समाजावर बोलू काही **
समाज म्हणजे सर्व माणसांना जगणे सोपे व सुखकर करणारी, माणुसकी जपणारी, प्रत्येकाच्या गरजांना, भावनांना, हक्कांना व अस्तित्वाला समान न्याय देणारी एक व्यवस्था. प्रत्येक समाज हा एक दुसर्या पासून वेगळा असतो. प्रत्येक समाजाची भाषा व संस्कृती वेगळी असते आणि ती टिकवून ठेवणे व पुढच्या पिढी पर्यंत पोहोचविणे हे समाजच कार्य आहे. एकमेकांशी संबंध व एकमेकांवर अवलंबून असणार्या व्यक्ति हे ही समाजातील घटक आहेत असे म्हणायला हरकत नाही. समाजातील व्यक्तिंना त्या समाजातील परंपरा, चालीरीती, प्रथा, रुढी पाळाव्या लागतात. प्रत्येक समाजातील उद्योग - व्यवसाय किंवा उदरनिर्वाह कसा करायचा याची व्यवस्था त्या त्या समाजाने केलेली असते. पण आता त्या समाजाचा व्यवसाय त्याच समाजाने करावा अशी बळजबरी नाही. कौटुंबिक, आर्थिक, शैक्षणिक, राजकिय आणि सांस्कृतिक दृष्टीने माणसाला मजबुत करण्याचं काम समाज करतो. समाजाचे अस्तित्व टिकवून ठेवण्यासाठी एकतेची भावना असणे खूप गरजेचे आहे. पण जेव्हा समाजातील एकी तुटते तेव्हा त्या समाजातील माणसं मागे पडतात. म्हणून "एकीचे बळ मिळते फळ" हे वाक्य प्रत्येक समाजासाठी लाभदायक आहे.
सौ. स्वाती सेलोकर, भंडारा
[6/27, 2:24 PM] संपर्क-3_ K B Sarve (mahila Sakhi Manch): ।। समाजावर बोलू काही ।।
■■■■■■■■■■■■■■■■■■■■■■■■■■■
🌺 समाज 🌺
मानव हा जन्मजात समाजशिल
समूहाने राहणारा बुध्दीजीवी प्राणी आहे.आपल्या बुध्दी चातुर्य
बलावर त्याने आजपर्यंतची सर्व प्रगती केली आहे.
कालपरत्वे त्याच्या व्यवसाय, रोजगारावरुन जातनिहाय वर्गीकरण झाले किंवा केल्या गेले.
त्यात आपण कुणबी कृषी उदयोग करणारे.जमिनीत 'बी' पेरुन शेती करणारे ते कुणबी.
"बावणकशी" सोन्याप्रमाने तापून
सलाखून निघणारे, दर्जेदार शेती करणारे,प्रामाणिक, कष्टाळु,दानशूर,दयाळू, मायाळु बावणकशी सोन्याप्रमाने ते "बावने कुणबी" होय.
पण हा जगाचा पोशिंदा कुणबी समाज सर्वच बाबतीत मागे पडलेला आहे. शिक्षणक्षेत्र,कलाक्षेत्र,खेळ,कुशल कामगार या बाबतीत बराच मागे आहे.
शासन दरबारी कुशल नेतृत्व करणारी माणसे आपल्याकडे पाहीजे त्या प्रमाणात नाहीत.अभ्यासुवृत्ती नाही,
ग्रामीणभागातील तरुणांची व्यसनाधिनता,नापिकी,महिलांचा अशिक्षितपणा, शासनाच्या योजनांचा योग्य लाभ न घेता येणे,या व अशा अनेक गोष्टी समाजाच्या मागासलेपणाला कारणीभूत आहेत.
जुन्या काळी आणि आताही काही ईतर समाजाचे लोक आपल्या समाजाला हसतात.
आणि म्हणतात सुद्धा काहीतर म्हणीच आहेत.
१ . धान पिकला कुणबी शिकला.
२.कापुस, आंबा पिकला कुणबी शिकला. अशाप्रकारे मी शिकत असतांना ऐकलेल्या आहेत.
म्हणजेच ज्यावर्षी बर्यापैकी शेती पिकली की कुणबी सर्व विसरुन जातो.अशा विचारामुळे शिक्षणाकडे दुर्लक्ष झाले.त्याचेच परीणाम आज दिसत आहेत.
हेकेखोर स्वभाव,एकत्र न येणे,एकमेकांना समजून न घेणे,
माहीत असलेल्या गोष्टी ईतरांना न सांगणे, न विचारणे,या सर्वामुळे आपण मागे पडत आहोत,या मुळेच पाटिलकीचा तोरा कमी झाला आहे.
तरीही डाॅ. बाबासाहेंबांच्या सुत्रानुसार "शिका, संघटित व्हा, संघर्ष करा" याच पालन करु तर पुढे जावु अन्यथा जि.प.,पं.स,ग्रा.प सांभाळत बसा मंत्री कधीच नाही.
बरे असो काही चुका झाल्या असतील तर मोकळ्या मनाने माफ करणे.हे माझे वैयक्तिक अभ्यासपुर्वक मत आहे.सर्वांना पटेलच असे नाही.
सौ. के.बी.सार्वे भंडारा.
■■■■■■■■■■■■■■■■■■■■■■■■■■■■
समाज:-
समुहात राहणार्या व्यक्तींमध्ये असणारी व्यवस्था म्हणजे समाज. मानव हा समाजप्रिय प्राणी आहे. या उक्तीनुसार दैनंदिन व्यवहारात समाज हा शब्द धर्म, जात, वंश, वर्ग, लिंग आदी भेदातील स्त्री - पुरूषांचा जनसमुदाय या अर्थाने वापरला जातो. अर्थात तो अगदी सैलपणे, ढोबळ व प्रसंगानुरूप बदलणार्या संकुचित व मर्यादित अर्थाने वापरला जातो. उदा.-"भारतीय समाज" "आर्य समाज", "हिंदू समाज" "कुणबी
समाज" इत्यादी. प्रत्येक ठिकाणी समाज या शब्दापूर्वी उपसर्ग लावलेल्या विशेषनानुसार या शब्दाचा अर्थ अभिप्रेत असतो. तो
समान नसतो. देशवाचक, समुह वाचक, धर्मवाचक वगैरे भिन्न अर्थाने हा शब्द व्यावहारिक भाषेत वापरला जातो, पण या सर्वांहून निराळा असा समाजशास्त्रीय अर्थ या संकल्पनेमागे आहे. त्या दृष्टीने समाज हा एक सहनशील, सातत्यशील व सहकारी सामाजिक समुह असुन, त्यातील सभासदांनी एकमेंकांतील आंतर-क्रियेव्दारे आप्तसंबंधविषयक संघटीत आकृतीबंध विकसित केला आहे. समाज म्हणजे परस्परांशी आंतरक्रिया करणार्या व्यक्ती आणि समचहांची मिळून बनलेली एक व्यापक संघटना - व्यवस्था होय. सामाजिक आंतरक्रियेमुळेच व्यक्ती आणि समुहात निश्चित स्वरूपाचे सामाजिक संबंध निर्माण झालेले असतात.
सौ. शितल श्रीकांत ठवकर
[6/27, 3:59 PM] +91 90229 51504: नमस्कार
"समाजावर बोलू काहीतरी"
आज आपण समाजावर बोलू कारण आजकाल आपला समाज खुप मागे पडला आहे. tv, mobile, laptop या कारणांनी, आजच्या पिढीला समाजाविषयी काहीपण समजत नाही. त्यामुळे त्यानापण समानविषयी माहिती पाहिजे. समाजाचे ब्रीद वाक्य आपल्या सर्वांना माहीत आहे"समाजसेव हिच ईश्वरसेव"मानून समाजातील प्रत्येक लोकांनी ब्रीदवाक्य चा बोध घेऊन समाजातील प्रत्येक लोकांना मदतीचा हात व पुढाकार दयावा. तरूण पिढीला व लहान मुलांना आतापासून त्याना समाजविषयी माहिती दयावि.आपल्या समाजाचे थोर संत जगतगुरु श्री तुकाराम महाराजांनी स्पष्ठ केलेला नुसार"जे का रंजले-गांजले,त्यासी म्हणे जो आपुले,तोचि साधू ओळखावा,देव तेथेची जाणावा"हे ब्रीद वाक्य लक्षात घेऊन समाजातील लोकांनि आपले वर्तन ठेवावे व सर्व समाज बांधवाणी समान मानावे. समाजाविषयी बोलायला खूप काही आहे पण वेढेच भान ठेवून एवढयावरच संपवते......
धन्यवाद!
सौ श्वेता स.कानतोडे
अमरावती
■■■■■■■■■■■■■■■■■■■■■■■■■■■
समाजावर बोलू काही..
माणूस हा नक्कीच समाजशील प्राणी आहे.तो समूहात म्हणजे समाजाशी जोडून राहतो. आपल्या सोबत समाजाच्या प्रगतीसाठी प्रयत्नशील असणे गरजेचे आहे. आर्थिक, सामाजिक आणि सांस्कृतिक प्रगती करणे आवश्यक आहे.
आर्थिक दृष्टया गरीब कुटुंबाला मदत, गरीब मुलामुलींना शिक्षणात मदत समाजातून केली पाहिजे. परिचय मेळावे, सामूहिक लग्न, संक्रांतीचा कार्यक्रम, गुणवंत विद्यर्थ्यांचा गौरव, वृक्ष लागवड,कोजागिरी असे अनेक कार्यक्रम बावणे कुणबी समाज राबवत असतो. या निमित्ताने सगळे एकत्र येतात.
बदल हा निसर्गाचा नियमच आहे आणि मनुष्याने काळानुसार बदल स्वीकारले आहे. नवीन पिढीला समाज कार्यात रस निर्माण व्हावा व तेही समाज कार्यात जोडले जावे असे प्रयत्न होणे गरजेचे आहे. समाजाकरिता खारीचा वाटा प्रत्येक जण उचलु शकतो. आपल्या बावणे कुणबी समाजाची प्रगती होत राहो हीच सदिच्छा.
सौ. रूपाली अमोल बोंद्रे
■■■■■■■■■■■■■■■■■■■■■■■■■■■
समाजावर बोलु काही...
समाज हा कसा निर्माण झाला.?जात म्हण जे काय? असे अनेक प्रश्न आपल्या पुढे निर्माण होतात.या सगळ्या विषयांचा विचार करण्या पेक्षा आपला कुणबी समाजावर या छोट्या लेखातून काही माहीती आपल्या पर्यत पोहविण्याचा प्रयास करते.
भारतात समाज व्यवर-था अस्तित्वात येण्या पूर्वी मानवी समुह होते .ते टोळयांचया रुपात होते पण त्यांना कुळ होते.या मुळ कुळ शब्दापासून कुडबी,कुडुबी,कणबी, कुळंबीज,कुळबी,कुलबी,कुंबी,कणबी,कुणबा असे शब्द
तयार झाले.कणबी शब्दाचा अर्थ कण म्हण जे मातीव बी म्हण जे बियाणे.महणजेच मातीत बी पेरून अन्न धान्याची
निर्मिती करणारा समुह म्हण जे कुणबी असा कुणबी शब्दाचा अर्थ लावला जातो.नागपुर जिल्हातील नरखेड,काटोल,कळमेशवर,पारशिवनी,रामटेक,कामठी,
मौदा,कुही,उमरेड इत्यादी भागात कुणबी समाजाचे लोक
मोठ्या संख्येने दिसून येतात.
कुणबी ही एक जात आहे. या जमातीत साडेबारा
उपजमाती असलेल्या दिसुन येतात.आपण फक्त आपलयाच जातीचा विचार करतो .वरवर पाहता 1-2पोट
जातीची नावे आप लयाला माहीत असतिल.पण आज आपण इतर पोटजातीची नावे माहित करून घेवु.साडेबारा
जातींपैकी बारा उपजाती ची नावे मला मिळाली पण अर्धी पोटजात कोणती हे अद्याप कळले नाही .कदाचित हे चुकीचे ही असु शकेल.माहिती असल्या स सुधारणा करावी.ही विनंती. चला तर कुणबयाचया बारा पोटजातीविषयी जाणुन घेवु.
1 तिरोले
2 बावणे
3. धनोजे
4. जाधव
5. खैरे
6 दखने
7 लेवे
8 झाडे
9कडवे
10 पातीदार
11 अंजन
12 मितये
या पोटजातीविषयी माहीती पुस्तकांमधये
दिसुन येते.या पोटजातीची नावे वेगवेगळी असु शकतात
माहीती असल्या स जरुर द्यावी.या लेखातून येवढेच आपल्या पुढे ठेवते.🙏🙏🙏🙏
सौ .जयश्री रेहपाडे
नागपुर.
■■■■■■■■■■■■■■■■■■■■■■■■■■■
बिग.के.सा.सं.परिषद
उपक्रम..
""समाजावर बोलुन काही...""
कुठल्याही समाज तुमच्या आमच्यामुळेच निर्मित होतो.त्याचे अस्तित्व सांभाळण्याची जबाबदारी सर्वांचीच आहे.कारण जन्मलो समाजात तर मरणेही समाजातच आहे.जन्मता लागलेले समाज ऋण प्रत्येकाने फेडायचे असते.ते माझे काम नाही असे न समजता आपला खारीचा वाटा उचलायचा आहे.
मुळात बावणे कुणबी समाज खेड्यात विखुरला होता.जुन्या चालीरिती,ऐश आराम,चैनीत लोळणे या समाजाच्या सवयी होत्या.त्याकाळातील धनिकव कर्ते लोकांनी लक्ष दिले नाही ते स्वार्थिच राहिले.
अंदाजे स्वातंत्र्यानंतर समाजातील लोक शहराकडे वळले व शिक्षणघेऊन छोटीमोठी कामे व नोकर्या करायला लागले.यानंतरच समाजास खर्या अर्थाने दिशा मिळायला लागली.नंतक्षची दुसरी पिढी अंदाजे १९८०काळातील त्यांना समाजाबाबत इतर समाजाचे तुलणेत विचार करून आपण कुठे आहोत याची जाणीव झाली."म्हणतात ना जोपर्यंत भावनेला चटके बसत नाही तोपर्यंत विकास नाही.तेव्हा समाजात समाज संघटनेबाबत चर्चा सुरू झाली.आदरणीय कै. श्रीराम दादा टिचकुले साहेब व सहकारी मंडळी यांनी मुंबई सारख्या शहरात समाजातील शिक्षीत होतकरू बांधवांना एकत्र बसवून मंडळ स्थापन केले.यांच्या चांगल्या कामाचे लोणं अख्या समाजाला कळायला लागले.
आता तर गावखेड्यापर्यंत संघटन निर्माण झालेत.जागरूकता आली.हक्काची,ध्येयाची, जवाबदारी ची जाणिव झाली.अंधश्रध्दा हळूहळू कमी होत गेली.हे चित्र फार सुखावह आहे.समाजाला एकत्र आणण्यास सर्वानी आपला तन ,मन ,धनाचा वाटा उचलला आहे.हि अभिमानास्पद बाब आहे.
आज आपल्या समाजाने बर्यापैकी शैक्षणिक सामाजिक व्यवसायीक प्रगती केली आहे.मी त्या सुरूवातीच्या मंडळींना शतश: प्रणामं करतो.की त्यांनी आम्हाला आज इथपर्यंत पोहचविलं.
थोडक्यात आज आपण या बि.के.सा.सं.परिषदेच्या माध्यमातुन कविता व साहित्य लेखनाचे कार्य करतो व कौतुक सुध्दा करतो.हे संघटन जागृतीचे बळ आहे.असा सामुहिक रित्या लिहण्याचा उपक्रम फक्त आणि फक्त आपण च समाज स्तरावर राबवित आहोत.असा उपक्रम कुठलाही समाज आपल्या पातळीवर राबवतांना मला तरी
नागपूर शहरात दिसत नाही.ही आपल्यासाठी एक स्पृहनिय बाब आहे.यातुन व्यक्ती विचार प्रकट व प्रगत होतात.विचाराला व शब्दाला धार व गती येते.मी सौ. मंगलाताई चे अभिनंदन करतो की त्या दररोज नवीन विषय देऊन आम्हाला दिसते करतात.आमच्या बुध्दीला बुध्दी चा प्याला पाजतात. खुप छान समाधान वाटते.यात इतरांनीही जुळुन आपली प्रज्ञा कामाला लावावी व हा ज्ञानाचा दिवा समाज संवर्धनासाठी पुढं सतत तेवत राहायला हवा! असा शुध्द निर्धार करूया.
धन्यवाद!
. दशरथ अतकरी
. नागपूर
दि.२७जुन २०२०
■■■■■■■■■■■■■■■■■■■■■■■■■■■
♦️समाजावर बोलू काही....!*
*-देवराव मते, मुंबई*
समाज हा शब्द आपण जेव्हा उच्चारतो तेव्हा अनेक बाबी डोळ्यासमोर येतात. मानव समाज, समाजवादी, कुणबी समाज, मारवाडी समाज, गुजराथी समाज, एक ना अनेक विश्व, प्रांत, राजकारण, जात ह्या बाबीशी समाज हा शब्द सहजपणे जोडला जातो.
समाज म्हणजे नेमके काय? ह्यावर अनेकांनी व अनेक विचारवंतांनी लिखाण केले आहे. जातपात, धर्म, राजकारण, समाजकारण यांच्या परिघातून चिरफाड करून प्रतिगामी,पुरोगामी ह्या सारखे तुलनात्मक गट तट तयार करून हा शब्द अजून बोजड बनविला आहे.
परंतु "समाजावर बोलू काही ...." हा विषय संयोजकांनी दिला आहे तो बावणे कुणबी ह्या समाजाच्या ग्रुपवर त्यामुळे या ठिकाणी बावणे कुणबी समाज ह्या विषयांवर बोलणे सयुक्तिक राहील.
मनुष्य हा समाजशील प्राणी आहे. तो समूहाने राहणे पसंत करतो ह्या करिता की दैनंदिन गरजा भागविण्या करीता समूह हा एक सहज सुलभ पर्याय उपलब्ध असतो व ह्या अनुषंगाने पूर्वजांनी तशी रचना पण करून ठेवली आहे.
बावणे कुणबी समाज हा नाते संबंधातून विस्तारीत झालेला व विखुरलेला समाज संघटित करतांना ज्या ज्या महानुभावानी आपला वेळ ह्या कामी दिला आहे. त्यांनी अभ्यासातुन केलेली टिप्पणी शब्दबद्ध होणे गरजेचे असून योग्यवेळी समाज उत्थापन कार्यात त्याचा वापर करावा.जेणे करून सामाजिक चौकट ही अबाधित राहील.
समाज👉समाज कार्यकर्ता👉 समाज कार्य👉समाज संघटन 👉समाज घटकांची प्रगती..... ह्या बाबीची स्वतंत्रपणे जर मीमांसा केली तर आज आपण कोठे आहो? हे संगण्याकरिता कोणत्याही विचारवंतांची गरज नाही.
बावणे कुणबी समाज हा दानशूर, शोषिक, कष्टाळू व पापभिरू, सहिष्णु लोकांचा समूह आहे. परंतु राजकारणी विचारधारेच्या चष्म्यातून किंवा गरीब-श्रीमंत भेदांच्या मानसिकतेच्या जोखडात त्याला बांधून ठेवले आहे. कोठे कोठे समाज व्यासपीठावर आमचे नेते असा शब्द वापरला जातो. ज्या समाजाने मोठे केले. ज्यांची सर्व कुंडली माहित आहे. समाज कार्यात त्यांचे योगदान हे सर्व समाज घटक जाणतो त्यांना नेत्यांचा नाही तर समाज सुधारक याचा साधा दर्जा दिला तर पुढील सर्व बाबी सुलभ होतील. कारण समाज सुधारक म्हटले की स्वतःवर बंधने लादले जातील. व समाज कार्यात सामाजिक सुचितेची गरज असते ती आपोआपच साधली जाईल.
बावणे कुणबी समाजातील कार्याची काळानुसार वर्गवारी केली तर तीन कालखंड पडतात, १)१९५९ अगोदरचा २) १९५९ नंतरचा ३) १९८० दशकानंतरचा आतापर्यंत ...
विविध ठिकाणी विखुरलेल्या समाजाची बांधणी करण्याचे कार्य सुरू झाले असेल तर ते १९८० नंतर ह्यापुर्वीच्या मंडळींनी समाजाची अस्मिता जागृत ठेवण्याचे काम इमानेइतबारे केले आहे. म्हणूनच आज समाजप्रेमाची ज्योत समाज घटकांच्या हृदयात जागृत असतांना दिसते. याचे जिवंत उदाहरण म्हणजे समाज संघटने कडून आयोजिक केलेल्या कार्यक्रमास हजारोच्या संख्येने मिळत असलेली उपस्थिती.
समाजाची प्रगती मोजायची असेल तर समाजात शिक्षण, शेतकी, साहित्य,उदयोग, सांस्क्रुतीक, वैद्यकीय, अधिकारी, राजकीय या क्षेत्राचा विचार करणे गरजेचे असून ह्या क्षेत्रात कार्यरत असलेल्या व्यक्तीचे आपण किती प्रमाणात योगदान घेत आहोत व त्यांच्या ज्ञानाचा उपयोग किती प्रमाणात होत आहे याचा पण विचार होणे गरजेचे आहे.
सदर विषयावर बरेच काही लिहिण्या सारखे आहे...परंतु विस्तार भयास्तव याठिकाणीच थांबतो.
*BK महिला सखी मंच म.रा.* च्या संयोजकांनी ह्या विषयावर लिहिण्याची संधी दिली त्याबद्दल धन्यवाद!
■■■■■■■■■■■■■■■■■■■■■■■■■■■
No comments:
Post a Comment