक्षित,
अंधश्रद्धा मोडुन काढी,
लेखणीतून ।
शहाण करी समाजमन।।

ज्ञानेश वाकुळकरांच्या,
त्या लेखणीतून।
गदगदुन जातो हृदयाचा,
तो प्रत्येक कप्पा ।।

सौ.के. बी. सार्वे भंडारा.
[6/10, 8:42 PM] Smj Bhand__Mangala Dahake Bhandara: आवडत्या कवयित्री (चारोळ्या)

बहिणाबाई
बहिणाबाई म्हणजे,नाही पुस्तक नाही शाळा,
कवित्व जीचे "सुगरणीचा सुंदर खोपा"
शब्द जीचे चटका देणारी "तव्यावरची भाकर "
'मन वढाय वढाय' म्हणत देई माणुसकीचा पाठ.

शांता शेळके
बाल मनात डोलणारी,स्त्रीमनात फुलणारी ,
शब्दांची जणू साखर पेरणी करणारी.
ज्यांच्या रचना ''नाखव्यावानी वल्हवनारी नाव'' ,
शांता शेळके असे त्यांचे नाव.

                       सौ.प्रतिभा सोपान वाठ
                       अकोला
                       दि. 09-06-2020
[6/11, 8:59 PM] Smj Bhand__Mangala Dahake Bhandara: 🌹माझे दोन बाबा.🌹
लहानपणी दिला मला
सन्मान ज्यांंनी ,ज्यांंच्या
पोटी जन्म ले मी
ज्यांंनी दिली ओळख मला
त्या माझ्या जन्मदात्याला
साष्टांग नमस्कार माझा.
ज्यांंनी झिझविले उंबरठे
सुखासाठी आमच्या
त्या देवरूप पित्याचा
अभिमान आहे मला..
संर-काराची बांधून शिदोरी
ध्याडीले ज्यांंनी सासरी
दमलेल्या हातांनी सोपविले
पित्यासम सासर-याचया हाती...
एक पिता जन्म दाता
दुसरा पिता सौख्य दाता
स्त्री जन्मा येणे वाटते
गत जन्माची पुण्याई मला...
🙏🙏🙏🙏🙏🙏🙏




  🌹माझे दोन बाबा.🌹
लहानपणी दिला मला
सन्मान ज्यांंनी ,ज्यांंच्या
पोटी जन्म ले मी
ज्यांंनी दिली ओळख मला
त्या माझ्या जन्मदात्याला
साष्टांग नमस्कार माझा.
ज्यांंनी झिझविले उंबरठे
सुखासाठी आमच्या
त्या देवरूप पित्याचा
अभिमान आहे मला..
संर-काराची बांधून शिदोरी
ध्याडीले ज्यांंनी सासरी
दमलेल्या हातांनी सोपविले
पित्यासम सासर-याचया हाती...
एक पिता जन्म दाता
दुसरा पिता सौख्य दाता
स्त्री जन्मा येणे वाटते
गत जन्माची पुण्याई मला...
🙏🙏🙏🙏🙏🙏🙏


  सौ जयश्री रेहपाडे.
   नागपुर.
[6/11, 8:59 PM] Smj Bhand__Mangala Dahake Bhandara: 🌹चारोळ्या🌹
माहेरचे बाबा
माझे बाबा गजानन
कलांचा खजाना
चित्रकार, संगीत,नट,कवी
वादक-हार्मोनियम,बांसरी,
बुलबुलतरंग,खंजरी
सैन्यात केली नोकरी
अन् गुरूजी होऊन चाकरी.
बहुरंगी व्यक्तिमत्त्वाचे धनी
काळे गुरूजी इमानी.

सासरचे बाबा
रुग्णांची सेवा करण्यात
डाॅ.लक्ष्मणराव सदैव तत्पर.
रात्री अपरात्री धावून जाण्यात
तय्यार असे त्यांचे दप्तर.
अचूक निदान  हमखास आराम
पैसे नसल्यास मोफत सेवा
स्वातंत्र सैनिक होऊन
केली देशसेवा ,हाच ठेवा.

सौ.मीरा नरेंद्र शेबे भंडारा
[6/11, 8:59 PM] Smj Bhand__Mangala Dahake Bhandara: चारोळी

माहेरचे बाबा
वरून फणस आतून गोड गर, दरारा असे घरभर
निरीक्षण अधिकाऱ्याचे त्यांचे पद,मान देती सर्वजण
वाचन,संगीत,बागकामात रमवी मन
स्वच्छता,टापटीप त्यांचे काम,नाव त्यांचे आत्माराम.

सासरचे बाबा
साधी राहणी,उच्च विचार,
हाडाचे शेतकरी,कष्ट अपार,फिरायला जाणे आवडे फार
ओळख त्यांची डोमजी नाव.कधी न दुखवी कुणाचे मन
हास्य त्यांचे,जिंकी सगळ्यांचे मन.

                       सौ.प्रतिभा सोपान वाठ
                       अकोला
                       दि. 11-06-2020
[6/11, 8:59 PM] Smj Bhand__Mangala Dahake Bhandara: माहेरचे बाबा---
मोतीरामजी बाबा माझे, सदा हसतमुख
शांत, प्रेमळ साधा त्यांचा स्वभाव
साधारण स्थितीतही शिकून मुलांनी मोठे व्हावे, हाच हृदयभाव।।
मी 5 वीत असतानाच बाबा गेले
मोठ्या दादानीच आमचे शिक्षण, कौतुक, लग्न केले
समाजापरी कार्य करण्याचे 
धाडसही दिले ।।
---------------------------------
सासरचे बाबा---
 बाबा आमचे हुशार, आणि करारी
शेतावर एक चक्कर लाऊन यायचे
इतक्या मजुरांची इतकी मजुरी
भर्रकन ते सांगायचे
चार चौघात होता त्यांना मान
इसतारीजी नाव त्यांचे, करायचे 
नातलगांचा सन्मान ।।
 ---------------------------------------
        मंगला डहाके, भंडारा
[6/11, 9:01 PM] Smj Bhand__Mangala Dahake Bhandara: चारोळ्या  " माहेर"


होता जन्म धन्य ' दशरथ ' वंश
जपुनी फोडासम दिली शिदोरी संस्काराची.
हुंदके घेता नेत्री धारा अश्रूंची.
धन्य मातापिता वाट सासरची.

         ' सासर'

लक्ष्मी पावलांनी ओलांडता उंबरठा.
झाले अक्षवन संस्कार कुळाचाराचे.
सासर सुखाचे आशिष भगवंताचे
पित्यासम मिळावे सौख्य ' भाऊरावांचे' .

दि.११ जुन२०२०
         .
दशरथ अतकरी, नागपूर
[6/11, 9:01 PM] Smj Bhand__Mangala Dahake Bhandara: ।। माहेरचे बाबा ।।

नाव तयांचे लक्ष्मणराव.
प्रथम प्राधान्य शिक्षणाला,
नौकरापेक्षा मालक बनून
धंदयाला महत्व देणारे,
ईमानेईतबारे स्वकष्टाचे
खाणारे।।

।। सासरचे बाबा ।।
बकारामजी असे तयांचे नाव.
सुनेलाही माझी माय म्हणनारे,
ईच्छामरणाने मृत्युला कवटाळणारे असे ते बाबा।।

सौ,के. बी. सार्वे भंडारा.
[6/12, 9:53 PM] Smj Bhand__Mangala Dahake Bhandara: जीवनसाथी----
---------------
जीवनसाथी म्हणा 
किंवा म्हणा जोडीदार
जीवनात राहतो
घट्ट प्रेमाचा आधार ।।
हात हातात घेऊन
वचन घेतले आयुष्यभराचे
सार्थक करू या जन्माचे ।।
हुशार, जिद्दी,करारी,स्वभाव
त्यांचा, दुखवत नाही कुणाला
गरिबांची भूक, तहान जाणती
हृदयी साथ अंतरीला ।।
सुख दुःखात सदा
असतात माझ्या सोबत
माझ्या चक्षुतील पाणीही
खुपतात त्यांच्या हृदयात ।।
त्यांच्या प्रोत्साहनानेच
गवसली मला प्रकाशाची वाट
त्यांच्या साथीनेच होते
चैतन्याची नवी पहाट ।।
भाग्यानेच मिळतो
आपला जीवनसाथी
दोघे मिळुनी मात करतो
सुख दुःखाच्या लाटेवरती
--------------------------------
         मंगला डहाके, भंडारा
[6/12, 9:53 PM] Smj Bhand__Mangala Dahake Bhandara: ।। जीवनसाथी ।।

जीवनाच्या या वाटेवरती,
असावा सुंदर जीवनसाथी।
    रम्य पहाट,रंगीत रात्री,
    स्वप्न बघावी आयुष्याची।
    सारीपाटाच्या या खेळासाठी,
     असावा सुंदर जीवनसाथी।।

सुखदु:खाचे देणे घेणे,
वाटून घ्यावे उणे दुणे।
गुण दोषांना समजण्यासाठी,
असावा सुंदर जीवनसाथी।।

  विश्वासाला जपण्यासाठी,
  गुजगोष्टीच्या मिलनासाठी।
   संसाराच्या या वेलीला,
   बहरुन न्यावे त्यांच्यासाठी।
    असाव् सुंदर जीवनसाथी।।

जन्मांतरीच्या असतात गाठी,
योगायोगाने होतात भेटी।
निभावून न्याव्या गाठीभेटी,
जगावे एकमेकांसाठी।
 असावा सुंदर जीवनसाथी।।

सौ. के.बी.सार्वे भंडारा.
[6/12, 9:53 PM] Smj Bhand__Mangala Dahake Bhandara: 🌹जीवनसाथी 🌹

सात वचन ,सात फेरे ,
एकमेकांशिवाय दोघेही अधुरे. 
नवे विश्व ,नवे स्वप्न ,
होतील पुरे, जेव्हा मिळेल साथ.

संसार नव्हे नुसती गोडी गुलाबी 
कधी आंबट, तुरट, कडू चव निराळी
 संसार नाही, राजा राणीचा खेळ
 बसवायचा आहे सगळ्यांचा मेळ.

या नव्या वाटेवरती साथ हवी एकमेकांची,
 नाती,विश्वासआणि प्रेमाने जिंकायची.
'अस्तित्व' तुझे मी आणि माझे तू जपायचे,
दुधात साखर होऊन राहायचे.

देऊ एकमेकांना जगण्याचे बळ,
कारण व्हायचे आपल्याला आधारवड.
"जीवनसाथी" म्हणजे एका रथाची दोन चाक,
तू दिवा मी वात.

                       सौ.प्रतिभा सोपान वाठ
                       अकोला
                       दि. 12-06-2020
[6/12, 9:53 PM] Smj Bhand__Mangala Dahake Bhandara: .            जीवनसाथी
बघायला आलास तू मला तेव्हाच मी ठरवलं l
जीवनसाथी म्हणून तुला हृदयात बसवलं l l
संकट येतात पुष्कळ, उदास होत मन l
' मी सोबत आहे ' या वाक्याने निघून जातो क्षणl l
एकाने रुसवे दुसऱ्याने मनवावे यातच आहे मजा l
जोडीला तुझा विश्वास असता नाही कोणती सजा l
जग जरी  विरोधात असलं तरी पर्वा नाही कश्याची l l
कारण माझ्या सोबत आहे माझा जीवनसाथी l l
           रूपाली अमोल बोंद्रे
           भंडारा ह. मू. महाड
[6/12, 10:12 PM] Smj Bhand__Mangala Dahake Bhandara: 🎻जीवनसाथी 🎻

हृदयाच्या अंतरंगी 
मी झाकून पाहतांना , 
दिसले पुन्हा नव्याने 
ते प्रेम प्रकाशतांना .

नशिबाचे द्वंद्व माझ्या 
शमवुन थंड केले .
जीवनसाथीने माझ्या , 
मजला क्रुतार्थ केले .

त्या ' आभाळमायेसाठी ' 
झिजलो असे कितीदा .
त्या तप्त श्वासांमध्ये मी 
भिजलो असे कितीदा .

आयुष्य गोड जगती , 
हा विश्वास पेरतांना , 
संगतीत धुंद झालो , 
सजनीशी खेळतांना .

हळुवार पाहिले मी , 
असे बंध रेशमाचे .
बेधुंद होऊन गातो , 
मी गाणे तिच्या प्रीतीचे .

जगण्याची हौस माझी 
मौजेत पुढे निघाली .
साथीचे हात धरता , 
नशिबी ' पहाट ' आली .

घनघोर संकटांची , 
तमा बाळगू कशाला ? 
' या ' साथीच्या संगतीचा 
हात असता उशाला .

सुभाष धांदे सर 
यवतमाळ 
दिनांक 12/06/2020
[6/13, 9:39 PM] Smj Bhand__Mangala Dahake Bhandara: एकीचे बळ----
    आहे संयुक्त कुटुंबातली 
आहे सुखी घरातली मी
मला कशाची भीती नाही
नातलगांच्या कळपातील मी ।।
जिथे भेद सारून चाले गोपालकाला
सखी त्या गोकुळातली मी
पाहिले मधमाशास एकत्र नांदताना
गोड मध चाखला पोळ्यातला मी।।
एकीचे बळ मुंगीला विचारावे जरा
पाहिला महाल तो वरुळातला मी
बोटे हाताची लहान मोठी
होते समान घास घेता मुखात मी।।
सेतू बांधाया तोकडा खारीचा वाटा
समाजशील आम्ही एकत्र यायचे
संघटन गुण आमचा, मित्र
मैत्रिणीतच ,सुख दुःख वाटायचे।।
स्नेह,जिव्हाळा, विचारांनी 
आपण एकत्र असावे
परस्परांच्या नेत्रात 
परस्परांसाठी पाणी दिसावे ।।
------------------------------------
      मंगला डहाके, भंडारा
[6/13, 9:39 PM] Smj Bhand__Mangala Dahake Bhandara: ।। एकीचे बळ ।।

कर ऐकी,
राख नेकी।
भेद नको,
भाव एक।
दयावा मान,
घ्यावा मान।
एक काडी,
फेक मोडी।
कर गठ्ठा,
लाव दट्टा।
दम लागी,
घाव भोगी।
ऐकी पाळे,
वैरी पळे।
ऐकी तोडे,
खाई जोडे।
भाव खाई,
ऐकी जाई।
ऐकी बळे,
संघ पळे।

(शब्द किमया)

सौ.के. बी. सार्वे भंडारा.
[6/13, 9:39 PM] Smj Bhand__Mangala Dahake Bhandara: 🤝🤝एकीचं बळ🤝🤝
माझी आई म्हणायची,
एक जाईल मरून,
दहा जातील खेळून.
कोणतही काम करायचं
सगळ्यांनी मिळून.
         भरल्या घरात मायेचा वारा
    ‌‌.   ‌. एकल कुटुंब नाही आसरा
          राजा राणीचा संसार छान
        ‌. अडचणी येता होई हैरान.
उमलून पाकळी पाकळी 
सुमन होई कळी
कडी कडी जोडून
बनवूअतुट साखळी.
           थेंब थेंब पाणी वाचवू
           जलाशयात साचवू
           दाणा दाणा पेरू
          कणगी, ‌कोठारं भरू.
 मोजून क्षण क्षण
बणतो इसवीसन
मृत्तिकेचा कण‌ कण
निर्मिती भूवन.
              बोटा बोटांची मूठ
               मुठी मुठीची ओंजळ
               तसे मंचातील सदस्य
                झरा वाहतो झुळझुळ.
एक होऊन राहू
राहू दाटीवाटीनं
समाजाला पुढं नेऊ
नेऊ नेटा नेटानं

      ‌सौ.मीरा शेबे भंडारा.
[6/13, 9:39 PM] Smj Bhand__Mangala Dahake Bhandara: *एकीचे बळ*
एक जुट खुप आहे आमची
नजर नसे वाकडी आमच्यावर कुणाची
शेपटीवर जरी पाय पडला तर
धावून सगळे जावू
एकिच्या बळाचे महत्त्व
जगाला पटवून देऊ

समाजाला एकत्र करू आम्ही
दिशा नविन दाऊ
एकजुटीने राहू आम्ही
एकजुटीने राहू

अन्यायाला वाचा फोडू
समाजकंटकांना फाडून काढू
धैर्याने पुढे जावू
संकटांना तोंड देवू
भांडणतंटे विसरून जावू
एकजुटीने राहू आम्ही
एक जुटीने राहू

             सौ नंदा भोयर
[6/13, 9:39 PM] Smj Bhand__Mangala Dahake Bhandara: एकीचे बळ

थेंब थेंब जोडुन झाली नक्षीदार रांगोळी सुंदर,
हसत खुदकन नक्षी म्हणाली बघ,मी एकीचे बळ.

शब्द शब्द रचुन झाली कथा,कविता,कादंबरी, 
शब्दा-शब्दातील सांगुन जाई बोध,आम्ही एकीचे बळ.

सुर,ताल,लय लेवूनी देई नजराणा गीत सुमधुर,
सप्तसुरांचा मेळही बोले,आम्ही एकीचे बळ.

घर असो वा राष्ट्र,जर जिंकायचे असेल अटळ,
होऊन सारे एकजूट दाखवू,एकीचे बळ.

निर्मिती,नव-निर्माणाची होईल अधिक सुंदर,
एकात्मतेचा संदेश देई,एकीचे बळ.

                       सौ.प्रतिभा सोपान वाठ
                       अकोला
                       दि. 13-06-2020
[6/13, 9:39 PM] Smj Bhand__Mangala Dahake Bhandara: एकीचे बळ
सीमेवर असता माझा सैनिक भेद न बाळगे उरा
माझे देशवासी सुखरूप राहो हाच ध्यास मना

असती राज्य अनेक, विविध असती भाषा
सर्व धावून येतात संकट येती देशा

अभिमान वाटे मजला जन्म घेतला या भूमीवर 
विवध तेत एकता हा आदर्श ठेवला जगावर

भूकंप असो वा पूर होतो आम्ही सगळेच एकत्र 
कोरोना पसरू नये म्हणून जागरूक होऊ सर्वत्र

एकीचे बळ आणखी काय अर्णणावे 
भारताला स्वतंत्र्य करण्यात याचेच योगदान असावे

सौ. रूपाली अमोल बोंद्रे
भंडारा ह. मू. महाड
[6/13, 9:51 PM] Smj Bhand__Mangala Dahake Bhandara: एकीचे बळ

काठयानचि बांधली मोड़ी
कोणी न जाऊन त्यांना तोड़ी
माळी मधले सगळे मोती
शिस्तबद्ध एकत्र असती
मजबूत असेल संगठन
त्यांना घाबरती सर्वजन
कोणी कोणाला न जुमानती
परकियांची आक्रमणे होती
भारतीयांचे दिसता एकीचे बळ
फिरंग्यंना करावा लागला पळ
जे विखुरलेले असती
त्यांचे आरक्षण घेऊन पळती
आता संगठित होवू या
आपली जनगणना करु या

सौ.आर.बी.झंझाड
[6/14, 9:42 PM] Smj Bhand__Mangala Dahake Bhandara: माझी आवडती कविता_
जागतिक रक्तदान दिनानिमित्त.
    ।। रक्तदान ।।
दान रक्ताचे मागण्या,
कोणते करु ऊपाय।
समजून ऊमजेना,
संकट आल्या शिवाय।।

   साधा भोळा समाज हा,
   समजाऊ कशी याला।
   ये बाहेरी गर्तेतुनी,
   लोचने पाही तयाला।।

नवा रुप, नवा गंध,
मिळव रक्तदानात।
दे जिवनदान तया,
कर पूण्य जीवनात।।

   रक्तदान श्रेष्ठदान,
   भविष्याची साठवण।
   प्रसंगी लहान थोर,
   करतील आठवण।।

सौ. के. बी. सार्वे भंडारा.
[6/14, 9:42 PM] Smj Bhand__Mangala Dahake Bhandara: माझी आवडती कविता--पत्र
                              ----------
हाती पत्र येताच
उत्सुकता लागायची
केंव्हा एकदा वाचते
मनाला धुंदीच राहायची ।।

पत्राची मजाच 
वेगळी खूप
पुन्हा पुन्हा काढून
वाचावेत मग ।।

एक एक शब्द
डोळे भरून येई
हृदयाची अस्मिता
अस्तित्व जाणवून देई ।।

कधी भेटणे, शब्दांचे
गहिवरने, नयनांचे
साथ ही जपणे
हृदयापलीकडल्या प्रेमाचे ।।

पत्र वाचून वाचून आपल्या
व्यक्तीला साठवून डोळ्यात
पत्र ठेवायचे पेटीत जपून
अगदी खालच्या कागदात ।।

वाटलं तेंव्हा काढायचं
अलवार हात फिरवून
शब्दांना गोंजारून
पत्र पुन्हा ठेवायचे जपून ।।
---------------------------------
           मंगला डहाके, भंडारा
[6/14, 9:42 PM] Smj Bhand__Mangala Dahake Bhandara: माझी आवडती कविता
        सैनिक
अहोरात्र जीवाचे करून रान
छाताडावर झेलीत गोळ्या
वाचवी अमुचे प्राण.
ठेवी अग्रणी भू-मातेला
निष्ठेनी तत्पर कर्तव्याला
पारखा होतो कुटुंबाला 
पुढेच असतो समराला.
नाही त्याचे हृदय पाषाण
नात्यात गुंतलेले ते मन
मनोमन दिलेले वचन
इमान राखून पूर्ण करी प्रण.
न प्रलोभने बांधती मोह माया
विरोध,क्रोध न थांबवी तया
दिसता शत्रूची नजर वाकडी
शह देई गनिमाला तगडी
बलीदानाची नसे तमा
न मान सन्मानाची कामना
सलाम माझा त्या विरांना
शतशत नमन तयां सन्माना
       सौ.मीरा शेबे भंडारा.
[6/14, 9:42 PM] Smj Bhand__Mangala Dahake Bhandara: *पावसाची सर*

सरीत पावसाच्या
ओलचींब व्हाव
प्रीतीच गीत ओठी
नकळत माझ्या यावं

बेधुंद पावसात
बेधुंद व्हाव
मन भरून हुंदडाव
कधीतरी आपणही लहान व्हाव

गार गार सरींनी
अंग शहारून जाव
मन कसं माझं 
उभारुन यावं

पावसाच्या सरींनी
माझ्याच अंगणी यावं
माझ्या संगे तीने ही
नाचण्यात दंग व्हाव

अलगद कुणी यावं
हातात हात घ्यावा
हळुवार सरींनी 
स्पर्शुनि मज जाव

 ‌‌         *सौ नंदा भोयर*
[6/14, 9:43 PM] Smj Bhand__Mangala Dahake Bhandara: बापू

बापू कुणाची बघताहेत तुम्ही वाट
जरी गर्दी दाट,इथे सर्वांचा वेगळा थाट

कुणी नाही कुणाचा,चढला कळस स्वार्थाचा
त्याग,निष्ठा,आत्मियता,आचार नावाचा
जाती,धर्माची जोडूनीया नाती
अहिंसेच्या मार्गाने घडविली क्रांती

पण,पण....आम्ही भारतीय महान
मिळून सर्वांनी देश,ठेवला गहाण

हत्या,लुट अन डाका बंद केले तुम्ही
सत्य,अहिंसा पदोपदी तुडवतो आम्ही

बघा,बघा कसे बसलो समंजसपणा थाटून
जात,धर्म आणि नेते शांततेने घेतले वाटून 

तुम्हाला तर कोणताच जवळचा नाही वाटला
उगाच सर्वधर्म समभाव तुम्ही थाटला

 कुणी म्हणे बापू मुसलमान प्रिय
कुणी म्हणे बापू हिंदु धर्मीय

उरले बाकी सारे,तेही बोलती न्यारे 
तुम्ही तुमचे बघा,आमचे नेते आम्हा प्यारे 

अहो,तुम्ही शांततेचे पुजारी इतिहासावरी 
कोण वाचेल तो इतिहास भविष्यात तरी

स्वयंरोजगाराचा चरखाही पळवला
नावापुरता स्वच्छता अभियानाचा झाडूच उरला

चढला कुबुद्धीचा पारा आता आम्हा
नोटावरूनही उडवाया लागलो तुम्हा

आधुनिकतेच्या हव्यासात स्वप्न तुमचे तोडले
सर्वधर्मसमभावाचे राष्ट्रही गाडले

जाती धर्मावरून पक्षही आटले
हृदय माणसाचे उभे गोठले

उगीच आशा तुम्ही करू नका
फसवत स्वतःला राहू नका

ठिणगीची शिल्लक तेवढी देर
नाही बसत कुणाचा कुणाशी मेळ

बापू ,जा आता, तुम्ही जा
फक्त इतिहासातच तुम्ही रहा...


विनोद शं तीरमारे  अमरावती 9422915786
[6/14, 9:43 PM] Smj Bhand__Mangala Dahake Bhandara: माझ्या आवडत्या ४ओळी
किती शुरांनी त्रास घेतला देशासाठी
पहा हसूनी फास घेतला देशासाठी
स्वातंत्र्याची किंमत इतुकी साधी नाही
जगावया वनवास घेतला देशासाठी
        ओमप्रकाश ढोरे
[6/14, 9:43 PM] Smj Bhand__Mangala Dahake Bhandara: माझ्या आवडीची कविता
       
         "मुक्ताई"

निवृती ज्ञानदेव सोपान
मुक्ताई त्यांची बहिण 
राहणी सर्व मिळुन
समाज देता टाकुनी

संण्याशाची मुले म्हणावी
कर्मठ वृती त्यांचे ठायी
भिक्षानं  देई मायी
न देता टोमणे मारी

वागणूक मिळता हिन
माऊली रडती दिनाच्या
बहिण धाकटी मुक्ताई
बोधवी तव भाऊराया

ताटी उघडा ज्ञानेश्वरा
कार्य करावे जगऊध्दारा
ऐसे नाव रडता घरा 
तुम्हा ठायीच अमृतधारा

वदताच उठल्या माउली
टाळी विठ्ठलनामाची घेतली
उध्दार व्हावया जिवनी
 रचाया पाया ज्ञानेश्वरीचा

कर्मठता असे अज्ञान
अंगी मिथ्या मोठेपण
जाई झाकण्या सुर्याला
[6/14, 9:43 PM] Smj Bhand__Mangala Dahake Bhandara: हाय! कोरोनाचा कहर झाला.......जीवनात सारा जहर झाला .........कविता अशी बहरून आली.........अन् जीवनात पून्हा बहर आला............तर्फे:-राजीव बुद्धे.....मांढळ🙏🙏
[6/15, 9:02 PM] Smj Bhand__Mangala Dahake Bhandara: // समाज काळ्या मातीचा //

काळ्या ढेकळा खाली
संपान लपलं
कष्टाच्या मायेनं
डोळ्यांत झाकलं

नांगराचा फाळ
निढळाचा घाम
पेरता काळ
अंकूरले कोम

तपत्या रविले
सावलीची झाल्लर
नजरेत भरते
रानातली पिल्लार

कणखर हात
फिरता येईल निखार
गोरप्यांची साथ
धरे सपान आकार.

गर्भार सपान
 पाहे टरारून डोळे
खपाटल्या पोटातील
भूक दाहून पळे.

लेकूरवाळ खळं
जसं गोकूळ भरलं
अस्मानी वैऱ्यानं
खवळून झोडलं.

काही भिजली सरीत
काही निजली मातीत
झरती आसवे
भरतो ओंजळीत.

काळ्या मातीचा समाज
पावसाच्या लहरीत
पाहे उघड्या डोळ्यांनी
सपानं थिजत.

सौ.मीरा शेबे भंडारा.
[6/15, 9:02 PM] Smj Bhand__Mangala Dahake Bhandara: समाज----
चार भिंतींचे घर
नसते हो कधी
माया, प्रेम, जिव्हाळा
वात्सल्य तिथे नांदती ।।
एक एक घटक
मिळून चढवलेला साज
एकोप्याचे होते संघटन
तोच आमचा कुणबी समाज ।।
द्यावी लागते वेळ
थोडी मेहनत, मौल्य विचार
जे आहे पाशी,ते दुसऱ्या द्यावे
मिळतो परस्परा आधार ।।
परस्परा प्रगत होण्या
करावे साहाय्य थोडे
लाचारी सदा दाखवून
दामटू नये आपलेच घोडे ।।
कृषी, क्रीडा, व्यवसाय
शिक्षण, नोकरीत पुढे जावे
मोठ्यांनीही स्नेह बाळगून
थोर विचार मांडावेत ।।
एकत्र येण्यासाठी
करावे आनंदोत्सव
विविध कला गुणांनी
घडावा समाज उत्सव ।।
------------------------------
       मंगला डहाके, भंडारा
[6/15, 9:02 PM] Smj Bhand__Mangala Dahake Bhandara: ।। समाजावर बोलू काही तरी ।।

या सख्यांनो या हो या,
लवकर भरभर सार्‍या या।
   काही तरी नवे समजू आज।।

विज्ञानाची धरु या कास,
अंधश्रद्धेला देऊ या फास।
    काही तरी नवे ठरवू आज।।

श्रद्धेवर विश्र्वास ठेऊनी,
अंधश्रद्धेला काळे फासूनी।
  काही तरी नवे करू या आज।।

कष्टावीण भाकर नाही समजूया,
कर्मावर विश्र्वास ठेऊया।
   काही तरी नवे ठरवू या आज।।

सावित्रीच्या लेकी म्हणून मिरवूया,
दररोज काहीतरी वाचू या।
  काही तरी नवे करु या आज।।

शिक्षणाचा ऊपयोग करु या संसारात,
शिक्षणाची आपुल्या वाढवू या शान।
   काही तरी नवे करु या आज।।

कुटूंब,समाज नेऊ या पुढे,
अंधश्रद्धेचे गाडू या मढे।
   काही तरी नवे करू या आज।।

सौ. के. बी. सार्वे भंडारा.
[6/15, 9:02 PM] Smj Bhand__Mangala Dahake Bhandara: समाज
ज्यात जन्मोलो आम्ही
अभिमान असावा त्याचा
कष्टकरी समाज माझा
नंबर वन ज्याचा

समाजाने घडविले मला
ऋणी राहिन मी त्यांचा
समाजाकडून खुप शिकलो
अभिमान असावा ज्यांचा

असा समाज माझा
तुकोबाराय दैवत ज्यांचे
शतशः आभार मानते
माझ्या समाजाचे

           सौ नंदा भोयर
[6/15, 9:02 PM] Smj Bhand__Mangala Dahake Bhandara: 🍁समाजावर बोलू काही🍁

कोणी कुठे जन्म घ्यावा ,
नसे कुणाच्या हाती.
धन्य आम्ही जन्मा आलो,
कुणबी म्हणुनी.

कष्टकरी जात आमची ,
जसा निधड्या छातीचा वाघ.
देणे असे धर्म आमचा,
दैवत आमुचे तुकोबा

कल्याण करण्या साऱ्यांचे,
ज्ञानदीप उजळु या.
समाजाच्या उन्नतीसाठी,
खांद्यास खांद्या भिडवू या.

देऊ सुप्त गुणांना वाव,
आधार होऊ त्यांच्या.
जतन करु रुढी परंपरेचे,
नवा प्रगत,प्रगल्भ समाज निर्मू या.

                      सौ.प्रतिभा सोपान वाठ
                      अकोला
                      दि. 15-06-2020
[6/15, 9:04 PM] Smj Bhand__Mangala Dahake Bhandara: समाजावर बोलुन काही.....

विदर्भाच्या पुर्व कुशीला
समाज उन्नत माझा.                   
महसुल वसुली बावन्न लाखा
वदतात मला कुनबी बांधता

करूनी शेती पिकवी होती
धरती माझी माय माउली
इमान, कष्टीक तत्वे माझी
पोशींदा मी आहेच जगी

तुकागाथा माझी प्रेरणा
झाला कळस तुझ्या दर्शना
घेता शिक्षण समाज बदलेल
समृध्द होणे चारी कोपरे

आम्ही घडु दुसऱ्या घडवू
समाज पताका कळसा रोवु
नाठाडाचे माथी काठी देऊ
विचारधनाचे जतन करू

मंचावरती सौजन्य दिसावे
काव्य ऐकता समाज घडावे
तुटता साखळदंड अंधश्रध्देचे
विचारमंथन बावणे कुनबीचे.

दि.१५जुन२०२०

               दशरथ अतकरी
                नागपूर ४४००३४
[6/15, 9:04 PM] Smj Bhand__Mangala Dahake Bhandara: हे ओथंबून
   नभ दाटले भारी
          चिंब भूवरी ।।

सळसळतो
      पानातून हा वारा
            स्पर्षे ह्या गारा ।।

वाऱ्याचे गुंज
      स्वर कानी पडते
            मी दचकते ।। 

चंद्र चांदण्या
      लुकलुकती नभी
               प्रकाश दावी ।। 
         ------------------------
               मंगला डहाके, भंडारा
[6/16, 10:39 PM] Smj Bhand__Mangala Dahake Bhandara: *गुंफन नात्याची*

गुंफीत जावे नाते
माझ्या तुझ्या मनाचे
मधुगंध पसरावा
नात्यातील ग़ोडव्याचे

नाते तुझे नि माझे
असावे अंतरीचे
दिसावी डोळ्यात भावना
त्या स्वप्नातल्या आठवणींचे

नाते असे असावे
गुज गोष्टींचे
नात्यातल्याआठवणीने
नयनी अश्रु दाटे

गुंफून तुझी नि माझी
वाऱ्या परी असावी
स्पर्श होवूनही
डोळ्याला न दिसावी

नाते नाना परीचे
परि भाव एकच दिसे 
प्रेम झिरपावे त्यातुनी
गुंफून ती घट्ट मनी वसे

    ‌‌     *सौ नंदा भोयर*
[6/16, 10:39 PM] Smj Bhand__Mangala Dahake Bhandara: ।।नात्यांची गुंफन।।

वरवधू आली दारी,
सजवून रिस्तेदारी
विहीण व्याही भिडस्त
साळा,साळी भारदस्त।।
जाऊ,भासरे प्रेमळ।
सासू,सासरे दयाळ।।

आजी, आजोबा मजेचे।
बहीण,भाऊ सुखाचे।।

नवागताची चाहूल।
नाते करी हलचल।।

माझी नात, माझा भाचा।
काका,मामा दादा,माझा।।

बहीण भाऊ माझेच।
मामा,मावशी माझेच।।

नाती,गोती जपण्यास।
दयावा मान एकमेकास।।

सौ.के. बी. सार्वे भंडारा.
[6/16, 10:39 PM] Smj Bhand__Mangala Dahake Bhandara: *नात्यांची गुंफण*

नाती असतात रक्ताची,प्रेमाची,मैत्रीची,
बागेत फुलणाऱ्या फुलांसारखी.
विविधतेने नटलेली.
काहींचे रूप सुंदर,काहींचा येतो दरवळ.
नात्याशिवाय जीवनाला नाही रंगत,
हवी-हवीशी वाटणारी साऱ्यांची संगत.
कधी हसवणारी,कधी रडवणारी,
कधी जवळ घेऊन समजविणारी.
"नात्यांची गुंफण" असावी मोत्यांच्या माळेपरी.
अनमोल असतो प्रत्येक मोती,
सुटले बंध तर विखुरणारी.
रेशीमबंधाने हळुवार बांधली जाणारी.
नाती म्हणजे प्रेम,विश्वास.
नाती घेऊनच येतो जन्मा.
नाती सुख-दुःखात निभवायची,
विश्वासाने पाळायची.
चूकले असेल कोणी,तर उदार मनाने जिंकायची.
नात्यांची गुंफण असेल पूर्ण,
तर जीवन जगण्याला आहे अर्थ.
नाही तर इथे सारेच व्यर्थ.

                      सौ.प्रतिभा सोपान वाठ
                      अकोला
                      दि. 16-06-2020
[6/16, 10:39 PM] Smj Bhand__Mangala Dahake Bhandara: ‌ गुंफण नात्याची

मोह मायेचा सारा पसारा
हळूवार गुंफूया नात्यांच्या तारा
विण अशी घट्ट,पण पडू नये गाठ
कुणाचाही विश्वास बसावा दाट.

एका तरुला अनेक शाखा
शाखांवरी पाने, फुले,फळे
प्रत्येक नात्यांचा मेवा चाखा
चविष्ट असती आगळेवेगळे.

नात्यांची थाळी,पाचापक्वानांची
आंबट,गोड,तिखट,खारट,
कडू,तुरट
आनंदाने ग्रहण करून 
 द्यावी ढेकर तृप्तीची.

विषाच्या पेल्यातही शोधावा
अमृताच्या थेंब
कोणतही नातं मनापासुन
जाऊ न द्यावा लांब.

शब्दांची धार,करी मनावर वार
आपला परका असू नये व्यवहार.
प्रेम ,आदरभावाचे असावे सिंचन
सर्वच नात्यात आपुलकीची गुंफण.

सौ.मीरा शेबे भंडारा.
[6/16, 10:40 PM] Smj Bhand__Mangala Dahake Bhandara: नात्याची गुंफण.

जन्मा येता नाते जुळते
नाती ममता माया भासते
जिवनगाणे नाते खुंटते
म्हणुनी नाते जगी श्रेष्ठते

प्रेम, जिव्हाळा घरी दिसावा
नकोत नुसती संसारनाती
नयनी बघाया किरण आशेचा
वदतील मुखी शब्द प्रेमाचा

संसारी येणं तुझं असावं
जिवनात माझ्या रंग भरावं
निर्मळ नाती गुंफीत जावं
गार सरींनी झुलत यावं

तव जखमांना फुंकर माझी
हम वेदना तुच शमवी
तुजविण हे सुणं जिवन
घडावे एवढे नाती गुंफण

वासरू हंबरी गोठ्यात
किलबिलते पिल्लु खोप्यात
घरी परतणे गोरज पर्व
वात्सल्य आईचे करते सर्व

नात्यागोत्याने समाज दिसतं
लाज एकाची एका वाटतं
निभविण्याला मनही धजतं
नक्षिदार हे समाज वसतं

दि. १६जुन२०२०
               दशरथ अतकरी
                नागपूर
[6/17, 10:54 PM] Smj Bhand__Mangala Dahake Bhandara: उगवती पहाट---
    अंधार संपता
उषा जागी होते
उगवत्या पहाटेची
नवी झुळूक येते ।।
   चैतन्याची पहाट येते
अंगी नवसंचार घेऊनी
धरती ही न्हाऊन
जाते, सोनेरी किरणांनी ।।
झाडांवरचे पक्षी
आनंदाने गाणे गाती
पहाटेचा गारवा
सृष्टी तेजोमय होती ।।
   उगवत्या पहाटेला
आला पाऊस भारी
पक्षी गेले उडुनी
शोधती आश्रय कुठेतरी ।।
   पहाट होता अंतरी
आळसाचे शीण जाते
नव्या उमेदीने मन
हे प्रफुल्लित होते ।।
    उगवती पहाट असते
ऊर्जा दिवसभराची
लवकर उठुनी करावे
कामे नित्यनेमाची ।।
-----------------------------
मंगला डहाके, भंडारा
[6/17, 10:54 PM] Smj Bhand__Mangala Dahake Bhandara: उगवती पहाट ----
पहाटेचा वारा
पावसाच्या धारा
अंगावर येती
शुभ्र शा गारा ।।

मनी लाजून
दवबिंदू शहारले
कोवळ्या तेजात
पान मिठीत आले ।।

येता दाटून नभ
काळा कुट्ट अंधार
धरती आसुसलेली
कधी होई धार संचार ।।
-------------------------–---
       मंगला डहाके, भंडारा
[6/17, 10:54 PM] Smj Bhand__Mangala Dahake Bhandara: *उगवती पहाट*

उगवत्या पाहाटेला 
ऊनं कोवळं कोवळं
पक्ष्यांची झाडावर 
सुरू झाली किलबिल

गायं गोठ्यात कशी
हंबरू लागली
घरच्या माऊलीनं
दारी रांगोळी रेखाटली

शेतकरी दादा
निघाला शेताच्या वाटेनं
बैलाच्या घुंगराचा
आवाज खनखन

घरातून दरवळला 
भाकरीचा सुगंध 
मन माय कसं
झाल हो धन्य धन्य 

उगवत्या नारायणाला 
जोडते मी हात
अशीच रम्य पाहाट 
भरते मी नयनात...
     
                          *नंदा भोयर*
[6/17, 10:54 PM] Smj Bhand__Mangala Dahake Bhandara: उगवती पहाट

उगवती पहाट घेऊन आली,
नवी प्रभा.
फेर धरुनि नाचू लागल्या,
दहाही दिशा.
गंध दरवळत फ़ुले सुगंधी,
करी सु-स्वागत.
वाराही गाऊ लागे,
पाखरासंगे मंगलगीत.
शिवरातली पिके डोलती,
लेऊन हिरवा साज.
नवं चैतन्याची उभारी देई,
उगवती पहाट.
श्वास नवा ,ध्यास नवा,
जगण्याचा जोश नवा.
उगवती पहाट देई ,
आत्मविश्वास नवा.
  
                        सौ.प्रतिभा सोपान वाठ.
                         अकोला
                         दि.17.6.2020
[6/17, 10:54 PM] Smj Bhand__Mangala Dahake Bhandara: *उगवती पहाट *
उगवती पहाट आठवे मज, 
माझ्या गावची
जात्यावरची सुंदर गाणी
रोज येई कानी
पहिल्या किरणासवे जागवी
बाग देऊनी कोंबडा
दारापुढे पडणार , रांगोळीसह 
शेणाचा सडा.
वासुदेव नाचत येई 
मुखी हरिनामाच्या घोषा.
दाणे टिपती अंगणी पाखरे
होऊनी भोवती गोळा
लगबग चाले मायची माझ्या ,
न्याहारी शेतात द्यायची.
चुलीवरल्या भाकरीचा सुगंध ,
दरवळे माझ्या नाकी.
बापही जुंपे बैलगाडीला,
जोडी ढवळ्या, पवळ्याची.
सोबतीला साथ असे, मोत्या कुत्र्याची.
पक्षांसवे, घुंगुरमाळेचा नाद आजही 
गुंजतो कानी.
अशी उगवती पहाट माझ्या 
रोज येई स्वप्नी.

                         सौ.प्रतिभा सोपान वाठ.
                         अकोला
                          दि.17/6/2020
[6/17, 10:54 PM] Smj Bhand__Mangala Dahake Bhandara: ।। उगवती पहाट ।।

प्रभात वेळी,
कोकीळ गाहे।
गीत मधूर,
स्वर तो वाहे।।

हिरवा चाफा,
डोले आनंदी।
रविकिरणते
पाही स्वानंदी।।

आंबे मोहर,
सुगंध देई।
मोगराही तो,
हासत येई।।

पक्षी सगळे,
गाण करीती।
फुलपाखरे,
स्वच्छ विहंगे।।

पांडूरंग तो,
भूपाळी गाई।
रम्य पहाट,
उजळून येई।।

सौ. के.बी. सार्वे भंडारा.
[6/17, 10:54 PM] Smj Bhand__Mangala Dahake Bhandara: उगवती पहाट

पहाट झाली तारा तुटल्या
मावळतीचा चंद्र लोपला
पक्षी गाती मंजुल गाणी
कोम्बडा सांगे आरवूनी
निशा गेली आळस घेवुनी
उषा आली नव चैतन्य लेवुनी
सूर्य निघाला रथात बैसुनी
हर्ष मावेना तव मग गगणी
वाऱ्यासंगे कळया उमलति
नवदिवसाची गाती महती
गवतावर फुलपाखरे झूलती
मरगळ झटका म्हणून सांगती
नवा उत्साह नवा जोम
कामाला लागावे सर्वजन

सौ आर.बी.झंझाड़
[6/17, 10:54 PM] Smj Bhand__Mangala Dahake Bhandara: 🌅 उगवती पहाट 🌅
झुंजूमुंजू झाली आता
झुंजूमुंजू झाली.
रात्रीच्या गर्भातून
उषा जन्मा आली.

निशेचं झालं गमन
उषेचं आगमन
दिनकराच्या स्वागता
सृष्टीचं नमन.

द्वीजगणांची किलबिल
मंद गार अनिल
खळखळता सलील
जागवी हलचल.

किरणांची आरास
चैतन्याचा प्रकाश
निर्मात्याची भूपाळी
सडा रांगोळी सकाळी.

रम्य पहाट समयी
जात्यावर ओवी
बांगड्यांची किणकिण
पैंजणांची रुणझुण.

टाकू आळसाची कात
नव्या जोशाने सुरुवात
उगवत्या पाहाटेस
शुभांकराचा वास.

सौ.मीरा शेबे भंडारा.
[6/17, 10:55 PM] Smj Bhand__Mangala Dahake Bhandara: उगवती पहाट.

किलबिलती पक्षी तरुवर
कोकीळ देई साद सुस्वर 
सडासमार्जन पहाट काळी
दारामध्ये नक्षीदार रांगोळी

लाल गुलाबी दिसे धुराळा
मिळते त्यात प्रकाश पिवळा
रथ सुर्याचा वरती आला
करदर्शने नारायणाला

आयुष्यात पहाट व्हावी
नवुऊर्जा अंगी. भरावी
नवकार्यास प्रारंभ व्हावा
यशकिर्तीचा ध्वज अंबरात

पहाट काळी शेतकरी राजा
सर्जा राजा जाई औताला
साधुसंत ब्रह्ममुहुर्ताला
ध्यानस्त बसती जपकार्याला.

दि.१७/०६/२०२०

        दशरथ अतकरी, नागपूर

दिनांक 26/05/2020
विषय- स्वरचित चुटकुले





दिनांक 26/05/2020
विषय- स्वरचित चुटकुले








दिनांक 26/05/2020
विषय- स्वरचित चुटकुले





दिनांक 26/05/2020
विषय- स्वरचित चुटकुले





[6/18, 1:20 PM] Smj Bhand__Mangala Dahake Bhandara: माता सरस्वती----
-----------------

माते शारदे, श्वेत वस्त्र परिधानित
वीणा हस्तीत, शब्द शृंखला दे मजला
ओंजळभर शब्द खाण देऊन
गर्भ श्रीमंत कर मजला ।।

विश्व विद्या रूप शोभे सुंदर
ते त्रिलोकी गाजते
कमल पद्मासनात 
तू सारे जग बघते ।।

शुभ्र वस्त्रे, कामालनिवासींनी
मोर पीस शोभे , मुगुटावरी
पाशंकूषधरा देवी, भक्ती
तुझीच राहू दे अंतरी ।।

विद्यारंभम करिषयामी
प्रसन्न भव सर्वदा
ममवक्तरे वसेनित्यम
चरणी माथा शतदा ।।

अहंकार, ईर्षा नसावी मनीं
हृदयी गोड भाव दे मज
पुन्हा पुन्हा चरणी ठेवते
माथा, हाच आशिष दे मज ।।
-----------------------------------
         मंगला डहाके, भंडारा
[6/18, 9:58 PM] Smj Bhand__Mangala Dahake Bhandara: तुळस

आयुर्वेदा असे तिची वर्णी
आहे आरोग्याची धनी
जळी बूटीची असे राणी
तुळस माझी बहुगुणी

तुळशीचा काढा नी रस
जाईल खोकला नी कफ
देई आम्हा प्राणवायू
तिला दारामध्ये लावू

दारी वृन्दावनी सजली
अंगणाला शोभा आली
सायंकाळी सांजवात
दिवा लागला दारात

दिवा लावू तुळशी पाशी
विशेष महिमा कार्तिक मासी
रोज खाई तुळशीचे पान
आरोग्य सुदृढ़ लाभे छान

सौ.आर.बी.झंझाड
भंडारा/ बेला
[6/18, 9:58 PM] Smj Bhand__Mangala Dahake Bhandara: तुळस----
    --------
घरासमोर दारात
असावी तुळस
आपल्या जीवन सुखाला
चढते हो कळस ।।
सर्दी, खोकला,पित्त
होऊ नये, खावी तुळशीची पाने
निरोगी राहून जगुया
या देही अभिमानाने ।।
तुळशी पासून मिळे आम्हा
भरपूर ऑक्सिजन
निरोगी शरीरात 
वसे सुदृढ मन ।।
प्रतिकारशक्ती वाढवण्या
 घ्यावा तुळशीचा काढा
निरामयतेचा मंत्र
लाभेल आरोग्याचा घडा ।।
श्रीकृणाला तुळस ही
आवडते फार
विठ्ठलाच्या माथ्यावर ही
तुळशीचाच भक्तीभार ।।
तुळशीला खाण्यात
असे पिण्यात मान
आऊषधी रूप तिचे
पूजेतही सन्मान ।।
शुभम करोती कल्याणम
सांजवेळी म्हणुनी
प्रसन्न दिपककार होता
नमन करते दिवा लावूनी ।।
---------------------------------
          मंगला डहाके, भंडारा
[6/18, 9:58 PM] Smj Bhand__Mangala Dahake Bhandara: 🌿तुळस🌿
तुळस आहे बहुगुणी
पावित्र्य, मांगल्याची धनी
घाला तुळशीला पाणी
विघ्न पळती रानोरानी
लावा तुळशीला दिवा
प्रकाश पडतो सर्व देवा
तुळशीपाशी सडा रांगोळी
इडापिडा सरेल सगळी
तुळशी असता दारी
आयुरारोग्य येई घरी
सकल रोगांवर औषध
तुळशी पासून होई साध्य
तुळशीची मंजिरी
हार घातले श्रीहरी
महिमा तिचा कार्तिक मासी
वरीले तिने कमलनयनासी
करू नमन तुळशीला मनोमन
सुख समृद्धी आनंदी जीवन.
तुळशीचं अंगणी वृंदावन
वातावरण होते पावन
जो करी तुळशीचं सेवन
कफ पित्ताचं होते दहन.
तुळशी ची करूया‌ सेवा
बहुमोल आयुष्याचा ठेवा.
सौ.मीरा शेबे भंडारा.
[6/18, 9:58 PM] Smj Bhand__Mangala Dahake Bhandara: तुळस ---
तुळशीच्या मंजुळा
गळ्यात माला
घालून शोभे
भक्त गळा ।।
उभे विटेवरी
हात कटेवरी
तुळसी माळ
रंगी गळा ।।
तुळसी किमया
हरिनाम जपा
आयुष्य सोडत
गोड आता ।।
तुळस पवित्र
एकच हे रोप
स्त्रिया करती
पूजा रोज ।।
प्राणवायू दाता
आरोग्याचा त्राता
कोमल त्वचा
राखे, तुळस माता ।।
मंजुळा विश्वासू
पोटास साजिऱ्या
वाटून मधात
निखळ हृदयी आपुल्या ।।
            मंगला डहाके, भंडारा
[6/18, 9:58 PM] Smj Bhand__Mangala Dahake Bhandara: *तुळस*

अंगणी तुळस
माझ्या ग बाई
डोक़यावर भार 
मंजुळयांचा

बहुगुणी तुळस
आॅक्सिजनची खान 
आहे तीला मान
हिंदुधर्मात

रामरक्षा म्हणती
तुळसीजवळ बैसुनी
तीनही सांजेला
बालगोपाल

अंगणाला शोभा
आहे तीची बाई
कृष्णला प्रीय
तुळसा माई

तीन्ही सांजेला
दिवा जळतो तीथे
प्रसंन्न वाटे 
माझ्या मना

    ‌.      सौ नंदा भोयर
[6/18, 9:58 PM] Smj Bhand__Mangala Dahake Bhandara: 🌹 तुळस. 🌹
तुळस फुलली दारी
सुवास पसरला अंगणी
तुळशीला घालावे पाणी
सांजवात लावावी वृंदावनी.....
विष्णू ची तुळस प्रिय
यऋ,जप केल्याचे लाभते फळ
तुळशी पुजनाने लाभते प्रसनता
 घरातील वातावरणात येते सात्विकता......
तुळशीचे रोप असेल जर घरी
लक्ष्मी घालेल घरी पाणी
तुळशीला जर रोज घालाल पाणी
आरोग्य राहील उतम नेहमी........
तुळशीची माळ करता धारण
सर्व देव देवतांची होते कृपा
जिद्ददी असेल संतती जर
पुर्व दिशेला ठेवलेली पाने दया वी खाया........
विवाह होतिल कनयेचे लवकर
तुळशीला घालावे पाणी रोज
तुळशीचे नावे अगणित
वृंदा,वृंदावनी,नंदिनी,तुळशी
मंजीरी,मंजुळा, कृष्ण जीवनी
नमन माझे माते तुळशीला
शितलता लाभु दे सगळ्यांना..........
     सौ जयश्री रेहपाडे
        नागपुर.
[6/18, 9:59 PM] Smj Bhand__Mangala Dahake Bhandara: बा.कु.सा.सं. परिषद

उपक्रम. कविता 'अंगणी तुलसी'

अंगणी तुळस मांगल्याची
शांती मनाला व‌ंदावनाशी
सायंकाळी सकल प्रार्थी
जातायेता भरते नेत्री

प्राणवायुचा बहर भरपुर
संजिवता वाटते सर्वदुर
आयुर्वेदी उपाय फार
घरोघरी तुलसी उपचार

सौभाग्य साक्षी रूक्मिणीचे
तुला कृष्णाची, सुवर्णा राशी
टाकीताच रूक्मिणी तुलसीपान
झाली तुला समसमान

ओवाळुनी तान्हुल्या अंगी
लावी दिवा तुळसीपाशी
आरोग्य संपदा प्राप्त व्हावी
राहावे सौभाग्य अखंड ची

दशरथ अतकरी, नागपूर
दि. १८ जुनं २०२०
[6/19, 10:03 PM] Smj Bhand__Mangala Dahake Bhandara: पाऊस---
---------
काळे कुट्ट मेघ
त्या नभी दाटले
धुवाधार पाऊस
धरतीला बिलगले ।।
येऊन पाऊस धारा
चिंब चिंब धरती
हिरवा शालू नेसून
बघते रविकिरणे वरती ।।
पावसाने वृक्षवेली
डोलती मुक्तपणे
सुसाट वारा घेतो
झोके स्वच्छंदी आनंदाने ।।
झाडांवरचे पक्षी
किलबिलती सुस्वरे
तलाव, नद्याही तरंगती
लहरी झरे ।।
आसमंतात शोभे
सप्तरंगी इंद्रधनूची कमान
क्षितिजाआडून हळूच पाही
राविकिरने गुमान ।।
पावसात त्या पक्षी
झाडावरूनी गाती
आपली आई भिजते
ही काळी माती ।।
हिरवा शालू नेसून
धरा मोत्यांचे थेंब बघते
ओशाळून त्या निलवर्णी
नभाला हळूच मनी लाजते ।।
नाभधारांचे मोती बघता
बळीराजा सुखावतो
पेरणीच्या कामाला
खुशीत लागतो ।।
---------------------------------
         मंगला डहाके, भंडारा
[6/19, 10:03 PM] Smj Bhand__Mangala Dahake Bhandara: पाऊस ....

आकाशाच्या काळजात 
ढग शिरते , फिरते .
ढग ढगाशी भिडता 
वीज खुशीत नाचते .

पावसाचे काळे ढग 
खाली वाकून पाहते 
हात जोडलेले जीव 
त्याच्या मनात भरते .

आनंदून त्याचे मन 
खाली ओसंडून येते .
आसुसल्या जमिनीला 
गर्भाराचे सुख देते .

पावसाच्या आगमनी 
वसुंधरा ही नाचते .
तना -मनाचा रोमांच 
जणू शहारुन येते .

पावसाचा थेंब -थेंब 
भिजविते सारे रान 
सजीवांच्या जीवनाला 
अमृताचे हेच दान ....

  सुभाष धांदे 
यवतमाळ 
दिनांक 19/06/2020
[6/19, 10:03 PM] Smj Bhand__Mangala Dahake Bhandara: पाऊस

ग्रीष्माच्या उकाडयाने
झाले होते लाही लाही
वर्षा आली धावून 
अंग शहारुन येई

निळ्याशार आभाळी
ढग आले दाटून
पडता पावसाचे थेंब
मोर नाचे आनंदान

पडता सरी वर सरी
धरती झाली ओली चिंब
पावसाच्या पाण्याने
भिजले तिचे अंतरंग

तरू,वेली,फुले,पाने
सारे न्हावून निघाले
पशु,पक्षी,सर्व प्राणी
आनंदाने गाई गाणे

तळे,ओढ़े,नदी,नाले
तुडूंब होवून वाहती
जावून सांगे सागराशी
देश,विदेशाची महती

पावसाच्या सरीने
बळीराजा सुखावला
सोबत घेवुनि ढवळया,पवड्या
शेतीकरीता सज्ज झाला

पावसाच्या पाण्याने 
झाले अंगनाचे तळे
मी ही पहात होते बसून
भिजणाऱ्या लेकरांचे थवे

सौ.आर.बी.झंझाड
भंडारा/बेला
[6/19, 10:03 PM] Smj Bhand__Mangala Dahake Bhandara: *पाऊस*

पाऊस धारा
गार वारा
झोंबे अंगाला
मन हे धुंद
ओले चिंब
साद घाली
सख्याला 
टप टप पडती
अंगावरती
पाऊस धारा या
मन.हे धुंद
शहारले अंग
सख्या सवे मी
झाले धुंद
धुंदीच्या नशेत मी
स्वतः विसरुन गेले
पावसाच्या सरीत
एकरूप झाले

          *सौ नंदा भोयर*
[6/19, 10:03 PM] Smj Bhand__Mangala Dahake Bhandara: .                पाऊस
प्रतीक्षा होती चातकाला पावसाची
उन्हात तळपलेल्या काळ्या मातीला पाण्याची

सूर्याला झाकून घेत दाटून मेघ आले
मातीच्या सुगंधासह जग चिंब न्हाले

पहिल्या वहिल्या पावसाची मज्जाच न्यारी
भजी आणि चहा  सोबत वाटतंय भारी

येणाऱ्या प्रत्येक सरी बरोबर बळी राजा सुखावतो
यंदा पीक फुलू दे असं देवाला विनवितो

धबधबे , नद्या खळखळून वाहू लागल्या
पावसाला प्रमाणातच पड अश्या विनवू लागल्या

सौ. रूपाली अमोल बोंद्रे
१९/०६/२०२०
[6/19, 10:03 PM] Smj Bhand__Mangala Dahake Bhandara: *पाऊस*

नभातुनी बरसती
पावसाच्या धारा
मंद शांत वारा 
घाली येर झारा

बरसत्या सरींनी
वृक्ष वेली न्हाली
धरती माय कशी
आनंदून गेली

मेघांचा गडगडाट
मध्ये विज डोकावली
तिच्या प्रकाशात
दिसते माझी सावली

निसर्गाचा खेळ चाले
दिसे उन सावली
मध्येच सुसाट्याचा वारा
मध्ये शुभ्र गार आली

निसर्गाचा खेळ बघता
मी ही अचंबित झाली
तोंडुन शब्द फुटे
देवा तुझी लीला न्यारी

                    *सौ नंदा भोयर*
[6/19, 10:03 PM] Smj Bhand__Mangala Dahake Bhandara: पाऊस

पावसाच्या धारा
बेधुंद वारा,
अंगी शहारा, 
फुलवी पिसारा.

काळ्या मातीचे प्रेम उरी,
वरूणाच्या भेटीला मन घेई भरारी.
दाटती प्रितीचे मेघ अंतरी,
बहरूनी येई सृष्टी सारी.

तरुणाईलाही साद हा घाली,
मन वाऱ्यासवे हिंदोळे घेई.
नाचती, हासती,
कधी रमती एकांती .

असा खट्याळ पाऊस हा,
ओढ लावितो जीवा.
नव संजीवनी देई,
चराचारातील सजीवा.

                        सौ.प्रतिभा सोपान वाठ.
                         अकोला
                         दि.19.06.2020
[6/19, 10:03 PM] Smj Bhand__Mangala Dahake Bhandara: 🌧️🌧️पाऊस🌧️🌧️
टप टप टप टप थेंब टपोरे
ओंजळीत झेलू
सर सर सर सर धारा साऱ्या
अंगावर पेलू.

गडगड गडगड शामल मेघ
धडाडधूम ऐकू
चमचम चमचम चंचला ही
लागली चमकू.

घेवून  बॅन्डबाजा आला राजा
राणी ला भेटू
व्याकूळ धरा बरसल्या धारा
प्रेम आले दाटू.

कडे कपारे रानोमाळ झरे
लागले झरू
हरीत पल्लव कोवळे बल्लव
पांघरूण तरू.

हिरव्या कुरणी विचरती हरणी
मनि होत हर्षू
द्विजगण गुंजन करीतो नर्तन
विपीनी मयूरू

भूमिराज मशागतीस सज्ज
जोमात कष्ट करू
दाने दाने पेरता पिक येई वरता
दैना सारी हरू

सौ.मीरा शेबे भंडारा.
[6/19, 10:08 PM] Smj Bhand__Mangala Dahake Bhandara: आजचा विषय
      "पाऊस"

आला पाऊस वारा
अंगी निथळती धारा
टिपावा मातीत दाणा
कशी थांबुन मी यांना

नभी ढगांचा कल्लोळ
गाव ओढ्याचे पल्ह्याड
घरी झोपली सानुली
सरींनी वनराई भिजली

पाऊस आला सरसर
नदीला आला महापुर
गावाची उडता तारांबळ
आसरा शोधण्या जाई दुर

गार पावसाच्या धारा
दर्प मातीला लावला
आले कोंब पर्हाटीला
शालु हिरवा निवारा

नेमेची येतो पावसाळा
घरागोठ्यांना सावरा
रेडिओ टिव्ही देई इशारा
आपातकाळी उपाय करा.

दि.१९जुन२०२०
         दशरथ अतकरी, नागपूर
सादर, बा.कु.सा.सं.परिषद
[6/19, 10:08 PM] Smj Bhand__Mangala Dahake Bhandara: ‌.    "द्रोण काव्य"


विरांची शहादत

लढता दुष्मणा

शहीद झालो

इतिहासा 

अमर

झालो

ना

द.ना.अतकरी,नागपुर
[6/20, 10:06 PM] Smj Bhand__Mangala Dahake Bhandara: समाजाचे संघटन
समाजाचे संघटन म्हणजे काय? तर समाजातील माणसांचे समूह तयार करणे. संघटनात्मक जीवनाचे फायदे अश्मयुगांपासून आपणाला ठावूक आहे.
सहकार्य , सहभाग इत्यादींमुळे व्यक्ती व्यक्ती मधील संघटन टिकून राहते. संघटनांमध्ये शिस्त असणे गरजेचे ठरते. आपापसातील भिन्न आचार विचार बाजूला ठेवून काही वेळा त्याचा त्याग करून एकत्र यावे लागते. संघटनेकरिता कुशल नेतृत्वाची गरज असते, त्याच बरोबर निरपेक्ष निवड गरजेची ठरते. कामाची विभागणी करून योग्य नियोजनाने ठरवून दिलेल्या कामाची जबाबदारी पार पाडावी लागते. त्याग, निष्ठा आणि सेवा या व्यतिरिक्त विविध गुण असलेली माणसे एकत्र येणे फायद्याचे ठरते.
सामाजिक प्रश्न सोडवणे, सांस्कृतिक कार्यक्रम , गुणवंत विद्यार्थ्यांचे गौरव, गरिबांना मदत, जुन्या अनिष्ट रुढींचा त्याग,ज्येष्ठांना आदर, पर्यावरणाचे रक्षण, राष्ट्रप्रेम जागृती, अशा अनेक गोष्टी या संघटने मुळे साध्य होतात. स्पर्धा ह्या तेव्हाच पोषक असू शकतात जेव्हा खेळीमेळीचे व संयमाचे धोरण असते. मानवी समाज संघटीत राहून विकसनशील बनतो. 

सौ. रूपाली अमोल बोंद्रे
२०/०६/२०२०
[6/20, 10:06 PM] Smj Bhand__Mangala Dahake Bhandara: समाज संगठण

.    ‌. समाज आपल्या पासूनच बणत असतो.आपण आपला अन् आपल्या समाजबांधवांच्या विकासाचा विचार केला पाहिजे.एकत्र येऊन विचारांचे आदानप्रदान करून समाज उत्थानाचे कार्य करायला हवे.आणि आपले समाजबांधव हे उत्तमप्रकारेकरीतआहेतच.आपणही त्यांच्या कार्यातील खारीचा वाटा उचलावा.खूप काम छान छान होतंआहेतच.यात तिळमात्रही शंका नाही.आपल्या बावणे कुणबी समाजाची उत्तरोत्तर प्रगती होवो.अशी ईश्वर चरणी प्रार्थनाकरते.जर आपणच आपल्यांचा हात धरला नाही, तर कोण आपल्या करीता लढेल?"एक की लकडी,दस का बोजा".एकते शिवाय समाज नाही, अन् समाजा शिवाय मानवाचा उद्धार नाही.आपल्या्लाही समाजाचं काही देणं लागतं.म्हणून चला समाज पथावर अग्रेसर होऊ या.
जय कुणबी समाज, जय समाज संगठण.एकता हीच शक्ती.
🙏🙏🙏🙏🙏🙏🙏
[6/20, 10:06 PM] Smj Bhand__Mangala Dahake Bhandara: समाज संघटन
  समाज संघटन म्हण जे केवळ समाजातील काही मान्य वरानी एकत्र येवुन समाजाचे नितीनियम ठरविणे असे नसुन समाजात सामाजिक गतीशिलता कशी आणता येईल यावर विचार विनीमय करुन समाजाला दिशा दाखविण्याचे काम करायला पाहीजे.सामाजिक गतीशिलता म्हण जे समाजाचा आर्थिक,सामाजिक,शैक्षणिक,कौटुंबिक विकास म्हणजे समाजात गतीशिलता येणे.समाजाचा विकास तेव्हाच
होवु शकतो ज्या वेळी समाजाला लाभलेले नेतृत्व योग्य असेल त्याच्यात इतरांना समजून घेण्याची क्षमता असेल तरच हे शक्य
 आहे. 
       आपण जर थोडा पुर्वीचा आपला समाज पाहीला तर केवळ
शेती करणे हे आपला मुख्य व्यवसाय होता पण आता जर पाहीले
आपले मुलं परदेशात उच्च शिक्षण घेत आहेत.याचाच अर्थ समाजात
गतीशिलता आलेली आहे.महिलाही सगळया क्षेत्रात अग्रेसर आहेत
ही समाजाची प्रगती अजुन व्या पक थरावर व्हावी असे वाटत असेल
तर समाज संघटन मजबूत असायला पाहीजे.
    तसाही बावणे कुणबी समाजाचा इतिहास फार मोठा आहे.
त्या वेळच्या राजानी कुणबी लोकांना महसुल वसुल करन आणण्यास
सांगितले त्यावेळी 52 हजारांच्या जागी आपल्या कुणबयांनी 52 लाख महसूल गोळा करून आणला तेव्हा पासुन आपलयाला बावणे कुणबी 
हया नावाने संबोधले जाते.असे बरयाच पुस्तकात रेफरनसेस सापडतात.
  अश्या आपल्या समाजाच्या उन्नतीसाठी समाज संघटानाच्या
तत्वांंचा वापर करायला पाहीजे.समाज संघटेनची तत्वे ,समाज संघटन कसे करावे याविषयी मान्य वरांकडुन प्रतिक्रिया अपेक्षित आहेत🙏🙏🙏🙏   
                         सौ जयश्री रेहपाडे.
                               नागपुर.
[6/20, 10:06 PM] Smj Bhand__Mangala Dahake Bhandara: *समाजाचे संघटन*

     मनुष्य हा समाजप्रिय प्राणी आहे .आपले सुख दुःख व्यक्त करण्यासाठी त्याला समाजाची गरज असते.समाजाच्या प्रगतीसाठी समाजाचे संघठन जरुरी आहे.त्यातूनच विचारांचे आदन-प्रदान होऊन नवीन कार्याला सुरुवात होते.
    आपल्या बावणे कुणबी समाजाने या दिशेने पाऊल उचलले आहे.  हुशार मुलामुलींना प्रोत्साहन देणे, त्यांचे सुप्तगुणांना वाव देणे, B.K ग्रुपच्या माध्यमातून विवाह जुळविणे, सामूहिक विवाह हे कार्य समाज संघटनेच्या माध्यमातून घडत आहे.  याचा फायदा समाजातील प्रत्येक व्यक्ती पर्यंत पोहचावा हाच उद्देश.
    आपण प्रत्येकजण समाजाचे देणे लागतो आणि म्हणूनच आर्थिकदृष्ट्या जे दुर्बल घटक आहेत त्यांच्या शिक्षणासाठी व त्यांचा तात्पुरत्या उदरनिर्वाहाची व्यवस्था करणे , त्यांना मदतीचा हात देणे हे आपले कर्तव्य आहे.
      चला तर मग आपण आपले संघटन मजबुत बनवू आणि चांगल्या कार्याला हातभार लावू.
*"एकमेका साहाय्य करू अवघे धरू सुपंथ"*
     
                          सौ.प्रतिभा सोपान वाठ.
                          अकोला     
                          दि. 20. 6.2020
[6/20, 10:06 PM] Smj Bhand__Mangala Dahake Bhandara: समाजाचे संघटन 💪

सगळ्यांना दिवसभरातील पाेस्ट वाचुन गाेष्ट कळलीच असेल ते म्हणजे समाजाविषयी प्रेम आणी आपुलकी. खरं तर समाजाचे संघटन करायचे असल्यास एेक गाेष्ट ध्यानी मनी असावी लागते, ती म्हणजे *निस्वार्थ भावना*. जर समाजापाेटी करत असलेल्या समाजकार्यामध्ये *'मी'* पणा बाजुला ठेवला तर निश्चितच आपल्याला बरच काही चांगलं घडतांना दिसेल. समाज काेणतेही असाे, महत्वाचं म्हणजे जातीभेद नसावा, कारण आपण राहत असलेल्या समाजात विविध जाती धर्माचे लाेक राहतात. महत्वाचं म्हणजे गरिबी आणी श्रीमंतीचा भेदाभेद नसावा, कारण एेकी निर्माण करायची असेल तर सगळ्यांना साेबत घेऊन चालण्याची ताकद असावी लागते, तेव्हा कुठे समाजाचे संघटन हाेण्यास मदत हाेते. 


प्रिया र. गाेमाशे
आकाशवाणी नीवेदीका, चंद्रपूर.
[6/20, 10:06 PM] Smj Bhand__Mangala Dahake Bhandara: समाज संघटन

अगदी प्राचीन काळापासून वन्यप्रान्यानच्या भयामुळे मानव समुहात राहू लागला व समाजाची निर्मिति झाली.एकमेकांना मदत होवू लागली. काळ बदलत गेला व समजाच्या गरजा वाढू लागल्या.आपल्या समाजाची शैक्षणिक,आर्थिक,सांस्कृतिक व सामाजिक प्रगती साधा वयाची असेल तर संघटन आवश्यक आहे असे वाटू लागले.ज्याला आपण एकीचे बळ म्हणू शकतो परंतु हे करीत असतांना फार कष्ट व मेहनत घ्यावी लागते.
प्रत्येकाचे विचार वेगळे,एकत्र आणने कठिण कार्य.
म्हणून सर्वांनी आपला स्व बाजूला ठेवून समाजाकरीता आपले काही देणे आहे असे समजावे व खारीचा वाटा उचलावा.शिकू,संघटित होवु व संघर्ष करू.ज्यांनी समाजाची बांधनी करुन संघठन करण्याचा प्रयत्न केला त्यांना सलाम.
🙏🙏

सौ.आर.बी.झंझाड
[6/20, 10:06 PM] Smj Bhand__Mangala Dahake Bhandara: 🙏🏻आज ' समाजाचे संघटन ' या विषयांवर आपले विचार मांडण्याची सर्वांना संधी होती .परंतू आज मात्र काही आदरणीय भगिनींनी आपले उत्कृष्ट विचार मांडून एक आदर्श घालून दिला त्याबद्दल त्या सर्व भगिनींचे मनापासून अभिनंदन 👍👍💐तरी पुढे मात्र संधी कुणीही सोडायची नाही ..हिच अपेक्षा ...🙏🏻आपणांस काही यांबाबत माहिती व्हावी यांसाठी मी खालील प्रमाणे (वरिष्ठ यांच्या सूचनेनुसार )माहिती देत आहे ...
समाजाचे संघटन , उत्कर्ष , विकास , प्रगती , समाजाने काय करावे ? आपण समाजासाठी काय करू शकतो ? ..आपल्या काही योजना , उपक्रम , काही बाबींवर विचार मंथन , समाजशाखा निर्माण करणे , राजकीय पातळीवर आपला दबाव निर्माण करणे , नवे राजकीय नेते निर्माण करणे , समाजाची आर्थिक , शैक्षणिक , सामाजिक प्रगतीसाठी ' युवा संसद , महिला संसद यांची अंमलबजावणी करण्यास आपण काय करावे ? ....या व अशा अनेक विषयांवर आपले मत मांडण्याची संधी ' आपणांस या ग्रूपच्या माध्यमातून देण्यात येणार आहे ...आपली विचार शक्ती अधिक प्रबळ करण्यास ही ' संधी ' आपणांस देण्यात येत आहे .जेणेकरून ' ' समाजाच्या प्रगतीसाठी ' आज आवश्यक झाले आहे .🙏🏻आपण सुध्दा काही चांगले संदेश , post , व्हिडिओ ग्रूपवर टाकत असतातच ..आता यापुढे त्यासोबत आपले स्वतःचे विचार सुध्दा मांडले पाहिजे ...असे वाटते ...तरी यापुढे दर बुधवारी व दर शनिवारी ' समाजाच्या प्रगती साठी दिलेल्या विषयांवर किंवा आपल्या मनातील विचारावर आपले मत मांडावे ....अशी अपेक्षा ..चला , उठा ! लेखनी उचला आणि संवादातून ' सुसंवाद साधा ' ...🙏🏻(ही माहिती जरी ' B K महिला सखी मंच , या ग्रूप साठी विशेष असली तरी इतर सामाजिक ग्रूप ने सुध्दा यांवर पाऊल उचलावे .असे मला वाटते .)🙏🏻🙏🏻समाजातील सर्व बंधू -भगिनींना नमस्कार 🙏🏻🙏🏻आपलाच एक बांधव 
सुभाष धांदे सर , यवतमाळ .
[6/20, 10:10 PM] Smj Bhand__Mangala Dahake Bhandara: बा.कु.सा.सं.परिषद

आजचा उपक्रम..लेख
        "समाजाचे संघटन"

समाजाला योग्य दिशा देण्याचे काम एकट्याने होत नसते.सामुहिक रितीने करावे व सर्वांनी त्याचा लाभ घ्यावा.यालाच सामाजीक संघटन म्हणतात.अनिष्ट रूढी परंपरा घालविणे,विकासात्मक बाबी रूजविणे,झालेल्या उत्कृष्ठ कार्याचा गौरव संघटनेचे माध्यमातुन समाजाने करावा.हे जास्त परिणामकारक ठरते.हेतुपुरस्सर किंवा जाणीवपुर्वक विनाकारण अन्याय झाल्यास, सामुहिक रित्या धरणे, निदर्शने चळवळ उभारून न्यायाची मागणी करून न्याय मिळवता येते.म्हणुन म्हणतात शिका,संघटित व्हा आणि संघर्ष करा.आपल्याला कोणीही बोट पकडुन मंचकी बसवणार नाही.ते
स्वप्रयत्नाने किंवा संघटन करून मिळवावे लागते. सामाजिक संघटनांचा मोठा इतिहास आहे.म्हणुन जिवनात संघटीत राहणे,हे जिवन जगण्याचे कौशल्य आहे.
                धन्यवाद....
दि.२०जुन२०२०
             दशरथ अतकरी, नागपूर
[6/20, 10:14 PM] Smj Bhand__Mangala Dahake Bhandara: एकमेका साहाय्य करू
अवघे धरू सुपंथ या उक्तीप्रमाणे
आपण सुंदर विचार मांडले ताई समाजाची उत्तरोत्तर प्रगती होवो
समाजबांधवांमध्ये आचार विचाराची देवाण-घेवाण हो
सहकार्य, सहभाग, विचार सिस्त यातूनच संघटन टिकून राहते तसेच संघटनेला वरिष्ठ मंडळींचा सल्ला ही आवश्यक असते
समाज बांधवांच्या विकासाचा शैक्षणिक विकासाचा विचार केला पाहिजे
आपल्याला समाजाच्या काही देण आहे हे विसरून चालणार नाही
    ताई खूप छान लिखाण
जय बावणे कुणबी समाज
रवींद्र मते
✊✊✊✊🙏🙏
[6/21, 8:20 PM] Smj Bhand__Mangala Dahake Bhandara: ग्रहण 

वेध लागले ग्रहणाचे, 
आता होणार ग्रहण. 
ग्रहणामध्ये करू नका भोजन, 
फक्त करा देवाचे स्मरण. 
पाण्यात टाका तुळशीचे पान,
द्या काहीतरी ब्राह्मणाला दान.
मुक्त व्हाल सगळ्या पापातून,
सुटका होईल शापातून.
हेच सुरू पिढ्यानपिढ्या पासून, 
कुणीच करत नाही विचार
 विज्ञान तपासून. 
वैज्ञानिक कारण घ्या लक्षात, 
अंधश्रद्धा दूर करा घराघरात.
ग्रहण हा तर निसर्गाचाच नियम,
ते तर होणारच कायम.
पण काय करायचे मनाच्या ग्रहणाचे? 
नकारात्मक विचार सोडून द्यायचे.,
सकारात्मक विचार आत्मसात करूया. 
माणसाने माणसाशी माणसासारखे वागूया. 

सौ. स्वाती दयानंद सेलोकर
भंडारा
[6/21, 8:20 PM] Smj Bhand__Mangala Dahake Bhandara: ग्रहण---
---------
    सूर्य आणि पृथ्वीमधले
चंद्राचे करदमन
निसर्गाचे फिरते पाते
आज आहे सूर्यग्रहण ।।
      खगोलशास्त्राचे हे
अभ्यासकीय नवतरन
वैज्ञानिकांचे नवीन कार्य
करण्याचे अमूल्य असे हे क्षण ।।
    आपल्या देशात आहे
ग्रहण अंधश्रद्धेचे
त्यापायी सर्वनाश होते
आपुल्या आयुष्याचे ।।
    चंद्रावरती जाउनी मानव
यश पुढे ओंजळभर
सर्वत्र अंधश्रद्धेपायी
चटके बसती जीवनभर ।।
विज्ञानयुगात ही जागृकतेच्या
भावना कितीही जोपासल्या
बुवा बाजी होते पुढे, अन
शिक्षण तरंग गदारोळात चालल्या।।
    समाजातून काढुया आपण
अंधश्रद्धेचे ग्रहण
व्यवसाय, शिक्षण प्रगती करुनी
विश्व नांदेल, सुखी तन, मन ,धन।।
----------------------------------------
         मंगला डहाके, भंडारा
[6/21, 8:20 PM] Smj Bhand__Mangala Dahake Bhandara: ।। ग्रहण ।।

पृथ्वी भ्रमण करीते,
सूर्या ग्रहण लागते।
माणूस दुषणे लावते,
विज्ञान नवल पाहते।।

ग्रहणे करीती बदल,
ब्रम्हांड दावीती नवल।
तज्ञ करीती अभ्यास,
खगोल कोडे ऊकल।।

घेऊ खगोल सहारा,
पाहू ग्रहण नजारा।
अंधश्रद्धेचा पळवू,
सर्वांनी धाक, दरारा।।

सौ. के. बी. सार्वे भंडारा.
[6/21, 8:20 PM] Smj Bhand__Mangala Dahake Bhandara: ग्रहण
ग्रहण आहे निसर्गाची प्रक्रिया
कुणी मानतात श्रध्दा
कुणी मानतात अंधश्रद्धा
ग्रहणाला आहे  विज्ञानाची जोड
शास्त्रज्ञां साठी खगोल व्युत्पत्ती
संशोधका साठी खगोल अभ्यास
ग्रहण आहे शास्त्रज्ञा साठी नविन वाटा
अवकाशात विहरतात असंख्य तारे,‌गह
सूर्य , चंद्र, पृथ्वी खेळतात लपंडाव
कधी चंद्र मध्ये तर कधी पृथ्वी मध्ये
गोल गोल रिंगणात खेळतात पाहा सारे
खेळता खेळता ग,ह येतात एका रेषेत तेव्हा होते ग्रहण
असा आहे पाहा ग्रहणाचा खेळ🌕🌖
माधुरी भूते
[6/21, 8:20 PM] Smj Bhand__Mangala Dahake Bhandara: ✍️  ग्रहण  ✍️

ग्रहण चंद्र सूर्याचे
स्थित्यंतर वातावरणाचे.
ग्रहण देशाला
सुरवात अशांतता,अराजकतेला.
ग्रहण मानवतेला
बळी हिंसा, अत्याचाराला.
आयुष्याला ग्रहण
विनाशाला निमंत्रण.
ग्रहण बुद्धीला
विळखा अंधश्रद्धेला.
ग्रहण ज्ञानाचा
भारी पारडा अज्ञानाचा.
मैत्रीचे ग्रहण
विश्वासाचे हरण.
ग्रहण नात्यांना
पारखा आपुलकी,प्रेमांना.
कारण जाणूनी ग्रहणाचे
उपाय शोधावे निवारणाचे.
समुळ नष्ट करूनी कारण
आनंदानं जगूया जीवन.

सौ.मीरा शेबे भंडारा.
[6/21, 8:20 PM] Smj Bhand__Mangala Dahake Bhandara: ग्रहण
खग्रास असो वा खंडग्रास
किंवा कंकनाकृति
वर्षातूनी असे दोनदा सूर्य,
चंद्र ग्रहणे येती

सूर्य,चंद्र अन पृथ्वीचा
खेळ चाले लयी भारी 
अंधविश्वास नसे हा
सृष्टीची ही किमया न्यारी

सूर्य अन पृथ्वी यांच्या
मध्ये आडवा येई चंद्र
धार्मिकतेची झालर लावून
त्याला मानती अभद्र

चंद्र,सूर्या मध्ये पृथ्वी
चंद्राला लागे ग्रहण
तुळशीची पाने टाकूणी
करती अन्न,पाणी ग्रहण

वेध लागता ग्रहणाचे
चंगळ खगोलप्रेमींची
दुर्बिनीतून चित्र टिपती
क्षणाक्षणाच्या बदलाची

अंधविश्वास न ठेवू आता
हा तर निसर्गाचा नियम
आस्वाद घ्यावा ग्रहणाचा
ठेवूनि वैद्नानिक दृष्टीकोन

सौ.रेणुका झंझाड
भंडारा/बेला
[6/21, 8:20 PM] Smj Bhand__Mangala Dahake Bhandara: .          ग्रहण
पृथ्वी आणि सूर्या मध्ये चंद्राचे आगमन
अंधार पडे पृथ्वीवर सूर्य जाई झाकून

पक्षी - प्राणी या बदलाने जातात गोंधळून
घरट्याकडे धावत सुटतात अंधार बघून

सूर्य ग्रहण तर जीवनात कधीतरी होत असतो
स्वकर्माच्या ग्रहणामुळे मनुष्य रोज रडत असतो

लोभाचे, मी - तूपणाचे, इर्ष्ये चे पाणी रोजच भरतो
रात्रीच्या अंधारात आपल्या मनाची करतो 

त्यामुळेच ग्रहण लोकशाहीला सुरू आहे राजकारण
ग्रहण शासकीय यंत्रणेला भ्रष्टाचार करून

या ग्रहणावर काय उपाय?
सुटो गिरण मिळो दान🙏

सौ. रूपाली अमोल बोंद्रे
[6/21, 8:20 PM] Smj Bhand__Mangala Dahake Bhandara: *ग्रहण*

पृथ्वी आणि सूर्य
यांच्या मध्ये येतो
चंद्र आणि लागते
सुर्याला ग्रहण
अंधश्रद्धेचे
आहे मन
नका करू यामध्ये
भोजन
कुठे चालले जग
आणि कुठे चालले
जन मन
सुर्यालाच काय
कधी कधी आपल्यालाही
लागते ग्रहण
पालटून जात आयुष्य
होते सुन्न मन
दहाही दिशा अंधारलेल्या
नकोसे होते जीवन

    ‌‌        *सौ नंदा भोयर*
[6/21, 8:20 PM] Smj Bhand__Mangala Dahake Bhandara: ग्रहण

दे दान सुटे गिऱ्हाण,
दान देऊ शिक्षणाचे,
ग्रहण मिटवू आज्ञानाचे.
दे दान सुटे गिऱ्हाण.

दान देऊ समानतेचे,
ग्रहण मिटवू विषमतेचे.
दे दान सुटे गिऱ्हाण.

दान देऊ श्रद्धेचे,
ग्रहण मिटवू अंधश्रद्धेचे.
दे दान सुटे गिऱ्हाण.

दान देऊ धर्मनिरपेक्षतेचे,
ग्रहण मिटवू धर्म-द्वेषाचे.
दे दान सुटे गिऱ्हाण.

दान देऊ शौर्याचे,
ग्रहण मिटवू दहशतीचे.
दे दान सुटे गिऱ्हाण.

जेव्हा धरू आपण विज्ञानाची कास,
तेव्हा सुटेल ग्रहण,उगवेल नवी पहाट.

                          सौ.प्रतिभा सोपान वाठ.
                          अकोला     
                          दि. 21.06.2020
[6/21, 8:24 PM] Smj Bhand__Mangala Dahake Bhandara: बि.के. हा.सं.परिषद

       ग्रहण.

ग्रहण...ग्रहण लागले कोणाला
सुर्याला,समाजाला की देशाला
ग्रहणाशिवाय आयुष्य सुणे
सर्व शक्तीमानालाही करते उणे

संसारालाही ग्रहण लागती
दुष्ट नजरेने कुटुंब नासती
 कोणास कोणी नाही ऐकती
अधोगतीच्या मार्गे जाती

भारतालाही ग्रहण लागले
संकटकाळात ही संकट आले
निधळ्या छातीचे विरबहाद्दुर
सरहद्दीवर शहीद झाले

समाजातही ग्रहण दिसते
वाममार्गाला लोक लागते
शिक्षण घेऊन घरीच बसणे
संपूर्ण वाट गावाची लावते

दशरथ अतकरी, नागपूर
दि.२१जुन२०२०
[6/21, 8:24 PM] Smj Bhand__Mangala Dahake Bhandara: II बाप II

बाप कधी तळपता सुर्य
बाप कधी मावळती सावली
बाप पचवीतो दुःखाचे तुफान
बापाला नाही उपाधी कसली

बाप कधी होतो वारा
बाप कधी भक्कम निवारा
बाप सर्वांचा आधार
तरी त्याचा तक्ता कोरा

बाप संयमाचा सागर
बाप थंड पाण्याची घागर
बाप घरातील अस्तीत्व
काळही बघतो त्याच सत्व

बाप अनेकदा थकतो
बाप खुपदा झुकतो
बाप खुप गोष्टीला मूकतो
पण बाप कधी न संपतो
---------------------------------------
   🌿 मंगेश बांते, पूणे 🌿
[6/21, 8:24 PM] Smj Bhand__Mangala Dahake Bhandara: स्वरचित कविता
(पितृदिनाला,वडिल "नारायणरावांना"समर्पीत)

         वडिल

वडिल आमचे दादा सर्वांचे
आदरयुक्त धाक समाजाचे
सत्यंम सुंदरंम मुल्ये अंगा
यास्तव गावा म्हणती दादा

विज्ञाननिष्ठ दादा अमुचे
विविध प्रयोग शेतीवाडी चे
शिवाराला लेणं हिरवळीचे
गाळुन घाम मोती काढावे

प्रोढ शिक्षणा साक्षर दादा
आकडेमोड गणित त्यांचा
लिखाण करती मोडी लिपीचा
शिक्षीतालाही न् ये वाचता

संकटकाळा स्थीर राहावे
मनचक्षुला स्वत:बोधावे
 काबाडकष्टच कुटुंब वैभवे
जिवन तंत्र आधारवडाचे

जिवनात तुम्ही अश्रु न् दाविले
तवमनाचे कोडे न् उलगडले
शिखर कर्तुत्वाचे तुम्ही गाठले
पुनर्रजन्मा वडिल तुम्हीच व्हावे

      दशरथ अतकरी, नागपूर
दि.२१/०६/२०२०

      ‌‌
[6/22, 10:34 PM] Smj Bhand__Mangala Dahake Bhandara: करा योग, रहा निरोग

मस्त होते दिवस बालपणीचे
खेळायचे आणि बागडण्याचे.
तरुणपणात तर सळसळतं रक्त
खायचे, प्यायचे, मौज -मजा फक्त.
नंतर उलटली चाळीशी
आजार जडले शरीरासी
पाठदुखी, मानदुखी, डोकेदुखी
गुडघेदुखी आणि कंबरदुखी.
अॅलोपॅथिक, आयुर्वेदिक, होमिओपॅथीक   झाले.
नाइलाजाने गावठी उपचाराकडे वळले.
दुखण्याने होई कासावीस जीव,
आली नाही कुणालाच माझी कीव.
  21 जून ला पाहिले रामदेवबाबाला,
आरोग्याचा मूलमंत्र च सापडला. 
सुरुवात केली प्राणायामने
दूर झाले श्वसनाचे विकार अनुलोम-विलोमने. 
हळू हळू सुरू केले योगासन 
सर्वात आधी शवासन. 
नंतर केले सूर्यनमस्कार 
पळून गेले सर्व आजार. 
नाही लागत वय योगासन करायला 
काय हरकत आहे बालपणापासूनच करायला. 
होणार नाही कुठलेच रोग 
करा योग, रहा निरोग. 


सौ. स्वाती दयानंद सेलोकर
भंडारा
[6/22, 10:34 PM] Smj Bhand__Mangala Dahake Bhandara: ।। करा योग रहा निरोग ।।

पहाटे ऊठूनी, करुया निश्चय,
घेऊ या वसा योगाचा ।।

मन ठेवी रे प्रसन्न,सोच रे निर्मळ।
अंगी बाणवी या शिस्त नि संयम।
येऊया एकत्र घेऊ या वसा योगाचा।।

ऊत्साह वाढवी,हसवी खेळवी।
रोगा ते पळवी औषध थांबवी।
  येऊ या एकत्र घेऊया वसा योगाचा।।

बी.पी.,शुगर, जवळ न येई।
वाढवूनी ऊर्जा,शक्ती देई।
  येऊ या एकत्र घेऊ या वसा....

असाध्य ते साध्य होई योगाने।
करुनी पहावे योगा नेमाने।
  येऊ या एकत्र घेऊ या वसा...

आपली संस्कृती जपू या रे सारे।
अंतरी समाधान घेऊ या रे सारे।
येऊ या एकत्र घेऊ या वसा योगाचा।।

सौ. के. बी. सार्वे भंडारा.
[6/22, 10:34 PM] Smj Bhand__Mangala Dahake Bhandara: करा योग, राहा निरोग---

रामदेवबाबा सांगतात नेहमी
योग करा रे योग करा
शरीर तुमचे लवचिक ठेवुनी
आनंदाने मौज करा ।।
सूर्यनमस्कार करुनी 
पळवू  बारा रोग
ओंकाराचे जप ,सहज
जमतील ते योग ।।
पद्मासन,ऊर्ध्वपद्मासनात
घ्यावे वास्तव वलयात जगून
आत्मा, मनाशी जुळवून
एकाग्रता हेची भूषण ।।
कपालभाती प्राणायाम करुनी
पोट, आतड्यांचे जपती स्पंदन
मज्जासंस्था निर्मळ झरा 
मस्तिष्काची नसांबरा जगी करे नमन ।।
अनुलोम विलोम श्वासाचे
उभारी नवसंवेदना
रोज सकाळी प्राणायाम, योग
करावे, सुदृढ शरीर राखण्या ।।
सुदृढ शरीरातच ,वास करते
सकारात्मक ऊर्जा अन निरोगी मन
उत्साही आयुष्यासाठी
नित्य योग, हेची खरे धन ।।
----------------------------------
         मंगला डहाके, भंडारा
[6/22, 10:34 PM] Smj Bhand__Mangala Dahake Bhandara: करा योग,रहा निरोग

करा योग,रहा निरोग.
सूर्यनमस्कार,प्राणायाम,योगाभ्यास,
आहे हाच निरोगी राहण्याचा व्यायाम.
सुदृढ शरीर हीच आपली संपत्ती,
काढा वेळ थोडा मग स्वतःसाठी.
हवा असेल सुदृढ बांधा,
तर योगालाच जीवनाचे अंग बनवा.
योगामुळे राहील मन प्रसन्न,
मन प्रसन्न म्हणजे,सर्व सिद्धीचे कारण.
न चुकता करू रोज योग,
तेव्हाच पळतील सगळे रोग.
ऋषी-मुनींची परंपरा आपली,
हीच आहे सुदृढ शरीराची गुरुकिल्ली.
योग करायला नको पैसा-पाणी,
दूर ठेवू महागडे औषध-पाणी.
घरीच बसून करू ध्यान-योग,
नको उगाच भलते खाण्याचे भोग.
जडतील नाहीतर असाध्य रोग,
संकल्प करू, रोज योग रहा निरोग.

                          सौ.प्रतिभा सोपान वाठ.
                          अकोला     
                          दि. 22.06.2020
[6/22, 10:34 PM] Smj Bhand__Mangala Dahake Bhandara: करो योग रहो निरोग

योग करूनी निरोगी रहावे
शरिर आपुले लवचिक ठेवावे
औषधांचा नको पसारा
योगासनांने चेहरा हसरा

सुर्य नमस्कार घाला बारा
अफानवायु दुर सारा
वात वगैरे निघून जाई
कधीही जवळ न येई रोगराई

खाली बैसुनी घालु सुखासन पद्मासन
पहुचावर उभे राहूनी
करुया तानासन
पायाला यानी मीळे आराम
गुडघेदुखीला कायमचा रामराम

रामदेव बाबांचा मंत्र एक
औषधांना दूर फेक
करा रोज योग ठेवा
शरिर निरोग 

    .          सौ नंदा भोयर
[6/22, 10:34 PM] Smj Bhand__Mangala Dahake Bhandara: ओम् च्या मंत्राने करा सुरुवात
योगासने आहे आरोग्याचे तंत्र
सूर्य नमस्काराने करा बारा क्रिया
आजार पळवा करा bye bye
तनाला ठेवतो सुदृढ
मनाला ठेवतो आंनदीत
धनाला ठेवतो पेटीत
ऊर्जा संचारेल रात्रंदिवस
करा प्राणायाम दुर ठेवतो श्वसनाचे  विकार
व्याधींवर मिळवाल विजय
घ्या तुम्ही वसा नित्य नियमाने
योगासने, प्राणायाम करा नियमित
उत्साही,चिरतरूण राहील शरीर.😌😌🧎‍♀️🏃‍♀️
माधुरी भूते
[6/22, 10:35 PM] Smj Bhand__Mangala Dahake Bhandara: बि.के हा.सं.प.
      "करा योग रहा निरोग"

करा योग रहा निरोग खरा
हा मंत्र असे जगण्याचा
प्रात:काळी उठुनी झडकरी
मोकळ्या मैदानी चालण्याचा

ताणने,वाकणे,वळणे,तोलणे
आसने योगाचे घटक  मुलभुत
करता नित्य हृदय कार्यक्षम
करणार्याचे आरोग्य अबाधित

प्रभातकाळी बसा मैदानी
बसावे पद्मासनी वा सुखासनी
भ्रामरी,ओंकार,अनुलोमविलोम
क्रिया करावी कपालभातीची

मुद्रेत ज्ञानमुद्रा प्रमुख शिरोमणी
अपानमुद्रा,सुर्यमुद्रा,वायुमुद्रा
प्राणमुद्रा करावे पद्मासना
गितेत वदले कृष्णार्जुना

शिकावी गुरुकरवी योगासने
करावी योग्यस्थानी नित्यनियमे
पळवा व्याधी विनाऔषधे
निरोगी शरीर जिवन सार्थके.

दशरथ अतकरी नागपूर
दि.२२/०६/२०२०
[6/23, 10:13 PM] Smj Bhand__Mangala Dahake Bhandara: ।। माणूसकीचा झरा ।।

काय माणसाचा थाट,
लावली माणूसकीची वाट।
काळीमा फासी माणूसकीला,
वाहवी रक्ताचे पाट।।

निरपराधांचे घेई बळी,
बसली माणूसकीची दातखिळी।
व्यसनाधिन झाला मानव,
देई मुक्याप्राण्याचे बळी।।

घे मानवा शोध अंतरीचा,
काय नांदते देह मंदिरात।
घे ठाव तुझ्या गतवैभवाचा,
दया, माया भर अंतकरणात।।

प्रेम कर मूक्या प्राण्यावर,
प्रेम कर दिनदुबळ्यावर।
दे भुकेल्यांना अन्नपाणी,
वाहू दे माणूसकीचा झरा।।

सौ.के. बी. सार्वे भंडारा.
[6/23, 10:13 PM] Smj Bhand__Mangala Dahake Bhandara: 🏞️माणुसकीचा झरा🏞️

प्रत्येक हृदयात आहे 
माणुसकीचा झरा
खळखळ वाहणारा 
निर्मळ निरझरा.

निर्मळ झऱ्या काठी
विषयांची झाली दाटी
कडाडून मारीता मिठी
माणुसकीला लागे ओहटी.

होता माणुसकीचा ऱ्हास
सद्गुण तुडवित चाले सर्रास
दुर्गुणांचा जकडता फास
माणुसकीचा नव्हे मानवाचा नाश.

अरे जागा हो रे मानवा
अराजकतेचा पेटला हा वणवा
कां पुजशी तू दानवा
प्रेम,त्याग,अहिंसेचे तेज जाणवा.

दुष्ट कृत्य करण्या आधी
माणूस म्हणून जाण ठेव साधी
पर धन,पर नारी तलवार दुधारी
आन,बान,शान जाईल सारी.

पुनरुज्जीव करी तुझ्यातील
निर्मळ माणुसकीचा झरा.
दे दिनदुबळ्यांना आसरा
सत्कर्म करी नित्य वासरा.

पशू, पक्षी,वृक्षां वरी माया
परोपकारी मिळेल छाया.
नारी माता, भगिनी,कन्या
बदल दृष्टी माणूस बनण्या.

माणुसकीचा झरा वाहू दे
ईश्वर सदा तुझ्यात पाहू दे
टाकीचे घाव सोशीत
दगडाला ही देव होवू दे.

सौ.मीरा शेबे भंडारा.
[6/23, 10:13 PM] Smj Bhand__Mangala Dahake Bhandara: माणुसकीचा झरा ---

हृदयातील घरात
सुख दुःखाचा वारा
निसर्गाला बघता वाटे
आहे माणुसकीचा झरा ।।

लोकडाऊनच्या काळात
घरात राहुनी ,मन सैरावैरा
अहोरात्र झटतात, डॉक्टर, नर्स
स्फुरतो इथे माणुसकीचा झरा ।।

दिन रात ड्युटी असते
पोलिसांना फुटते घामाच्या धारा
खाकी वर्दीत करतो काम
दिसतो इथे माणुसकीचा झरा ।।

सफाई कामगारांचे 
सतत झाडू मारा
सर्वत्र स्वच्छता राखून ते
दर्शविती माणुसकीचा झरा ।।

असेल ते थोडे द्यावे
गरजू व्यक्तींच्या डोई भारा
सर्वाना सुखी करुनी राखु
हृदयी, माणुसकीचा झरा ।।

मूक, बधिर,अनाथांना
द्यावा आधाराचा गरा
शिक्षण,अन्न ,मायेचा हात
देऊनी, दवावा माणुसकीचा झरा।।
----------------------------------------
           मंगला डहाके, भंडारा
[6/23, 10:13 PM] Smj Bhand__Mangala Dahake Bhandara: बिग.के.सा. सं.प.

माणुसकीचा झरा.

निर्वासितांना द्यावा आसरा
तहानलेल्यांना प्याला पाण्याचा
भुकेलेल्यांना घास अन्नाचा
वाहतो झरा माणुसकीचा

दिनदुबळा कुणी समाजाचे
दैन्य पाहता आधार द्यावा
विचारलेल्यांना सल्ला द्यावा
भटकलेल्यांना रस्ता दावा

तप्त उन्हातही चालत गेले
भुक पोटाची झेलत गेले
झरा माणुसकीचा शोधत गेले
वाट मरणाची चालत गेले

लहान बाळे केविल झाले
दुध,बिस्कीट मार्गे दिधले
मातापिता मनी गहिवरले
झरे माणुसकी चे वाहिले

कोरोणाने रोजगार बुडाला
कामाअभावी बेजार झाला
मालकासमोर लाचार झाला
माणुसकीचाच झरा आपला

दैन्य पाहता गरिबांचे
गहिवरले मन सामान्यांचे
माणुसकीने सारेच जमले
अन्नदानाचे छत्र लावले

दशरथ अतकरी, नागपूर

दि.२३जुन२०२०
[6/23, 10:13 PM] Smj Bhand__Mangala Dahake Bhandara: वाट साफल्याची

लागलीया भूक
वासरे भुकेली
पान्हवे माऊली 
शिवारात --

विठ्ठल भेटीस
व्याकूळ वैष्णव
नाही भेदभाव
भक्तांमाजी --

विठ्ठल नामाचा
गजर करूनी
नाचतो कीर्तनी
नामदेव --

सारुनिया द्वैत
एकरूप झाले
गजरात न्हाले
विठ्ठलाच्या --

आसक्तीचा आता
करा नायनाट
साफल्याची वाट
चालावया --


        प्रा.  संजय तिजारे
                  नागपूर
              9272120762
[6/23, 10:13 PM] Smj Bhand__Mangala Dahake Bhandara: माणुसकीचा झरा

जिकडे बघावे तिकडे
येतो भोगाचा दर्प,
माणुसकीला कलंकित करणाऱ्या 
गोष्टींचा होतोय बघा उपद्रव.

इंच-इंच जागेसाठी 
रक्ताचे तुकडे पाडतो.
नातीगोती विसरून
पैशाच्या मागे धावतो.

जन्म देणाऱ्या मायबापाला
अपराध्या प्रमाणे वागवतो,
 एक कोर भाकरीसाठी 
वृद्धाश्रमात टाकतो.

वंशाचा दिवा हवा म्हणून
 मायेची कुस उजाडतो,
वंशाची पणती तू 
का विझवून टाकतो?

स्त्री हि कुणाची, 
मुलगी-बहीण असते.
आपली नसली म्हणून का 
पायदळी तुडवली जाते?

माणूस म्हणून जन्माला आला 
माणूस म्हणूनच जग,
ईश्वराने दिलेल्या विवेकबुद्धीचा
चांगल्यासाठी उपयोग कर.

थांब जरा विचार कर,
एवढा स्वार्थ नव्हे बरा,
माणुसकीच्या उत्थानासाठी
वाहु दे "माणुसकीचा झरा"

"मानव सेवा हिच ईश सेवा" समजून घे. 
प्राणीमात्रांवर दया करून 
"जग आणि जगू दे."

                          सौ.प्रतिभा सोपान वाठ.
                          अकोला     
                          दि. 23.06.2020
[6/24, 9:40 PM] Smj Bhand__Mangala Dahake Bhandara: .   पारंपरिक खाद्य पदार्थ-  उकडीचे मोदक
लग्न झाल्यावर कोकणात आले आणि उकडीचे मोदक हा इथला पारंपरिक पदार्थ इथल्या मैत्रीणीच्या मदतीने शिकले. संकष्ट चतुर्थी ला इथे हे मोदक आवर्जून करतात. पर्यटनाला आलेल्या काहींनी हा पदार्थ नक्की खाल्ला असेल.
 कृती:
साहित्य.
मोठं ओल नारळ
किसलेला गूळ
२ कप तांदूळाचे पिठ
वेलचीपूड
मिठ
तांदूळाच्या उकडीत घालण्यासाठी तेल, तूप

कृती:
१) सारण बनवण्यासाठी नारळ खवून घ्यावा. (नारळाचे दोन भाग करून विळीच्य पुढच्या भागाला असलेल्या अर्ध चक्रांने खोवतात. खोवता येत नसेल तर काळी पाठ काढून खोबरे मिक्सर ला लावून बारीक करावे. खोवल्यास चव उत्तम होते.)  प्रमाणासाठी एक स्टीलची वाटी घ्यावी. जितकया वाट्या खवलेला नारळ असेल त्याच्या निमपट किसलेला गूळ घ्यावा. (उदाहरणार्थ २ वाटीभर नारळाचा चव त्यासाठी १ वाटी किसलेला गूळ).पातेल्यात एक चमचा शुद्ध तूप, खवलेला नारळ आणि गूळ एकत्र करून मंद आचेवर ढवळत राहावे. गूळ वितळला कि वेलची पूड घालावी. ढवळून बाजूला ठेवून द्यावे.
२) आवरणासाठी तांदूळाची उकड करण्यासाठी नेहके जितके पिठ तितके पाणी असे प्रमाण घ्यावे. (तांदळाचे पीठ गिरणीचे असल्यास बारीक हवे, बाजारात बासमती राइस पीठ मिळते, साधे तांदूळ पीठ सुध्दा चालतात. )२ कप तांदूळ पिठासाठी २ कप पाणी गरजेचे असते. जाड पातेल्यात २ कप पाणी उकळवत ठेवावे. त्यात १ चमचा तेल किंवा तूप घालावे. चवीसाठी थोडे मिठ घालावे. गॅस बारीक करून पिठ घालावे. सरत्याच्या मागच्या दांडीने ढवळावे. मध्यम आचेवर २-२ मिनीटे २-३ वेळा वरती झाकण ठेवून वाफ काढावी. गॅसवरून उतरवून ५ मिनीटे झाकून ठेवावे.
३) परातीत तयार उकड काढून घ्यावी. हि उकड व्यवस्थित मळून घ्यावी लागते. त्यासाठी बाजूला वाडग्यात कोमट पाणी आणि वाटीत थोडे तेल घ्यावे. उकड मळताना तेल आणि थोडे पाणी लावून मऊसर मळून घ्यावी.
४) उकड व्यवस्थित मळून झाली कि त्याचे सुपारीपेक्षा थोडे मोठे गोळे करून त्याची पारी तयार करावी. त्यात एक चमचाभर सारण भरून बोटाने पारीच्या चुण्या कराव्यात आणि सर्व चुण्या एकत्र आणून मोदक बंद करावा.बाजारात मोदक साचा उपलब्ध आहे साच्यात पहले उकडिचा गोळा भरून बोटाने जागा तय्यार करावी नंतर सारण भरून बंद करावे. आणि साचा उघडून मोदक काढावा.
५) जर मोदकपात्र उपलब्ध असेल तर पात्रात पाणी उकळत ठेवावे .त्यातील चाळणीत स्वच्छ धुतलेले सुती कापड ठेवून किंवा प्लास्टीकची जाड शिट ठेवून त्यावर मोदक ठेवावेत. वरून झाकण लावून १०-१२ मिनीटे वाफ काढावी.
६) जर मोदकपात्र उपलब्ध नसेल तर मोदकांना वाफवण्यासाठी उपलब्ध असलेल्या चाळणीपेक्षा मोठ्या तोंडाचे जाड बुडाचे पातेले घ्यावे. त्यात ३-४ भांडी पाणी उकळावे. मोठे भोक असलेल्या स्टीलच्या किंवा अल्युमिनीयमच्या चाळणीत स्वच्छ सुती कापड ठेवून त्यावर मोदक ठेवावेत. एकावर एक मोदक ठेवू नयेत. त्यामुळे मोदक फुटण्याचा संभव असतो. जेवढे मावतील तेवढेच मोदक ठेवावेत. पातेल्यातील पाणी उकळले कि मिडीयम हाय गॅसवर पातेल्यात कूकरचा डबा ठेवावा त्यावर मोदकांची चाळण ठेवावी. पाणी मोदकांच्या तळाला स्पर्शेल एवढे असले पाहिजे. वरून झाकण ठेवून १२-१५ मिनीटे वाफ काढावी.
७) जर मोदक केल्यावर तांदूळाची उकड उरली असेल तर त्यात मिरची, मिठ, जिरे, हिंग, हळद, थोडी चिरलेली कोथिंबीर घालून मळून घ्यावी आणि त्याच्या गोल छोट्या चपट्या पुर्या करून शेवटचे मोदक वाफवताना त्यातच या निवगर्या वाफवून घ्याव्यात.
गणपती बाप्पाला याचा नैवेद्य दाखवून साजूक तूप घालून गरमागरम मोदक खावेत.
सोबत फोटो पाठवत आहे.

सौ. रूपाली अमोल बोंद्रे
भंडारा ह. मु. महाड(रायगड कोकण)
[6/24, 9:42 PM] Smj Bhand__Mangala Dahake Bhandara: रुपाली बोन्द्रे--उकडीचे मोदक-- 2
[6/24, 9:45 PM] Smj Bhand__Mangala Dahake Bhandara: आशा वनवे--आलू bonda--3
[6/24, 9:46 PM] Smj Bhand__Mangala Dahake Bhandara: स्वाती सेलोकर,   संज्याच्या पुऱ्या
4
[6/24, 9:48 PM] Smj Bhand__Mangala Dahake Bhandara: कमल सारवे --घनुले--5
[6/24, 9:49 PM] Smj Bhand__Mangala Dahake Bhandara: प्रिया गोमासे,--रवा बेसन लाडू-6
[6/24, 9:52 PM] Smj Bhand__Mangala Dahake Bhandara: मनोरमा तिजारे--मुगडाळ लाडू--7
[6/24, 9:56 PM] Smj Bhand__Mangala Dahake Bhandara: पल्लवी fendar--आलू स्टिकस
8
[6/24, 9:58 PM] Smj Bhand__Mangala Dahake Bhandara: मंगला डहाके,भंडारा--वड्या च पाणी--9
[6/24, 10:00 PM] Smj Bhand__Mangala Dahake Bhandara: सुषमा पडोळे, भंडारा--तरोट्याचीभाजी--10
[6/24, 10:02 PM] Smj Bhand__Mangala Dahake Bhandara: योगा भुते, नागपूर--मूग डाळ कचोरी--११
[6/24, 10:05 PM] Smj Bhand__Mangala Dahake Bhandara: मंगला kantode--मुगडाळ पक्वान्न--12
[6/24, 10:07 PM] Smj Bhand__Mangala Dahake Bhandara: पारंपरिक खाद्य पदार्थ-दही वडा
साहित्य-उडीद सोल(भिजून बारीक केलेली)
दही
मिठ
तेल
साखर
जिरेपूड
सजावटीला- तिखट, हळद, मसाला, शेव,कोथिंबीर, इ..
कृत-प्रथम बारीक केलेली उडीद सोल घायचा तायमध्ये चवीप्रमाणे मीठ, तेल,पाणी घालून फेटाडून घ्या. नंतर तेल गरम झाल्यावर वडे गोलाकार मध्ये तळून घ्यावे... नंतर कोमट पाण्यात मिठ घालून तळलेले वडे 15 मी भिजत घालावे. त्या नंतर डिश तयार करावी व सजावटीसाठी मसाला,शेव,आवडीप्रमाणे चिंच,,,,,
दहिवडा पदार्थ खायला तयार.. लग्न व कार्यप्रसंगामध्ये लोक आवडीने खतात.
श्वेता स.कानतोडे.   अमरावती
[6/24, 10:08 PM] Smj Bhand__Mangala Dahake Bhandara: श्वेता kantode--दहिवडा--13
[6/24, 10:10 PM] Smj Bhand__Mangala Dahake Bhandara: मीरा शेबे--कणकेचे ghivar--14
[6/24, 10:11 PM] Smj Bhand__Mangala Dahake Bhandara: जयश्री रेहपाडे--balushahi
15
[6/24, 10:13 PM] Smj Bhand__Mangala Dahake Bhandara: बिट्टू--शेव पुरी --16
[6/24, 10:16 PM] Smj Bhand__Mangala Dahake Bhandara: शोभा खोकले--बिटत्या--17
[6/24, 10:19 PM] Smj Bhand__Mangala Dahake Bhandara: अनुश्री धांडे,राघोर्ते--चकली--18
[6/24, 10:20 PM] Smj Bhand__Mangala Dahake Bhandara: शीतल ठवकर ,देव्हाडी--कणकेचे 
बिस्कीट--19
[6/24, 10:22 PM] Smj Bhand__Mangala Dahake Bhandara: रेखा लांडगे--balushahi--20
[6/24, 10:23 PM] Smj Bhand__Mangala Dahake Bhandara: वर्ष इलमे--स्वीट रोल--21
[6/24, 10:46 PM] Smj Bhand__Mangala Dahake Bhandara: माझी आवडती कविता
आनंदीआनंद गडे
कवि-बालकवी
आनंदीआनंद गडे
जिकडे तिकडे चोहिकडे
वरती खाली मोदी भरे
वायू संगे मोदी फिरे
नभात भरला, दिशांत फिरला
जगात उरला
मोदी विहरतो चोहिकडे....
सुर्य किरण सोनेरी हे
कौमुदी ही हस्ते आहे
खुलली संध्या प्रेमाने
आनंदे गाते गाणे
मेघ रंगले, चित्रण दंगले
गान स्फुरले.... इकडे तिकडे चोहिकडे...

वाहती निर्झर मंदगती
बोलती लतीका वृक्षतती
पक्षी मनोहर कुजीत रे
कोणाला गातात बरे
कमल विकसले, भ्रमर गुंगले
बोलत वदले.... इकडे तिकडे चोहिकडे....
स्वार्थाच्या बाजारात 
किती पांढरे रडतात
त्यांना मोद कसा मिळतो
सोडून स्वार्था तो जातो
द्वेष संपला,मत्सर गेला
आता उरला... इकडे तिकडे चोहिकडे, आनंदी आनंद गडे.
सौ.मीरा शेबे भंडारा.
[6/24, 10:46 PM] Smj Bhand__Mangala Dahake Bhandara: *माणुसकीचा झरा*

जिथे वाहतो सदा
माणुसकीचा झरा
तोची आपुला धर्म खरा
भुकेल्याला अन्न तहानलेल्याला पाणी
गाडगेबाबांची शिकवण
पाडु अंगवळणी
थोरामोठ्यांचे गुण आणु
आचरणात त्यांच्या चांगल्या
गोष्टी ठेवू निरंतर ध्यानात
हिंदू धर्माची शिकवणच
जणू माणुसकी जपण्याची
आंधळ्या पांगळयांना धावुन
मदत करण्याची
जिथे अन्याय होतो
तिथे मदतीचा हात देण्याची
अन्यायाला तत्पर वाचा फोडण्याची
हिंदूधर्माची शिकवणच आहे
माणुसकी जपण्याची

              *सौ नंदा भोयर*
[6/24, 10:46 PM] Smj Bhand__Mangala Dahake Bhandara: बि.के सा. सं.परिषद
उपक्रम..आवडती कविता

        ‌‌"चेष्टा"

शब्द चेष्टा दोन अक्षरा
करता कुणी लागीशब्द उरी
बोचती  मनाला सुयांपरी
करते नात्यात दुरावा भारी

चेष्टा न् करावी कुणाची
परिस्थिती न् थांबे तयांची
खंत गरिबीची जिद्द उत्कर्षाची
जावे त्यांच्या वंशा,दशा मनाचु

करती चेष्टा धुर्त मनाचे
अभिमान त्यांना श्रीमंतीचे
कालचक्र हे फिरे जिवाचे
आज तुमचे,परवा आमचे

संवाद साधता विनोद करावा
तोलुनी शब्द विचारी बोलावा
चुक दाखविता मना न् घ्यावा
मस्त खेळत मन जुळवावा

नणंद भावजय नाते स्नेहाचे
बोलणे  असावे मनोमिलनाचे
परी शब्द टोमणे कुचेष्टेचे
बदनाम नाते जगी त्यांचे

चेष्टा पहावी त्या सुधारकांची
निंदकाचे घर असावे शेजारी
चुकले भुलले आदान प्रदानाची
शिकवण घ्यावी थोर साधुसंताची

दशरथ अतकरी, नागपूर
दि.२४जुन२०२०
[6/24, 10:46 PM] Smj Bhand__Mangala Dahake Bhandara: आजचा उपक्रम--
        आवडती कविता
   ।। हळवे मन ।।
उमेदीचे वारे अंगात संचारले
अन हळवे स्वप्न तिने पाहिले ।।

दह्याचा माठ डोईवर घेऊन
आपल्याच तालात जाऊ लागली धाऊन ।।

म्हणे,दही विकून पैसे मी मिळविण
त्याच पैश्यांची नथ मी आणीन ।।

साजेशी नथ नाकात घालीन
भरजरी कपड्यांत पिक्चरला जाईन ।।

रामाचा हात हातात घेईन
सुंदरशा नाथीने त्याला भाळवींन।।

नथ वर धरून आईस्क्रीम खाईन
लाजून नाक मी जोरात मुरडेन।।

मानेला जोरात झटका दिला
डोईवरचा माठ खालीच पडला।।

ते बघून मन जागे झाले
हळवे स्वप्न क्षणात भंग पावले।।
---------------------------------------
           मंगला डहाके, भंडारा
[6/24, 10:46 PM] Smj Bhand__Mangala Dahake Bhandara: * माझी आवडती कविता*
  
*कोरोनाचे येणे*

कोरोनाचे आगमन झाले
खुप काही शिकवून गेले
गरिब श्रीमंत एकाच रांगेत आले
इलाज त्यांच्यावर सारखेच झाले

खुप गर्व होता श्रीमंतीवर
एका झटक़यात नशा उतरली
तु अन् मी एकच आहे
अशी शिकवण कोरोनाने दिली

कोरोनाच्या येण्याने मानसेही
खुप जवळ आली
वेगवेगळ्या ग्रुपमध्ये वेळ
आपुला घालवू लागली

नवनवीन कल्पना सुचवल्या
त्यातही बायका खुप छान नटल्या
नथीचा नखरा खुप छान झाला
घरी बसण्याचा कंटाळा नाही आला

कवि लोकांची तर मजाच झाली
रोज एक नविन कविता लेखणीतून अवतरली
नविन ग्रुप तयार झाला
मला तर बाई खुपचं आनंद झाला

            सौ नंदा भोयर
[6/24, 10:46 PM] Smj Bhand__Mangala Dahake Bhandara: ।। पाऊस ।।

येती पावसाच्या धारा,
नाहते आनंदान धरा।
      बीज अंकूर फुलवी,
       प्रेमा शिवार हसवी।
            येती पावसाच्या धारा,
                शांत होई वसुंधरा।

घरधनी पाही नभ,
चमके डोळ्याची वीज।
    पावसाचे रुप तेअनेक,
     कधी करी प्रेम, कधी रौद्ररूप।

येई धो धो रे पाऊस,
वाहून नेई रे संसार।
     मांडे डोक्यावर हात,
     टक लावते नभात।
        सावरु कशी पाण्यात,
         काही नाही रे घरात।

सौ. के.बी सार्वे भंडारा.
[6/25, 6:32 PM] Smj Bhand__Mangala Dahake Bhandara: 🙏पारंपरिक आभूषण
[6/25, 6:34 PM] Smj Bhand__Mangala Dahake Bhandara: ** कोल्हापुरी साज **

हा दागिना कोल्हापूर मध्ये जास्त घातला जातो म्हणून ह्याला कोल्हापुरी साज म्हणतात. कोल्हापूर करांची शान असलेला हा दागिना आहे. हा दागिना लाखेवर तयार केला जातो. यात वेगवेगळ्या आकाराची सोन्याची पाने सोन्याच्या तारेमध्ये गुंफली जातात. हाराच्या मध्यभागी एक गोलाकार पेंडंट असते. 

सौ स्वाती दयानंद सेलोकर
भंडारा
[6/25, 6:34 PM] Smj Bhand__Mangala Dahake Bhandara: स्वाती --1
[6/25, 6:52 PM] Smj Bhand__Mangala Dahake Bhandara: ठुशी

ठुशी म्हणजे ठासून भरलेले गोल मणी.ठुशी हा प्रकार राजघराण्यात फार प्रसिद्ध होता.छोट्या मण्यांचा गळ्याबरोबर असलेला हा दागिना म्हणजे ठुशी. मण्यांच्या आकारामुळे हा नाजूक तर दिसतोच, आणि समारंभात मुलींनाही शोभून दिसतो. यात कधी मध्यभागी गडद गुलाबी माणिक तर कधी सोन्याचं पानही असतं. सगळ्याच समारंभात बायका हौशीने मिरवताना दिसतात.

सौ. रूपाली अमोल बोंद्रे
[6/25, 6:53 PM] Smj Bhand__Mangala Dahake Bhandara: रुपाली।  2
[6/25, 6:53 PM] Smj Bhand__Mangala Dahake Bhandara: जोंधळापोत
   हा दागिना पारंपरिक व जुना दागिना आहे,बारीक छोटया छोटया सोन्याच्या मण्यांपासून हा तयार झालेला,पाच सरी दागिना जुन्या काळी फार प्रसिद्ध होता,आमच्या आजी,आई हा दागिना घालून लग्नात मिरवीत असत,घातल्यानंतर,अतिशय सुरेख दिसत असे,आणि जिने घातलाय ती तर जणू लावण्यवती उठून दिसल्या शिवाय राहत नसे, आजच्या महिला पण याला सणसमारंभाला आपली पसंती देतात.🙏🌹
[6/25, 6:54 PM] Smj Bhand__Mangala Dahake Bhandara: कीर्ती।   3
[6/25, 6:56 PM] Smj Bhand__Mangala Dahake Bhandara: शीतल ठवकर ,देव्हाडी--4
[6/25, 6:56 PM] Smj Bhand__Mangala Dahake Bhandara: पारंपरिक आभूषण आता लोप पावत चालले आहेत, आजच्या तरुण पिढीला कळावे, या उद्देशाने
आपण हा उपक्रम हाती घेतला आहे,  जोंधळी पोत --
घरंदाज स्त्रियांच्या गळ्यातील हे एक आभूषण👌🌹
          मंगला डहाके, भंडारा
[6/25, 6:57 PM] Smj Bhand__Mangala Dahake Bhandara: मंगला डहाके--5
[6/25, 6:59 PM] Smj Bhand__Mangala Dahake Bhandara: माधुरी भुते--6--धाटणीची एकदानी
[6/25, 7:19 PM] Smj Bhand__Mangala Dahake Bhandara: पल्लवी बोरकर आरमोरी--7
गहू पोत
[6/25, 7:20 PM] Smj Bhand__Mangala Dahake Bhandara: ममता भोयर--8
मोत्यांचा हार
[6/25, 7:20 PM] Smj Bhand__Mangala Dahake Bhandara: श्वेता kantode--9
रानिहार
[6/25, 7:21 PM] Smj Bhand__Mangala Dahake Bhandara: पारंपरिक आभूषण-मंगळसूत्र
मंगळसूत्र हे स्री चे सौभाग्य चे प्रतिक असून विवाह मधे पती विधी पूर्वक आपल्या पत्नीच्या गळ्यात बांधतो. मंगळसूत्राचे स्थान कोणीच घेवू शकत नाही. काळ्या रंगाचे मणी दोघांचे प्रेमाचे प्रतीक आहे. म्हणून मंगळसूत्र हे स्त्री चा सौभाग्य चा आहेर मानला जातो.
[6/25, 7:22 PM] Smj Bhand__Mangala Dahake Bhandara: मंगला kantode--10
मंगळसूत्र
[6/25, 7:24 PM] Smj Bhand__Mangala Dahake Bhandara: पाटल्या--कमल सारवे bhandara --11
[6/25, 7:25 PM] Smj Bhand__Mangala Dahake Bhandara: मोत्याच्या कुड्या---12
रेणुका झंझाड
[6/25, 7:26 PM] Smj Bhand__Mangala Dahake Bhandara: ।। मंगळसूत्र ।।

भारतीय जीवन पध्दतीत कुटुंबसंस्थेस अत्यंत मोलाचे स्थान आहे. या कुटुंबसंस्थेचा पाया म्हणजे आपली विवाहसंस्था होय. 
सोळा संस्कारांपैकी ‘विवाह’ या संस्काराचे स्त्री-पुरुषाच्या जीवनात उदात्त, मंगल, भावरम्य संस्कार मानला जातो. 
या विवाहाची अर्थपूर्णता ‘मंगळसूत्र’ या प्रतिकाची- दागिन्याची मानली गेलीय.  
 जन्म, विवाह, मृत्यू या गोष्टी दैवाधीन, ईश्वराधीन मानल्या गेल्या आहेत. जन्माच्या गाठी देव बांधतो, असंही आपल्याकडे मानलं गेलं आहे. 
‘पाणीग्रहण’ हा सुंदर शब्द विवाहास आहे. वराने वधूचा पत्नी होण्यासाठी हात धरणे. पुरुष स्त्रीचा हात धरतो, मंत्रोच्चार होतो. वधूला हाती धरून अग्नीभोवती प्रदक्षिणा घातलो, कंकणबंधन होते. त्या वेळी तर वधूच्या गळ्यात मंगळसूत्र बांधतो.   
मंगळसूत्राला संस्कृतमध्ये ‘मांगल्यतंतू’ असेही म्हणतात.
प्रत्येक हिंदू स्त्रीला विवाहाच्या बंधनात ठेवणारं ‘मंगळसूत्र’ हा दागिना न वाटता ते भावबंधन वाटत असतं. 
ग्रामीण भाषेत यावा ‘डोरलं’ असं सुंदर अर्थवाही नाव आहे.
आमच्या उन्नत, उदात्त, मंगल विचारांचा वारसा जतन करून जीवन समृध्द, वैभवशाली करण्यासाठी हे सुंदर विचारांचे मंगळसूत्र घरात शोभू द्यावे. म्हणजे ‘मंगळसूत्र’ केवळ अलंकार न वाटता तो ‘भावालंकार’ किंवा ‘श्रध्दालंकार’ वाटेल.
सौ.अनुश्री इशान राघोर्ते धान्दे, पुणे ..😊🙏🏻
[6/25, 7:27 PM] Smj Bhand__Mangala Dahake Bhandara: अनुश्री धांडे--मंगळसूत्र  13
[6/25, 7:30 PM] Smj Bhand__Mangala Dahake Bhandara: सुचेता सारवे--मोत्याचा हार--14
[6/25, 7:31 PM] Smj Bhand__Mangala Dahake Bhandara: मोहनमाळ---15
अनुश्री धांडे
[6/25, 7:37 PM] Smj Bhand__Mangala Dahake Bhandara: हुंडाबळी--
        -------
आमच्याकडे नसे रीत ती
झाडीपट्टी म्हणतात मागासलेली
वऱ्हाडात हुंडा उच्च स्तरीय प्रतिष्ठा समाजात मानलेली ।।
कन्या जन्मली की वाटे
काळजी माय बाबा हृदयी
पैसा पैसा जमवण्या
लागतात ते हुंड्यापायी ।।
शेती विकून कधी ,कर्जाचे ओझे
तरी मुलींना देतात हुंडा
सासारच्यांचे तोंड फाटके
भरत नाही लाखाचा हंडा ।।
येते ती सोनपावलाने
सासरच्या उंबरठ्यावर 
तगादा लागतो पैशासाठी
कोमेजते फूल मंदिर पायरीवर।।
कधी पाठवून माहेरी
पैसे आणण्या
कधी जाळून टाकतीU
काळीज नसे, गुण बघण्या ।।
उगाच प्रतिष्ठा प्रतिष्ठा
जपत,कुणी होत नाही मोठे
अहंभाव चित्ती दिसता
अंतरी असती सदाच खोटे ।।
काळजाच्या तुकड्याला असते
मायेच्या कोंदणात जपलं
पती, सासरा, सासू, दीर याना
तिचं सोनेरी पाऊलही खुपलेलं।।
हुंडा देने आणि घेणे
कायद्याने आहे गुन्हा
तरीही गुण न बघता समाज
हुंडा घेतो पुन्हा पुन्हा ।।
---------------------------------
      मंगला डहाके, भंडारा
[6/25, 7:37 PM] Smj Bhand__Mangala Dahake Bhandara: हुंडाबळी (नक्की वाचा) 😊🙏


जन्म झाला लेकीचा, आता करेल ती स्वप्न पुर्ण, 
खुप शिकावे, पै-पै पैसा बाप लावताे हाेऊन ताे जिर्ण. 
मुलगी शिकली प्रगती झाली, अजुन हे कागदावरच,
कारण हुंडाबळी च्या विचाराने बापाचा जिवही टांगणीवरच. 

हजार द्या लाख द्या बाेली अशी हाेत हाेती, 
लाडाची पाेर, दुसर्या घरी धाडण्याची इच्छा हाेत नव्हती. 
शेवटी बाेली गेली लाखावर, सुपारी ही फुटली, 
अन् शिकली सवरली लेक लग्नासाठी नटली. 
जिवाचं रान करुन शिकवले याचा तिला माेठा अभिमान, 
एेकदिवस हाच हुंडा घेईल जिव, याचं नव्हतं तिला भान. 

गेली लेक सासरला सगळं मस्त चाललं हाेतं, 
बापाकडे तुप रोटी, इकडे भाकरीच्या तुकड्यावर भागत हाेतं.
लाख रुपये घेऊन सुद्धा नवरा निट वागेना, 
हाल किती करतात हे माहेरी काही सांगेना. 
एेवढं शिकुन काय झालं ? हाेई माेठा पश्चाताप, 
रडुन रडुन आठवण येई, जेव्हा घास चारुन देई बाप. 
हाेई पिळणुक पैशासाठी, स्त्री पणाची वागणुक नाही, 
राेज परकेपणाची जाणीव, कमी हाेईना काही. 
शेवटी शिकुन सुद्धा अडाणी असतात काही लाेकं, 
जिव द्यावा का ? विचार करुन झालं हाेतं डाेक्याचं खाेकं. 
शारिरिक अन् मानसिक आता सहन हाेईना त्रास, 
शेवटी पाेटात इवलसं पिल्लु घेऊन लावला गळ्याला फास. 
आरडा आेरडा करत करत, दाखवली थाेडी साेंग, 
तिचं हाेतं लफडं, म्हणुन सांगु लागली लाेकं.
हाेता हा हुंडाबळी, सासरे मंडळीला झाली अटक, 
जातीचे महान म्हणुन हुंड्याची लागली हाेती चटक. 
शेवटी झाला पश्चाताप, अन् दिली त्यांनी कबुली,
आम्हीच घेतला जिव, तिच्यावर केली हाेती बळजबरी. 


टिप :- काही वर्ग सुशिक्षित असुन देखील हुंड्याच्या नावाने पैसाच नाही तर भरपुर साेनं ही मागतात ताे पण हुंडाच असताे. मग अश्या काही घटना कानी पडतात, जर आपले असे विचार असतील तर आपण घेतलेल्या शिक्षणाचा काही फायदा नाही, जर शिक्षणाचा असा उपयाेग हाेत असेल तर, आपण शिक्षण घेऊनसुद्धा अडाणी आहाेत हे मात्र नक्की. मला अभिमान आहे आपला वर्ग यातला नाही, आणी आपल्यात हुंडा ही नाही. कारण आपण आहाेत बावणे कुणबी 💪😊 


प्रिया र गाेमाशे. 
आकाशवाणी नीवेदीका, चंद्रपूर.
[6/25, 7:37 PM] Smj Bhand__Mangala Dahake Bhandara: .       हुंडाबळी

आज मी खूप खुश होतो 
कारण आज मी एका मुलीचा बाप झालो होतो

माझी लाडाची परी मुळातच खूप हुशार होती
अभ्यासात नेहमी अव्वल ती येत होती

कधी मोठी झाली मला कळलंच नाही 
साडी नेसून समोर आली मी ओळखलं च नाही

चांगली नोकरी करायची तिची इच्छा होती
लग्नाला उशीर नको, मला ही काळजी होती

हुंडा मागून वरपक्ष वधुपक्षाला हिनवू लागले
१९६१ च्या कायद्याची पायमल्ली करू लागले

मुलगी म्हणते मी हुंडा न घेणाऱ्याशीच लग्न करणार
मी म्हटलं म्हणजे? तू काय घरातच बसणार?

मी आहे समर्थ तुझा संसार सुखाने थाटणार
हुंडा दिल्याशिवाय बाळ कोण लग्न करणार?

केलं जिवाचं मी रान
शेती ठेवली लग्नासाठी गहाण

लग्नाच्या या बाजारात मुलीच्या गुणांना काही किंमत नसते 
हुंडा हा सर्वश्रेष्ठ ठरतो माणुसकी कमी पडते

सासरी गेल्यावर नव्हते उरले स्वातंत्र्य
दाराबाहेर पाय ठेवल्यास बसे शिव्या सर्वत्र

पैशा साठी होऊ लागली वारंवार मागणी
हुंडा देऊन लग्न केल्याची चूक मला उमगली


मी केलेली चुकी तुम्ही करू नका
मुलीच्या लग्नासाठी हुंडा देवू , हुंडा देवू नका.

सौ. रूपाली अमोल बोंद्रे
[6/25, 7:37 PM] Smj Bhand__Mangala Dahake Bhandara: बि.के.सा.सं.प.
कविता: "हुंडा बळी"

पोराची माय लग्नाचं बोलली
गावोगावी पोरीस फिरली
शेतीवाल्याले नाहीच म्हणती
माय पोराची घाईस आली.

एकानं आणला पोरीचा पत्ता
देवा लागन मले बी भत्ता
पोरगी भाऊ कणविच दिसली
पोरगी देईन द्यावा पैसा

म्या म्हणलं कावुनजी,बसा
बाप म्हणे रिवाजच असा
पोरगी  दिली उपकारच जसा
लग्न लागलं भाऊ कसाबसा

आली भाऊ माया घरी
आठ दिवस रायली बरी
सुर्यनारायण आला दारी
झोपुणच रायते पलंगावरी

म्हातारी माय माझी कामाले
जवान बायको भाऊ पावाले
देते रिपोर्ट धमकीची पोलीसाले दहेज देऊनही हुंडा बळी केले.

दशरथ अतकरी, नागपूर
दि.२५जुन२०२०
[6/25, 7:37 PM] Smj Bhand__Mangala Dahake Bhandara: *हुंडाबळी*
   
हुंड्यासाठी किती जातात बळी
खुलण्या आधीच कोमेजते कळी
फुलासारखे जपतो आपण
काळजाच्या तुकड्याला
क्षणात भंगवितो तीला आणि
तिच्या भावी स्वप्नाला
पैशासाठी तीचे तोडतो लचके
इलाज नाही चालत 
बापाजवळ पैसे असतात मोजके
उसनवार घेऊन भरतो 
बिचारा याची खळगी
तरीही एक दिवस असा येतो
फॅनला लटकते मुलगी
केव्हा समाज सुधरणार की
अशाच निष्पाप मुली मरणार
तेही दिवस दूर नसणार
एक दिवस असा येणार
मुलगीच याला धडा शिकवणार

          नंदा भोयर
[6/25, 7:37 PM] Smj Bhand__Mangala Dahake Bhandara: हुंडाबळी

ना लाज ना लज्जा
हुंडा मागणे वाटे मज्जा
पोरीच्या बापाला सजा
वर पक्ष आहे किती खुजा.

हुंड्यापायी वाटे शाप
दारिद्रयानं भरलं माप
वधू पक्षास संताप
वरास नाही वाटत पाप.

पोटची पोरं लाडात वाढली.
हुंडा देऊन सासरी धाडली.
भकास सासर तोंड फाटली
माणुसकी सारी आटली.

माप ओलांडून लक्ष्मी आली
गुणांची कदर नाही झाली.
लालची सासरं, सैतान झाली.
सोशीक मैना हुंडाबळी ठरली.

लेकींना लोटू नका मरणाच्या दारी
स्वयं सिद्धा बणवून द्या उभारी
हुंडाप्रथेचा जोअसे वैरी,त्यास वरी
आत्मसन्मान बाळगा लेकीवरी.

नका‌ बाळगू भिती समाजाची
लज्जा असू द्या, कुप्रथेची
मुलगी नसे भार, असे आधाराची
दिशाअन् दशा बदलवू समाजाची.

मुलांपेक्षा मुलगी बरी
म्हणतो आपण वरचे वरी
लग्नासाठीच कां बळजबरी
मुलांना दावा,कन्या नाही लाचारी.

सन्मानानं वागवा,कर्तव्यदक्ष नारी
घर स्वर्गतुल्य बणेल,गोकुळापरी
हुंडा देणे-घेणे, दोघेही अपराधी
कां अमुल्य जीवन नाशवीता 
हुंड्याची व्याधी.

सौ.मीरा शेबे भंडारा.
[6/25, 7:37 PM] Smj Bhand__Mangala Dahake Bhandara: हुंडाबळी(मुलीचे मनोगत)

नको बाबा,नको आई,
लग्नाच्या माझ्या का करता हो घाई.
मुलगी झाली म्हणून जीवाला घोर तुमच्या लागला,
पोटाला चिमटा घेऊन पै-पै जमविला,
लेकीच्या लग्नासाठी एका दमात खर्चिला.
हुंड्याची रीत किती विचित्र असते आई,
शेत विकून,घर विकून मायबाप येतात डबघाईस.
मुलगी परक्याचे धन म्हणून पाठविल्या जाते सासरी,
मोल त्याचे का ग ठरवतात हुंड्याच्या पैशावरी?
नाही त्यांना शिक्षण-संस्काराचे देणे घेणे,
फक्त पैश्याच्या लालसेपोटी मुलीच्या जीवाचे हालहाल करणे.
हुंडा घेणाऱ्याची हाव कधी संपत नाही,
म्हणून म्हणते बाबा आई,
कन्यादानापेक्षा मला शिक्षणाच दान द्या.
हात पसरु नये कुणापूढं एवढ मात्र बळ दया.
स्वतःच्या पायावर उभ राहुन सक्षम मी होणार,
अन लग्नासाठी म्हणाल तर;
ज्याच्या मनगटात जोर, त्यालाच मी वरणार.
काबाडकष्ट करून मी वाढविन दोन्ही घरचा मान,
जन्मदात्या आई-बाबांना देईन मी सन्मान.
हुंड्यासाठी मात्र मी,
माझा अन तुमचा बळी नाही देणार.

                          सौ.प्रतिभा सोपान वाठ.
                          अकोला     
                          दि. 25.06.2020
[6/26, 5:40 PM] Smj Bhand__Mangala Dahake Bhandara: बिग.के.सा.सं.प.

     "आजीची माया"

ज्यांना मिळते आजीची माया 
मस्तक ठेवावे तिच्या पाया
शितल वारा प्रेमाची छाया
झिजते नातवांस आजीची काया

कथा कहाण्या सांगते आजी
भिती दाखवी भुताखेताची
प्रसाद आणायला मंदिरी जाई
 घाबरता भितीने लपवी पदरी

करावी आम्ही दंगामस्ती
मारामारी शिरजोरी जास्ती
तोंडावर बोट हाताची घडी
आवाज आजीचा भरतेय धास्ती 

आई-बाबा रागावती घराला
लपून ठेवी आजी पदराला
मुरमुरे फुटाण्याचा खाऊ द्यावा. 
वर्षाव प्रेमाचा आजीचा व्हावा
आजी आम्हाला नेई गावाला
आमचे गुणगान सांगे भावाला
 मस्त पाहुणचारहोई आम्हाला
स्मरण करावे तिच्या मायेला

दशरथ अतकरी, नागपूर
दि.२६जुन२०२०
[6/26, 5:40 PM] Smj Bhand__Mangala Dahake Bhandara: आजीची माया

लाडाची कोडाची माझी 
गोड गोड आजी.
दिसायला साधी 
बोलायला मधाळ,
आजी माझी मायाळू फार.
नातवांचे लाड पुरविते,
छान-छान गोष्टी शिकविते.
करते पूजा-हरिपाठ,
अभंग-ओव्या तोंडपाठ.
आजीच्या हातची चवच न्यारी,
पदार्थ करते पारंपारिक.
शेवळ्या कुरड्या पापड लोणचे,
आजीच्या सल्ल्याशिवाय होणार कसे?
आजी जणू घरचाच वैद्य,
घरगुती औषधीचा टक देते मस्त.
अनुभवाच्या गोष्टी तिच्या गाठी,
खमठोक उभी सगळ्यांच्या पाठी.
आजीचे असते सगळीकडे लक्ष,
तिच्या तैनातीत सारेच दक्ष.
आजी आमची शिदोरीचा ठेवा,
देवा आमच्या आजीला सुखी ठेवा.

                          सौ.प्रतिभा सोपान वाठ.
                          अकोला     
                          दि. 26.06.2020
[6/26, 5:40 PM] Smj Bhand__Mangala Dahake Bhandara: .         माझी आजी
आजीला माझ्या म्हणायचे मी दादी
मदतीला सर्वांच्या असायची ती रेडी

अडाणी असली तरी होती ती हुशार
रामायण, महाभारताच्या गोष्टी होत्या मुकपाठ

पिशवीमध्ये तिच्या असायचे विड्याचे पान
ओठी असायचे तिच्या हरिनाम

आई बाबा असायचे नोकरी मध्ये व्यस्त
गोष्ट सांगून जेवण करायला लावाची फस्त

आजारी असताना कुशीत घेऊन झोपायची
लुगड्याची ऊब तिच्या फार छान वाटायची

कष्ट करून शिकवल्या चे सांगत होती अनुभव
तीनही मुलांना सरकारी नोकरी म्हणून सुखावत होत तिचं मन

लोणच्याची चव तिच्या फारच न्यारी होती
अश्यातच मी तिची खूप लाडाची होती

आई आम्हाला जेव्हा जेव्हा रागवायची
मध्यस्थी होऊन तिच आम्हाला सोडवायची

सफाईची होती तिची विशिष्ट्य शिस्त
तिचा नियम मोडेल कुणाची एवढी भिस्त

आजीचे संस्कार आजही आठवतात
आठवणीने तिच्या डोळे पाणावतात

आजीची माया फार निराळी असते 
कारण आजी ही आजीच असते.🙏

सौ. रूपाली अमोल बोंद्रे
भंडारा
[6/26, 5:40 PM] Smj Bhand__Mangala Dahake Bhandara: *आजीची माया*

आजी विना नातवंड
कल्पनाच न्यारी
आमची आजी होती
एकदम भारी

भारदस्त आजी 
भारदस्त आवाज
कुंकू कपाळी मोठं
नऊवारी साज

खूप होती प्रेमळ 
जसा लोण्याचा गोळा
सांगायची एक गोष्ट
सगळे नातवंडं गोळा

कधी जरी दुखलतर
नव्हती ती झोपत
वारा घाली पदरान
नव्हती ती थकत 

कुणीही रागावल  तर
भाग माझा घेई
पदराच्या आड मला
लपवून ठेवी

सांजच्यापायी बसे
तुळशी पाशी
हाती राही गाठी
हरीनामाचा जप ओठी

    ‌‌ सौ नंदा भोयर
[6/27, 7:50 AM] Smj Bhand__Mangala Dahake Bhandara: 👫🏻  पती-पत्नी 👩‍❤️‍👨

पती-पत्नी चाक संसार रथाची
रथाला बांधतो डोर विश्वासाची.

प्रेम अन् जिव्हाळा,फुलवी मळा
नात्या नात्यात आपुलकीचा लळा.
.
दांमपत्य जीवन रंगभरी आगळा
निर्मिती होते दोहोंचा गोतावळा.

उणं बिसं सारं एक होऊन खरं
स्वप्न सुमनांचा गुंफीती हार.

देह जरी दूर मना नाही अंतर
एक न दिसता लागे हुरहूर.

भांडाभांडी हा भातुकलीचा खेळ
रुसणं मनवणं प्रित वाढीचा काळ.


पती-पत्नी सम नाही दुजी नाती
क्षणात ओहटी,क्षणात भरती.

नाही कोणी मोठं, नाही  लहान
एकमेकांना मान द्यावा समान.

तुमचं माझं करू नये कधी
आपलीच म्हणून जाणा आधी.

संसाराचा खेळ मांडला जोडीनं
श्र्वास  तोवरी खेळावं गोडीनं.

चुकामुका साऱ्या‌ पदरात घ्याव्या
गोड आठवणी स्मरणात राहाव्या.

सौ.मीरा शेबे भंडारा..
[6/27, 7:50 AM] Smj Bhand__Mangala Dahake Bhandara: आजीची माया

आजी ची माया
वट वृक्षाची छाया
नातवांच्या सुखासाठी
झिजविती काया.

संस्कारांची घागर
मायेचा सागर
वात्सल्याचा पाझर
आजीचा पदर.

घरादाराची शान
आजी आजोबांना मान
नातवंड जिव की प्राण
नाही त्यांना कसली वान.

नातवंडांसाठी 
पदराला गाठी
गाठीतील खाऊ
 घालती ओठी

नातवंडांची मिठी
साखरेची वाटी
नातवांना सांगती
गाणी गप्पा गोष्टी.

नातवंडांना प्यार
आजीचा आधार
सगळीकडे नजर
राखती घरदार.

घराचा कुलूप
मुले सुखरूप
देवाचाच रूप
आजी आवडे खूप.

सौ.मीरा शेबे भंडारा.
[6/27, 7:50 PM] Smj Bhand__Mangala Dahake Bhandara: ।। समाजावर बोलू काही ।।

      🌺  समाज  🌺

  मानव हा जन्मजात समाजशिल 
समूहाने राहणारा बुध्दीजीवी प्राणी आहे.आपल्या बुध्दी चातुर्य
बलावर त्याने आजपर्यंतची सर्व प्रगती केली आहे.
कालपरत्वे त्याच्या व्यवसाय, रोजगारावरुन जातनिहाय वर्गीकरण झाले किंवा केल्या गेले.
त्यात आपण कुणबी  कृषी उदयोग करणारे.जमिनीत 'बी' पेरुन शेती करणारे ते कुणबी.
"बावणकशी" सोन्याप्रमाने तापून
सलाखून निघणारे, दर्जेदार शेती करणारे,प्रामाणिक, कष्टाळु,दानशूर,दयाळू, मायाळु बावणकशी सोन्याप्रमाने ते "बावने कुणबी" होय.
       पण हा जगाचा पोशिंदा कुणबी समाज सर्वच बाबतीत मागे पडलेला आहे. शिक्षणक्षेत्र,कलाक्षेत्र,खेळ,कुशल कामगार या बाबतीत बराच मागे आहे.
     शासन दरबारी कुशल नेतृत्व करणारी माणसे आपल्याकडे पाहीजे त्या प्रमाणात नाहीत.अभ्यासुवृत्ती नाही,
ग्रामीणभागातील तरुणांची व्यसनाधिनता,नापिकी,महिलांचा अशिक्षितपणा, शासनाच्या योजनांचा योग्य लाभ न घेता येणे,या व अशा अनेक गोष्टी समाजाच्या मागासलेपणाला कारणीभूत आहेत.
  जुन्या काळी आणि आताही काही ईतर समाजाचे लोक आपल्या समाजाला हसतात.
आणि म्हणतात सुद्धा काहीतर म्हणीच आहेत.
१ . धान पिकला कुणबी शिकला.
२.कापुस, आंबा पिकला कुणबी शिकला. अशाप्रकारे मी शिकत असतांना ऐकलेल्या आहेत.
म्हणजेच ज्यावर्षी बर्‍यापैकी शेती पिकली की कुणबी सर्व विसरुन जातो.अशा विचारामुळे शिक्षणाकडे दुर्लक्ष झाले.त्याचेच परीणाम आज दिसत आहेत.
हेकेखोर स्वभाव,एकत्र न येणे,एकमेकांना समजून न घेणे,
माहीत असलेल्या गोष्टी ईतरांना न सांगणे, न विचारणे,या सर्वामुळे आपण मागे पडत आहोत,या मुळेच पाटिलकीचा तोरा कमी झाला आहे.
तरीही डाॅ. बाबासाहेंबांच्या सुत्रानुसार  "शिका, संघटित व्हा, संघर्ष करा" याच पालन करु तर पुढे जावु अन्यथा जि.प.,पं.स,ग्रा.प सांभाळत बसा मंत्री कधीच नाही.

बरे असो काही चुका झाल्या असतील तर मोकळ्या मनाने माफ करणे.हे माझे वैयक्तिक अभ्यासपुर्वक मत आहे.सर्वांना पटेलच असे नाही.

सौ. के.बी.सार्वे भंडारा.
[6/27, 7:50 PM] Smj Bhand__Mangala Dahake Bhandara: ** समजावर बोलू काही **

 समाज म्हणजे सर्व माणसांना जगणे सोपे व सुखकर करणारी, माणुसकी जपणारी, प्रत्येकाच्या गरजांना, भावनांना, हक्कांना व अस्तित्वाला समान न्याय देणारी एक व्यवस्था. प्रत्येक समाज हा एक दुसर्‍या पासून वेगळा असतो. प्रत्येक समाजाची भाषा व संस्कृती वेगळी असते आणि ती टिकवून ठेवणे व पुढच्या पिढी पर्यंत पोहोचविणे हे समाजच कार्य आहे. एकमेकांशी संबंध व एकमेकांवर अवलंबून असणार्‍या व्यक्ति हे ही समाजातील घटक आहेत असे म्हणायला हरकत नाही. समाजातील व्यक्तिंना त्या समाजातील परंपरा, चालीरीती, प्रथा, रुढी पाळाव्या लागतात. प्रत्येक समाजातील उद्योग - व्यवसाय किंवा उदरनिर्वाह कसा करायचा याची व्यवस्था त्या त्या समाजाने केलेली असते. पण आता त्या समाजाचा व्यवसाय त्याच समाजाने करावा अशी बळजबरी नाही. कौटुंबिक, आर्थिक, शैक्षणिक, राजकिय आणि सांस्कृतिक दृष्टीने माणसाला मजबुत करण्याचं काम समाज करतो. समाजाचे अस्तित्व टिकवून ठेवण्यासाठी एकतेची भावना असणे खूप गरजेचे आहे. पण जेव्हा समाजातील एकी तुटते तेव्हा त्या समाजातील माणसं मागे पडतात. म्हणून "एकीचे बळ मिळते फळ" हे वाक्य प्रत्येक समाजासाठी लाभदायक आहे.

सौ. स्वाती सेलोकर, भंडारा
[6/27, 7:50 PM] Smj Bhand__Mangala Dahake Bhandara: समाजावर बोलू काही.. 

माणूस हा नक्कीच समाजशील प्राणी आहे.तो समूहात म्हणजे समाजाशी जोडून राहतो. आपल्या सोबत समाजाच्या प्रगतीसाठी प्रयत्नशील असणे गरजेचे आहे. आर्थिक, सामाजिक आणि सांस्कृतिक प्रगती करणे आवश्यक आहे.
आर्थिक दृष्टया गरीब कुटुंबाला मदत, गरीब मुलामुलींना शिक्षणात मदत समाजातून केली पाहिजे. परिचय मेळावे, सामूहिक लग्न, संक्रांतीचा कार्यक्रम, गुणवंत विद्यर्थ्यांचा गौरव, वृक्ष लागवड,कोजागिरी असे अनेक कार्यक्रम  बावणे कुणबी समाज राबवत असतो. या निमित्ताने सगळे एकत्र येतात.  
बदल हा निसर्गाचा नियमच आहे आणि मनुष्याने काळानुसार बदल स्वीकारले आहे. नवीन पिढीला समाज कार्यात रस निर्माण व्हावा  व तेही समाज कार्यात जोडले जावे असे प्रयत्न होणे गरजेचे आहे. समाजाकरिता खारीचा वाटा प्रत्येक जण उचलु शकतो. आपल्या बावणे कुणबी समाजाची प्रगती होत राहो हीच सदिच्छा. 

सौ. रूपाली अमोल बोंद्रे
[6/27, 7:50 PM] Smj Bhand__Mangala Dahake Bhandara: नमस्कार
"समाजावर बोलू काहीतरी"
आज आपण समाजावर बोलू कारण आजकाल आपला समाज खुप मागे पडला आहे. tv, mobile, laptop या कारणांनी, आजच्या पिढीला समाजाविषयी काहीपण समजत नाही. त्यामुळे त्यानापण समानविषयी माहिती पाहिजे. समाजाचे ब्रीद वाक्य आपल्या सर्वांना माहीत आहे"समाजसेव हिच ईश्वरसेव"मानून समाजातील प्रत्येक लोकांनी ब्रीदवाक्य चा बोध घेऊन समाजातील प्रत्येक लोकांना मदतीचा हात व पुढाकार दयावा. तरूण पिढीला व लहान मुलांना आतापासून त्याना समाजविषयी माहिती दयावि.आपल्या समाजाचे थोर संत जगतगुरु श्री तुकाराम महाराजांनी स्पष्ठ केलेला नुसार"जे का रंजले-गांजले,त्यासी म्हणे जो आपुले,तोचि साधू ओळखावा,देव तेथेची जाणावा"हे ब्रीद वाक्य लक्षात घेऊन समाजातील लोकांनि आपले वर्तन ठेवावे व सर्व समाज बांधवाणी समान मानावे. समाजाविषयी बोलायला खूप काही आहे पण वेढेच भान ठेवून एवढयावरच संपवते......
धन्यवाद!
सौ श्वेता स.कानतोडे
अमरावती
[6/27, 7:50 PM] Smj Bhand__Mangala Dahake Bhandara: समाज:-
           समुहात राहणार्‍या व्यक्तींमध्ये असणारी व्यवस्था म्हणजे समाज. मानव हा समाजप्रिय प्राणी आहे. या उक्तीनुसार दैनंदिन व्यवहारात समाज हा शब्द धर्म, जात, वंश, वर्ग, लिंग आदी भेदातील स्त्री - पुरूषांचा जनसमुदाय या अर्थाने वापरला जातो. अर्थात तो अगदी सैलपणे, ढोबळ व प्रसंगानुरूप बदलणार्‍या संकुचित व मर्यादित अर्थाने वापरला जातो. उदा.-"भारतीय समाज" "आर्य समाज", "हिंदू समाज"  "कुणबी
 समाज" इत्यादी. प्रत्येक ठिकाणी समाज या शब्दापूर्वी उपसर्ग लावलेल्या विशेषनानुसार या शब्दाचा अर्थ अभिप्रेत असतो. तो
समान नसतो.  देशवाचक, समुह वाचक, धर्मवाचक वगैरे भिन्न अर्थाने हा शब्द व्यावहारिक भाषेत वापरला जातो, पण या सर्वांहून निराळा असा समाजशास्त्रीय अर्थ या संकल्पनेमागे आहे. त्या दृष्टीने समाज हा एक सहनशील, सातत्यशील व सहकारी सामाजिक समुह असुन, त्यातील सभासदांनी एकमेंकांतील आंतर-क्रियेव्दारे आप्तसंबंधविषयक संघटीत आकृतीबंध विकसित केला आहे. समाज म्हणजे परस्परांशी आंतरक्रिया करणार्‍या व्यक्ती आणि समचहांची मिळून बनलेली एक व्यापक संघटना - व्यवस्था होय. सामाजिक आंतरक्रियेमुळेच व्यक्ती आणि समुहात निश्चित स्वरूपाचे सामाजिक संबंध निर्माण झालेले असतात.
                      सौ. शितल श्रीकांत ठवकर
[6/27, 7:50 PM] Smj Bhand__Mangala Dahake Bhandara: समाजावर बोलु काही...
           समाज हा कसा निर्माण झाला.?जात म्हण जे काय?  असे अनेक प्रश्न आपल्या पुढे निर्माण होतात.या सगळ्या विषयांचा विचार करण्या पेक्षा आपला कुणबी समाजावर या छोट्या लेखातून काही माहीती आपल्या पर्यत पोहविण्याचा प्रयास करते.
   भारतात समाज व्यवर-था अस्तित्वात येण्या पूर्वी मानवी समुह होते .ते टोळयांचया रुपात होते पण त्यांना कुळ होते.या मुळ कुळ शब्दापासून कुडबी,कुडुबी,कणबी, कुळंबीज,कुळबी,कुलबी,कुंबी,कणबी,कुणबा असे शब्द
तयार झाले.कणबी शब्दाचा अर्थ कण म्हण जे मातीव बी म्हण जे बियाणे.महणजेच मातीत बी पेरून अन्न धान्याची
निर्मिती करणारा समुह म्हण जे कुणबी असा कुणबी शब्दाचा अर्थ लावला जातो.नागपुर जिल्हातील नरखेड,काटोल,कळमेशवर,पारशिवनी,रामटेक,कामठी,
मौदा,कुही,उमरेड इत्यादी भागात कुणबी समाजाचे लोक
मोठ्या संख्येने दिसून येतात.
          कुणबी ही एक जात आहे. या जमातीत साडेबारा
उपजमाती असलेल्या दिसुन येतात.आपण फक्त आपलयाच जातीचा विचार करतो .वरवर पाहता 1-2पोट
जातीची नावे आप लयाला माहीत असतिल.पण आज आपण इतर पोटजातीची नावे माहित करून घेवु.साडेबारा
जातींपैकी बारा उपजाती ची नावे मला मिळाली पण अर्धी पोटजात कोणती हे अद्याप कळले नाही .कदाचित हे चुकीचे ही असु शकेल.माहिती असल्या स सुधारणा करावी.ही विनंती. चला तर कुणबयाचया बारा पोटजातीविषयी जाणुन घेवु.
 1    तिरोले
 2    बावणे
  3.   धनोजे
   4.   जाधव
    5.   खैरे
     6 दखने  
      7 लेवे
      8 झाडे
       9कडवे
      10 पातीदार
       11 अंजन  
        12 मितये
                      या पोटजातीविषयी माहीती पुस्तकांमधये
  दिसुन येते.या पोटजातीची नावे वेगवेगळी असु शकतात
 माहीती असल्या स जरुर द्यावी.या लेखातून येवढेच आपल्या पुढे ठेवते.🙏🙏🙏🙏
               
            सौ .जयश्री रेहपाडे
                    नागपुर.
[6/27, 7:52 PM] Smj Bhand__Mangala Dahake Bhandara: बिग.के.सा.सं.परिषद
उपक्रम..
    
     ""समाजावर बोलुन काही...""

       कुठल्याही समाज तुमच्या आमच्यामुळेच निर्मित होतो.त्याचे अस्तित्व सांभाळण्याची जबाबदारी सर्वांचीच आहे.कारण जन्मलो समाजात तर मरणेही समाजातच आहे.जन्मता लागलेले समाज ऋण प्रत्येकाने फेडायचे असते.ते माझे काम नाही असे न समजता आपला खारीचा वाटा उचलायचा आहे.
       मुळात बावणे कुणबी समाज खेड्यात विखुरला होता.जुन्या चालीरिती,ऐश आराम,चैनीत लोळणे या समाजाच्या सवयी होत्या.त्याकाळातील धनिकव कर्ते लोकांनी लक्ष दिले नाही ते स्वार्थिच राहिले.
      अंदाजे स्वातंत्र्यानंतर समाजातील लोक शहराकडे वळले व शिक्षणघेऊन छोटीमोठी कामे व नोकर्या करायला लागले.यानंतरच समाजास खर्या  अर्थाने दिशा मिळायला लागली.नंतक्षची दुसरी पिढी अंदाजे १९८०काळातील त्यांना समाजाबाबत इतर समाजाचे तुलणेत विचार करून आपण कुठे आहोत याची जाणीव झाली."म्हणतात ना जोपर्यंत भावनेला चटके बसत नाही तोपर्यंत विकास नाही.तेव्हा समाजात समाज संघटनेबाबत चर्चा सुरू झाली.आदरणीय कै. श्रीराम दादा टिचकुले साहेब व सहकारी मंडळी यांनी मुंबई सारख्या शहरात समाजातील शिक्षीत होतकरू बांधवांना एकत्र बसवून मंडळ स्थापन केले.यांच्या चांगल्या कामाचे लोणं अख्या समाजाला कळायला लागले.
     आता तर गावखेड्यापर्यंत संघटन निर्माण झालेत.जागरूकता आली.हक्काची,ध्येयाची, जवाबदारी ची जाणिव झाली.अंधश्रध्दा हळूहळू कमी होत गेली.हे चित्र फार सुखावह आहे.समाजाला एकत्र आणण्यास सर्वानी आपला तन ,मन ,धनाचा वाटा उचलला आहे.हि अभिमानास्पद बाब आहे.
     आज आपल्या समाजाने बर्यापैकी शैक्षणिक सामाजिक व्यवसायीक प्रगती केली आहे.मी त्या सुरूवातीच्या मंडळींना शतश: प्रणामं करतो.की त्यांनी आम्हाला आज इथपर्यंत पोहचविलं.
         थोडक्यात आज आपण या बि.के.सा.सं.परिषदेच्या माध्यमातुन कविता व साहित्य लेखनाचे कार्य करतो व कौतुक सुध्दा करतो.हे संघटन जागृतीचे बळ आहे.असा सामुहिक रित्या लिहण्याचा उपक्रम फक्त आणि फक्त आपण च समाज स्तरावर राबवित आहोत.असा उपक्रम कुठलाही समाज आपल्या पातळीवर राबवतांना मला तरी
नागपूर शहरात दिसत नाही.ही आपल्यासाठी एक स्पृहनिय बाब आहे.यातुन व्यक्ती विचार प्रकट व प्रगत होतात.विचाराला व शब्दाला धार व गती येते.मी सौ. मंगलाताई चे अभिनंदन करतो की त्या दररोज नवीन विषय देऊन आम्हाला दिसते करतात.आमच्या बुध्दीला बुध्दी चा प्याला पाजतात. खुप छान समाधान वाटते.यात इतरांनीही जुळुन आपली प्रज्ञा कामाला लावावी व हा ज्ञानाचा दिवा समाज संवर्धनासाठी पुढं सतत तेवत राहायला हवा! असा शुध्द निर्धार करूया.

धन्यवाद!
      ‌‌.       दशरथ अतकरी
  ‌.              नागपूर
दि.२७जुन २०२०
[6/27, 8:07 PM] Smj Bhand__Mangala Dahake Bhandara: हा मेसेज फक्त  प्रामाणिक लोकांसाठी आहे  :-  👇🏾👇🏾


प्रामाणिक लोकांनी एकदा मन लावून वाचाच... ______________________________
कोणत्याही क्षेत्रात कार्यरत असताना जसजशी प्रगती सुरु होते तसतसा छुपा विरोध हा वाढू लागतोच;
सुंदर वेलीच्या खोडावर बांडगुळ वाढावा तसा. हा निसर्गाचाच नियम आहे.
पण आपल्याला त्याची पुसटशीही कल्पना नसते.
मग तुमची प्रगती डोळ्यात सलते आणि डोक्यात भनाणु लागते तेव्हा कारस्थानांच्या बिया पेरल्या जातात.

खुरटय़ा विचारांचे कावळे एकत्र जमू लागतात आणि व्रणार्त शिशूच्या पंखावर चोच मारण्याची संधी शोधू लागतात.
मग तुमच्यावर आरोप होतात- गैरव्यवस्थापनाचे,गैरकारभाराचे, भ्रष्टाचाराचे !

तुम्ही भांबावता, हडबडून जाता. कारण हा हल्ला तुम्हाला अपेक्षित नसतो. आणि मग तुम्ही प्रत्युत्तराची तयारी करू लागता.
शब्दाला शब्द वाढतात.. त्यांची धार तिखट होते.. विरोधकांना आयते खाद्य मिळते. आणि नेमक्या याच क्षणी तुमच्या हातून आजवर न झालेली गफलत होऊ शकते. सत्यनिष्ठ, प्रामाणिक लोक कामाच्या ओझ्याने दबून जात नाही ; पण मिथ्या आरोपांच्या हल्ल्यामुळे खचून जातात. त्यांच्या आत्मविश्वासाला तडा जातो आणि मग प्रत्युत्तरे देण्याच्या घाईगर्दीत तो आजवर सांभाळलेले संतुलन गमावून बसतो. नुकसान हे या क्षणाला होते.
त्यामुळे जेव्हा तुम्ही अर्थशून्य नौटंकीला सामोरे जाल, विषारी टीकेचे फूत्कार ऐकावे लागतील, तुमच्याबद्दलची व्यक्त होणारी मते चुकीच्या मार्गावर दाखविलेल्या दिशांचे प्रतििबंब ठरू लागतील,
तेव्हा ताठ मानेने उभे राहायचे आणि एकही शब्द न बोलता तेथून निघून जायचे, यातच खरे शहाणपण आहे. हा पळपुटेपणा नाही. ही पाठ दाखविण्याची प्रवृत्तीही नाही. तर ही शहाणी, समंजसपणाची, सन्मानाची भूमिका आहे. प्रत्युत्तर देणे, आवाज चढवणे म्हणजे एका अर्थी होणाऱ्या आरोपांना स्वीकृती देण्यासारखेच ठरते.

प्रत्येक प्रत्युत्तराची एक वेळ असते. अपमान विसरायचे नसतात, तर ते मनाच्या हळव्या कोपऱ्यात जपायचे असतात. त्यांची बोच रोज लागता कामा नये ; पण त्यांचा सल मात्र खोलवर दडलेला बरा. कारण तो पुढच्या वाटचालीला मार्गदर्शक ठरतो.

यश पचविणे एक वेळ सोपे; पण आरोप रिचवणे खूप कठीण. 'हेचि फल काय मम तपाला'? याचा वारंवार मनाच्या खिडकीत येणारा प्रत्यय सहन करणे सोपे नाही.

कोणत्याही मॅनेजमेन्ट स्कूलमध्ये हे शिकविले जात नाही. मग हे शिकायचे कसे?

वेळ आणि अनुभव यापेक्षा मोठे गुरू नाहीत.आरडाओरड करायला शक्ती लागत नाही, ती शांत राहायला लागते. अशावेळी बाळगलेले मौन हे तुमच्या दुर्बलतेची निशाणी नसून तुमच्या आत्मिक शक्तीचा तो साक्षात्कार आहे. आणि ही शक्ती एका दिवसात येत नाही. तिचा 'थेंबे, थेंबे' संचयच करावा लागतो. तुमच्या निघून जाण्यात तुमचा पराभव नसतो, तर ती तुमची प्रगल्भता असते. आरोप करणाऱ्यांचे पितळ उघडे पडतेच, आणि कालांतराने इतरांनाही सत्य समजते. तोपर्यंत तुम्ही बरीच प्रगती केलेली असते.

शेवटी काय तर''आपण प्रत्येकाच्या दृष्टीने चांगले असू शकत नाही,, ''पण आपण त्यांच्यासाठी उत्कृष्ट आहोत जे आपल्याला समजतात,,

''माणसाने स्वत:च्या नजरेत चांगलं असलं पाहीजे,,
''लोक तर देवाला पण नाव ठेवतात.
          अर्चना
[6/27, 9:48 PM] Smj Bhand__Mangala Dahake Bhandara: *♦️समाजावर बोलू काही....!*
                           *-देवराव मते, मुंबई*
     समाज हा शब्द आपण जेव्हा उच्चारतो तेव्हा अनेक बाबी डोळ्यासमोर येतात. मानव समाज, समाजवादी, कुणबी समाज, मारवाडी समाज, गुजराथी समाज, एक ना अनेक विश्व, प्रांत, राजकारण, जात ह्या बाबीशी समाज हा शब्द सहजपणे जोडला जातो.
    समाज म्हणजे नेमके काय? ह्यावर अनेकांनी व अनेक विचारवंतांनी लिखाण केले आहे. जातपात, धर्म, राजकारण, समाजकारण यांच्या परिघातून चिरफाड करून प्रतिगामी,पुरोगामी ह्या सारखे तुलनात्मक गट तट तयार करून हा शब्द अजून बोजड बनविला आहे.
    परंतु "समाजावर बोलू काही ...." हा विषय संयोजकांनी दिला आहे तो बावणे कुणबी ह्या समाजाच्या ग्रुपवर त्यामुळे या ठिकाणी बावणे कुणबी समाज ह्या विषयांवर बोलणे सयुक्तिक राहील.
    मनुष्य हा समाजशील प्राणी आहे. तो समूहाने राहणे पसंत करतो ह्या करिता की दैनंदिन गरजा भागविण्या करीता समूह हा एक सहज सुलभ पर्याय उपलब्ध असतो व ह्या अनुषंगाने पूर्वजांनी तशी रचना पण करून ठेवली आहे. 
   बावणे कुणबी समाज हा नाते संबंधातून विस्तारीत झालेला व विखुरलेला समाज संघटित करतांना ज्या ज्या महानुभावानी आपला वेळ ह्या कामी दिला आहे. त्यांनी अभ्यासातुन केलेली  टिप्पणी शब्दबद्ध होणे गरजेचे असून योग्यवेळी समाज उत्थापन कार्यात त्याचा वापर करावा.जेणे करून सामाजिक चौकट ही अबाधित राहील.
   समाज👉समाज कार्यकर्ता👉 समाज कार्य👉समाज संघटन 👉समाज घटकांची प्रगती..... ह्या बाबीची स्वतंत्रपणे जर मीमांसा केली तर आज आपण कोठे आहो?  हे संगण्याकरिता कोणत्याही विचारवंतांची गरज नाही.
  बावणे कुणबी समाज हा दानशूर, शोषिक, कष्टाळू व पापभिरू, सहिष्णु लोकांचा समूह आहे. परंतु राजकारणी विचारधारेच्या चष्म्यातून किंवा गरीब-श्रीमंत भेदांच्या मानसिकतेच्या जोखडात त्याला बांधून ठेवले आहे. कोठे कोठे समाज व्यासपीठावर आमचे नेते असा शब्द वापरला जातो. ज्या समाजाने मोठे केले. ज्यांची सर्व कुंडली माहित आहे. समाज कार्यात त्यांचे योगदान हे सर्व समाज घटक जाणतो त्यांना नेत्यांचा नाही तर समाज सुधारक याचा साधा दर्जा दिला तर पुढील सर्व बाबी सुलभ होतील. कारण समाज सुधारक म्हटले की स्वतःवर बंधने लादले जातील. व समाज कार्यात सामाजिक सुचितेची गरज असते ती आपोआपच साधली जाईल.
   बावणे कुणबी समाजातील कार्याची काळानुसार वर्गवारी केली तर तीन कालखंड पडतात, १)१९५९ अगोदरचा २) १९५९ नंतरचा ३) १९८० दशकानंतरचा आतापर्यंत ...
   विविध ठिकाणी विखुरलेल्या समाजाची बांधणी करण्याचे कार्य सुरू झाले असेल तर  ते १९८०  नंतर ह्यापुर्वीच्या मंडळींनी समाजाची अस्मिता जागृत ठेवण्याचे काम इमानेइतबारे केले आहे. म्हणूनच आज समाजप्रेमाची ज्योत समाज घटकांच्या हृदयात जागृत असतांना दिसते. याचे जिवंत उदाहरण म्हणजे समाज संघटने कडून आयोजिक केलेल्या कार्यक्रमास हजारोच्या संख्येने मिळत असलेली उपस्थिती.
   समाजाची प्रगती मोजायची असेल तर समाजात शिक्षण, शेतकी, साहित्य,उदयोग, सांस्क्रुतीक, वैद्यकीय, अधिकारी, राजकीय या क्षेत्राचा विचार करणे गरजेचे असून ह्या क्षेत्रात कार्यरत असलेल्या व्यक्तीचे आपण किती प्रमाणात योगदान घेत आहोत व त्यांच्या ज्ञानाचा उपयोग किती प्रमाणात होत आहे याचा पण विचार होणे गरजेचे आहे.
   सदर विषयावर बरेच काही लिहिण्या सारखे आहे...परंतु विस्तार भयास्तव याठिकाणीच थांबतो.
   *BK महिला सखी मंच म.रा.* च्या संयोजकांनी ह्या विषयावर लिहिण्याची संधी दिली त्याबद्दल धन्यवाद!
[6/28, 1:40 PM] Smj Bhand__Mangala Dahake Bhandara: ## *सांजवेळी*##

*अश्या या सांजवेळी*........ 
*गाई निघाल्या गोठ्याकडे*, 
*बघूनि त्यांसी*, 
 *वासरू हंबरडा फोडे*.

 *अश्या या सांजवेळी*...... 
*पक्षी निघाले घरट्याकडे*, 
*पिल्लांची नजर*
*त्यांच्या  चाऱ्याकडे*. 

*अश्या या सांजवेळी*....... 
*प्रेयसी म्हणे प्रियकरासी*
*उद्या  पुन्हा ये भेटावयासी*.

*अश्या या सांजवेळी*..... 
*सूर्य माखला*
*नारंगी रंगानि*,
*लपून जाई*
*क्षितिजा पलीकडे लाजूनि*. 

*अश्या या सांजवेळी*.... 
*आकाशात येती*
*ढग दाटूनी*, 
*धरणी मुग्ध होई हे*
*दृश्य पाहुनी*.

*अश्या या सांजवेळी*....... 
*दिवा लावते तुळशीपाशी*, 
*आशिष मागते सर्वांसाठी*. 
*दे सर्व जगाला सुख*, 
*पदरात घे त्यांची चूक*. 

*सौ स्वाती दयानंद सेलोकर*, *भंडारा*.
[6/28, 1:40 PM] Smj Bhand__Mangala Dahake Bhandara: सांजवेळी...

सुर्याची किरणे पडते झाडावरती
कोवळी किरणे फुले पाने हसती....
  
पक्षी किलबिल करती आकाशी
कोकीळा मधुर गाणी गाती....

तीव्र माथ्यावर मध्यान्ही होते
झाडाखाली आधार घेती....

सांजवेळी निशिगंधाची फुले बहरली.

रोमांचक क्षणांची पाने
परत मनी हिरवळली

     .....सौ.सुचेता कुकडे सार्वे,
               ...पनवेल नवी मुंबई
[6/28, 1:40 PM] Smj Bhand__Mangala Dahake Bhandara: सांजवेळ----
-----------
राविकिरणांची सोनेरी छटा
उधळीत कला नेते
धरतीवर धूसर छाया
सांजवेळी पसरते ।।
    वारा वाहतो प्रेमाने
धरती अलवार बघते
सांजवेळी पशु पक्षीही
घरट्या कडे परतते ।।
  वासरू हंबरते गायिसाठी
वात्सल्याच्या भुकेने
सांज वेळी धावत येते
ती मायेच्या उबेने ।।
झाडेही ती निजून जाती
चांदण्या लुकलुकती आकाशी
शीतल चंद्र पृथ्वी बघतो
अनंत मोत्यांच्या राशी ।।
    नदी नाले शांत
सांज वेळी का म्हणुनी
निसर्ग चक्र आहे ते
उत्साह जातो नमुनी ।।
   दिवा लावूनी सांजवेळी
तुळशी पाशी जपती
शुभम करोती म्हणुनी
सर्वाना सुखी ठेवा म्हणती ।।
     70 री च्या वरचें मिळते बोनस
आयुष्याच्या सांज वेळी
जगून घ्यावे आनंदाने
जन्म मृत्यूच्या खेळी ।।-
          मंगला डहाके, भंडारा
[6/28, 1:40 PM] Smj Bhand__Mangala Dahake Bhandara: सांजवेळी

रंगछटा म्हणावी की 
आकाशातील रांगोळी
मुक्त उधळण केली
निसर्गाने सांजवेळी

साद देती सख्या रे 
या सागर लहरी
येशील सांजवेळी
या सागरी किनारी

सूर्याची ही वेळ झाली 
अन्य देशी जायची
सांगे साऱ्यास उद्या 
भेटू सकाळी


पाखरे गाणी गात 
निघाली माघारी
चंद्राला बघायला
 रात्र समीप आली

घरोघरी लागली दिवे
शुभंकरोति म्हणे मुले
गायही गोठ्यात विसावे
वासरा शेजारी

सौ. रूपाली अमोल बोंद्रे
[6/28, 2:13 PM] Smj Bhand__Mangala Dahake Bhandara: सांजवेळ

सांजवेळी पाखरे
किलबिलाट करती
घरट्यात जाण्या
घाई करती ।।

सांज वेळी वासरू
वाट बघती
गायींना बघून
आनंदाने नाचती ।।

देवापुढे दिवा लावूनी
करते मी प्रार्थना
मुलांनो तुम्ही
शुभम करोती म्हणा ।।

दमलेला बाबा
घरी येई
दमून छोटी परी
राणी, निजून जाई ।।

    पूनम डहाके, भंडारा
[6/28, 2:13 PM] Smj Bhand__Mangala Dahake Bhandara: " सांजवेळ" 
पाखरांना ओढ लागे घराची
गुलाबी छटा होई आभाळाची
मनातील पाखरू भिरभिरू लागे
जणू ह्रदय गुंफे प्रेमाचे धागे
           भानु बदले आपले रंगरूप
           शोभे जणू कि गगनाचा नृप
            हे सर्व पाहता मन होई तृप्त
मग मी अधीन होईल शब्दांची
आपसूकच कविता मोत्यांची
निसर्गांशी घालेल तेव्हा मेळ
ती वेळ असेल 'सांजवेळ'.
           सौ. शितल श्रीकांत ठवकर (तुमसर रोड देव्हाडी)
[6/28, 2:23 PM] Smj Bhand__Mangala Dahake Bhandara: हा मेसेज फक्त  प्रामाणिक लोकांसाठी आहे  :-  👇🏾👇🏾


प्रामाणिक लोकांनी एकदा मन लावून वाचाच... ______________________________
कोणत्याही क्षेत्रात कार्यरत असताना जसजशी प्रगती सुरु होते तसतसा छुपा विरोध हा वाढू लागतोच;
सुंदर वेलीच्या खोडावर बांडगुळ वाढावा तसा. हा निसर्गाचाच नियम आहे.
पण आपल्याला त्याची पुसटशीही कल्पना नसते.
मग तुमची प्रगती डोळ्यात सलते आणि डोक्यात भनाणु लागते तेव्हा कारस्थानांच्या बिया पेरल्या जातात.

खुरटय़ा विचारांचे कावळे एकत्र जमू लागतात आणि व्रणार्त शिशूच्या पंखावर चोच मारण्याची संधी शोधू लागतात.
मग तुमच्यावर आरोप होतात- गैरव्यवस्थापनाचे,गैरकारभाराचे, भ्रष्टाचाराचे !

तुम्ही भांबावता, हडबडून जाता. कारण हा हल्ला तुम्हाला अपेक्षित नसतो. आणि मग तुम्ही प्रत्युत्तराची तयारी करू लागता.
शब्दाला शब्द वाढतात.. त्यांची धार तिखट होते.. विरोधकांना आयते खाद्य मिळते. आणि नेमक्या याच क्षणी तुमच्या हातून आजवर न झालेली गफलत होऊ शकते. सत्यनिष्ठ, प्रामाणिक लोक कामाच्या ओझ्याने दबून जात नाही ; पण मिथ्या आरोपांच्या हल्ल्यामुळे खचून जातात. त्यांच्या आत्मविश्वासाला तडा जातो आणि मग प्रत्युत्तरे देण्याच्या घाईगर्दीत तो आजवर सांभाळलेले संतुलन गमावून बसतो. नुकसान हे या क्षणाला होते.
त्यामुळे जेव्हा तुम्ही अर्थशून्य नौटंकीला सामोरे जाल, विषारी टीकेचे फूत्कार ऐकावे लागतील, तुमच्याबद्दलची व्यक्त होणारी मते चुकीच्या मार्गावर दाखविलेल्या दिशांचे प्रतििबंब ठरू लागतील,
तेव्हा ताठ मानेने उभे राहायचे आणि एकही शब्द न बोलता तेथून निघून जायचे, यातच खरे शहाणपण आहे. हा पळपुटेपणा नाही. ही पाठ दाखविण्याची प्रवृत्तीही नाही. तर ही शहाणी, समंजसपणाची, सन्मानाची भूमिका आहे. प्रत्युत्तर देणे, आवाज चढवणे म्हणजे एका अर्थी होणाऱ्या आरोपांना स्वीकृती देण्यासारखेच ठरते.

प्रत्येक प्रत्युत्तराची एक वेळ असते. अपमान विसरायचे नसतात, तर ते मनाच्या हळव्या कोपऱ्यात जपायचे असतात. त्यांची बोच रोज लागता कामा नये ; पण त्यांचा सल मात्र खोलवर दडलेला बरा. कारण तो पुढच्या वाटचालीला मार्गदर्शक ठरतो.

यश पचविणे एक वेळ सोपे; पण आरोप रिचवणे खूप कठीण. 'हेचि फल काय मम तपाला'? याचा वारंवार मनाच्या खिडकीत येणारा प्रत्यय सहन करणे सोपे नाही.

कोणत्याही मॅनेजमेन्ट स्कूलमध्ये हे शिकविले जात नाही. मग हे शिकायचे कसे?

वेळ आणि अनुभव यापेक्षा मोठे गुरू नाहीत.आरडाओरड करायला शक्ती लागत नाही, ती शांत राहायला लागते. अशावेळी बाळगलेले मौन हे तुमच्या दुर्बलतेची निशाणी नसून तुमच्या आत्मिक शक्तीचा तो साक्षात्कार आहे. आणि ही शक्ती एका दिवसात येत नाही. तिचा 'थेंबे, थेंबे' संचयच करावा लागतो. तुमच्या निघून जाण्यात तुमचा पराभव नसतो, तर ती तुमची प्रगल्भता असते. आरोप करणाऱ्यांचे पितळ उघडे पडतेच, आणि कालांतराने इतरांनाही सत्य समजते. तोपर्यंत तुम्ही बरीच प्रगती केलेली असते.

शेवटी काय तर''आपण प्रत्येकाच्या दृष्टीने चांगले असू शकत नाही,, ''पण आपण त्यांच्यासाठी उत्कृष्ट आहोत जे आपल्याला समजतात,,

''माणसाने स्वत:च्या नजरेत चांगलं असलं पाहीजे,,
''लोक तर देवाला पण नाव ठेवतात.
          अर्चना चेटूले, लाखनी
[6/28, 5:56 PM] Smj Bhand__Mangala Dahake Bhandara: हा लेख कालचा आहे
[6/28, 5:57 PM] Smj Bhand__Mangala Dahake Bhandara: 🌄सांजवेळ🌄

अस्ताला जाता जाता थकून भाष्कर
निलांबरी नयनमनोहर रंगांचा अविष्कार.
उधळीत मुक्तहस्ते आनंदाच्या छटा
सांजवेळी विसावा शोधती रानवाटा.

दिनभर झिजवूनी देह,गाळूनी घाम
सांजवेळी विश्रांतीला मुखी हरीनाम
कष्टकरी ललना परतूनी निजधामा
लगबग करीती सांजवात, नित्यकामा.

सांजवेळी विहंगमेळा परतती घरट्यात
गाई वासरे, गोकुळ विसावती गोठ्यात.
त्यांच्यासाठी निवांत असावा आसरा
सदोदित  राखावा हक्काचा बसेरा.

सांजवेळ आयुष्याची होता होता‌
स्वर्ण किरणे पसरावी जाता जाता.
गर्भ काळोखाचा भेदण्याला
देऊन जावे प्रकाशकिरण काजव्याला.

सौ.मीरा शेबे भंडारा.
[6/28, 5:57 PM] Smj Bhand__Mangala Dahake Bhandara: ।। 🌺 सांजवेळ 🌺।।

सांज होता,
होई घाई।
पशु,पक्षी,
घरी जाई।।

भाष्कर तो,
लुप्त होई।
दिवा देवा,
लावी आई।।

मुले गाती,
संध्या गीते।
दिपज्योती,
नमोस्तूते।।

तिन्ही सांजी,
लक्ष्मी येई।
प्रसन्न ते,
मन होई ।।

सौ.के.बी. सार्वे भंडारा.
[6/28, 5:57 PM] Smj Bhand__Mangala Dahake Bhandara: *सांजवेळ*

सांजवेळ होता 
दिवा लागतो देवापुढं
शुभंकरोती म्हणती
घरातील बालगोपाल

सांजवेळ होता होता
पक्षी येती झाडावर
माय निघते घराकड
पाय टाकते भराभर

सांजवेळ होता होता
तांन्हुला वाट पायी
विचारते कसा ताई
माय कधी घरी येई

सांजवेळ होता होता
घरातुन निघे धूर
माय टाकते भाकर 
सुगंध पसरते दूर दूर

   ‌‌                    नंदा भोयर
[6/28, 5:57 PM] Smj Bhand__Mangala Dahake Bhandara: "सांजवेळ"
पाखरांना ओढ लागे घराची,
गुलाबी रंग होई आभाळाची,,
मनातील पाखरू भिरभिरू लागे,जणू मन गुफे प्रेमाचे धागे,,

पाखरी सारी गाणी गात माघारी निघाली होती,
चंद्राला बगायलारात्र ही धावत होती,
आयुष्यतून ती मात्र माझ्या मावळत होती,,

एकाकी ही सांजवेळ आठवण तुझी घेऊन आली,
सुकलेलाय सगळ्या जखमा नातयने ओलय करून गेली,,

सांजवेळ झाली रे पाखरा, परतून ये माहेरी, तुला गोषट सांगू या दिवसाची झाडावर्ती बसून,,

अशी ही तिची अन माझी सांजवेळ ची शेवटची भेट,,,,,,

सौ श्वेता स. कानतोडे
अमरावती
[6/28, 5:57 PM] Smj Bhand__Mangala Dahake Bhandara: सांजवेळ

सांजवेळ होता
पक्षी घरट्यात आली
ग़ोठयात गाय
हंबरू लागली

सांजवेळ होता
दिवाबत्ती झाली
आजीच्या हाकेला
नातवंड घरी आली

सांजवेळ होता
सुर्यकिरण
कोवळी झाली
उन्हाची दाहकता
आता शित झाली

सांजवेळ होता
आकाश निळ निळ
सुर्यदेव मावळला
लागे चंद्राची चाहूल

सांजवेळ होता
घरी आले सगळे
मायेची नजर
साऱ्या घरात भिर मिरे
     नंदा भोयर
[6/28, 5:57 PM] Smj Bhand__Mangala Dahake Bhandara: सांजवेळ
सांजवेळ ही श्यामल रंगात पृथ्वी वरी आली,
पाहा सांजवेळ झाली, पाहा सांजवेळ झाली.
अशा या सांजवेळी
सूर्य हा लाली आवरून क्षितिजाकडे गेला
अशा या सांजवेळी
पक्षी घरट्यात,गायी गोठ्यामध्ये आल्या वासरू दुग्धपान करू लागले
अशा या सांजवेळी
मुले-मुली खेळून, दमून घराकडे आले
अशा या सांजवेळी
रातराणीनीं मंद मंद सुगंधाने वातावरण रम्य, आनंदीत केले
अशा या सांजवेळी
नववधू ही प्रणयसुखाने शाहारली मनी,
अशा या सांजवेळी
आरती घेऊन देवाजवळी
प्रार्थना ही आई करी
तुळशी जवळ दिवा लावूनी
सांजवात करून घेई
ही पाहा किमया सांजवेळेची

माधुरी भूते
[6/28, 7:47 PM] Smj Bhand__Mangala Dahake Bhandara: बि.के सा.सं.प.

          ""सांजवेळ""

रवि स्पर्शीला क्षितिजास
गोधन परतले गोठ्यात
पक्षी बरडती घरट्यात
प्रकाश पिवळा सांजवेळेत

सांजवेळस तयारी बाळाची
श्रृंगारते सजनी सांजेची
करावी सांजवात तुळसीची
नेत्रात भरवी शुभशकुनची

शुभंकरोती शिकवण बाळाला
नित्यनेमे बसवी अभ्यासाला
पाजवी पाणी बसुन धन्याला
किती रम्य भासे सांजवेळेला

आयुष्याच्या सांजवेळेला
हळूहळू कारभार त्यागावा
वळावे मन वानप्रस्थाला
नातवंडांना आशिर्वाद द्यावा

सागराची ओहोटीच जणु
सांजवेळ वाटते जिवाची
सर्वांनाच मार्ग एकची
जगणे जिवन निरामयाची.

दशरथ अतकरी, नागपूर
दि.२८जुन२०२०
■■■■■■■■■■■■■■■■■■■■■■■■■■■■■
[7/18, 6:41 PM] Smj Bhand__Mangala Dahake Bhandara: महिलांचे आरोग्य महत्त्वाचे!


महिलांचे आरोग्य हा अत्यंत कळीचा मुद्दा! कुटुंबाची काळजी घेणारी महिला कायम आपल्या आरोग्याकडे दुर्लक्ष करते. ती जागरूक व्हावी आणि समाजातही तिच्या आरोग्याबाबत संवेदनशीलता निर्माण व्हावी, हे गरजेचे आहे. आहार, चांगल्या सवयी आणि वैद्यकीय सल्ला या त्रिसूत्रीवर महिलांचे आरोग्य टिकणे आवश्यक आहे. आज २८ मे ‘आंतरराष्ट्रीय महिला आरोग्य दिन’असून; त्यानिमित्त स्त्री आरोग्याच्या विविध पैलूंचा घेतलेला हा वेध.


ladiesमुंबई- समाजातील रूढी-परंपरा, अंधश्रद्धा, वैद्यकीय सुविधांचा अभाव व वैयक्तिक आरोग्याकडे दुर्लक्ष इत्यादी कारणांमुळे महिला आरोग्याकडे दुर्लक्ष होत आहे. महिलांत मधुमेहाचे प्रमाण अलीकडे वाढत आहे. कर्करोग हीसुद्धा समस्या बनली आहे. मुंबईसारख्या शहरात उच्चशिक्षण, करिअरला महत्त्व देणा-या मुली उशिरा लग्न करताना दिसतात.


मुलींत तिशीच्या आसपास लग्न करण्याचे प्रमाण वाढले आहे. म्हणजेच वयात आल्यापासून लग्न होईपर्यंतचा टप्पा चांगलाच लांबला आहे. या कालावधीत महिलांना आरोग्याशी संबंधित विविध बाबींना तोंड द्यावे लागते. लग्नानंतर पहिल्या मुलाचा विचार लवकर करावा की उशिरा याविषयी तरुणींच्या मनात कायम गोंधळ उडालेला दिसतो.


वैद्यकीय कारणांनुसार २० ते ३० वर्ष हे वय प्रसूतीसाठी योग्य असते. पूर्वी प्रत्येक स्त्रीला पाच ते दहा वेळा बाळंतपणाच्या दिव्यातून जावे लागे. घरगुती बाळंतपणात कधीकधी तिचा जीवही जाई! आता शस्त्रक्रिया, अतिरक्तस्रव झाल्यास रक्तपुरवठय़ाची सोय असल्याने शहरात मातामृत्यूचे प्रमाण कमी झाले आहे. मात्र काही ठिकाणी प्रसूतिवेदना सहन करू शकत नसल्याने शस्त्रक्रियेचा पर्याय महिला स्वीकारताना दिसत आहेत. अशा शस्त्रक्रियांमुळे अनेकदा महिलांचा मृत्यू होत असल्याचेही समोर आले आहे.


काही वर्षापूर्वी ‘दोन या तीन बच्चे, होते है घर में अच्छे’ असे म्हटले जाई. आता मात्र आपण ‘हम दो हमारा एक’ अशी धारणा झाली आहे. सध्याच्या बदलत्या जीवनशैलीमुळे स्तनांचा कर्करोग, गर्भाशयाचा कर्करोग अशा विविध आजारांना महिलांना तोंड द्यावे लागत आहे. पूर्वी गर्भाशयमुखाच्या कर्करोगाचे प्रमाण जास्त होते.


हल्ली मात्र स्तनांचा कर्करोग मोठय़ा प्रमाणात होताना दिसतो. आज महिला केवळ चूल आणि मूल यापलीकडे गेल्या आहेत. घराबाहेर पडून स्वत:चे वेगळे अस्तित्व निर्माण करण्याचा प्रयत्न करत आहेत. या धकाधकीच्या जीवनात महिलांनी कामासोबत आरोग्याकडेही लक्ष देणे गरजेचे झाले आह
[7/18, 6:41 PM] Smj Bhand__Mangala Dahake Bhandara: *🙎‍♀️महिलांच्या आरोग्यविषयक समस्या*🙎‍♀️

*आजची महिला नोकरी करण्यासाठी घराबाहेर पडते*. *तिला कित्येक तास घराबाहेर रहावं लागते*. *ती  घरातल्या प्रत्येकाची काळजी घेते*, *पण या सगळ्यात ती स्वतः कडे मात्र दुर्लक्ष करते*. *त्यामुळे तिला बर्‍याच आजारांना समोर जावं लागते*. *जेव्हा मुलीला मासिक पाळी सुरू होते त्यावेळेसच मुलींना योग्य आहार व व्यायामाची गरज असते*. *मात्र या गोष्टी कडे दुर्लक्ष केलं जाते*. *करीअरच्या मागे लागल्यामुळे लग्न उशिरा होतात व जेव्हा प्रसूतीची वेळ येते त्यावेळेस बर्‍याच स्त्रियांमध्ये रक्त कमी असणे किंवा हिमोग्लोबीन कमी असणे या समस्या आढळतात*. *प्रसूतीनंतर स्त्री नोकरीसाठी बाहेर जाते व बाळाला योग्य प्रमाणात स्तनपान करू शकत नाही*, *यातून स्तनांचा कर्करोग होण्याची शक्यता असते. तसेच  खेडेगावात अधिक मुलं होण्याचा आग्रह धरला जातो*. *तिची मानसिक व शारीरिक स्थिती समजून घेण्यात कुणालाही रस नसतो*. *अशक्तपणा व सतत गर्भारपणामुळे गर्भाशयाचा कर्करोग होण्याची शक्यता आहे*. *योग्य प्रमाणात कॅल्शियम न मिळाल्यास हाडांचे रोग होण्याची शक्यता आहे*. 
          *हे रोग कदाचित औषधांनी बरे होतील, पण तिच्या मानसिक आरोग्याचं काय*? *घर आणि नोकरी दोन्ही सांभाळताना तिला प्रचंड तणावातून जावं लागते*. *त्यातूनच ती नैराश्याची शिकारही होऊ शकते*. 
       *महिलांनी पौष्टिक व योग्य आहार घ्यावा,  व्यायाम करावा. व  तब्येतीची योग्य ती काळजी घेऊन डॉ. कडे तपासणी करून घ्यावी*

*सौ स्वाती दयानंद सेलोकर*, *भंडारा*
[7/18, 6:41 PM] Smj Bhand__Mangala Dahake Bhandara: महिलांच्या आरोग्यविषयक समस्या--
             स्त्रियांच्या आयुष्यात बऱ्याच घडामोडी घडत असतात
मुलगी वयात येते तेंव्हा शारीरिक बदल म्हणजे हार्मोन्स मध्ये होणारे बदल जाणवतात. मुलीचं लग्न झाल्यावर, दिवस जातात तेंव्हा ,बाळ झाल्यानंतर अशा नैसर्गिक प्रक्रियांमधून जाताना
पत्त्येक महिलेला त्रासदायक कष्टाना सामोरे जावे लागते.प्रसंगी रुग्णालय, डॉक्टर यांच्यासोबत सामना करावा लागतो, पण कुटुंब आणि मुख्य म्हणजे जोडीदार सोबत असला की त्रास कमी जाणवतो.वय वाढत जाते ,मासिक चक्र बंद होते, तेंव्हा हार्मोन्स मध्ये ऋतुचक्राप्रमाणे बदल होतात. स्थूलपणा वाढतो, तेंव्हा महिला अनेक आजारांना बळी पडत असते.BP ,शुगर,पायदुखी, कंबरदुखी हे तर सामान्य आजार तर कधी गर्भाशयाचा, स्तनाचा कँसर चे प्रमाण महिलांमध्ये वाढत आहेत.
                काही लक्षण दिसताच 
डॉक्टरचा सल्ला घ्यावा, आपण बरेचदा दुर्लक्ष करीत असतो.पूर्ण घर जिच्या कार्यावर अवलंबून असतो, तिने स्वतःची काळजी घ्यायलाच हवी,  तरच पूर्ण घराची काळजी घेऊ शकेल, हो ना.
      आहारात प्रथिने, कर्बोदके, जीवनसत्वे, स्निग्धए,खनिजे, पाणी हे खूप आवश्यक आहे ,
दाणे,खोबरं, जवस, तीळ.
सर्व भाज्या, दूध, डाळी, काकडी, मुळा, बिट, मटकी, कडधान्ये
आवळा, लिंबू  हे नेहमीच आहारात असावे.
       आपणच आपली काळजी घेऊ या, हो ना सख्यांनो
               मंगला डहाके , भंडारा
[7/18, 6:41 PM] Smj Bhand__Mangala Dahake Bhandara: महिलांच्या आरोग्य विषयक समस्या...

संपूर्ण राष्ट्रीय आरोग्याचा विचार करता महिलांचे आरोग्य या घटकाला अनन्य साधारण महत्त्व आहे.
       महिलांचा विकास लहानपणापासून व्हायला हवा. तिच्या शारीरिक व मानसिक आरोग्याची जपणूक होणे आवश्यक आहे.
         बालपणी मिळणारा योग्य तो पोषक आहार पुढील आयुष्य व आरोग्य ठरवत असतो आज जी कुपोषणाची समस्या संपूर्ण देशाला भेडसावत आहे त्यातुन महिलांची सुटका झालेली नाही.
        घरातील गृहिणीचे आरोग्य जर उत्तम असेल तर ती इतरांकडे नीट लक्ष देऊ शकते. परंतु तिच स्वतः काही समस्यांनी बेजार झाली तर संपुर्ण कुटुंब अस्वस्थ होते हा सर्वांचाच अनुभव आहे. महिलांची मानसिकता बऱ्याचदा रोग अंगावर काढण्याची असते. तो बळावला तरच त्या वैद्यकीय


 सल्ला घेण्यास तयार होतात.
        मनाचे आरोग्य जपण्यासाठीही आवश्यक ते सर्व प्रयत्न महिलांनी करावेत...🙏🏼

    सौ.सुचेता कुकडे सार्वे
           पनवेल नवी मुंबई ।।
[7/18, 6:41 PM] Smj Bhand__Mangala Dahake Bhandara: #महिलांच्या आरोग्य विषयक समस्या

घरची महिला आरोग्य संपन्न असेल तर घर आरोग्यपूर्ण असतं असे म्हणतात. महिला या सतत दुसऱ्यांची काळजी घेण्यात व्यस्त असतात. घरातली कामं, नोकरी यामुळे छोटी मोठी दुखणे अंगावर काढत असतात. पाठदुखी, गुडघेदुखी, डोकेदुखी, acidity, सर्दी, खोकला, ताप अशे आजार बघण्यात येतात.यांना महिला जास्त गांभीर्याने घेत नाहीत.
UTIs (urinary tract infection) याचे प्रमाण स्त्रियांमध्ये जास्त बघायला मिळते.लघवी दरम्यान त्रास होतो. हा आजार bacterial infection मुळे होतो. डॉक्टरांच्या योग्य सल्ल्याने Antibiotics घेतल्यास हा जर बरा होतो. हा आजार  टाळण्याकरिता जास्तीत जास्त पाणी पिणे फायद्याचे ठरते. वाढते वजन ही सुद्धा आजची महिलांची मोठी समस्या झाली आहे.
कुठला ही आजार डॉक्टर च्या योग्य सल्ल्याने बरा होतो, जर आजार मुळात उ्त्भवू नये म्हणून आपण काही गोष्टी लक्षात घेतल्या पाहिजे.
भरपूर पाणी पिणे. शिळे अन्न शक्य झाल्यास न खाणे. योग्य वेळी जेवण.कमीत कमी अर्धा तास व्यायाम. छोटी मोठी दुखणी अंगावर n काढता डॉक्टरांचा सल्ला. सर्व महिलांनी नक्कीच  आरोग्याची काळजी घेतली पाहिजे.
सौ. रूपाली अमोल बोंद्रे
MSc. Biotechnology
[7/18, 6:41 PM] Smj Bhand__Mangala Dahake Bhandara: आरोग्य आमुच्या हाती---

आज धावपळीच्या युगात
जोडुया आपुल्या देहाशी नाती
तेंव्हा राहील आमचे
आरोग्य आमुच्या हाती ।।

करावे प्रेम देहावर, बोलावे देहाशी
ऐकून तक्रारी,कुरवळावे प्रेम हस्ती
आहार, निद्रा राही संतुलित
असे आरोग्य आमुच्या हाती ।।

निरंतर सकाळी करुनी योग
आजार दूर पळून जाती
औषधांचे नको समन्वय
राहील आरोग्य आमुच्या हाती।।

भास्कर चरणी सूर्यनमस्कार घालुनी
सोनेरी किरणांचे तेज झळकती
प्राणवंदना करुनी ,उत्साहभरी
राहील, आरोग्य आमुच्या हाती।।

कार्य करण्या हृदयी स्फुरण
सकारात्मक विचारांचे मोती
सुदृढ शरीरी,निरोगी मन
राहील,आरोग्य आमुच्या हाती।।
--------------------------------------
          मंगला डहाके, भंडारा
[7/18, 6:41 PM] Smj Bhand__Mangala Dahake Bhandara: 🙏महिला  आणि तिचे  आरोग्य अतिशय  महत्वाचा  विषय  आहे  पण  तोच  आपल्या  महिलां आपण  आपल्या  पासून  लांब  ठेवतो  असं  का करतो  आपण 
याकरिताच  आम्ही  खास   महिला  आणि  आरोग्याची माहिती  यासाठी  चर्चा  सत्र  आयोजित  केले  होते  तेव्हा  हा  अनुभव  आला  कि  महिला  ही  एकाचवेळी  दहा  विचार  डोक्यात  ठेऊन  काम  करते  मग  ती  नोकरी  करणारी  असो  वा  घरी  राहणारी तेव्हा  ती घरात  लहानां  पासून  तर  मोठ्यानं  पर्यंत  काय  हवं  नको  ते  सर्व  डोक्यात  ठेऊन  करते पण माझी  गरज  काय  हा  विचार  ती  करत  नाही  तिथूनच  आजाराला सुरुवात होते कारण  आम्ही  कामाला  प्राधान्य  देतो  थोडा  वेळ  काढून  स्वतः  ला  काय  हवं  नको  हा  विचार  करत  नाही  
     महिलांचा  हॉर्मोनल  चेंजेस  हा  सर्वात  मोठा  प्रश्न  आहे  त्यात  आपोआप  शरीरात  म्हणा  अथवा  वागण्यातून  फरक  जाणवतो  तेव्हा  आम्हांला  घरच्यांनी  ही  सहकार्य  करणे  गरजेचे  असते  स्वभावात  वागण्यात  फरक होतो  चिडचिड  होते  
हें  घरच्यांनी  ही  लक्ष  द्यावं 
आणि  मला  हें  काही  लोकांन कडे  ह्याचा  विचार करतात  हें  जाणवलं  तेव्हा  हें  आवश्यक  आहे  
  सण, वार, उपवास  हें  सोबत       
येतात  तेव्हा  झेपेल  तेवढे  व्रत  वैकल्य  करावे  उगाच  उपवास  करून  अचकट  विचकट  खाऊन  पोटाला  त्रास  होईल  असं  करू  नये 
   अंगावर  दुखणं कधी  काढू  नये  स्वतः  मला  काय  होतंय  काय  बर असं  होतंय  हा  प्रश्न  स्वतःला  विचारून  डॉक्टर  कडे  जावे  ही  आमची  जवाबदारी 
   नोकरीं  करतात  म्हणून  त्या  रोज  बाहेर  पडतात पण  आपण हाऊस  वाइफ कडे  दुर्लक्ष  करतो 
ती  दिवसभर  जॉब  करते तिचा  जॉब  थँक लेस  जॉब  असतो 
पण  तीच  आरोग्य  ती  जपत  नसेल  तर  इतरांनी  तीच  आरोग्य  जपावं 

आपल्या  अनेक  महिलांनी  विचार  मांडलेले  आहेत 
जागतिक  महिला  दिवस  साजरा  करतो 
पण  आपल्याच  घरच्या  महिलेला कुणी  हें  म्हणत  नसत कि  रोज  करून  थकली  आज  राहूदे  आम्ही  सांभाळून  घेऊ 
एवढं  जरी  म्हंटल  कि  तु  जेवली  काय  
जेऊन  घे  आधी  काम  होतील  नंतर 
नोकरीं  करणारी  महिला  घरी  आली  तिला  साधं  तिला  हातात  पाण्याचा  पेला  दया  
एक  कप  चहा  दया झालं  याच  प्रेमानी  तीच  आरोग्य  उत्तम  राहील  ती  आपली आणि  घरच्यांची  काळजी  घेईल 
बाकी  सर्व  सख्या  नि  उत्तम  माहिती  दिली  पण  मी  जनरल  बोलले 
तेव्हा 🙏
सौ  ममता  भोयर 
नागपूर
[7/18, 6:41 PM] Smj Bhand__Mangala Dahake Bhandara: बिग.के.सा.सं.प.

      "" आरोग्य आपल्या हाती ""

सदृढ आरोग्य आहे श्रीमंती
निरोगी असणे हमी जिवाची
सोडुनी बिछाणा प्रात:काळी
धरावी वाट मैदानी योगाची

बना शिल्पकार आरोग्याचे
करा व्यायाम योगासनाचे
नित्य सराव योगसाधनेचे
महत्त्व आरोग्याला पहाटेचे

आहार विहाराची वेळ असावी
झोपे आधी शतपावली करावी
प्यावे पाणी दोन घोटची
हृदयरोगास ठेवते लांबची

ठेवावे मनाला सदा प्रसन्न
आहे आरोग्यसिध्दीचे कारण
सकाळी फिरावे झपाट्यानं
राखावे आरोग्य आपल्या हातानं

दशरथ अतकरी, नागपूर
दि.२९ जुन२०२०
[7/18, 6:41 PM] Smj Bhand__Mangala Dahake Bhandara: *आरोग्य आपुल्या हाती*💪🏻

*नका करू आरोग्याची हेळसांड*
*आरोग्य हीच संपत्ती*. 
*होईल मधुमेह तुम्हास*, 
*जर साखर खाल अति*. 
*कॅल्शियम घ्या भरपूर प्रमाणात*, 
*हाडे दुखणार नाही म्हातारपणात*. 
*घ्या कमी मिठाचा घास*, 
*नाही होणार बीपी चा त्रास*. 
*पाणी बसून प्या नेहमी*, 
*गुडघ्याचं दुखणं होईल कमी*. 
*दुधात घ्या तुळशीचं पान*, 
*आरोग्य तुमचं राहील छान*. 
 *ग्रहण करा सात्विक आहार*, 
*रोज पैदल करा विहार*. 
*मधूर गाण्यांचा ऐका सूर*, 
*रहा नैराश्यापासून दूर*. 
*खा रोज फळे ताजी*, 
*आपुले आरोग्य आपुल्या हाती*.

*सौ स्वाती दयानंद सेलोकर*, *भंडारा*
[7/18, 6:41 PM] Smj Bhand__Mangala Dahake Bhandara: 💐आरोग्य आमच्या हाती 💐
     रोग पाहुणी आसपासचे
     जीव सदा हा घाबरतो
      दर दुःखी जीवाच्या जागी
     स्वतः स ठेवून मी बघते
             जरा कुठे धडधडता छाती
             चिंता वाढे ह्रदयाची
             इच्छा होते पुन्हा पुन्हा
              मग रक्तदाब चाचण्यांची
    पदार्थ जे जे मज आवडते
    राक्षस त्यात मला दिसे
     साखर झाली वैरी माझी
   कडू  चाहा आता पिते
            रसनेचे मी कैतुक करुनी
             जरी मारला ताव कधी
             नंतर केक क्षणाकरीता मग
             अपराध्यासम वावरतो. 💐💐💐💐💐💐💐💐
              सौ. शितल श्रीकांत ठवकर (तुमसर रोड देव्हाडी)
[7/18, 6:41 PM] Smj Bhand__Mangala Dahake Bhandara: 👩जप गडे👩  
              
                                   सखी,जप आरोग्य आपले
                                    कुटूंबाचे र-वार-थ त्यात दडले
                                     प्रत्येकाची घेतेस काळजी
                                     र-वतालाही जप ना. गडे........
                                     छातीत होता धडधड
                                       चिंता करीत बसु नको
                                     डाँकटरकडे जायचे सोडून
                                     रक्त दाब उगाच वाढवू नको.......
                                     साखर झाली वैरी जरी
                                     उगाच कडू काढे पिवु नको
                                     आवडीचे पदार्थ डावलून सारेेे
                                       मधुमेहा उगाच कुरवाळु नको...
                                        जिभेचे चोचले पुरविताना
                                        उगाच मन मारू नकोस
                                        पथ्यपाणी सांभाळून घराचे
                                         खरी गृहर-वामीनी हो गडे.....
                                          लक्ष्मी तू ग घराची
                                           सतत हसत रहा गडे
                                            तुझ्याकडे पहाता-पहाता
                                              संसारही तुझा फुलेल गडे.....


                                                       सौ जयश्री रेहपाडे
                                                               नागपुर.
[7/18, 6:41 PM] Smj Bhand__Mangala Dahake Bhandara: महिलांचं आरोग्य
नको दुर्लक्ष ‌आरोग्यकडे
घ्या एकची मंत्र
सात्त्विक आहार,करा योगासन
आरोग्य तपासा डॉक्टर कडून
लहान लहान रोगास
घ्या आजीचा बटवा
घरगुती उपाय करुन पाहा
मिळेल आराम त्वरीत
नको तेलकट, मसालेदार भाज्या
सीझने बल गावरानी भाज्या घ्या आहारात, दूर करा पोटाचे विकार
जडल्यास व्याधी,
मन करा स्थिर
नविन तंत्रज्ञानने
होईल उपचार सोईस्कर
नको दुर्लक्ष ‌आरोग्यकडे
हा मुलमंत जपा तूम्ही
आरोग्य सुदृढ तुमच्या हाती🌲☝️
माधुरी भूते
[7/18, 6:41 PM] Smj Bhand__Mangala Dahake Bhandara: *आरोग्य अपुल्या हाती*

रोज नविन मैत्रीणी
रोज नवनविन ग्रुप
जोडूया मनाशी नाती
तरच राहिल आपुले आरोग्य
आपुल्या हाती

करूया पहाटे व्यायाम
बाजूला ठेवूया काम
आजाराला ठोकुया रामराम
तरच अवयव करतील काम

जावूया रोज फिरायला
करूया मनसोक्त गप्पा
घालून बसुया पद्मासन
घेवूया भरपूर ऑक्सिजन

देऊ या स्वताला वेळ
जपूया आपुले आरोग्य
औषधांना ठेवूया कोसो दूर
तेव्हाच येईल जिवनात
निरोगी स्वाथ्याचा पुर
        
           ‌नंदा भोयर
[7/18, 6:41 PM] Smj Bhand__Mangala Dahake Bhandara: आरोग्य आपल्या हाती

आपले आरोग्य आपल्या हाती,
नका करू जीवाची माती.
स्वतःसाठी द्या थोडा वेळ,
तेव्हाच बसेल आरोग्याचा मेळ.
जगायचे असेल तर मनसोक्त जगा
जगण्यासाठी खा,खाण्यासाठी जगू नका
मैदा,साखर,डालडातूप,
हेच असे बीपी शुगरचे शत्रू.
योग्य निद्रा,योग्य आहार,
हाच आरोग्याचा मंत्र खरा.
योगासन,प्राणायाम 
करा लंघण आठवड्यातून एक वार.
पाणी प्या भरपूर,
ताणतणावापासून सदा दूर.
हिरवी भाजी,मोसमी फळे
सेवन करा यथोच्छेत.
दही,दूध,तेल,तूप
देईल तुम्हास सुंदर रूप.
"झेरो-फिगर" पेक्षा सुदृढ शरीर
हेच असे खरे फलित.
गूळ-शेंगदाणा-तीळ चिक्की
हिमोग्लोबिनसाठी रोज मिटकी.
मूग,मटकी,मसूर,तूर,
मिळतील तुम्हा प्रोटीन भरपूर.
नको उगाच आचरट खाणे,
डॉक्टरकडे जाऊन मल्टि-व्हिटॅमिन घेणे.
निसर्गासोबत,निसर्गाच्या सानिध्यात,
आनंदी जीवनाचा खरा आस्वाद.

                          सौ.प्रतिभा सोपान वाठ.
                          खामगाव     
                          दि. 29.06.2020            

***मागील दोन-तीन दिवसांपासून खामगावला शिफ्ट होण्याची लगबग सुरू असल्यामुळे आपली भेट होऊ शकली नाही.आज कामातून वेळ काढत ही कविता लिहिली
धन्यवाद.🙏
[7/18, 6:41 PM] Smj Bhand__Mangala Dahake Bhandara: ।। आपले आरोग्य आपल्या हाती।।

स्रीचे आरोग्य,
तिच्याच हाती।
जप महती,
त्या आरोग्याची।।

सात्विक अन्न,
करा ग्रहण।
कुटूंब तुझे,
घे सांभाळून।।

रोग दिसता,
वेळीच कर।
रोग निदान,
घे उपचार।।

करा व्यायाम,
रहा निरोग।
मन प्रसन्न,
सुद्ढ आरोग्य ।।

सौ. के.बी. सार्वे भंडारा.
[7/18, 6:41 PM] Smj Bhand__Mangala Dahake Bhandara: आहे आपल्याला रक्ताची कमी ? 
बिट,अनार खा, प्या नारळाचं पाणी 

आहे आपल्याला सांधेदुखीचा त्रास 
जवस, मेथी त्यावर रामबाण खास 

अशक्तपणा, काम करतांना दुखताे कणा 
घ्या शुद्ध दुध, तुप, लाेणी, दुखण्याला bye म्हणा 

फारच हाेई अँसेडीटी, आणी जळजळ 
अद्रक रस, शतावरी देई रामबाण बळ 

जिभेला येतात माझ्या खुप छाले 
उठल्यावर एेक प्याला नित्य पाणी प्यावे. 


प्रिया र गाेमाशे, (आकाशवाणी निवेदीका) चंद्रपूर.
[7/18, 6:42 PM] Smj Bhand__Mangala Dahake Bhandara: 30 जून
[7/18, 6:45 PM] Smj Bhand__Mangala Dahake Bhandara: स्वाती सेलोकर, 1
[7/18, 6:45 PM] Smj Bhand__Mangala Dahake Bhandara: अनुश्री धांडे, राघोर्ते  2
[7/18, 6:45 PM] Smj Bhand__Mangala Dahake Bhandara: मनोरमा तिजारे, पुणे
[7/18, 6:45 PM] Smj Bhand__Mangala Dahake Bhandara: सुषमा पडोळे।   4
[7/18, 6:45 PM] Smj Bhand__Mangala Dahake Bhandara: श्वेता कांतोडे, अमरावती।    5
[7/18, 6:46 PM] Smj Bhand__Mangala Dahake Bhandara: Varsha इलमे,  6
[7/18, 6:46 PM] Smj Bhand__Mangala Dahake Bhandara: प्रतिभा vath,     7
[7/18, 6:46 PM] Smj Bhand__Mangala Dahake Bhandara: सुचेता सारवे,      8
[7/18, 6:46 PM] Smj Bhand__Mangala Dahake Bhandara: रुपाली बोन्द्रे।    9
[7/18, 6:46 PM] Smj Bhand__Mangala Dahake Bhandara: *संयुक्त आणि विभक्त कुटुंबाचे फायदे, तोटे*

*मानव माणूस बनतो तो कुटुंबामुळे*. *कुटुंबाशिवाय माणूस ही परिभाषा होऊच शकत नाही*. *त्यातही संयुक्त म्हणजेच joint family आणि विभक्त म्हणजेच nuclear family असे प्रकार आहेत*.
        *संयुक्त कुटुंबात आई - वडील, आजी- आजोबा, काका-काकू एकत्र राहतात*. *त्यामुळे या कुटुंबातील मुलांना व प्रत्येक सदस्याला adjustment करायची सवय लागते*. *कारण सगळ्यांच्या सवयी, वागणं वेगळं असते*. *कुठल्याही गोष्टीचा निर्णय सगळ्यांच्या सहमतीने घेतला जातो. आजारपण आलं की सगळे मदतीला येतात*. *तसेच जर आई नोकरी करणारी असेल तर मुलांना सांभाळायला अनेक जण असतात*. *मुलांना आजी कडून गोष्टी ऐकायला मिळतात*. *एखादा सण असला तर सगळे मिळून साजरा करतात*. *आई रागावली की घरची मंडळी मुलांना जवळ घेतात*.
        *पण या कुटुंबात व्यक्तीला स्वातंत्र्य कमीआहे*. *काही वेळेस मुलांचे अतिलाड पण होतात*. 
          *विभक्त कुटुंबातील व्यक्ति स्वतः चे निर्णय स्वतः घेऊ शकते*. *तिला बंधन कमी  असतात*. *स्वतः साठी मन मोकळेपनाने पैसे खर्च करू शकते*. *दुसर्‍यांचा विचार मनात घ्यायची गरज नसते*. *यात फक्त मी, माझा नवरा आणि मुलं एवढाच विचार केला जातो*. *अश्या कुटुंबात मुलाना आई वडिलच दिसतात*  *जास्त लोकांमध्ये रहायची सवय नसते त्यामुळे ते एकलकोंडे आणि जिद्दी बनतात*. *आणि आई बाबा दोघही नोकरी वाले असतील तर मग विचारूच नका*. *मुलांना पाळणाघरात ठेवावे लागते आणि त्यांच्याकडे दुर्लक्ष होते*. 
          *जी मजा संयुक्त कुटुंबात मिळून मिसळून राहण्यात ती विभक्त कुटुंबात नाही*. *हे अनुभवाचे बोल आहेत कारण माझं बालपण संयुक्त कुटुंबातच गेलं*.


*सौ स्वाती दयानंद सेलोकर*, *भंडारा*
[7/18, 6:46 PM] Smj Bhand__Mangala Dahake Bhandara: कमल सारवे.  10
[7/18, 6:46 PM] Smj Bhand__Mangala Dahake Bhandara: विषय--संयुक्त आणि विभक्त कुटुंबाचे फायदे, तोटे

पूर्वापार काळापासून संयुक्त कुटुंब पद्धती आपल्या भारतात आहे. पारंपरिक व्यवसाय असल्या कारणाने सगळे एकत्र नांदत. व्यवसाय तोच असल्यामुळे आपोआपच तो पुढच्या पिढीला सोपवला जात. अनुभवाच्या आधारे वयस्कर व्यक्तीचे निर्णय अंतिम असतं.

औद्यगिक क्रांती नंतर नाविन व्यवसाय, उद्योग धंदे ,कारखाने उदयाला आले.त्यामुळे लोक पारंपरिक व्यवसाय सोडून इतरत्र जाऊ लागले आणि विभक्त कुटुंब पद्धती उदयाला आली.

संयुक्त कुटुंबात एकमेकांचा आधार कायम असायचा. ज्येष्ठ मंडळी लहान मुलांचा सांभाळ करायचे. शाळा अभ्यास हाही विशेष नसायचा. मनोरंजनाचे साधन नसल्यामुळे सगळे एकमेकांना वेळ द्यायचे. ज्येष्ठ लोकांना एकटं वाटत नव्हते. आजारपणात मदत व्हायची. सणवार आनंदात साजरे होत. बायका घरची कामे करत. कुणाचा आपसात अबोला झाला तरी बाकीचे त्याची काळजी घेत. परंतू घरातील मुला मुलींना मदत होत असल्यामुळे स्वतंत्र कामे करायची सवय नसे.

आजच्या काळाचा विचार करता, स्त्री पुरुष समानता असल्यामुळे दोघेही नोकरी करतात.  मुले शाळा अभ्यास यात गुंतून असतात. सगळं वेळेनुसार चालत. घरातील ज्येष्ठ लोकांना एकटं वाटतं. घरात मोजकीच लोकं असल्यामुळे त्यांना बोलायला कुणीच नसतं. यात दोष कुणाचाच नाही. काळच बदलला आहे.

आजच्या काळाला अनुसरून स्त्री- पुरुष, लहान मोठे या सर्वांनी एकमेकांचा आदर केला पाहिजे. प्रत्येकाला योग्य ते स्वातंत्र्य असायलाच पाहिजे. प्रत्येकाचा वयक्तिक वेळ जपला पाहिजे. आमच्या वेळी असच होतं , तसं नव्हतं हा विचार सोडून बदलत्या जमाण्यानुसर बदल मान्य केला पाहिजे.आपल्या वयाच्या इतर लोकांशी संघटन केले पाहिजे. नविन पिढीने सुट्टीच्या दिवशी मोबाईल, टी व्ही बाजूला ठेवून घरातील ज्येष्ठ व्यक्तींना वेळ दिला पाहिजे. लहान मुलांना योग्य संस्कार दिले पाहिजे.भाऊ भावजया यांनी कामे मिळून केली पाहिजे. स्त्री पुरुष हा भेद नसावा. एकमेकांच्या भावना जपाव्या. यामुळे नक्कीच संयुक्त कुटुंब फायद्याचे ठरते.

सौ. रूपाली अमोल बोंद्रे
भंडारा
[7/18, 6:46 PM] Smj Bhand__Mangala Dahake Bhandara: संयुक्त कुटुंबाचे फायदे-
१)पूर्वी एकत्र कुटुंबपद्धती चांगल्या प्रकारे नांदत होती.
2)एकत्र कुटुंबा मध्ये एकत्र पद्धतीचा व मिळून मिसळून राहुनव्यवसाय करायचे.त्यामूळे त्या कुटुंबात प्रेम वाढायचे.
3)एकत्र कुटुंबातआजी, आजोबा हे आपल्या नातवंडे यांचावर प्रेम करते व ते मूल त्या प्रमाणे वागतात.
४)आपल्या वर व मुलांवर चांगले संस्कार होतात.
५)एकत्र कुटुंबात खर्च कमी होते, सणावाराला मिळून मिसळून खर्च केला जातो व आनंदात राहतात.
एकत्र कुटुंबामध्ये आपल्या पूर्वजांच्या कडून अनेक गोष्टी, जुन्या आठवणी, ओवी, कथा, यांची माहिती आपल्याला व आपल्या मुलांना मिळते.
6)एकत्र कुटुंबात कोणतेही कार्य करण्याआधी मोठ्या लोकांचे विचार घ्यावा लागते.

विभक्त कुटुंबाचे तोटे-
1)आताचे कुटुंबपद्धती ते आता त्या'ना वेगळे पाहिजे.
२)विभक्त कुटुंबाच्या माध्यमांना त्यांचा वेगळा व्यवसाय पाहीजे,व स्वतःच स्वतंत्र पाहिजे, त्यामुळे त्या स्त्री पुरुष मध्ये तनाव व अडचणी येतात.
3)विभक्त कुटुंबात पूर्वजांचे प्रेम मिळत नाही,मुलांना आई,आणि बाबा च दिसतात, त्यामुळे त्यांना चांगले संस्कार व प्रेम मिळत नाही.
4)विभक्त कुटुंबात खर्च व जबाबदारी वाढते. मुलांना संस्काराचे महत्त्व कळत नाही. कार्य करायला स्वतः निर्णय घ्यावा लागतो व त्यामुळे नुकसान होते.
५)विभक्त कुटुंबामध्ये नवरा बायको व त्यांचे मुलं यांच्यामध्ये त्यांचा परिवार पूर्ण होते, पण त्यामुळे त्यांना मोठ्यांचा व समाजाचे शिक्षण मिळत नाही....

सौ श्वेता स.कानतोडे
(अमरावती)
[7/18, 6:46 PM] Smj Bhand__Mangala Dahake Bhandara: संयुक्त कुटुंब आणि विभक्त कुटुंब
         ----------------------
आपला समाज शेती व्यवसाय करणारा .आधी संयुक्त कुटुंबच बघायला मिळायचे. पण मुले शिक्षणासाठी, नोकरी निमित्याने
बाहेरगावी वास्तव्य करू लागले.
त्याचे रूपांतर हळूहळू विभक्त कुटुंबात व्हायला लागले. पती पत्नी, त्यांची मुलं. 
        आज सर्व मुली उच्च शिक्षण घेतात, नोकरी करतात, मुलांकडे लक्ष द्यायला कुणी तरी हवं असते, मोठ्या शहरात मूल सांभाळायला बाई ठेवतात. पण आजी आजोबा जेवढ्या मायेने करतील ,तितकं बाया नाही करणार.
       संयुक्त कुटुंबात एकटीवर कामाची जबाबदारी पडत नाही,घरी आई नसली तरी मुलांची गैरसोय होत नाही, पण शिस्त असते, प्रत्येकाला स्पेस दिली की स्वातंत्र्य हरवलं असं ही वाटत नाही. 
   विभक्त कुटुंबात केंव्हाही शॉपिंग, पिक्चर ,हॉटेलिंग करू शकतात.एकटीला मुलाच्या वेळा सांभालाव्या लागतात , मला वाटते, एकत्र कुटुंब ही आजची गरज आहे.
      ------------ ----------
        मंगला डहाके, भंडारा
[7/18, 6:46 PM] Smj Bhand__Mangala Dahake Bhandara: ‌बि.के..सा.सं.प.

       """अनाथ""" 

मुलं असती देवाघरची फुले
जन्मा घालुन नदीत वाहिले
अनाथाला अधिरथाने  काढले
तेजपुंजाने राधाअधिरथ भाळले

संगोपनाने घडती बाळे
नियती अनाथांवर घाली वारे
कौरवच शब्दमित्र कर्णाचे
जपले शब्दाला मरण त्याचे

तारुण्याचे उंबरठे गाजती
किती अनौरस जन्मा येती
जन्मदात्री पान्हा न् पाजता 
उकिरड्यावर फेकुन देती

अनाथ बाळाची नजर फिरते
जन्मदात्यांना जगी पाहते
जिवन सागरी किनारा शोधते
अनाथांचा नाथ ईश्र्वर होते

आयुष्याच्या संध्याकाळी
अनाथांचे जिवन आले
पंखबळाने उडाली बाळे
व्यथित मनाचे जिवन झाले

दशरथ अतकरी, नागपूर
दि.३० जुन२०२०
[7/18, 6:46 PM] Smj Bhand__Mangala Dahake Bhandara: 😢😢😢अनाथ 😢😢😢
आज रान सुखले, काहूर माजले,
पेटून उठल्या हिमनद्या
जन्म घेतला त्या पिलानी,
ज्याच्या येण्याचा कोणा आनंद नाही.
पुरूषाने पुरूषार्थ गाजविला,
माऊलीने त्या गर्भ जोपासीला.
नसे कोणी वाली आयुष्या, 
जन्मताच कपाळी दुर्देव त्याच्या, 
ईवलासा तो जीव नाल्याकाठी , 
बेफिकीर होऊन दिला फेकूनी, 
किंचतशीही यातना नसेल का, 
त्या जन्मदायिनीला?? 
पोटाच्या पिलांचा अंतः
तिनेच कसा ठरविला, 
ह्रदय कठोर त्या माऊलीने 
गमविली सारी ममता, 
रस्तोरस्ती ठोकर खातो हा अभागी 
अपयशाची काहूर जागोजागी, 
ना आई बापाचा ठावठिकाणा, 
ना आडनावाची शान, 
ना समाजात जागा, 
ना आयुष्याचे भान. 
जीवन असेच अंधारात डुबलेले, 
दुःखाच्या खोल समुद्रात पोहताना, 
हातून पाणी निसटलेले, 
सुरक्षित गर्भाची आठवण दाट, 
शोधतो आहे जीवनाचा काठ. 
ज्याची नाही कोणती जात, 
नाही कोणत नात, 
ह्रदयद्रावक कहाणी असलेला तोच मी
          "अनाथ" 😢😢😢
[7/18, 6:46 PM] Smj Bhand__Mangala Dahake Bhandara: अनाथ----
       ज्यांचा कोणी वाली नाही
तेच असतात अनाथ
आपल्यासारख्यानी जपून माणुसकी
द्यावा एक मदतीचा हात ।।

एकदा गेलो आम्ही अनाथाश्रमात
बघून थक्कच झालो
केविलवाणे चेहरे, नेत्री पाणी
 बघून गारच झालो ।।

धावत पळत येण्याची
होती त्यांना घाई
प्रत्येकाला कपडे दिल्यावर
घालण्याची ही घाई ।।

सफरचंद देताच त्यांना
मटा मटा खाल्ला
चेहऱ्यावर थोडा 
आनंदच बघितला ।।

जगी ज्यास कोणी नाही
त्यास देव आहे
मनाचे बळ त्यांचे
रक्षण करीत आहे ।।

2 तास घालवून त्यांच्यासोबत
मिळून गाणे गायले
आयुष्याचे समाधान घेऊन
घरी सारे परतले ।।

दरवर्षी माझ्या परुच्या वाढदिवसाला
आम्ही तिथे जातो
त्यांना थोडा आनंद देऊन
मोठया सुख सरी घेऊन परततो।।
            मंगला डहाके,  भंडारा
[7/18, 6:46 PM] Smj Bhand__Mangala Dahake Bhandara: *अनाथ*

*गेले बापाचे छप्पर*, 
*अन् आईचीही माया*. 
*आता फक्त उरली*, 
*माझी शरीररूपी काया*. 

*न दिसे मायबाप*, 
*न कुणाची साथ*. 
*अश्या या दुनियेत*, 
*मी झाले अनाथ*. 

*कुणी नसे ज्यांचे*, 
*त्यांचा असे ईश्वर*. 
*तोच जगा सांभाळी*, 
*सर्वांचा परमेश्वर*. 

*सौ स्वाती दयानंद सेलोकर*
*भंडारा*
[7/18, 6:46 PM] Smj Bhand__Mangala Dahake Bhandara: अनाथ

आज माझेही घर असते
    ..तुम्ही असता तर
दोन वेळच्या जेवणाची काळजी नसती
    ..तुम्ही असता तर
कुणाला पैसे नसते मागावे लागले
    ..तुम्ही असता तर
माझ्या जवळही छान कपडे असते
    ..तुम्ही असता तर
मी सुद्धा शिकायला शाळेत गेलो असतो
    ..तुम्ही असता तर
माझा पण वाढदिवस साजरा झाला असता
    ..तुम्ही असता तर
माझ्याही पायात नवीन बूट असते
    ..तुम्ही असता तर
माझाही प्रेमळ परिवार असता
    ..तुम्ही असता तर
मी अनाथ राहिलो नसतो
    ..तुम्ही असता तर

सौ. रूपाली अमोल बोंद्रे
भंडारा
[7/18, 6:46 PM] Smj Bhand__Mangala Dahake Bhandara: अनाथ

अनाथांची माऊली,
मायेची सावली।
चिमुकल्यांची आई
झालीस तू।।

प्रेमाचा पाझर
सकल आधार।
लेकरांची हाक
झालीस तू।।

स्वतः अनाथ,
फिरसी दारो-दार।
स्मशानात रात्र 
काढलीस तू।।

असली वेळ
कुणावर नको।
ठाम निश्चय 
केलास तू।।

विसरून दुःख
स्वतःचे अपार।
मायेचा पदर
दिलास तू।।

खरोखर धन्य
सिंधूताई सपकाळ।
"ममता" बालसदन
उभारीले तू।।

ज्या नवऱ्याने
हाकलले गर्भारपणी।
त्याचीही माऊली
झालीस तू।।

साऱ्यांचा आदर्श
"अनाथांची आई"।
देवरूपात धावून
येशील तू।।

                          सौ.प्रतिभा सोपान वाठ.
                          खामगाव     
                          दि. 30.06.2020
[7/18, 6:46 PM] Smj Bhand__Mangala Dahake Bhandara: *अनाथ*

येतो पुराचा लोंढा
वाहून जात सगळं
होत़ो मी अनाथ
नसीब कस वेगळं

काही समजण्या आधीच
शिक्का बसतो मला
अनाथ हा मुलगा
पहा निसर्गाची कला

नसतो मला वाली
भटकत़ो मी रस्त्यानी
नशीब सांगत मला
जिवन जगायचंय एकटयानी

गुन्हा नसत़ो काहीच माझा
शिक्षा होते मला
माय बाप हीरावले जातात
अनाथ ह़ोतो मी बिचारा

काय बितत असेल अनाथांवर
ही कल्पनाच न्यारी
आईविना पोरका
जगन होत भारी
 
            नंदा भोयर
[7/18, 6:46 PM] Smj Bhand__Mangala Dahake Bhandara: अनाथ.....
नाही आई-बाप, नाही नातलग,
असे आम्ही, "अनाथ अनाथ"
आम्हाला मिळाला हा जन्मापासून शाप,
असे आम्ही "अनाथ अनाथ"
कधी वासनेचे बळी, कधी अपघाताचे बळी,
कधी उकिरड्यात,तर कधी रस्त्यावरी
असे आम्ही, "अनाथ अनाथ"
शासनाने केली आमची मदत
उभारले त्यांनी अनाथालय
नाही ज्याचे कूणी,त्याचे अनाथालय
सिंधू ताई सारखा मदतीचा हात
दिले आम्हासं ,सदनगृह"
ईश्वराची माया आमच्या वर
निपूतिरकांना आम्ही वरदान
शासनाने केल्या काही अटी शिथिल, दत्तक देण्यास,
मिळेल आम्हांस आई-बाप.
पुरवुन हट्ट,घेऊ मुलांचे स्थान
आई तुझ्या संगोपनाने, घेऊन शिक्षणभरारी, समाजात जगू
मानाचे स्थान.
आम्ही ,"अनाथ अनाथ"
😭😭😭
सौ.माधुरी  देवेंद्र भूते
[7/18, 6:46 PM] Smj Bhand__Mangala Dahake Bhandara: पूनम डहाके , भंडारा   11
[7/18, 6:46 PM] Smj Bhand__Mangala Dahake Bhandara: साहित्य संवर्धन वर अनाथ  ह्या विषयावरील कविता आहेत
[7/18, 6:46 PM] Smj Bhand__Mangala Dahake Bhandara: 👨‍👩‍👧‍👦👫🏻**एकत्र कुटुंब विरुध्द विभक्त कुटुंब**👨‍👩‍👧‍👦👨‍👩‍👦‍👦
 एकत्र कुटुंब पद्धतीमध्ये एकाहून जास्त पिढ्या किंवा एकाच पिढीतील सख्खी आणि चुलत भावंडे एकाच घरात आणि एकत्र कुटुंबात गुण्यागोविंदाने राहतात. ‘एकत्र कुटुंबाची गोष्ट’ बहुतेक कुटुंबसंस्था पितृसत्ताक असतात, अभावानेच काही देशात, भागात मातृसत्ताक पद्धती आपल्याला बघायला मिळतात.
मुलांच्या वाढत्या वयात होणारे संस्कार हे एकत्र कुटुंबाच्या घरात होताना दिसतात.लहानग्या सदस्यांच्या शंकांचे निराकारण एकत्र कुटुंबातील जेष्ठ सदस्याकडून होते, आता मात्र,विभक्त कुटुंबपद्धती अस्तित्वात असल्याने मुलांना आपल्या भावनांचा निचरा होण्यास अडचण निर्माण होते तसेच त्यास वेळ लागतो किंवा बंधने येतात असे वाटते. किशोरवयीन मुलांचा भावनिक बुद्ध्यांक कसा ओळखावा, पाल्याने शारिरीक व मानसिक बदलांमध्ये स्वत:ला कसे सांभाळावे याचेही भान एकत्र कुटुंबात एकमेकांशी चर्चा केल्याने चांगल्या प्रकारे होते. भारतात ग्रामीण भागात ही पद्धत सध्यातरी प्रचलित असली तरी नागरी भागातून ही पद्धत आता हळूहळू नाहीशी होत चालली आहे. संतश्रेष्ठ श्री ज्ञानेश्वर माऊलींनी पसायदानात म्हंटलेच आहे की.,
‘विश्वची माझे घर’ म्हणजे विश्वालाच एक कुटुंब मानले. काळानुसार कुटुंबाची संकल्पना आणि व्याख्याही बदलत गेली.
एकत्रित कुटुंबातून संयुक्त कुटुंबेही अस्तित्त्वात आली असे आपल्याला वेळोवेळी समाजात वावरतांना जाणवते. अशा कुटुंबातही प्रत्येक सदस्याचीही त्याच आपुलकीने तशीच काळजी घेतली जाते. ‘विश्वची माझे घर’ या संकल्पने नुसार., जगातील एकत्रित कुटुंबावर जेंव्हा एखादी नैसर्गिक मानव निर्मित आपत्ती कोसळते तेंव्हा त्यांना वसुंधरेवरील इतर
कुटुंबं सदस्यांनी केलेली सहाय्यता किंवा मदत म्हणजे रक्ताच्या नात्यांपलिकडेही प्रेम आणि मायेने जोडलेल्या नात्यातील मानवतेच्या कुटुंबाला जिद्दीने आणि ताठ मानेने जगण्यास शिकविणारे परमेश्वराचे प्रेषकच म्हणावे लागतील. एकत्र कुटुंबात  जर काही कार्यक्रम असेल जसे कि जन्म, मरण, लग्नसोहळ्याच्या प्रसंगात एकत्र कुटुंबाचे योगदान फार जास्त असते जन्म व विवाह प्रसंग एकत्र कुटुंबात समरसून साजरे होत. कुटुंबात घडलेल्या वाईट प्रसंगी एकमेकांना मानसिक आधार मिळे.माणसांच्या उबेमुळे उदासीनतेवरची खपली नैसर्गिकरीत्या सहजपणे भरून येत असे. व्यक्तिमत्त्व विकासासाठी
प्रशिक्षण वर्गांची गरजच भासत नसे. व्यवहारी जीवनाचे खाचखळगे आपोआप आत्मसात केले जात होते. एकत्र कुटुंब
म्हणजे नैसर्गिक मानसोपचाराचे एक चालतेबोलते समुपदेशन-केंद्रच. दु:खद प्रसंगी एकमेकांना सांभाळून घेण्याची आपसूकच
चालून आलेली परंपरा. याप्रसंगी तीव्र मतभेद पण संपुष्टात येत होते. घरातील स्त्रीया कामानिमित्त बाहेर गेल्या असतील तर अन्य महिलांच्या मदतीमुळे, कुटुंबात किंवा घरात अडचणी येत नसत. मुलांनाही मोठय़ा कुटुंबात राहण्याची सवय लागे. सण-समारंभ एकमेकांच्या मदतीने उत्साहात साजरे करता येत होते. हे सगळे एकत्र कुटुंब पद्धतीचे फायदे आहेत.
 * स्वर्ग से सुंदर सपनो से प्यारा था अपना घरद्वार .. हींदी चीत्रपटातील गीतांच्या ओळी आठवण्याचं कारण,
म्हणजे आजचा चर्चेचा वीषय. पुर्वी बहूतेक संयुक्त कुटुंबपद्धती अस्तीत्वात होती, आताही कुठेतरी संयुक्त कुटुंब दीसतं पण क्वचीत. 
संयुक्त कुटुंबाचा पाया त्यागावर आधारीत असायचा, मुलांचा आईसाठी आईचा मुलांसाठी, पतीचा पत्नीसाठी आणी पत्नीचा पतीसाठी, भावंडांचा एकमेकांसाठी. तर एकंदरीत संयूक्त कुटुंब हे वैयक्तीक आशा आकांक्षा आणी भावनेचा त्याग
यावर उभं असायचं. यामध्ये कुटूंबातील स्त्रीवर्गाचा सहभाग म्हणजे सीहांचा वाटा. संयूक्त कुटुंबातील व्यक्तीला आपसुकच
कुटुंबाचं सुरक्षाकवच असायचं जीवनात येणा-या अडीअडचणींचा सामना संपुर्ण कुटुंब मीळुन करायचं. कालांतराने बदलती जीवनपद्धती आणी आधुनीक संस्कार यामुळे "मीच का त्याग करायचा " ही भावना वाढीस लागली, आणी संयुक्त कुटुंबाचा पायाच ढासळला. हळुहळु एक सुंदर भारतीय जीवनपद्धती संपूष्टात आली. वीभक्त कुटुंबात मानसाच्या वैयक्तीक महत्वाकांक्षा पुर्ण होऊ लागल्या मात्र मानवी नातेसंबधातला गोडवा संपला हे मात्र तीतकेच खरे ...
*काळ बदलला तसा एकत्र कुटुंब पद्धती लोप पावल्या..एकत्र म्हणण्यापेक्षा सर्व समावेशक कुटुंब पद्धती म्हटले तर वागावे ठरणार नाही..सर्व समावेशक अशा अर्थाने की त्यावेळी संपूर्ण चाळ, शेजारी पाजारी सुद्धा कुटुंबाप्रमाणेच वावरत होते..
एकमेकांच्या सहाय्याला धावून जात होते..सुख दुखाःत सहभागी होत होते..
पण हळू हळू हे सर्व बदलत गेले..समाजात विभक्त कुटुंब पद्धतीचा शिरकाव झाला..ह्याचे मुख्य कारण म्हणजे..एक तर जागेचा अभाव आणि दुसरा म्हणजे वैयक्तिक स्वार्थ..तुम्ही म्हणाल जागेचा अभाव पूर्वी सुद्धा होता तरी १५ माणसांच कुटुंब १८० चौरस फुटाच्या खोलीत रहात होते.. तुमच म्हणण सुद्धा बरोबर आहे..त्यावेळी जागा जरी छोटी असली तरी माणसाचं मन आणि हृदय विशाल होते..त्यामुळेच सर्व गुण्यागोविंदाने नांदत होते..काळानुरूप माणसाचं मन कोत बनलं..मग घर ते काय हो ते सुद्धा सहाजिक छोट बनलं..आणि हि लागण फक्त शहरापुरती मर्यादित नाही तर अगदी खेड्या पाड्यात गाव-कुसा पर्यंत पोहचली आहे...गावातली विशाल घरे सुद्धा आज विभक्त होऊन कोंबड्याची खुराडी बनली आहेत व मनाने
विखुरली गेली आहेत..सर्वच कुटुंबात स्वार्थाचा शिरकाव झाला अस मी म्हणणार नाही काही अपवाद सुद्धा आहेत..तर काहींनी सामंजस पणाने निर्णय घेवून विभक्त पण मनाने एकत्र राहण्याचा निर्णय घेतला..आणि तो स्तुत्य आहे..अस मी म्हणेन..
आता आपण दुस-या कारणाकडे वळू तो म्हणजे वैयक्तिक स्वार्थ..मी आणि माझ त्रिकोणी किंवा चौकोनी कुटुंब ह्या पलीकडे कसलाच विचार..ह्या वैयक्तिक स्वार्थ पाहणा-या व्यक्ती करत नाही..अशा कुटुंबाचा प्रवास खरे तर उजेडाकडून-अंधाराकडे
चालू आहे म्हंटल तर वागवे ठरणार नाही..
कारण स्वतःच्या चार भिंतीत ह्यांच संपूर्ण जग सामावलेलं असत..ह्यांच्या शेजारी
कोण राहतो ह्याचा सुद्धा त्यांना पत्ता नसतो..फ्लैट पद्धत सुरु झाल्याने सताड उघडे असणारे दरवाजे आता कायमचे बंद
झाले..त्याच बरोबर मनाची कवाडं सुद्धा आपसूक बंद झाली..
आता तुम्ही म्हणाल विभक्त राहण्यात कसला आलाय स्वार्थ..?? तर त्याच अस आहे..सामंजसपणे घेतलेले निर्णय वेगळे..पण
अट्टाहासाने नाहक कुरापती काढून निर्णयाप्रत येणे हे वेगळे..अशा निर्णयात मागाहून पच्छाताप करून घेण्याची पाळी येते..आणि सहन होत नाही, सांगताही येत नाही अशी अवस्था होऊन जाते..त्यासाठीच इथे एक उदाहरण देऊ इच्छिते:-

भाऊ आपल्या आई वडिलांसमवेत आणि त्याच्या अपत्यासह अगदी गुण्या गोविंदाने नांदत होते..पण आई वडील
गेले आणि कुठून तरी स्वार्थी किडा एका भावाच्या आणि त्याच्या पत्नीच्या मनात शिरला..क्षणात होत्याचे नव्हते झाले..दोन्ही
भाऊ विभक्त झाले..सहाजिक सुरवातीला दोघांनाही बरे वाटले..पण नंतर त्याना एकत्र राहण्याचे फायदे समजून आले तो पर्यंत
उशीर झाला होता..ज्या कारणासाठी विभक्त झाले तेच कारण मुळावर आले.. कारण तस शुल्लक होत..म्हणे त्यांना एकांत मिळत नव्हता..तोच एकांत आज आकांत करतो आहे.माणसं जोडण्यासाठी अजूनही धडपडतो आहे...

सरते शेवटी इतकेच सांगेन शरीराने भले विभक्त रहा पण मनाने कायम एकत्र या..एकत्र रहा..धन्यवाद...
सौ.अनुश्री इशान राघोर्ते धान्दे, पुणे..😊🙏🏻
[7/18, 6:46 PM] Smj Bhand__Mangala Dahake Bhandara: **अनाथ**

स्वरुप आम्हचे अनाथांचे
 नाही नाते गोते हक्कांचे
 तरी जीवंत जीव आम्हांचा
  सजीव र्पुथ्वीवरील किडामाकोडयासारखा

 आमच्या मनीही खुप लालचा
 नातेगोते आम्हा असण्याचा
 कधी होतील पूर्ण इच्छा
 इतरांसारखे आम्हाला जगण्यांचा

 देवा घरची आम्ही मुले
 सारेच म्हणती आम्हा
 कुणी देवाला वाहती फुले
 तसेच वाहती वस्तु आम्हा

 खुप आहे देवा तुला
 अनाथांच्या जीवनाबददल सांगण्याचा
 पण तु माझ न ऐकता तुच सांगण  मानवाला
 हक्कांच काहीतरी देण्याचा

 पुरे झाल देवा असं लाजीरवाणं  जीवन जगणं
 त्यापेक्षा मरण बरं 
तुझ्या कुशीत येऊन रडणं

दया येईल तुलाच आम्हची तुच हात फिरवशील प्रेमांनी
 आश्वासनेही तूच देशील पुढल्या जन्मी
हक्कांचे नाते गोते देण्याची    ।।
      
- *सौ. चंदा शेंडे*
[7/18, 6:46 PM] Smj Bhand__Mangala Dahake Bhandara: संयुक्त आणि विभक्त कुटुंबाचे फायदे-तोटे

           21 व्या शतकात नवनवीन बदल होतांना दिसत आहे . माणूस नोकरी-व्यवसायाच्या निमित्ताने आपल्या कुटूंबापासून दूर जात कुटूंब विभक्त होत आहे .
संयुक्त आणि विभक्त कुटूंबाचे फायदे तसे तोटेही दिसून येतात.संयुक्त कुटूंबात, कुटूंब प्रमुख स्वतः पूर्ण निर्णय घेत असतो. त्यामुळे इतरांना आपली मत-मतांतरे मांडता येत नाही.घर चालवितांना कुटूंब प्रमुखाला सर्व गोष्टींचा विचार करून निर्णय घ्यावे लागतात. त्यामुळे प्रत्येकाला योग्य न्याय मिळत नाही.
           विभक्त कुटूंबात ,छोटे कुटूंब सुखी कुटूंब असे म्हणत इथे प्रत्येकाला आपआपले विचार स्वातंत्र्य असते.पण इतरांशी जुळवून घेतांना त्यांना त्रास होतो. वेळ प्रसंगी त्याला कोणत्याही  संकटाचा एकट्यालाच सामना करावा लागतो.
          संयुक्त कुटूंबात सर्वजण एकजुटीने राहिले तर कुटूंबात आलेले सुख दुःख वाटून घेता येतात. आणि छोट्या मुला-मुलींचे संगोपन चांगले होते .
           माझ्या विचाराने,कुटूंब कोणतेही असले तरी चालेल फक्त प्रत्येकाने नात्याप्रती आपूलकी जपायला हवी . प्रेमाने राहायला हवे. जेणेकरून आयुष्याचा प्रवास सुखी व समृद्ध होईल.

                          सौ.प्रतिभा सोपान वाठ.
                          खामगाव     
                          दि. 30.06.2020
[7/18, 6:46 PM] Smj Bhand__Mangala Dahake Bhandara: 🌹अनाथांचा नाथ🌹
असे जो ऐकला। नसे मायबाप ।
त्या अनाथांचा नाथ । सखा पांडूरंग ।
मायेचा पदर । उकिरड्यावरी फेकला ।
त्या वंचितांचा नाथ । सखा पांडूरंग ।
भुकेने व्या कुळ जे। त्यासी देई अन्न।
होई मायबाप । सखा पाडूरंग ।
दाटली माया ।अनाथांलया च्या दारी।
 वाढवी लेकुरे. । सखा पांडूरंग।
 भेटवी मायबाप । फिटे वांझपण ।
 दत्तकां च्या रूपे। सखा पांडूरंग।
  ऐसे क्षेष्ठ मन । तुझेच देवा ।
   दुःखीताचा आधार। सखा पांडूरंग।
   द्या वे मज वरदान ।उपेक्षितांंची सेवा।
   घडावी हातून । सखा पांडूरंग ।।
    🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏
           सौ जयश्री रेहपाडे
                   नागपुर
[7/18, 6:46 PM] Smj Bhand__Mangala Dahake Bhandara: आजचा विषय-संयुक्त कुटूंबआणि विभक्त कुटुंब.

🌺 संयुक्त कुटूंब-

१.आजी,आजोबा,काका,काकु,आत्या, चुलत भावंड यांचे भरपूर प्रेम वाट्याला येते.आनंद व प्रेम भरपूर मिळते.
२.नात्याविषयी आदरभाव मुलांना   समजतो.
३.सुखदु:खात खूप मानसिक आधार वाटतो.(आवश्यक गोष्ट))
४.रक्त नात्यांचे महत्व समजते.
५.घराला कुलूप लागत नाही.कोणीतरी असतेच.
६.बाहेर निश्चिंतपणे जाऊ शकतो.
७.एकमेकांना समजण्याची भावना तयार होते.
८.रुढी, परंपरा समजण्यास ऊपयुक्त.
९.पती-पत्नीची भांडण,अबोले लवकर मिटतात.
१०.मुलांच्या संसाराचे कौतुक पाहुन आई,वडील,आजी, आजोबा खूश, नातवंड खूश.

     ।। 🌺 विभक्त कुटूंब 🌺।।

१.एकलकोंडेपणाची भावना निर्माण होते.
२.नातेसंबधात दुरावा निर्माण होतो.परकी वाटतात.
३. रक्ताच्या नात्याचे महत्व कमी वाटते.मित्रमंडळी जवळची वाटतात.
४.दोघे नौकरीवर गेल्यावर घराला कुलूप लागते. कुणी येत नाही.
५.मुले इतर नातेवाईक सहन करीत नाहीत.
६.मुलांवर नातेवाइकांचा धाक नसतो.
७.रुढी, परंपरेशी काही घेणदेण नसते.
८.सूना,मुलीमधे मी पणा निर्माण होतो.
९.मुले पाळणाघरात असल्यामुळे घरी लवकर जाण्याची चिंता असते.
१०. मुले आजी,आजोबा,काका, आत्या या महत्वाच्या नात्याला दुरावतात.

महत्वाचे-
१.नौकरीनिमित्त जरी बाहेर असाल तरी कुटूबांशी आॅनलाईन सवांद साधा.
२.मुलांना आत्या,मामा,काका काकू नात्यांची ओळख करुन दया.
३. सर्वात महत्वाचे सासू सासर्‍यांचा मान तसूभरही कमी करु नका तरच तुमच्या शिक्षणाची,साहेबगीरीची समाजात ईभ्रत राहील याची विभक्त कुटुंब वाल्यांनी पूरेपूर जाण ठेवावी.


No comments:

Post a Comment

पुसद जि. यवतमाळ येथे योगाचार्य डाॅ रामकृष्ण ठवकर यांचे योग व मुद्रा वर मार्गदर्शन*

योगाचार्य डाॅ रामकृष्ण ठवकर यांचे योग व मुद्रा  वर मार्गदर्शन                             मंगळवार दि.22/11/2023 ला दुपारी  गांधीनगर, पत्रे ल...