शंख प्रक्षालन
शरीर आणि मन शुद्ध करण्याच्या सहा शुद्धिक्रिया आपण पाहिल्याच आहेत.
आजच्या या धावपळीच्या जीवनात सर्वसाधारणपणे पाहिल्यास बस्तीविधी करणे जरा कठीणच असते. वेळेच्या अभावी ते अशक्य आहे.. बहुतेक व्यक्ति तसे करणे गौण समजतात आपल्याला सहज स्वास्थ्य लाभ होण्यासाठी बस्ती करण्याची जरुरी नाही. तसे केले पाहिजे असे बंधनही नाही आणि सर्वसाधारण व्यक्ती पोटाची नौलीकर्म करण्याचा अभ्यास साधू शकत नाही. त्याऐवजी आपल्या पूर्वजांनी सांगितलेली ‘शंखप्रक्षाल’ नाची क्रिया करू शकतो. ही क्रिया पाणी पिऊन करायची असते. कारण पाणी हेच जीवन आहे. तसेच पाणी हेच औषध आहे.
‘शरीरे जर्जरीभूते- व्याधीग्रस्ते कलेवरे |
औषधं जानव्ही तोयं | वैद्यो नारायणो हरि ||
अर्थ:- व्याधीग्रस्तास पाणी म्हणजे औषधच आहे.
आपण जे अन्न खातो त्याचे शरीरात पाचन होण्यासाठी- तोंडापासून प्रत्यक्ष मळ बाहेर येईस्तो एकूण १४ अंगाचा उपयोग होतो. म्हणजे तोंडात दातांनी चर्वण केल्यानंतर त्यात लाळ मिसळून चोथा पुढे पुढे जठरामध्ये जातो नंतर त्यावर HCL आम्लाची प्रक्रिया होते. पुढे लहान व मोठ्या आतड्यांमध्ये त्यावर क्रिया होऊन, सप्त रस बाहेर पडतात आणि अनावश्यक वस्तू मळा द्वारे बाहेर पडत असते. अशी संपूर्ण सहज क्रिया झाल्यास मनुष्य निरोगी असतो. मात्र ही क्रिया अपूर्ण ह शरीराचा कोठा साफ न झाल्यास आपल्याला बद्धकोष्टता च्या आजारामुळे ९०% आजार उद्भवतात. याकरिता आपण विविध द्रव किंवा घन औषधाचा प्रयोग करतो. त्यातही यश प्राप्त होत नाही. यास पर्याय म्हणून शरीरातील मुख्य अंग- जठर, लहान आतडे व मोठे आतडे यास आसनाच्या द्वारे कार्यक्षम केल्यास सहज सुटका होऊ शकते. त्याकरिता योगशास्त्रात सांगितलेला खात्रीलायक सहज व सोपा उपाय म्हणजे शंखप्रक्षालन होय.
याचे लघु शंखप्रक्षालन व महा असे दोन प्रकार आहेत. लघुशंख प्रक्षालनात आसनांची तयारी केली जाते. व महा शंखप्रक्षालनात पाणी पिऊन असनांचा प्रयोग केला जातो.
शंखात पाणी टाकल्यानंतर ज्याप्रमाणे पाणी चक्राकार फिरून ते वेगाने बाहेर पडते, त्याप्रमाणे तोंडाने पाणी प्यायल्यानंतर ते पाणी थोड्या वेळा नंतर पोटातील मळासकट, आतड्यांना स्वच्छ करीत गुदद्वार बाहेर फेकले जाते. म्हणून या क्रियेला शंख प्रक्षालन असे म्हणतात.
लाभ:- या क्रियेने अनेक रोग दूर होऊन स्वास्थ्य सुधारण्यास आश्चर्यकारक प्रगती होते. बद्धकोष्टता, अग्नीमाद्यंता, पोटाचे सर्व विकार, मुळव्याध, मधुमेह, कफदोष आदी विकार घालविले जाऊन देह निर्मळ होतो.
नुसती वरील आसने केल्यास मधुमेह, स्लिप-डिस्क, मनाचे विकार यावरही चांगला परिणाम होतो. ‘नाड्या मलरहीत झाल्यानेच पुढे प्राण संग्रह होतो. वायू इच्छेनुसार खेळविता येतो.
क्रियेची विधी:-
महा शंख-प्रक्षालन म्हणजेच पाणी पिऊन करण्याची क्रिया होय. त्या आधी आपणास लघु शंख-प्रक्षालनाची ४ आसनांची सवय करावी लागते. ८-१० दिवसात या आसनांची चांगली सवय होऊन, ती ४ आसने क्रमश: सर्पासन, उर्ध्वहस्त कटीवक्रासन, समान हस्त कटिचक्रासन व कागासन आहेत.
सर्पासन:-
दोन्ही हाताचे तळवे जमिनीवर संपूर्ण टेकून दोन्ही हातात २ फुटाचे अंतर ठेवून दोन्ही पाय एकमेकास जोडून कमरेपासून वरचा भाग सर्प फणा वर करून उभा राहतो त्याप्रमाणे दोन्ही हातास ताकद लावून भुजंगासनात येणे व वरील प्रमाणे ३-३ वेळा डावीकडे व उजवीकडे मान वळवून मागील पायांच्या टाचा पाहणे. हे करतांना गुडघे जमिनीला टेकल्यास हरकत नाही.
उर्ध्वहस्त कटीचक्रासन:-
दोन्ही पायात २ फुटाचे अंतर ठेवून उभे रहा. दोन्ही हाताच्या दंडाचा कानाला स्पर्श होईल अशा दिशेने सरळ उभे करा. हाताची बोटे एकमेकात गुंतवून हाताचे तळवे उलटे आकाशाकडे करा. कमरेपासून वरचा भाग डावीकडे व उजवीकडे ३-३ वेळा वाकवा. दृष्टी मात्र समोर ठेवा.
समानहस्त कटिचक्रासन:-
वरचे आसनाची हाताची मिठी सोडून दोन्ही हात आपल्या खांद्याशी समांतर आणा. दोन्ही हाताची बोटे (पंजा) ताठ असावी. त्याच स्थितीत दोन्ही पायाच्या ताकतीवर जितका डावी-उजवीकडे कमरेला वळसा देता येईल. (चक्राप्रमाणे फिरवता येईल) तितका ३-३ वेळा फिरवावा. दृष्टी आपण ज्या बाजूला वळतो त्या बाजूच्या पंजा कडे असावी.
कागासन:-
या असण्यासाठी खाली बसा. (जसे आपण पाणी पिताना बसतो) प्रथम डाव्या पायाचा गुडघा व पंजा जमिनीला टेकून गुडघा सरळ येईल असा ठेवावा. दोन्ही हात दोन्ही गुडघ्यावर ठेवून जो गुडगा वर आहे त्या बाजूने तीन वेळा दोन्ही हाताची ताकत लावून कावळ्या प्रमाणे मागे वळून पहावे. जसे आपण झोपून उठताना अंग पडतो त्याप्रमाणे उजव्या पायावरची क्रिया तीन वेळा करावी.
(सूचना:- प्रत्येक वेळी क्रिया करताना श्वास घेउन क्रियेस सुरुवात करावी व क्रिया पूर्ण झाल्यावर म्हणजेच पूर्वस्थिती आल्यावर श्वास सावकाश सोडावा. चारही आसने डावी-उजवी कडे करावे, जेणेकरून जठर आणि इतर अवयवांना विळखा बसेल.
महाशंख प्रक्षालन:-
लघु शंखप्रशालना मधील आसनांची ८-१० दिवस सवय केल्यानंतर, ज्या दिवशी आपणास महा शंखप्रक्षालन करावयाचे आहे. त्याचे आधले दिवशी रात्री साधे भोजन करावे. दुसऱ्या दिवशी सकाळी मुगांच्या डाळीची खिचडी तयार करावी. कारण ही क्रिया केल्यानंतर खूप सपाटून भूक लागते. एक तासाने गरम गरम खिचडी करावी व त्यात २०-२५ ग्रॅम चांगले साजुक तुप घालून भोजन करावे. जेवणात त्याशिवाय दुसरा कोणताही पदार्थ चालणार नाही. भोजन करतांना पाणी घ्यावयाचे नाही. एक तासानंतर पाणी प्यावे. भोजन झाल्यानंतर तोंड स्वच्छ करण्यासाठी चूळ वगैरे भरून १-२ घोट पाणी घेण्यास हरकत नाही. खिचडी खाल्ल्यानंतर ४ तासांनी नरम अशी गोड फळे खाण्यास हरकत नाही. तसे करणे चांगले आहे. ज्या दिवशी ही क्रिया करण्यास येते त्यावेळेस २४ तास पर्यंत दही-दुधाचे प्रकार किंवा दही-दूध घेता कामा नये. वरील क्रिया आवश्यकतेप्रमाणे वर्षातून-एकदा, सहा महिन्यातून-एकदा, ३ महिन्यातून-एकदा आपणास आवश्यकता वाटत असेल तर प्रत्येक महिन्यात एकदा सुध्दा करू शकता. मात्र रोज ४ आसणांची सवय ठेवावी.
महा शंखप्रक्षांलनाची कृती:-
प्रथम १ ग्लास पाणी प्यायल्यावर वरील ४ प्रकारची आसने आपण ३-३ वेळा केल्यानंतर चौथे आसन म्हणजे कागासन झाल्याबरोबर कदाचित कोणास ताबडतोब शौचास जावे लागेल. जर कोणास असा अनुभव आला नाही तर प १ ग्लास पाणी पिऊन पुन्हा ४ आसने परत करावीत यावेळी नक्कीच आपल्याला सौचाची घाई होणार, शौचाला बसताना पोटाला कागासणा प्रमाणे पीळ दिल्यास पोटाचे २-३ वेळा आत ओढणे (आकुंचन-प्रसरण) ढिले सोडणे केल्यास जास्त साहाय्यक ठरते. पहिली शौचास घट्ट होईल व नंतर पातळ होईल. सौच्याहून जाऊन आल्यानंतर परत दुसऱ्या वेळेसही २ ग्लास पाणी पिऊन परत ४ आसने पूर्वीप्रमाणे करावीत. पुन्हा शौचाला पातळ, पिवळसर अशी होईल आणि शेवटी जमल्यास तिसऱ्यांदा परत २ ग्लास पाणी पिऊन चारही आसने केल्यास या वेळी मात्र पोट साफ झाल्याचा आनंद होईल.
वरील क्रिया केल्या नंतर मीठ न घातलेले गरम पाणी २-३ ग्लास पिऊन लगेच जलधौती करून परत पिणी काढून टाकावे. नंतर स्नान करावयाचे असल्यास थंड पाण्याने करू नये. गरम पाण्याने बंद जागी केल्यास हरकत नाही. न केल्यासही चालेल.
बद्धकोष्ट ते साठी काही उपयुक्त टिप्स:-
- आपल्या जीवनशैली मध्ये बदल करा. आपल्या खाण्याच्या सवयी बदला.
- प्रत्येक खाण्याची वस्तू भरपूर चाऊन खाव्यात. त्यात लाळेचे मिश्रण होईल.
- झोप पूर्ण घ्या
- शरीरातील पाणी कमी झाल्यास म्हणजे डीहायड्रेशन (Dehydration) झाल्यास रोग होतो. म्हणून पाण्याचं योग्य ते प्रमाण राखा. पाण्याचे संतुलन ठेवा.
- उन्हातून आल्यावर, मेहनत केल्यानंतर व एसीमध्ये राहिल्यामुळे पाण्याची नेहमी कमतरता भासते. तसेच जेव्हा आपण आपली लघवी पिवळी होते. तेव्हा पाण्याची आवश्यकता आहे. असे समजू एक ते दीड ग्लास पाणी घ्या.
- शरीरास कोमट किंवा गरम पाणी २४ तास उपयोग घ्या. पित्त प्रवृत्तीच्या व्यक्तींना गरम पाण्याचा (अधिक वेळा घेतल्यास) त्रास होऊ शकतो.
- रोज व्यायाम व २०-३० मिनिटे, आठवड्याचे कमीत कमी ५ तास अवश्य घ्यावा.
- मोकळ्या हवेत फिरणे हा सुद्धा व्यायामाचा प्रकार आहे.
- अंकुरित अन्न (एकदल द्विदल), सलाद, भाजीपाला, भाज्यांचा फळांचा रस. सालासह फळे खाणे
- रेषा किंवा फायबर मुळे पोट लवकर भरते मात्र पोटातील मळ साफ करण्यासाठी ते अतिशय उत्तम माध्यम आहे.
- फळांमध्ये रेषा (Fibers) फळाची साल, गर व फळांच्या बियांचे सेवन आवश्यक असते.
- बद्धकोष्टता साठी सगळ्यात उत्तम पेरू, डाळिंब, सफरचंद केळी, बेल ,लिंबू, संत्रा
- निरोगी राहण्यासाठी (Handfull Nuts) म्हणजे आपल्या मुठी मध्ये जितके सुकामेवा बसतील त्याचा उपयोग करणे. भिजवून केल्ल्यास त्याचा गुणात्मक फायदा होतो
- द्राक्ष, (वाळलेली द्राक्षे म्हणजे किसमिस ल मनुका) काळा मनुका हा अधिक प्रभावी आहे. अंजीर, बदाम.
- जवस (Flex Seed) ओवा, सोप, शेंडे मीठ, गाईचे तूप
हे पदार्थ घेऊ नयेत
- तणाव (Stress) काळजी, चिंता
- जंक फूड, स्ट्रीट फूड, फास्ट फूड, बंद डब्यातले पदार्थ, मॉल चे पदार्थ, दूध आणि दुधाचे पदार्थ, मिठाई, साखर मैद्याचे पदार्थ, बिस्कीट, केक, नशेचे पदार्थ, बिडी-सिगरेट व गुटका
No comments:
Post a Comment