Saturday, May 30, 2020

■ कै. दादासाहेब टिचकुले ऑनलाईन योग वर्ग ◆२८ मे ते १६ जून २०२० पर्यंत योग शिबिरातील माहिती

          कै. दादासाहेब टिचकुले
      ऑनलाईन योग शिबिर

🙏🏽 *बावणे कुणबी सामाजिक संस्था पुणे चे वतीने व समाज भारती मुंबई  च्या सहकार्याने ऑनलाइन योगा शिबीराचे आयोजन दि.२८ मे पासून सकाळी ७.०० ते ७.४० पर्यंत विनामूल्य केले आहे. योगाचार्य मान.श्री. रामकृष्णजी ठवकर साहेब हे अतीशय सुंदर माहिती व प्रात्यक्षिक करून सांगताहेत हे सर्व आपल्या आरोग्याशी निगडित असून याचा लाभ सर्व समाज बंधू-भगीनींनी घेण्यास हरकत नाही शेवटी वेळ आपला , आरोग्य आपले, निर्णय आपला....... मला जे मिळतं ते माझ्या बांधवांना मिळावं हिच अपेक्षा.* 
*आँनलाईन लिंक वर क्लिक करा सकाळी ७.०० वा. व सुंदर लाभ घ्या व इतरांनाही सांगा. * आपलं स्वागत आहे.*
       *धन्यवाद!* 

आपलेच,
  🙏🏽 श्री. लक्ष्मणराव शेलोकर, कार्याध्यक्ष, बावणे कुणबी सामाजिक संस्था पुणे.
  🙏🏽  देवराव मते संपादक, समाज भारती, मुंबई


*लिंक*👇🏻                                                    

Topic: Yoga Session 
Time: 7:00 am to 7:40 am Everyday 

Join Zoom Meeting 
https://us04web.zoom.us/j/72095404495?pwd=VTZnelFqa09uSTJTbUN0Mkd5ZC9GZz09 

Meeting ID: 720 9540 4495 
Password: 9Vhien

‼️योगाचार्य रामकृष्ण ठावकर यांचे ऑनलाईन योगशिबिर दररोज सकाळी 7 ते 7.40 ह्या दरम्यान सुरू असते. वरील लिंक द्वारे आपण शिबिराचा लाभ घेवू शकता‼️

■■■■■■■■■■■■■■■■■■■■■■■■■■■■

शिबिरात योगाचार्य रामकृष्ण ठावकर यांनी प्रस्तुत केलेली विविध योग विषयावरील माहिती....

मानसिक आजार


                               -योगाचार्य रामकृष्ण ठावकर

      1. सत्यकथा क्र १:-
1952 मध्ये अमेरिकेमधील अंतिम म्हणजेच चौथ्या स्टेजचा ४५ वर्षीय  Mr Right,  त्यांच्या आयुष्याचे २ आठवडे शिल्लक असणारा कर्करोगी. त्या दरम्यान एका वर्तमानपत्रांमध्ये “Crabizon इंजेक्शन घ्या व 100% कर्करोगातून मुक्त व्हा” अशी जाहिरात त्यांनी वाचली. व ती घेऊन  तो आपल्या फॅमिली फिजिशियन Dr West कडे जाऊन म्हणाला, डॉ मला हे इंजेक्शन देऊन मला कॅन्सर मधून मुक्त करा. डॉक्टरांना पूर्ण माहिती होते हे इंजेक्शन त्याच्यासाठी योग्य नाही. डॉक्टर म्हणाले हे औषध कॅन्सरच्या दुसऱ्या स्टेजमध्ये आणि तरुण व्यक्तीला दिल्या जाते. राईट म्हणाला ‘काही नाही माझं मन म्हणते इंजेक्शन दिल्यानंतर मी संपूर्णपणे बरा होईल.’ डॉक्टरांनी त्याचे समाधानासाठी ते इंजेक्शन त्याला दिलं. तो दिवस शुक्रवार होता. सोमवारी राईट डॉक्टरांसमोर शर्ट काढून उभा झाला. कारण त्याच्या सगळ्या संपूर्ण अंगावर संत्रा आणि मोसंबी सारखे मोठे मोठे गोळे लोंबकळत होते. संपूर्णपणे ते नाहीशे झाले होते. तो खुशीत होता डॉक्टरांनी रक्त तपासणी केली नंतर त्याचा रिपोर्ट कॅन्सर रहित होता‌. दोघांना आनंद झाला‌.
काही महिन्यानंतर पुन्हा जाहिरात त्याने वाचली आणि सदर इंजेक्शन  कॅन्सर साठी प्रभावहीन आहे. ते अजिबात उपयुक्त नाही असे वाटल्यामुळे त्यांचे मन निराश झाले. आणि संध्याकाळ पर्यंत त्याच्या शरीरावर तसेच गोळे निर्माण झालेत. अतिशय घाबरून ती जाहिरात घेऊन डॉक्टरांकडे गेला आणि डॉक्टरांनी त्याची संपूर्ण परीक्षण केले परीक्षांना अंतर्गत  त्याला चौथ्या स्टेजचा कॅन्सर आढळून आला‌. डॉक्टर याची कल्पना होती ह्या इंजेक्शनमुळे तो ठिक झालाच नव्हता, त्याच्या बलवान मनाच्या अवस्थेमुळे तो ठीक झाला होता. म्हणून त्याला निराश न करता, त्याला सांगितले माझ्याकडे मुळ बॅच मधीलं एक  तसेच एक इंजेक्शन आहे‌ मी तुला ते देतो आणि तू निश्चित ठीक हो्शिल.  त्याच्या मनाची अवस्था एकदम सकारात्मक झाली डॉक्टरांकडे कोणतेही इंजेक्शन नव्हते फक्त त्या इंजेक्शन मध्ये डिस्टिल्ड वॉटर भरून त्याला इंजेक्शन दिले.  दोन दिवसानंतर त्याचे पूर्ण परीक्षण केल्यानंतर त्यास कॅन्सरचे कोणतेही लक्षण नव्हते. तो पुन्हा कॅन्सर मुक्त झाला होता.  
१९५४ मध्ये म्हणजे दोन वर्षानंतर पुन्हा त्यांने पेपर मध्ये जाहिरात वाचली आणि सदर इंजेक्शन नसून निव्वळ माती असून ते सर्वथा अनुपयुक्त असून आम्ही नेहमीसाठी बाजारातून बाहेर काढीत आहे. असे वाचले आणि त्याच्या मनाने इतकी हाय खाल्ली की, काही तासाच्या आंत त्याला पुर्ववत कॅन्सर चे गोळे निर्माण होऊन त्याचा मृत्यू झाला.
  1. सत्यकथा क्र २:-
Dr Victor Franel, मनोविकार तज्ञ,  यांनी “Man search for me” हे अनेक भाषांमध्ये भाषांतरित  झालेल्या पुस्तकाचे लेखक आहेत. 
लेखक, त्यांचा परिवार, नातेवाईक, मित्रांसह सर्वाना दुसऱ्या महायुद्धात राज्यकर्त्यांनी कैदेत ठेऊन त्यांचा सतत मानसिक व शारीरिक छळ व  यातना (Torture) देत असे. त्यामुळे  कैद्यांचा सतत मृत्यु होत असे. त्या ३ वर्षाच्या कालावधीत लेखका शिवाय कोणीही बाहेर येऊ शकला नाही. एक दिवस एका कैद्याला एक स्वप्न  पडले त्यात त्याला सांगण्यात आले ‘तुला काय मागायचे ते माग' तेव्हा मार्च चालू होता. त्याने स्वप्नात सांगितले आमची येथून सुटका कधी होईल ? स्वप्नात त्याला सांगण्यात आले ३० मार्चला . त्या दिवसा पासून तो रोज -एकेक दिवस मोजू लागला. जसजसा ३० मार्च येऊ लागला तो  त्याची वाट पाहु लागला. २९ मार्च पर्यंत सुटकेचे  कोणतेही चिन्ह न दिसल्यामुळे , २९ मार्चला तो अचानक आजारी पडला. तो पुर्णपणे २९ मार्च पर्यत स्वस्थ असुनही त्याचा  ३० मार्चला मृत्यू झाला. मनुष्य आशाहीन झाल्यावर त्याची रोग प्रतिकारशक्ती बलहीन होत जाते.  व्यक्तींचा धोका, त्रास, आवाहन, किंवा कोणत्याही अन्य कारणांमुळे मृत्यू होऊ शकत नाही. परंतु त्याच्या आशा मावळताच त्याचा मृत्यू होऊ शकतो. जर कोणाचे स्वप्न, आत्मविश्वास, ध्येय, महत्त्वाकांक्षा मोठे असेल तर त्याच्या समोर कितीही त्रास, कष्ट, अडचणी आल्या तरीही तो ते गाठू शकतो. लेखकाचे सर्व मित्र, परिवार एकेक करून मृत्यू पावलेत.  ह्या जगासाठी काहीतरी करावे असा लेखकाचा द्रुढ आत्मविश्वास होता म्हणून इतका त्रास सहन करून देखील ३ वर्षानंतर त्याची सुटका झाली. वरील पुस्तक लिहून, त्याच्या करोडो प्रती विकल्या गेल्यात.
 आपल्या समोरील कोणतेही संकट आल्यानंतर आपण त्याचा कसा विचार करतो. सकारात्मक वा नकारात्मक त्यावर सर्व काही अवलंबून असते.
लेखक म्हणतात ‘आपल्या कडून सर्व काही जाऊ शकते धन-दौलत, घर, मुल-बाळ, आई-वडील मात्र आपल्या विचारांच्या निर्णयाची शक्ती कधीही नष्ट होऊ शकत नाही
      3. सत्यकथा क्र ३:-
तिसरे उदाहरण माझ्या गुरूचे आहे. ते एका कंपनीमध्ये ऑपरेटरचे काम करीत होते. नुकतेच त्यांना दुसऱ्या विभागात पदोन्नती मिळाली. त्या विभागात हजर होण्यापूर्वी एक दिवस स्फोट झाला. कोणालाही इजा झाली नाही मात्र, कंपनीचे भरपूर आर्थिक नुकसान झाले होते.  ते हजर झाल्यावर तेथे काम करीत असतांना त्यांच्या उजव्या हाताला अचानक मुंग्या येऊ लागल्या.  त्यासाठी त्यांनी अनेक औषधे व उपचार घेतलेत परंतु काहीही लाभ झाला नाही. म्हणून ते रजा घेऊन घरी राहिलेत, त्या चिंतेमुळे ते आजारी पडलेत. तेव्हा त्यांनी स्वतः सगळ्या घटनाक्रमांचा अभ्यास केला. ते कां, कधी, कसे व कोणत्या परिस्थितीत त्याच्या हाताला मुंग्या येतात याचा शोध घेऊ लागले. तेव्हा त्यांना कळले की, ते जेव्हा कंन्ट्रोल इन्स्ट्रमेंटची छोटीशी एक इंच लांबीची लिव्हर. एक इंच  manual मधुन auto मध्ये सरकवण्याचे  काम करीत असतांनाच उजव्या हाताला मुंग्या येतात.  हे काम त्यांनी अनेक वेळा सहजतेने पार पाडले होते. परंतु  ज्या दिवसी हा प्रसंग घडला त्या दिवशी त्यांचा अंदाज चुकला व थोडीशी ही क्रिया सावकाश झाली. प्लॉट बंद होणारच होता इतक्यात त्यांच्या बाजूला  असलेल्या Forman ने त्यांना चटकन बाजूला ढकलले व इन्स्ट्रुमेंटची लिव्हर Mannual वरून Auto वर टाकली, व त्यांना  मोठ्या संकटातून वाचविले. मात्र  Forman च्या सवयी प्रमाणे, तो त्यांच्यावर खेकसला.’क्यारे इतनाभी नहीं आता क्या ?’  या घटनेचा त्यांनी इतका धसका घेतला होता की, ज्या ज्या वेळी हा लिव्हर बदलायचा असे तेव्हा तेव्हा ते कोणत्याना कोणत्या कारणाने ते काम टाळू लागत.
आता मात्र यावर त्यांना उत्तर सुचले होते. ते म्हणजे ह्यासाठी ‘त्यांच्या मनातील भीतीच कारणीभूत असावी.’ या भीतीवर मात करूनच प्रश्र्न सुटू शकतो. असे त्यांच्या मनाने ठरविले‌. कोणत्याही परीस्थितीत  हे काम पळ न काढता  पुर्ण करणारच, असा निश्चय केला की, जेव्हा कधी हे काम त्यांच्या समोर येईल. तेव्हा ते पळ काढणार नाहीत. कोणत्याही परिस्थितीत ते स्वतः काम पूर्ण करतीलच. त्यानंतर लवकरच संधी आली. त्यावेळी त्यांना स्वतःला सांभाळणे फार कठीण होते. मनाला पळ काढण्याची चटक लागली होती. त्यांनी स्वतःला अनेक प्रकारे  समजावत होते. संपूर्ण शरीर बर्फासारखे थंड-गार झाले होते. कोणत्याही क्षणी हार्ट अटॅक येईल असे वाटत होते. त्यांना एकदाच ते संपवायचे होते ‘करेंगे या मरेंगे' असे म्हणून त्यांनी त्याला स्पर्श केला. डोळे मिटून देवाचे नांव घेतले व ते काम पूर्ण केले. त्याच क्षणी त्यांच्या हाताच्या मुंग्या बंद झाल्या. ते जिंकले होते. संपूर्ण शरीरात उत्साह पसरत होता. मन त्या भिती पासून मुक्त झाले होते. आजाराकडे पाहण्याची नवी दृष्टी त्यांना मिळाली होती. 
मन आणि शरीर हे वेगळे असतात. कोणताही आजार शरीराच्या आधी मनाला जडतो व आपण मात्र शरीरावर उपचार करीत असतो. जसे- राग आल्यास शरीर क्रोधित होऊन लाल बुंद होते‌, कुटुंबातील व्यक्तीचे अचानक मृत्यूमुळे आघात होऊन तो शोकाकुल आणि उदास होतो. खाणेपिणे सर्व बंद होते. मन जेव्हा आनंदित, उत्साहित  होते, तेव्हा आपले शरीर नाचू-बागडू लागते. ह्या मनाच्या अवस्था शरीरावर सतत प्रकटत असतात.
  1. सत्यकथा क्र ४:-
 आचार्य रजनीश ओशो ह्यांनी १९७० मध्ये सांगितले आहे. भीती म्हणजे एक प्रकारे आत्मसंमोहन आहे. भीतीमध्ये रस घ्यायचे सोडून द्या वारंवार त्याच त्याच गोष्टी पाहिल्यामुळे शरीरात एक प्रकारचे रासायनिक बदल घडत असतात आणि कधीकधी ते इतके जहाल असते की आपला मृत्यु देखील होऊ शकतो. साप 1000 प्रकारचे असतात. त्यात ९-१० च विषारी असतात. परंतु  सर्वसामान्यांमध्ये इतकी भिती असते की बरेच लोक साप न चावताच त्याचे भितीने मृत्युमुखी पडतात. 
भीती पेक्षा कितीतरी चांगल्या गोष्टी आहेत. प्रार्थना,  ध्यान साधना करा. यामुळे एक भरीव वलय (Aura) तयार होते व नकारात्मक ऊर्जेला त्यात प्रवेश मिळत नाही. ब्लॅक होल च्या नावे मध्ये बसू नका. ज्ञान  व ध्यानाच्या नावेत बसून ह्या झंझावाता मधून स्वतःचा बचाव करा‌. आहारावर विशेष लक्ष द्या. स्वच्छ जल प्राशन करा. हिम्मत ठेवा घरी बसा. रोज २ पुस्तके वाचा. पुस्तक लिहा. योगासने प्राणायाम करा. आपले वाढलेले वजन कमी होऊ शकेल. मुलांसारखी चेह-यावर ताजगी येईल‌.
  1. सत्यकथा क्र ५:-
मोठी माणसे सांगायची ‘लवकर निजे लवकर उठे, त्यास आयु-आरोग्य लाभे'! 
   आणि ते खरे आहे. हेल एरॉल्ड नावाचे एक जग प्रसिध्द व्यक्तिमत्व आहे. एक प्रचंड यशस्वी व्यावसायिक होते. मोठ्या जिद्दीने त्यांनी एका अपघातामुळे आलेल्या शारीरिक विकलांगतेवर मात केली होती. 
पण २००८ च्या महामंदीत  त्यांचे प्रचंड नुकसान झाले. अब्जपती असलेला हेल कर्जबाजारी झाला. पण तो हार मानणारा नव्हता. 
यातून बाहेर कसे पडावे? हे विचारण्यासाठी तो आपल्या एका यशस्वी मित्राकडे गेला. मित्राने त्याला काय सल्ला दिला असेल 'बरं तू सकाळी लवकर उठ, बाकी सगळे आपोआप ठीक होईल' 
या चमत्कारिक सल्याने हेल निराश झाला‌. त्याला काहीतरी आगळे-वेगळे उपाय अपेक्षित होते. काही दिवस त्याने कसेबसे दिवस ढकलले. पण दिवसेंदिवस निराशा त्याला घेरत होती. मग नाईलाज म्हणून त्याने सकाळी ४ वाजता उठायला सुरुवात केली, 
-आणि हेल सांगतो त्याचे आयुष्यच बदलून गेलं.
-पहाटे आणि सूर्योदय इतकी जादुई असतात का?
-पहाटे सकाळी उठून काय करावे ह्या प्रश्नावर हेलेने एक कोडवर्ड (Code-word) पण सांगितला.
SAVERS
१) SILENCE—(ध्यान)  .                                
-शांत बसून स्वतःच्या आत डोकावणे म्हणजे ध्यान    
-स्वतःच्या आतल्या चेतनेला स्पर्श करणे म्हणजे ध्यान!. 
-मनाच्या संगणकाला Formet करून Virus काढून टाकणे म्हणजे ध्यान!                                   
-मन प्रफुल्लित आणि ताजेतवाने करण्यासाठी आवश्यक असते ते ध्यान!                                     
-माणसाच्या गरजा किती कमी आहेत आणि सगळ्या चिंता किती व्यर्थ आहेत‌ याची आत्म-प्रचिती म्हणजे ध्यान!        
‌-अफाट अद्भुत आणि आनंदायी विश्वशक्ती सोबत स्वतःला जोडून घेणे, आणि स्वतःच्या  मन: शरीराचा कणकण प्रफुल्लित करवुन घेण्याची कृती म्हणजे ध्यान!
२) AFFIRMATIONS:- (सकारात्मकता स्वयंसूचना)
-अफरर्मेशन म्हणजे स्व-संवाद!                        
-स्वतः स्वतःला सूचना देणे.                             
-प्रचंड शक्तिशाली असलेल्या अंतर्मनावर आपण निश्चित केलेले ध्येय कोरणं                                   
-येत्या पाच वर्षात, येत्या एक वर्षात, येत्या एक महिन्यात, पुढच्या आठवड्यात आणि आज दिवसभर….. मी काय करणार आहे याचं मनातल्या मनात पुन्हा पुन्हा उजळणी (Revision) करणे म्हणजे स्वयंसूचना!                
-स्वयं रचनेमुळे कल्पना खोल अंतर्मनात झिरपतात आणि नाटकी रीत्यास त्यातही उतरतात.    
-अंतर्मनाची शक्ती प्रचंड असल्यामुळे तिथे रुजलेला प्रत्येक विचार मग तो चांगला असो की वाईट खराच होतो.                
-आपले पूर्वज म्हणायचे शुभ बोल नाऱ्या! किंवा जिभेवर सरस्वती असते. आपण बोलू तसेच घडते. जिभेवरती देवता तथास्तु म्हणते. वगैरे वगैरे -या सगळ्या अंधश्रद्धा नव्हत्या, यामागे मनोविज्ञान आहे. 
-एखादी गोष्ट १००० वेळा बोलली तर ती, अंतर्मनात  प्रक्षेपित होते. मग अशुभ कशाला बोलायचे ?           -वाईट? ते बोलून विनाशाला आमंत्रण देण्यापेक्षा या सुखांनो या…
३) VISUALIZE:- (चांगल्या कल्पनांना मनात घोळवणे) तीव्र इच्छा पूर्ण झाली आहे. अशी मनातून कल्पना करणे, ती पूर्ण झाल्याचा आनंद व्यक्त करणे आणि मन पटलावर तिला बारीक-सारीक रूपात साकारणे म्हणजे Visualization होय.       
-कल्पना शक्तीचा योग्य वापर केल्यास साधारण माणसाच यशस्वी व्यक्ती मध्ये रूपांतर होते. 
-दररोज आपण आपली ध्येय पूर्ण झाली आहेत असे मनात घोळवल पाहिजे.         
-पोहण्याच्या स्पर्धेत सुवर्णपदकाची रास उभी करणारा मायकेल हेच म्हणतो. ज्या वेळी मला झोप येऊ लागते. तेव्हा मला जे नक्की करायचे आहे ते मला आपल्या मनातल्या मनात बघण्याचा मी प्रयत्न करतो.
-ऑलिंपिक विजेती अँँथेलिटिक्स लेन बीजले म्हणाली होती. ४ वर्षे मी एकच निकाल डोळ्यापुढे आणत होते‌. ते म्हणजे मी हातात विजेतेपद घेऊन उभी आहे, आणि माझ्यावर शॉपेनचा वर्षाव होत आहे.     
-मायकेस स्मिथ म्हणाला, मी मला हवे असलेल्या स्वप्नाचे रेखाचित्र कागदावर रेखाटतो. स्वप्नाबद्दल टिप्पण लिहितो आणि वेगवेगळ्या पद्धतीने त्याला डोळ्यासमोर उभे करतो.
-प्रसिद्ध उद्योगपती अझीज प्रेमजींना त्यांच्या यशाचे रहस्य विचारले, तर ते म्हणाले यश दोनदा मिळते. एकदा मनात आणि दुसऱ्यांदा वास्तव जगात.
4) EXERCICE :- (व्यायाम) शरीरातून आळसाला पळून लावण्यासाठी, शरीरातील ऊर्जा वाहती ठेवण्यासाठी, मनाने कणखर आणि आनंदी राहण्यासाठी आवश्यक असतो, तो व्यायाम!       
-शरीर आळसावल कि मन भ्रष्ट झालंच समजा.             
-व्यायाम, योगासने व प्राणायाम यांच्या माध्यमातून उर्जेला वळण न  दिल्यास ती अतिरिक्त मैधुनाकडे वळते आणि माणूस वासनांचा गुलाम बनतो.                    
-वाईट सवयीचा गुलाम झालेल्या माणसातले चैतन्य हरपुन अशा व्यक्तीला एकाकी असल्याची जाणीव अस्वस्थ करते.             
-तो कशावरच एकाग्र होऊ शकत नाही, आणि म्हणून तो आनंदी होऊ शकत नाही. मनात एक अनाभिक भय तयार होते.            
-ह्या सगळ्या दृष्ट श्रृख्यलेला तोडण्याचा एकच उपाय आहे तो म्हणजे व्यायाम करा. डिप्स (Dips) मारा, सूर्यनमस्कार घाला, पुल-अप्स (Pull-ups) करा, ट्रेडमिलवर (Tredmill) घाम गाळा.                    
-शरीरातले चैतन्य जिवंत ठेवा.
5) READING:- (वाचन) पुस्तक वाचणारी माणसं एका आयुष्यात अनेक आयुष्य जगतात.            
-पुढच्यास ठेच मागचा शहाणा. या नात्याने दुसऱ्याच्या अनुभवाने शहाणे होणारे लोक जगावर राज्य करतात.
-वॉरेन बफें, बिल गेट्स, मार्क ज्युकर बर्ग हे सगळे आठवड्याला २ पुस्तके वाचून पूर्ण करतात.
6) SCRIBLING:- (लिहिणे) माझे ठाम मत आहे की, माझ्या आयुष्यातला खडतर काळात मी जर लिहीत राहिलो नसतो, तर मी आज जिवंत राहिलो नसतो.            
-लिहिल्याने तुमचे तुमच्याशी नव्याने भेट होते.            
-लिहील्याने मन रिकामे न होणे, दुःख नाहीसे होणे, मनात नव्या ऊर्जेचा संचार होतो.                 ‌ ‌  
-लिहिल्याने नवे रस्ते उघडतात. नव्या प्रगतीच्या वाटा खुलतात.                 .    
-म्हणून संतांनी सांगून ठेवले आहे. ‘दिसामाजी काही लिहीत जावे'.              
-लिहिणे हे सुद्धा व स्व-संवादाचे प्रभावी साधन आहे. -लिहील्याने विचार पक्के होतात.                   
-सकाळी उठल्यावर दिवसभर मी काय करणार हे लिहिले पाहिजे.                   
-एखादी समस्या छळत असेल तर, ते लिहून त्याचे उपाय लिहावे.           
-मनाला स्वप्नाच्या आकाशात मुक्तपणे पाठवून कागदावर स्वप्न रेखाटावित.               
-ती स्वप्ने पूर्ण करण्यासाठी मी काय काय करणार आहे? त्याचे नियोजनही लिहावे.      
-आणि जो स्वप्नाला कामे नेमुन घ्यावीत, आणि पुर्ण झाली की स्वतःला विजयी घोषित करावे.
-लिहिल्याने मन मोकळं होतं चित्तांच ओझ हलकं होतो.
-जवळच्या व्यक्तीला पत्र लिहावीत, कधी प्रेरणादायक किस्से, कहाण्या लिहावेत.
                                             -              
-----------------------------------------------------------------

अनुलोम-विलोम   
अनुलोम-विलोम     दोन्ही नाशिकानी  करणारी क्रिया म्हणजे अनुलोम-विलोम क्रिया किंवा प्राणायाम होय. आपले शरीर १२० लाख, करोड  कोशिकाने बनलेले आहे. 72,864 सूक्ष्म नाड्या आहेत. त्यातील पिंगला, ईडा आणि सुषुम्ना ह्या प्रमुख आहेत.
उजवी नासिका सूर्यनाडी, उष्ण, पिंगला किंवा सोम तर डावी चंद्रनाडी, सौम्य, थंड, ईडा असते. हठयोगात उजव्या नासिकेला “ह” तर डाव्या नाशिकेला “ठ” असे म्हणतात. यालाच “शिवस्वरोदय” शास्त्र म्हणतात. हे माझे आवडते शास्त्र खुपच मजेदार व सुंदर आहे‌. प्रत्येकाची एक नासिका २ तास 28 मिनिटे चालू असते नंतर दुसरी सूरू होते. सूर्योदय व सूर्यास्त व मध्यांनी दोन्ही नासिका सुरू असतात. भगवान गौतम बुद्ध म्हणतात. आपणास कितीही भयंकर आजार झाला असेल तर, आपली एक नासिका बंद असते‌ ती जर आपण उघडू शकत असाल तर, विना-औषध आपण निरोगी होऊ शकतात. दोन्ही नासिका एकाचवेळी समानतेने चालू असल्यास आपण पुर्णात: निरोगी आहात. श्वसन व प्राणायामामुळे हे सहज साध्य होते.
बाहेरील वायू नाकातून आंत प्रवेशानंतर तो प्राणात रूपांतर होऊन ती प्राणशक्ति होय. प्राणशक्तिचा संबंध हा मनाशी येतो. मनाचा बुध्दिशी- आत्मा व नंतर तो परमात्म्याशी येत असतो. प्राणायाम म्हणजे लय बद्दल वचन तसेच आपल्या विश्वासावर आपला अधिकार बसवणे रमेश्वराने जन्माला येताना आपल्याला मोजून श्‍वास घेऊन पृथ्वीवर पाठविले आहे हे शाळा संपली की माणूस मृत्यू होतो पण येतानाच जर आपण श्वास कमी घेतला तर सहाजिकच आपले श्वास कमी वापरले जातात व शासनाची बचत होते त्यामुळे आपण दीर्घायुषी होऊ मात्र जर आपल्याला गरज नसतानाही आपण श्वास जास्त वापरले तर आपले आयुष्य कमी होते थोड्या श्वासात जास्त कार्य कसे करावे हे प्राण्यामुळे यातून शिकायला ये शिकता येते ्‍वास घेणे व सोडणे ही स्वाभाविक सहज होणारी नैसर्गिक क्रिया आहे या शासनाला आपला सेवक बनवणेआपली मालकी हक्क शासनावर नियंत्रित करणे आपल्या फूलमती प्रमाणे शासनाने आपल्या फायद्यासाठी चालणे म्हणजेच सहज क्रियेची प्रकशित क्रिया म्हणजेच प्राणायाम होय थोड्या श्वासात जास्त कार्य कसे करावे हे प्राण्यांमधून शिकता येते केवळ वाचून करण्याजोगे प्राणायाम ही क्रिया नाही कारण त्याचा थेट संबंध आपल्या प्राणाची म्हणजेच आयुष्याशी असतो
क्र
                  प्राणी
१ मि. श्वासाची संख्या

०१
कबूतर
३४

०२
चिमणी
३०

०३
बदक
२२

०४
वानर माकड
३० 

०५
कुत्रा
२८

०६
डुक्कर
३०

०७
घोडा
२६

०८
बकरी
२४

०९
मांजर
२४

१०
साप
१९

११
हत्ती
२२

१२
मनुष्य
१५

१३
कासव

श्‍वासाची गती आणि प्राण्यांच्या आयुष्य हे एक दुसऱ्यावर संबंधित असते. कासव ४०० वर्षे  जगते, कुत्रा १०-१२ वर्षेपर्यंत. योगाभाषी पुरुषांची श्वासाची संख्या ८ पर्यंत, तर प्राणायाम आणि ध्यान नियमित अभ्यास केल्यानंतर ही ४ पर्यंत संख्या येऊ शकते.
अनुलोम विलोम संजीवनी-बुटी म्हणजेच रामबाण औषध आहे. मेंदूच्या डाव्या आणि उजव्या भागाचे समन्वय होते. रक्त शुद्ध होते‌ शरीरातील प्रत्येक कोशिका प्रभावित होतात‌. पाच तत्त्वांचे संतुलन होते. सात चक्र जागृत होतात.  शारीरिक मानसिक व आध्यात्मिक उन्नती होऊन कुंडलिनी जागृत होते. प्रशस्त मार्ग प्राप्त होऊन एक अद्भुत चमत्कारी साधन म्हणजे मनुष्य स्वस्थ अर्थात स्वत: मध्ये (स्वयम्) स्थित होतो गीतांमध्ये श्रीकृष्णाने ”थित-प्रज्ञ” गीतेत म्हटले आहे.
महत्व:-
मेरुदंडाच्या च्या सर्वात खालच्या भागापासून पिंगला उजव्या दिशेने डाव्या दिशेकडे व ईडा डाव्या दिशेकडून उजव्या  दिशेकडे वाकडी-तिकडी  सूर्य व चंद्र नाडी एक दुसर्‍याच्या विपरीत दिशेने (मुलधार चक्रावरून) वर-वर जात असतात. जेथे त्या  मिळतात तेथे चक्रावर भेदून पुढे जातात. ते म्हणजे स्वाधिष्ठान, मणिपूर, अनाहत, विशुद्ध व शेवटी आज्ञाचक्र येऊन मिळतात. हेच ते त्रिवेणी संगम म्हणजेच प्रयाग-क्षेत्र येथे तीनही नाड्या एकत्र येऊन मिळतात. सहस्त्रार चक्रात फक्त सुषुम्ना नाडीच प्रवेश करते‌.
शरीरातील सर्व ७२,८६४ नाड्या या चक्राशी जोडलेल्या आहेत. ह्या तीनही नाड्या आपल्या स्वंचालित स्नायू प्रणालीच्या आधार आहेत. या प्रणालीचे २ भाग आहेत. मेंदू व मेरूदंडास जोडणारा मेंडुला-आम्लागेटा,  मेरुदंडात ३३ गोट्या असून 31 जोडा द्वारे त्या जोडलेल्या असतात. दोन नाडी प्रत्येक जोडामधुन २-२ नाड्या एक डावी व दुसरी उजवीकडे. उजव्या बाजूच्या 31 नाड्या सूर्यनाडीशी तर डाव्या बाजूच्या 31 नाड्या चंद्रनाडीशी जोडलेले असतात. उजव्या बाजूकडून गेलेल्या प्रणालीला अनुकंपी स्नायू प्रणाली म्हणतात. त्याद्वारे मेंदूला संदेश पोहोचवला जातो. डाव्या बाजूकडील नाड्या  मेंदूकडून आदेश पाठविला जातो. त्याला सह-अनुकंपी प्रणाली म्हणतात‌.
जेव्हा आपण अनुलोम-विलोम करतो तेव्हा मेरुदंडाच्या 33 गोट्या 31 जोड मेंडूला व मेंदू प्रभावित होतो. सात चक्र प्रभावित होतात‌. ह्या चक्राच्या माध्यमातून 72,864 नाड्या सुद्धा प्रभावित होतात. यामुळे शरीराच्या संपूर्ण  कोशिका, उत्तक, अंगामध्ये शुद्ध ऑक्सिजन पोहोचतो पूर्ण शरीर स्वस्थ होते. आणि कार्बन डाय-ऑक्साइड बाहेर निघाल्यामुळे आपण रोगमुक्त होतो. अनुकंपी व सह-अनुकंप प्रणाली यामुळे योग्य प्रकारे काम करू शकतात.
      आपल्या स्वास्थाचा आधार सूर्य व चंद्र नाडी आहेत. यामुळे शरीराचे तापमान सदैव ठीक राहते. या नाड्यांचे संतुलन बिघडले म्हणजे आपणास सर्दी-पडसे, ताप, कर्करोग, मधुमेह असे कितीतरी आजार होतात आणि दोन्हीपैकी एका नाडीचे गतीमध्ये अवरोध निर्माण होतो. हा अडथळा (अवरोध) दूर केला तर आपण बिना औषधाने स्वस्थ होऊ शकतो. म्हणून अनुलोम-विलोमाचे अनन्यसाधारण महत्त्व आहे. माझे मानसिक व कंपवाताचे (पॅरालीसीस) रुग्ण फक्त अनुलोम-विलोम व वायु मुद्रानि एक आठवड्यात पूर्णपणे ठिक झालेले आहेत.
जगातील सर्व आजार आहार, योगाभ्यास व प्राणायाम द्वारे पूर्णतः ठीक होऊ शकतात.
अनुलोम विलोम
अनुलोम-विलोम ३ प्रकारात करता येईल. पहिल्या दोन ह्या क्रिया आहेत व तिसरा प्राणायमाच्या स्वरूपात असून त्यास नाडी शोधन प्राणायाम सुध्दा म्हणतात. प्राणायामा मध्ये कुंमकाचा उपयोग केल्या जातो. कुंभकाचा उपयोग प्रत्यक्ष अनुभवी  व्यक्तीचे मार्गदर्शना खाली करावे. त्यात अनुपाताचे प्रमाण थोडे थोडे वाढविण्यात येत असले तरीही हे अजिबात कठीण नाही. तरीही सुरुवातीला मार्गदर्शन आवश्यक आहे. ऑक्सिजन हलका गॅस असून हा पोटात घेणे सहज शक्य असतो. मात्र कार्बन-डाय-ऑक्‍साईड भारी असून तो बाहेर निघण्यास अधिक शक्तीची आवश्यकता असते‌‌. ( कार्बन डायॉक्साईड जेथे जेथे जमा झालेला असतो- म्हणजे गुडघ्यात जमा झाला तर  गुडघ्याच्या आजार, पायात जमा झाला तर पायाचा आजार निर्माण होत असतो) त्यासाठी त्याला बाहेर काढण्यासाठी आंतरिक कुंभक ४ पट केल्या जातो म्हणजेच तिथे थांबून संपूर्ण कार्बन डाय-ऑक्साइड बाहेर काढून सर्व कोशिका, अंग, उत्तक यामधे रक्त शुद्ध करणे सहज शक्य होते. ह्यामुळे शरिराची लसिका प्रणाली (Lymphatic System)  सक्रिय होते. जी रक्तामधील साचलेली घाण काढण्याचे काम करीत असते‌. सर्व अंतर व बाह्य कुंभकाद्वारे हे करणे सहज शक्य होते.
अनुलोम-विलोम क्रिया:-
कोणत्याही आसनात मेरुदंड सरळ राहिल असे बसा. डाव्या हाताची प्राण मुद्रा ( करंगळी, अनामिका व अंगुठा यांचे शीर्ष टोक) लावून मांडीवर ठेवावा. उजव्या हाताने प्राणायाम मुद्रेने (पाच बोटा पैकी मधली दोन बोटे तर्जनी व मध्यम मोडून अंगठ्याने उजवी नासिका व उर्वरित दोन बोटे अनामिका आणि करंगळी) डावी नासिका बंद करावयाची आहे.
डाव्या नासिकेने रेचक करा. उजवी नासिका बंद करून डाव्या नसिकेने हळूहळू श्वास घ्या. आपल्या सहज अनुभवासाठी आपण आकडे मोजू शकता. उदाहरणार्थ हा श्वास आपण ४ आकडी घेतलेला आहे  आता डावी नासिका बंद करून उजव्या नासिकेने हा श्वास कमीत कमी ६ आकडे मोजत बाहेर काढावा. (कार्बन डाय-ऑक्साइड जड असतो  व तो सहज बाहेर निघत नसल्यामुळे रेचक हा पूरका पेक्षा जास्त असावा. अर्थात येथे आपण पूरक ४ आकडी घेतला तर रेचक ६,७,८ किंवा त्यापेक्षा अधिक असावा) आता उजव्या नासिकमध्ये श्वास नसल्यामुळे ४ अंकापर्यंत हळूहळू श्वास  घ्यावा. उजवी नासिका बंद करून डाव्या नासिकेने ६ अंक मोजत  श्वास बाहेर काढावा. हे एक चक्र पूर्ण झाले. अशाप्रकारे दुसरे, तिसरे चक्र करावेत. अशाप्रकारे हे एक आवर्तन झाले. असे २-३ आवर्तन करावे. हे आवर्तन वाढवू शकता.
प्रथम श्वास हळू हळू  घ्यावा‌. नंतर तो मध्यम व तीव्र गतीने करू शकता.
ह्या अनुभवाचे आवर्तन वाढवत वाढवत १०-१५  मिनिटे पर्यंत हळूहळू  आपल्या क्षमतेनुसार करावे.
दुसरी विधि:-
या विधीत थोडासा कुम्भकाचा प्रयोग आपण करीत आहोत.  (अनुलोम-विलोम प्राणायाम/ नाडी शोधन प्राणायामा मध्ये कुभंका शिवाय बंधाचा सुद्धा उपयोग केल्या जातो म्हणून आपण इथे ते घेणार नाहीत.)
 डाव्या नासिकेने रेचक नंतर, ४ आकडी श्वासाचा पूरक, २ आकडी कुंभक (येथे शरीरात श्वास असल्या मुळे यास अंतर कुंभक म्हणतात) म्हणजे त्याच अवस्थेत थांबणे‌. नंतर डावी नासिका बंद करून उजव्या नासिकेने ६  आकडी रेचक, पुन्हा दोन आकडी बाह्य कुंभक (येथे आपल्या शरीरातील प्राणवायू रेचक केल्यामुळे बाहेर निघून गेला आहे. ही बाह्य कुंभकाची अवस्था आहे्) नंतर पुन्हा उजव्या नासिकेने ४ आकडी पूरक, नंतर २ आकडी अंतर कुंभक व डाव्या नासिकेने ६ आकडी रेचक करून एक चक्र पूर्ण झालेले आहेत. 
असे ३-३ चक्र, ३ वेळा करून हा कालावधी हळूहळू १०-१५ मिनिटे पर्यंत वाढवावा. 
अनुलोम विलोम आपण  सकाळ-संध्याकाळ, तसेच लहान मुले व वृद्ध, दुर्बल-व्यक्ती आणि रुग्ण सुद्धा करू शकतात. ज्यांना जमिनीवर बसता येत नाही त्यांनी खुर्चीवर बसून किंवा रुग्णांनी झोपून सुद्धा याचा लाभ घेता येईल.
सावधानी:-
अस्थमा, उच्च रक्तदाब हृदयरोग आदि रूग्णांनी कुम्भक न करता याचा प्रयोग करावा. तसेच श्वसन हळूहळू करावे.
-----------------------------------------------------------------


कपालभाती
श्वसन प्रणाली चे अनेक अंग आहेत जसे दोन नासिक, ग्रसनी, टाळू, स्वर-तंत्र, शास नलिका आणि डायफ्राम. परंतु आपण श्वसन प्रणाली चे ३ भाग—नाक, गळा व फुफ्फुसांची माहिती पाहू या.
नाक:-
               नाकात दोन छिंद्रे व एक पडदा असतो. शुद्ध वायू प्रदान करणे, गंधाची ओळख करणे, शरीराचे तापमान प्रभावित करणे यापेक्षा सर्वात मोठे कार्य म्हणजे फुफ्फुसात शुद्ध वायू पाठविणे. दिवसभरात  जवळजवळ  ५०० घन फुट  हवा फुफ्फुसात भरत असतो.  वायू मध्ये अनेक दूषित तत्व बाहेर फेकणे. ह्यासाठी नाकात लहान लहान केस हवा गाळण्याचे काम करतात. उन्हाळ्यातील उष्ण हवा थंड करणे व हिवाळ्यातील थंड हवा गरम करुन सामान्य तापमान करून फुफ्फुसात पाठविली जाते. हे जर केले नाही तर फुफ्फुसात अडथळे निर्माण होऊन फुफ्फसात सर्दी जमुन  निमोनिया होईल 
               जो वायू आपण बाहेरुन ग्रहण करतो. त्यात पुढील फुफ्फुसा पर्यंतचा मार्ग अवलंबण्यासाठी त्यात आर्दता ही आवश्यक असते. हा चिकट स्त्राव दोन्ही नासिकामधील लाल स्पंजी  झिल्ली (परत)  मधून रोज १ लिटर तयार होत असतो. हेच व नाकातील केस येणा-या वायुची साफसफाई करीत असतो. नासिकेत श्लेष्मा (कचरा) तयार होत असतो. जेव्हा तो जुना झाला व आपले कार्य पूर्ण झाले की गळ्यातून गिळल्या जाऊन‌ पोटात   रासायनिक क्रियाद्वारे  मोठ्या आतड्याद्वारे बाहेर फेकला जातो. हे  कार्य करण्याकरिता नाकात फार मोठ्या संख्येत सुक्ष्म रोम कुप असतात. हे प्रती सेकंद १० वेळा तरी सफाई करीत असतात. जेव्हा आपणास सर्दी होते  तेव्हा त्याचे कार्य बंद पडते आणि तेव्हा  श्लेष्माचा जणूकाही पूर येतो. तो गळ्याकडे न जाता नाकावाटे बाहेर पडत असतो. त्यास आपण शेंबूड म्हणतो. तेव्हा नाकातून सु-सु आवाज येत असतो. आपण म्हणतो नाकात एवढे पाणी कोठून येत आहे. नाकाच्या वरती ल डोळ्याच्या मधल्या भिंती मध्ये  एक गुहे सारखी पोकळ जागेला सायनस (Sinus) म्हणतात. वायूसाठी आर्द्रता  तयार करते.  वाणी सुमधूर बनविते.  हा भाग रिकामा असल्यामुळे मेंदूच्या भार हलका होतो. जेव्हा आम्हांला सर्दी होते तेव्हा यात श्लेष्मा  भरला जातो. श्वास घेण्यास अडचण निर्माण होते‌. आवाज बसतो. व डोके भारी होते. डोळे दुखू लागतात आणि असंख्य त्रास सुरू होतो. जेव्हा हा श्लेष्मा कोरडा होतो तेव्हा मेकुड तयार होतो. नाकामध्ये एक हाड असून त्याचे तीन भाग असतात. त्यातील सर्वात मोठा एक इंच लांब असतो. त्यात अनेक उत्तके (Tissuess) असून ते सदैव रक्ताने भरलेले असतात. हे उत्तक नाकाला तानण्याचे काम करीत असतात. ह्यातून रक्त अनेक कोशिका, धमनीला  मिळत  राहते. जेव्हा तुम्ही उष्ण हवा नाका द्वारे ओढीत असतात तेव्हा ह्या कोशिका फुलतात आणि थंड  हवेला गरम करीत ती फुफ्फुसाला योग्य तापमानाचा पुरवठा करीत असते. नाकातील ह्या अस्थी व उत्तक रेडिएटरचे (Radiator) कार्य करीत असतात. आता आपण समजला असणार की, श्वास प्रक्रियांचे कसे काम चालत असेल.
                   यावर भस्त्रिका प्राणायाम हा उत्तम उपाय आहे. व मुद्रा नाकातील आजारा साठी- सूर्य मुद्रा, कुबेर मुद्रा तसेच सर्दी-पडश्या साठी सूर्य मुद्रा व लिंग मुद्रा आणि सायनस साठी कुबेर मुद्रा कराव्यात. लक्ष या सर्वांचे विश्लेषण आपण नंतर पाहू या.
 फुफ्फुस:-
               आम्हांला आता पर्यंत फुफ्फुसे श्वास घेतात म्हणून शिकवले आहे‌. परंतु फुफ्फुसाचे खरे कार्य  रक्त शुध्द करणे. ह्रदयाकडून येणारे अशुद्ध रक्‍त शुद्ध करून, शुद्ध रक्‍त हृदयाकडे पाठविणे हेच मुख्य कार्य आहे.
                 हृदय पंपिंग करून सर्व शरीरातील अशुद्ध रक्त गोळा करून  फुफ्फुसाकडे पाठवीत असतो.  फुफ्फुसा कडून आलेले शुद्ध रक्‍त  हृदय रोहिणी, रक्तवाहिनी व सुक्ष्म कोशिका द्वारे सर्वत्र पाठवीत असतो. फुफ्फुसाचे काम अदलाबललीचे म्हणजे एका दुकानातून सामान दुसऱ्या दुकानात नेण्याचे आहे. ही अदलाबदल ऑक्सिजन व कार्बन डाय-ऑक्साइड ची  आहे. आता आपण फुफ्फसा बद्दल थोडी माहिती पाहू या.
              फुफ्फुसे म्हणजे जुळे भाऊ, छातीच्या डाव्या-उजव्या बाजूस असतात. डावीकडे ह्रदय असल्यामुळे डाव्या बाजुकडील  थोडे लहान असते. म्हणजेच तेथे २ भाग व उजवी कडे ३ भाग असतात. जेव्हा आपण श्वास घेतो तेव्हा फुफ्फुसा तील खाली स्थान भरते आणि आपली छाती भरून जाते. श्वास सोडतांना ते रिकामे होऊन छाती आकुंचन पावते‌‌. फुफ्फुसाला कोणत्याही मास पेशी नसतात‌
श्वासनलिका जवळ जवळ १०  सेंटीमीटर ची असते. ती फूफ्फुसात येताच ती  दोन भागात विभागली जाते. डावी-उजवी नंतर ती छोट्या छोट्या भागांमध्ये विभागले जाते‌. त्याचे दृश्य उलट्या झाडासारखे असते‌‌. आमचे फुफ्फुसे देखील झाडाप्रमाणे म्हणजेच ऑक्सिजन व कार्बन डायऑक्साईडचे देण्या-घेण्याचे  काम करीत असते. प्रत्येक छोट्या भागाचा घेरा १/४० सेंटीमीटर इतके सूक्ष्म असते‌. हे दृश्य  लटकलेल्या अंगुरा सारखी  असतात‌‌. अति सूक्ष्म वायू मार्ग ज्यास अलव्हीओली (Alveoil) म्हणतात‌‌. फुफ्फुसाचे खरे कार्य तर ह्या अल्विओली करतात. प्रत्येक कल्वी होली वर एक अति सूक्ष्म रक्तवाहिनी चे आवरण आच्छादलेले असते. या सूक्ष्म रक्तवाहिनीच्या एका टोकातून हृदयाद्वारे दूषित रक्त पंप केल्या जाते तर दुसऱ्या बाजूने शुद्ध रक्त प्राप्त केल्या जाते‌. जसे काही एखादी दमली-थकलेली युवती ब्युटी पार्लर मध्ये जाते व   टवटवलेल्या सुंदर फुलासारखी होऊन परत येते.
फुफ्फूसाचे हेच ते खरे काम असते. जेव्हा ह्या कोशिकाच्या एका टोकाकडून ह्रदयाने पंपिंग केलेले शुद्ध लाल रक्त तालबद्ध ओळीमध्ये घेऊन जात असते, तर एका क्षणातच परिणाम स्वरुप विचित्र प्रक्रिया चालू होते. ह्या कोशिकांच्या जाळीदार भिंतीमधून कार्बन-डाय-ऑक्‍साईड ला फुफ्फुसातील बाहेर विसर्जन करणे तर त्याच क्षणी दुसरीकडे जाताना ऑक्सिजनला सोबत घेऊन येत असते. हे एक प्रकारे  गॅस रुपी अदलाबदली चे दुकानच उघडल्या सारखे वाटते. ज्याचे परिणाम स्वरूप कोशिका च्या एका टोकापासून  एका बाजूला निळे रक्त तर दुसऱ्या बाजूला लाल रक्त तयार होऊन निघत असते.
        आपला श्वास निरंतर चालू असतो. परंतु कधीकधी आपण जाणून-बुजून कुंभका द्वारे काही काळ श्वास  थांबवू शकतो. जसे योगी पुरुष करतात. आपले मेरुदंड व मेंदूस Medulla Oblongala ने जोडले जाते. हा येणाऱ्या-जाणाऱ्या श्वासाला नियमित करीत असतो. आपण प्रतिमिनिट १६ ते १८ श्वास घेतो. एका श्वासात अर्धा लिटर (५०० ML) वायू फुफ्फुसा मध्ये भरला जातो. अर्थात एक मिनिटात ५०० मिली (१/२×१८)=९ लिटर.  ही गती नेहमी समान नसते म्हणजे.  एक मिनिटात बसून -१८ लि., चालतांना—२७ ली,  पळतांना--४५-५० ली. 
आम्ही जेव्हा धावतो, मेहनतीचे काम करतो अथवा पायर्‍या चढतो, तेव्हा आम्हांला  अधिक श्वासाची O2 आवश्यकता असते. आपण श्वास तर खूप  भरत असतो, परंतु आधी गेलेल्या श्वासाचे ज्वलन होऊन बनलेला कार्बन-डाय-ऑक्‍साईड (Co2) आणि लॅक्टिक अॅसिड  (Lactic Acid) हे फुफ्फुसात जमा होऊन राहते व ते त्याप्रमाणात बाहेर न निघाल्यामुळे आपल्याला दम लागतो. फुफ्फुसात प्राणवायू साठी  जागा शिल्लक राहत नाही. 
आपण जेव्हा अनुलोम-विलोम करतो. त्यावेळी फुफ्फुसात १ मिनिटात ५० लिटर प्राणवायू जमा होतो (याची क्षमता आपण वाढवू शकता) परंतु, रेचक करतांना तो (कार्बन डाय-ऑक्साइड) संपूर्णतः बाहेर सुद्धा पडतो. आणि आंत पुन्हा नवीन श्वास O2 घेण्यासाठी संपूर्ण जागा शिल्लक राहत असल्यामुळे आपणास थकवा येत नाही, उलट आपण‌ ताजेतवानेच राहतो. जसे वर सांगितले  आहे. जेव्हा साधारण श्वास घेतो तेव्हा अर्धा लिटर श्वास फुप्फुसात जातो, परंतु आपल्या शरीरात  वायु भरण्याची क्षमता ह्यापेक्षा १० ते १२ पट अधिक आहे याला TLC (Total Lung Capacity)  म्हणतात. जेव्हा आपण दीर्घ व खोल (Deep Breathing), प्राणायम किंवा कुंभक करतो तेव्हा १ श्वासाची संख्या ५ ते ६ ली. असते यास VLC ( Vital Lung Capacity)  म्हणतात.  परंतु आपल्या फुप्फुसाची क्षमता १० ते १२ पट अधिक म्हणजे ५ ते ६ लिटर (१२×६=७२) म्हणजेच (५० ते ७२ लीटर ही क्षमता दीर्घ श्वसन, प्राणायाम व कुंभका द्वारे वाढवू शकता.)            पुरुष VLC ४-५ लि. महिला VLC ३-४ लि. असते. महिलांचे फुफ्फुस लहान असते. तर पुरुष फुफ्फुस मोठे म्हणून ते अधिक क्षमतेने व सहज मेहनतीचे काम करू शकतात‌.
 दूषित हवा फुफ्फुसाचा मोठा शत्रू आहे. तसेच धुळीचे कण, विषाणू (Bacteria) व जिवाणू (Virus) , मोठ्या शहरात वाहनांचा धूर, औद्योगिक क्षेत्रातील सल्फर डायऑक्साइड, नायट्रोजन डायऑक्साइड, शिसा (Led) तसेच जहरिले विषाणु वायू चे कण इ. आपल्या नाकात व गळ्यात केसाद्वारे श्र्वास गाळण्याची  क्रिया  असल्यामुळे बरेच प्रमाणात शुद्ध श्वास गाळून मिळू शकतो.  ह्या झिल्लीया कडून रक्त शुध्दिकरणाचे काम होत असते. परंतु वरील धुळ व वरील विषारी वायू येत पर्यत पोहोचल्यास त्या नष्ट होण्याच्या तयारीत असतात.  एकदा नष्ट झाल्या तर त्या पुन्हा पुनर्उत्पन्न होऊ शकत नाहीत. यांचा पुनर्विकास होत नाही. मेंदूतील न्यूरॉन्स, पाठीतील कोशिका व ह्या  एकदा नष्ट झाल्या तर त्याचे कधीही पुनरुज्जीवन होत नसले तरीही काही योगीक क्रियांमुळे ह्याच्यात निश्र्चित वाढ करता येऊ शकते. अन्य कोशिका रोज करोडो मरतात आणि करोडो जिवंत होत असतात.
  1.  सिगारेटचा धुर फुप्फुसामध्ये मोठ्या प्रमाणात जमून राहतो.  आणि त्यामुळे ते तीव्रतेने नष्ट होत जातात किंवा या हवेच्या पिशव्यामध्ये श्लेष्मा भरला जाते किंवा सुकू लागतात. त्यामुळे अस्थमा आणि एम्फिसिमा (Enphysema) होतो त्यामुळे कोशिकांची लवचिकता समाप्त होऊ लागते. व त्यामुळे ऑक्सीजन भरणे कार्बन डाय-ऑक्साइड निघण्याची क्षमता कमी होते.  लहान बाळ जन्मताच त्याचा रंग गुलाबी असतो. सुंदर निसर्गातील व थंड प्रदेशातील लोकांच्या शरीराचा रंग गुलाबी असतो. परंतु दूषित वातावरणात हळूहळू हा रंग बदलून काळा होत जातो. हा दूषित हवामानाचा परिणाम असतो. 
आपल्या फुफ्फुसात ७५ कोटी कोशिका असतात साधारणतः श्वास घेताना एक तृतीयांश कोशिकांचा प्रयोग होतो आणि दोन तृतीयांश कोशिकांमध्ये ऑक्सिजन आणि कार्बन डाय-ऑक्साइडचे आदान-प्रदान होत नाही.  दोन मीनिटासाठी डोळे बंद करून श्वसना कडे पहा तुम्हाला असे जाणवेल की तुमचा श्वास नाक व गळ्यापर्यंत पोहोचला आहे. खालील भागावर श्वास न पोहोचल्यामुळे या २/३ भागांमध्येपोचत नाही तिथे त्या कोशिकेच्या प्रयोग होत नाही आणि आपले आयुष्य जसजसे वाढत जाते त्या प्रमाणात मी आपली बी एल सी कमी होत जाते. आणि श्वास फुलू लागतो. कोशिका चे काम रक्ताला शुद्ध करणे असते. अशाप्रकारे आपल्या शरीराच्या अरबो-खरबो कोशिका ना रक्त न मिळाल्यामुळे आपण वृद्ध होऊ लागतो व अनेक रोगांच्या विळख्यात पोहचतो. 
आपण तरूण असताना खेळ, शारीरिक श्रम होत असल्यामुळे अधिक प्राणवायू ग्रहण झाल्यामुळे आपले फुफ्फुसे बलवान होत जाते. जर तुम्हाला स्वस्थ व तरुण बनवून राहायचा राहायचं असेल तर खेळा, नृत्य करा व शारीरिक परिश्रम करा. दीर्घश्वसन,अनुलोम-विलोम, प्राणायाम रोज करणे यासाठी आवश्‍यक आहे. त्यामुळे तुम्ही अस्थमा, निमोनिया व श्वसन रोगापासून बचाव करू शकाल
सकाळी खुल्या हवेत प्राणवायूचे प्रमाण २१%  ऑक्सीजन भरलेले असते, तर संध्याकाळी ते ४% पर्यंत कमी होऊन जाते‌.
कपालभाति:-
“भस्त्रावलोहकारस्य रेचपूरी संसभ्रमौ।। 
कपालभातिर्विख्याता कफदोष विशोषणी”।।
कपाल या शब्दाचा अर्थ कवटी असा होतो. तर भाती म्हणजे चकाकणे म्हणजेच कवटीच्या आंत मेंदूतील समग्र इंद्रियांना प्रकाशमान करणारी, पण जागृती करणारी यंत्रणा असे कपालभाती या प्राणायामाला म्हणता येईल. 
दुसरा अर्थ म्हणजे कपाल म्हणजे भाळ प्रदेश चमकणे असा होतो. एकूणच या प्राणायामाने सौंदर्य वृद्धी होते व मेंदू कार्यक्षम होतो.
       आपल्या डाव्या हाताच्या अंगठ्याने डावी (चंद्र) नासिका बंद करून उजवा (सूर्य) नासिकेने लोहाराचे भात्याप्रमाणे (अर्धापूरक-अर्धारेचक) श्वास-प्रश्वास जलद गतीने ५४ वेळा करावेत. श्वास घेण्याची क्रिया म्हणजे पूरक व प्रश्वासाची क्रिया म्हणजे रेचक. याप्रमाणे पूरक रेचक अपूर्ण गतीने प्रथम उजव्या नासिकेने करावे. सुरुवातीस सहज करता येतील तेवढी श्वास प्रश्वास करून शेवटचा रेचक केल्यानंतर  त्याच अवस्थेत थोडा थांबण्याचा प्रयत्न करावा. त्याला बाह्य कुंभक म्हणतात. नंतर सावकाशपणे एक दीर्घ पूरक करून ३-४ सेकंद आंत थांबवून म्हणजेच आंतर कुंभक करून हळूहळू दीर्घ रेचक करावा. याप्रमाणे उजव्या नासिकेचा एक टप्पा झाला. 
अर्धा-एक मिनिटे विश्रांती घेवून उजवी नासिका उजव्या हाताचे अंगुठ्याने बंद करून डाव्या नासिकेने वरीलप्रमाणेच ५४ वेळा क्रिया करावी. आपल्या एका बाजूला ५४ व दुस-या बाजूला ५४ नाड्या असतात. अशा रीतीने संपुर्ण चेह-याच्या नाड्या शुद्ध होऊन दोन्ही नाकपुड्या मोकळ्या होतात. अर्धा-एक मिनिट विश्रांती घ्यावी.अभ्यासानंतर ही क्रिया दोन्ही नासिकेने (सूर्य व चंद्र) १०८ वेळा करावी. यावेळी दोन्ही हात दोन्ही गुडघ्यावर ठेवून अपान मुद्रा करावी. (अंगठा+अनामिका+मधले बोटांचे शिर्ष टोक एकत्रीत जोडावे)  डोळे बंद करून प्रथम दोन्ही नासिकेने रेचक व ऩतर दोन्ही नासिकेने अर्धा-रेचक अर्धा-पुरक (फक्त प्रश्वासाची) क्रिया करावी.  हळूहळू १०८ चे तीन टप्पे पर्यंत पोहचावे. सहाजिकच पोटाची आकुंचन व प्रसरण क्रिया होते आणि मूलाधार, स्वाधिष्ठान व मणिपूर चक्रावर विशेष दाब पडतो. श्वास सोडते वेळी मनात हा भाव आणावा की सर्व शारीरिक व मानसिक रोग, काम, क्रोध, लोभ, मोह, राग  व व्देष इत्यादि भस्म होऊन बाहेर पडत आहेत.  
लाभ:- लठ्ठपणा, मधुमेह, गॅस, मलावरोध, आम्ल-पित्त, किडनी, प्रोस्टेट संबंधी आजारांमध्ये निश्चितच फायदा होतो. हृदय रोगामध्ये व फुप्फुसाठी विशेष लाभदायक सिद्ध झाले आहे. चेहऱ्यावर तजेला येतो. मुरूम, वांग इत्यादी विकार दूर होतात. स्मरणशक्ती वाढते. उत्साह व चैतन्य येते. पचनक्रिया सुधारते, गॅसेस दूर होतात. पोटावरची चरबी घटते. कमरेचा घेर कमी होतो. नाकाचे हाड वाढणे, घसा सुजणे, नाक गच्च होणे, नाक वहाने इत्यादी विकार दूर होतात. रक्तातील गुठळ्या कमी होतात. श्र्वास पटलाची कार्यक्षमता वाढते.
सुचना:- अर्धशिशी, लकवा, फिट, हृदयविकार, रक्तदाब यांचे विकार अल्सर, अपेंडिक्स, जलोदर असल्यास तज्ञांचा सल्ला घ्यावा.
विशेष सुचना:-
कोरोना आजारासाठी मी विशेषत: ज्या आसनामध्ये गळा, छाती व फुफ्फुसे ताणल्या जातात त्या अवस्थांमध्ये तेथे कपालभाती करताना नुसतं अर्धा-पुरक, अर्धा-रेचक म्हणजेच प्रश्वासाची क्रिया क्षमतेनुसार सातत्यांने करण्यात यावी. यामुळे आपला गळा, फुफ्फुस आणि छातीला ताण पडेल व श्वसनाचे ह्या अभ्यासा मुळे ह्रदय व फुफ्फुसे बलवान होऊन आपण कोरोना आजारावर मात करु शकाल. उदा. जसे अस्थमाच्या रोगावर मात करण्यासाठी आपण मच्छासनात कपालभाती करतो. त्याच प्रकारे कपालभाती करण्यात यावी. 
 -----------------------------------------------------------------------

शुक्रवार दि ६ जून २०२०       

१) झोपेतून उठणे, स्वर पहाणे, 
२) कर प्रार्थना
कराग्रे वसते लक्ष्मी| करमध्ये सरस्वती || कर मुलेश्र्च गोविंदा | प्रभाते कर दर्शनम्||
३) उष:पान, गरमपाणी, मध (शहद) लिंबू घुट घुट पिणे. 
लाळेचे महत्त्व:- लाळ हे जगातील अनमोल रसायन असून  आमच्या शरीराची प्रतिरक्षा प्रणाली (Immune System) ला मजबुत करते. कर्करोग रुग्ण, पान तंबाखू व गुटखा खाणाऱ्यांना लाळ उत्पन्न होत नाही. अमेरिकेत कर्करोग्यास  एका १० ML पाउच साठी ₹ १०,०००  मोजावे लागतात‌. सकाळची लाळ डोळ्यात लावल्यास आपला चष्मा निघू शकतो. शिवाय चर्मरोग किंवा सोरायसिस तसेच शरीरावरील डागास रोज लाळ लावल्यास ते नष्ट होतात.
      भोजन दाताने चावून खाल्ल्या जाते. त्यात लाळ मिसळली नाही तर त्या भोजनाचे पाचन होत नाही. व दांत आपले कार्य व्यवस्थित करू शकत नाहीत. आपल्या तोंडामध्ये पाचकरस सोडणाऱ्या १२ ग्रंथी आहेत. लाळ सोडणाऱ्या  (Salivary Glands) ६ ग्रंथी आहेत. त्यापैकी- २ कानाखाली व  समोर (Parotid Glands), २ जबड्याच्या खाली (Sub-Maxillllary Glands), 22 जिभेखाली (Sub- Lingual Glands) असतात. तोंडातून निघणारे हे पाचक रस क्षारीय (Alkaline)  असतात. रक्ताचे अन्न ८०% क्षारीय व २०%आम्लिय असते. जर पोटामध्ये आम्लांचे प्रमाण अधिक झाल्यास रक्त अशुद्ध होऊ लागते‌. 
       आपले भोजन अधिक तर आम्लीय (Acidic) असते‌. पीठ, तांदूळ, (भात),मसाले, दूध, चहा-कॉफी, कोल्ड्रिंग हे सर्व आम्लीय असतात‌. फळे आणि भाजीपाला हेच क्षारीय असतात. तोंडातून निघालेली ही लाळ आम्लीय भोजनास क्षारीय करून देते. तेव्हा भोजनात अधिकाधिक मसाले असतात, तेव्हा आहार नळीचे दुसऱ्या भागावर म्हणजेच ग्रसनी (Pharynx) मध्ये जाऊन आग होऊ लागते. कारण ते अत्याधिक आम्लीय असते. जेव्हा आपण लवकर-लवकर भोजन करतो. तेव्हा त्यात पूर्णपणे लाळ मिसळत नाही. म्हणून लवकर-लवकर केलेल्या भोजना मुळे गॅस व (Acidity) तयार होते तोंडातून निघणार्‍या लाळेमुळे अनेक औषधीय गुण असतात. जे आमच्या शरीर व प्रतिरक्षा प्रणाली  (Immune System) ला मजबूत करतो. भोजना सोबत  पाणी पिल्यामुळे लाळ पातळ होऊन त्यातील औषधी गुण समाप्त होत जातात. पाणी जेव्हा प्यायचे असेल तर बसून प्या व घुट-घुट प्या. जेणेकरून ती भोजनात मिसळून पाण्यास औषधी गुण प्राप्त होईल. लोक बाटली उघडून गटा-गटा पाणी पितात. तर ते आपल्या शरीरासोबत खूपच अन्याय करीत असतात. आपणास हे जाणून आश्चर्य होईल की आपल्या शरीराच्या ग्रंथी २ लीटर निर्माण करतात. तोंडात एक मोठी लांब जिम असते. तिचे काम बारीक केलेल्या भोजनाच्या लगद्यास ग्रसणीकडे (Pharynx) ढकलत असते. तोंडाद्वारे निर्माण झालेला रस चिकटपणा निर्माण करतो. ही लाळ ह्यास ग्लुकोज (Glucose) मध्ये रुपांतरीत करते.
  . ४) सौच, गणेश क्रिया, मूलबंध व अश्विनी मुद्रा:- 
अश्व लीद टाकतो तेव्हा गुद द्वाराचे आकुंचन, प्रसरण  करीत असतो. अशीच आपल्या गुदद्वाराला वरती ओढून, सोडणे म्हणजे गुदद्वाराचे आकुंचन-प्रसरण करणे. ह्या क्रियेस अश्विनी क्रिया म्हणतात. ही अतिशय महत्त्वाची क्रिया असून रोज ३०० वेळा तरी करावी. ह्यामुळे आपले मूत्ररोग, बेड वेटिंग गुदद्वाराचे सगळे आजार, बद्धकोष्टता, मुळव्याध, फिशर शौचासचे रोग, हर्निया,  प्रोस्टेट, महीलांचे मासिक धर्म, गर्भाशय लटकणे, नपुंसकता, प्रॉटडक्टिविटी हे सगळे रोग ठीक होतात.
५) मर्कटासन
६) सुक्ष्म क्रिया,PT, Jogging, शरीराचे विविध व्यायाम, टाळ्या, हास्याचे प्रकार
७) सुखासन, वज्रासन, पद्मासन, सिद्धासन स्वस्तिकासन 
८) प्राणाकर्षण क्रिया, सोह$म जप
९) नमन मुद्रा, योगमुद्रा क्र-१, योगमुद्रा क्र-२
१०) शांतिपाठ
असतो मा सद्गमय तमसो मा ज्योतिर्गमय मृत्योर्मा अमृतम गमय ओम शांति| शांति|| शांति |||
-----------------------------------------------------------------------

काही महत्त्वाचे योगासने

---------------------------------
ग्रुप च्या माध्यमातून आलेल्या 
सूचना व त्यावर चर्चा
[6/6, 8:02 AM] smj_Mbi_Thawakar Ramkrishan L., (Vashi): 
हरिओम,       
प्रत्येक शनिवारी त्या आठवड्यांची उजळणी असते. पुढील शनिवारी ही उजळणी होणार नाही. येथल्या आठवड्यात शिकवू त्याचीच उजळणी होईल. रविवार प्रश्न-उत्तर, आपल्या अडचणी, सूचना व मार्गदर्शन होईल. या ग्रुपवर आरोग्य, योग व आजार संबंधी उपयुक्त गोष्टीसाठी आपले स्वागत होईल.   
 सर्वे भवतुं सुखिना|.सर्वे संतु निरामय:||
---------------------------------------------------------------------------               
[6/7, 8:09 AM] smj_Pune_Asole Ratiram Shripat, (Pune): 
🙏🏼श्री. ठवकर साहेब नमस्कार 🙏🏼माझी १ सूचना आहे. योग्य असेल तर बघा. रविवारला आपण विचारलेल्या प्रश्ननाचे ऊतर देवुन समाधान करता त्याबद्दल धन्यवाद . जर प्रश्न शनिवारी ला आपल्याला पाठवले तर आपण रविवारी ला सर्वाच्या प्रश्नांचे ऊतर.वेळ वाया न जाता  देवु शकाल असे मला वाटते. ...... आस्वले पुणै।
---------------------------------------------------------------------------               
[6/7, 8:13 AM] smj_Mbi_Thawakar Ramkrishan L., (Vashi): 
हरी ओम,  सुंदर कल्पना आहे. ✅बरोबरच आहे. या शनिवार पासून प्रारंभ करू या.
---------------------------------------------------------------------------               
[6/7, 9:13 AM] Smj_Ngp_Sudhir Keshav Mate_Nagpur: 
Zoom वरुन SayNamaste कींव्हा google meet वर shift होता येईल का?
Zoom is chinese product, एक विचार मांडला, 🙏
---------------------------------------------------------------------------               
[6/7, 9:14 AM] Smj_Ngp_Sudhir Keshav Mate_Nagpur: Namaste!
Please use the following link to download the Say Namaste Video Conferencing app on your phone from the Google Play Store:
https://bit.ly/2X4qHqO
---------------------------------------------------------------------------               
[6/7, 9:22 AM] Smj_Pune_Shelokar Lilesvar: 
Rahulji, Mate Saheb yani jo vichar pragat kela tyawar kahi technically karata yeil ka!
---------------------------------------------------------------------------               
[6/7, 10:28 AM] smj_Mbi_Thawakar Ramkrishan L., (Vashi): 
हे ✅ आहे. परंतु Technical व्यक्तिनी ठरवावयाचे आहे. मी याबाबत पूर्ण अज्ञानी आह ‌.
---------------------------------------------------------------------------               
[6/7, 10:30 AM] पुणे- Botmange R: 
We are using zoom US and Canada
---------------------------------------------------------------------------               
[6/7, 10:30 AM] पुणे- Botmange R: 
Google meet has restrictions
[6/7, 10:31 AM] पुणे- Botmange R:
 Me dusre option agodarch baghto ahe
---------------------------------------------------------------------------               
[6/7, 11:41 AM] Smj_Pune_Shelokar Lilesvar: 
Ok, you decide 👍🏻.
--------------------------------------------------------------------------- 
 ग्रुपवर आलेली "शरीर शास्त्र" 
ह्याविषयी महत्वाची माहिती        
[6/7, 12:12 PM] संपर्क-7 Vitthal Mate Whatsapp: 
कोणी कोणतेही धर्मशास्त्र वाचले नाहि तरी चालेल पण एकदा "शरिरशास्त्र" चा अभ्यास करावा.
( वैज्ञानिक मानवी शरिराचं अभ्यास करुन थक्क झाले आहेत )
*मानव शरिर अदभुत आहे.*
*मजबुत फुफ्फुस*
आपलं फुफ्फुस दररोज २० लाख लिटर हवेला फिल्टर करते. आपल्याला याचा अंदाज पण नाहि येत. जर फुफ्फुसाला खेचुन लांब केल तर तो टेनिस कोर्टचा एक हिस्सा पुर्ण व्यापुन टाकेल.
*अशी कोणतीही फॅक्टरी नाही*
आपले शरिर दर सेकंदाला २५ करोड नविन सेल बनवते. दररोज २०० अब्जा पेक्षा जास्त रक्त कोषीकांचे उत्पादन होते. सतत शरिरात २५०० अब्ज रक्त कोषीका असतात. रक्ताच्या एका थेंबात २५ करोड कोषीका असतात.
*लाखो किलोमीटर चा प्रवास*
मानवाचे रक्त शरिरात दररोज १९२००० किलोमीटर चा प्रवास करत असते. आपल्या शरिरात साधारण पणे ५.६ लीटर रक्त असते. जे दर २० सेकंदाला एकवेळा संपुर्ण शरिराचे भ्रमण करतो.
*धडधड*
तंदुरुस्त व्यक्तीचं ह्रदय दररोज १००००० वेळा घडकतं. वर्ष भरात ३० करोड पेक्षा जास्त वेळा धडकतं. ह्रदयंच पंम्पिग चा दाब एवढा जास्त असतो कीरक्ताची चिळकांडी ३० फुट वर उडु शकतो.
*सर्व कॅमेरे आणि दूर्बिण निष्फळ*
मानवाचे डोळे एक करोड रंगाना ओळखुन लहानातला लहान फरक ओळखु शकतात. अजुन पर्यत जगात अशी कोणतीही मशीन नाही जी यांच्या बरोबर स्पर्धा करु शकेल. 
*नाकात एअर कंडीशनर*
आपल्या नाकात नैसर्गिक एअर कंडीशनर आहे. जी थंड हवेला गरम आणि गरम हवेला थंड करुन फुफ्फुसात पाठवते.
*ताशी ४०० कि.मी. ची गती*
चेतनातंत्र शरीराच्या बाकी हिश्यात तासाला ४०० की.मी. गतीने तडक उपयुक्त सुचनाचं प्रसारण करतं. मानवाच्या मेंदुत १०० अब्ज पेक्षा जास्त नर्व सेल्स आहेत.
*जबरदस्त मिश्रण*
शरिरात ७० % पाणी आहे. या शिवाय मोठ्या प्रमाणात कार्बन, जस्त, कोबाल्ट, केल्शियम, मेग्नेशियम, फाॅस्फेक्ट, निकल आणि सिलिकोन आहे.
*अजब शिंक*
शिंकताना बाहेर येणारी हवेची गती प्रती ताशी १६६ ते ३०० कि.मी. पर्यंत असु शकते. उघड्या डोळ्यांनी शिंकणे निव्वळ अशक्यच आहे.
*बेक्टेरियाचे गोदाम*
मानवाच्या शरिराच्या १० %  वजन हे त्याच्या शरिरात असलेल्या बेक्टेरियाचे असते. एक चौरस इंच त्वचे मध्ये सुमारे ३.२ कोटी बेक्टेरीया असतात.
*विचित्र विश्व*
डोळ्याचा विकास लहान पणीच पुर्ण झालेला असतो. नंतर त्याचा विकास होत नाही. पण नाक, कानाचा विकास संपुर्ण जीवन पर्यंत चालुच राहतो. कान लाखो आवाजाचे फरक जाणु शकतो. कान १००० ते ५०००० हर्टज आवाजाना ओळखु शकतो.
*दातांची काळजी घ्या*
मानवी दात दगडा सारखे मजबुत असतात, पण शरिराचे अन्य भाग स्वःताची काळजी स्वःताच घेतात. तसे दात आजारी पडल्यावर स्वःताची सुधारणा करण्यासाठी सक्षम नसतात.
*तोंडांतली लाळ*
मानवाच्या तोंडात दररोज १.७ लिटर लाळ बनते. लाळ भोजन पाचन करण्यास मदत करते. जीभेत असलेली १०००० पेक्षा जास्त स्वाद ग्रंथीना ओली ठेवते.
*पापण्या झपकणे*
वैज्ञानिक सुद्धा मानतात की पापण्या झपकल्यास कचरा निघतो यामुळे डोळ्यांच्या दृष्टीत फारच  फरक जाणवतो.
*नखांची कमाल*
अंगठ्याचे नख सर्वात हळु वाढते आणि मधल्या बोटाचे नख सर्वात वेगाने वाढते.
*दाढीचे केस*
पुरुर्षाच्या दाढीचे केस सर्वात वेगाने वाढतात. जर कोणी व्यक्ती संपुर्ण जीवन दाढी नाही करत तर ती ३० फुट लांब होवु शकते.
*जेवणाचे गणित*
व्यक्ती सामान्य रीत्या जेवणासाठी ५ वर्षाचा वेळ खर्ची करतो. जीवनपर्यंत आपण आपल्या वजनाच्या ७००० पट जेवण खालेलं असते.
*केस गळण्याचा त्रास*
एका तंदुरस्त माणसाच्या डोक्यातले 80 केस दररोज गळतात.
*स्वप्नाची दुनिया*
बाळ जगात येण्या आधी पासुनच आईच्या गर्भाशयातच स्वप्न पाहायला सुरु करतो. वसंत रुतुमध्ये बाळाचा विकास वेगाने होतो.
*झोपेचे महत्व*
झोपे दरम्यान माणसाची उर्जा वाढते. मेंदु महत्वपुर्ण माहिती गोळा करतो. शरिराला आराम मिळतो आणी डागडुजीचे ( रिपेरिंग) काम पण होते. झोपे दरम्यान शरिराच्या विकासासाठीचे गरजु होर्मोन्स मुक्त होतात.
*तेव्हा तुमच्या किमती शरीराचे कमी मुल्यांकन करु नका.*
*म्हणुन नियतीचे दिवसात ३ वेळा ( न चुकता, आभार म्हणुन ) आठवण करा. सकाळी उठताना, जेवताना, रात्री झोपताना*🙏
🙏मन करा रे प्रसन्न... सर्व सिद्धिचे कारण🙏
साभार.....🙏🏼
■■■■■■■■■■■■■■■■■■■■■■■■■■■■


शनिवार दि ७ जून २०२०       

वज्रासन
पाचन प्रणाली व स्नायू प्रणाली यांना स्वस्थ ठेवण्यासाठी एक वैशिष्टपूर्ण व सशक्त साधन म्हणजे वज्रासन आहे.
योगासनांमध्ये असे अधिक तर आसन आहेत, ज्यामुळे शरीराच्या सर्व अंगाला व्यायाम होतो.सर्व मासपेशी, सांधे, ग्रंथी, प्रभावित होतात, व शरीराच्या चयापचय क्रियेमध्ये  BMR (Body's Metabolic Rate)  वाढ होते. मासपेशींची  क्रियाशीलता आणि लवचिकता वाढते‌. अशी सर्व आसने आपण खूप वेळ पर्यंत करू शकत नाही. म्हणून मध्ये मध्ये काही वेळा विश्राम मिळावा म्हणून विश्रामाची आसने आहेत. ती आसने करतांना शरीराला विश्रांती तर मिळतेच, परंतु मांसपेशी व मनाला  शीतलता प्राप्त होत असते‌‌. योगासन करताना़ंचा सर्वोत्तम वेळ प्रात: समई रिकामेपोटी व स्नाना नंतरचा असतो.
परंतु १ असे आसन आहे, की जे दिवसात कधीही करता येऊ शकते‌. मग आपले रिकामे पोट असो वा नसो. हे आसन शरीराला विश्राम तर देतेच, शिवाय व्यायामाचे अनोखे फायदे सुद्धा प्राप्त करून देते‌. म्हणून या आसनात व्यायाम आणि विश्रामाचा असा अनोखा संगम आहे.
वज्रासनाची विधी:-
जमिनीवर जाड चादर किंवा गादी अंथरूण त्यावर दोन्ही पाय सरळ करून बसावे‌. आता दोन्ही हात डावीकडे व दोन्ही पाय उजवीकडे फिरवित गुडघ्याजवळ मोडून दोन्ही टाचा उघडून पायाची बोटे जोडावीत. पंजे व  टाचा दोन्ही आडवी करावीत व त्यावर नितंबाचा भार देऊन आरामशीर बसावे. गुडघे जोडून ठेवा. दोन्ही हात गुडघ्यावर ठेवा. शरीर पूर्णपणे शिथिल सोडा. हे आसन आपण पलंग व गादीवर सुद्धा बसून करता येऊ शकते.
या आसनात प्रथम  बसतांना कधी कधी त्रास होऊ शकतो, तेव्हा आपल्या पाय व पोटरी खाली उशीचा आधार घेऊन १ मिनिटा पासून प्रारंभ करावा. थोडे थोडे करून ३० मिनीटा पर्यत अभ्यासाचा  वेळ वाढवत जावा.
लाभ:- 
  1. घरातील वयोवृद्ध व्यक्ति बाहेरून आल्यावर  माझे पाय तुडवून द्या/ दाबून द्या/ माझ्या पायावर उभे रहा, असं सारखे म्हणत. कधी आपण पहाडावर/ वैष्णोदेवी मानसरोवर यात्रा करतो पायामध्ये खड्डे पडतात फार पीडा होते. महिला स्वयंपाक घरात  स्वयंपाक करतांना  शिक्षक, पोलीस, प्राध्यापक सतत उभे राहतात. यामुळे त्यांना थकवा येतो, पायात वेदना होतात. अशा अवस्थेत वज्रासन हे अतिशय उत्कृष्ट आहे. ह्या आसनात बसल्यावर आपला थकवा क्षणात निघून जातो.
  2. विश्रामा शिवाय अतिरिक्त सर्वात मोठा लाभ म्हणजे, पाचन शक्तिला सुदृढ करणे. वज्रासनात  बसल्यावर मणिपूर चक्र प्रभावित होते. मणिपूर चक्रास जोडलेले सर्व अंग- जठर (अमाशय), पेंक्रियाज, यकृत छोटे व मोठे आंतडे हे सर्व अंग स्वस्थ होऊ लागतात. जेव्हा आम्ही वज्रासना मध्ये बसतो, तेव्हा आमच्या पोटऱ्या (त्याला आपण दुसरे ह्रदय म्हणतो) व मांड्यांवर दबाव  पडल्यामुळे पायांच्या नसामध्ये गर्मी उत्पन्न होते. आणि रक्तसंचार तीव्र गतीने जठराकडे होऊ लागते, पोटाची सर्व अंगे क्रियाशील होऊन जातात. ह्या सर्व अंगाचा अंतरित व्यायाम होतो. त्याचे फलस्वरूप हे सर्व अंग स्वस्थ होऊन जातात. ऑक्सीजन चा नियम शरीराच्या ज्या-च्या अंगात ऑक्सिजन पोहोचतो त्या अंगात रक्त प्रवाह सुरू होतो अंगात रक्ताचा संचार होऊन ते टिकून येथील एकत्रित मळ, घाण जाळून नष्ट करते ह्या अंगातील कोशिकांची नवनिर्माणाची गती ठीक राहते. हे अंग स्वस्थ राहतात. याच्या विपरीत या अंगामध्ये ऑक्सिजनचा पुरवठा होत नाही. तेथे घाण/अशुद्ध रक्त जमा होते. आणि रोग व पीडा सुरू होऊ लागतात.
  3. भोजनानंतर सर्व शक्ती भोजन पचनावर केंद्रित होत असते. शरीराच्या संपूर्ण शक्‍तीचे स्तोत्र तर  ऑक्सिजन व रक्त हेच असते. भोजनाच्या वेळी जठराला रक्ताची सर्वाधिक आवश्यकता असते. भोजनानंतर जठराच्या मांसपेशियां मध्ये आकुंचनाची  प्रक्रिया प्रारंभ होऊ लागते. म्हणून यावेळी कोणतेही आसन/ व्यायाम केल्या जात नाही. कारण असे केल्यामुळे भोजनाच्या या क्रियेला बाधा निर्माण होते. परंतु वज्रासनामध्ये बसल्यामुळे  जठराला अधिक रक्ताचा पुरवठा होऊ लागतो. त्याचे आकुंचन व प्रसरण योग्य रीतीने होऊ लागते. आणि भोजन शीघ्र गतीने पाचन होऊ लागते. शरीराच्या चयापचय (Metabolism) क्रिया वाढत जातात. आणि भोजनाचे योग्य प्रकारे व लवकर पाचन होत जाते.  भोजनानंतर लगेच कोणत्याही शारीरिक/मानसिक क्रिया/कार्य करणे अथवा थोड्याशा चालण्यामुळे सुद्धा या क्रियेमध्ये बाधा निर्माण होत असते. वज्रासन हे एकमात्र असे आसन आहे. की या क्रियांमध्ये सहाय्य करीत असते.
  4. वज्रासनात बसल्यावर आपण कोणतीही शारीरिक क्रिया करीत नसतो. म्हणून  पाचनशक्ती वर कोणताही विपरीत प्रभाव पडत नाही. असे म्हटले जाते की भोजनानंतर वज्रासनात ५ मिनिटं बसल्या मुळेच १कि. मीटर लांब चालण्याचा लाभ होतो.
  5. रात्रीचे भोजना नंतर १०० पावले (२० मिनिटे), २ कि. मीटर हलके-फुलके भ्रमण करावे‌. अशी एक जुनी म्हण आहे. त्यामुळे रात्रीचे भोजनाचे पाचन होते. परंतु आजच्या परिस्थितीत हे शक्य होत नाही, त्यामुळे आम्लपित्त (Acidity), गॅस (Gas), हृदयशूळ उद्भवत आहेत.  आणि याचे फलस्वरुप अन्य भयंकर आजारांची  शृंखला तयार होत असते.या TV च्या युगात रात्रीचे भोजनानंतर  सर्वच TV समोर येऊन बसतात. या युगातही वज्रासन हे एक वरदानच आहे. भोजन करा, तत्पश्चात TV बघा, परंतु वज्रासना मध्ये बसून. त्यामुळे आपण- विश्राम, पाचन, शतपावली व TVचा आनंद प्राप्त होऊन रोगापासून मुक्त व्हाल. 
  6. मधुमेहींसाठी वज्रासन एक वरदानच आहे. मधुमेहाचे मुख्य कारण भोजना नंतर वाढलेली  शर्कराचे पाचन योग्य प्रकारे न होणे. याचे फलस्वरूप रक्ता मध्ये शर्कराची मात्रा वाढणे. वज्रासनात बसल्यामुळे भोजन व शर्कराचे पाचन योग्य व जलद गतिने होत असते. मधुमेहीसाठी फिरणे अनिवार्य असते. जर वज्रासनात  बसण्याचा अभ्यास त्यांनी केला तर त्यांना खूप लाभ होऊ शकतो. मधुमेहा पासून वाचण्यासाठी एकदम सरळ उपाय म्हणजे भोजनानंतर २०-३० मिनिटे वज्रासनामध्ये बसणे.
  7. पचना शिवाय  वज्रासनाचे अतिरिक्त लाभ आहेत. आपण वज्रासनात बसतो तेव्हा आपली मान, मेरुदंड व पाठ सरळ (ताठ) राहते. त्यामुळे मेरुदंडाचे दोष, कंबरेचा त्रास, सर्व्हायकल व  स्लिपडिस्क या त्रासापासून  वाचण्यासाठीचा हा अतिशय उत्तम उपाय आहे.
  8. मेरुदंड सरळ राहील्यामुळे मूलाधारा पासून सहस्त्रार चक्रा पर्यंत प्राण-संचार ठीक होऊन सातही चक्र प्रभावी होतात.  श्वसन क्रिया सुरळित होऊन  अस्थमा व श्वास रोगावर वज्रासन अशाप्रकारे लाभदायी ठरते. ‌
  9. भारतीय सौच पध्दतीमध्ये गुडघे मोडून पायावर बसने म्हणजेच पोट-या व मांडीवर दाब देऊन सौच करणे होय. या दाब तंत्रामुळे शौच सहज होत असते. व पृथ्वीच्या चुंबकीय तत्त्वाचा ही लाभ प्राप्त होतो. ज्या व्यक्तींना बद्धकोष्टतेचा  त्रास आहे त्यांनी वज्रासनामध्ये जास्तीत जास्त बसण्याचा प्रयत्न करावा. त्यामुळे मोठे आतडे हे (Colon) सक्रीय होते आणि शौचाचे सर्व प्रश्न मार्गी लागतात. ज्या व्यक्तींना वज्रासनात बसता येत नाही‌. त्यांनी  सकाळी १-२ ग्लास गरम पाणी पिऊन पोट-या व मांडीला वज्रासनात बसल्यासारखा हाताने दाब द्यावा, व शौचास  जावे.
  10. वज्रासनामुळे  जेव्हा पाचनक्रिया स्वस्थ होते‌. शरीर  शक्तिमान बनून  रोगप्रतिकारशक्ती बलवान होते.
  11. वज्रसाना मुळे किडनी, मूत्राशय व मूत्रनलिका ह्या सक्रिय होऊन मुत्र रोगापासून बचाव होतो व प्रॉस्टेट ग्रंथी चे रोग सुद्धा दूर होतात.
  12. वज्रासनामुळे पेल्व्हिक (Pelvic) क्षेत्रावर दबाव पडत असल्यामुळे महिलांची ओव्हरीज/ Ovaries) गर्भाशय आणि पुरुषाचे  (Testes) टेस्टीज ग्रंथी वर सुद्धा प्रभाव पडतो. त्यात रक्त प्रवाहाची गती वाढल्यामुळ वीर्य निर्माण तेजीने होऊ लागते. वीर्य घट्ट होते. पुरुषांची स्तंभन शक्ती (Erectile Function) सुदृढ होते. महिलांचे वांझपन, पुरुषांची नपुंसकता दूर होते. हार्मोन प्रणाली योग्य प्रकारे काम करते‌. मेनोपॉझ नंतर गर्भाशय लटकणे सारख्या भयंकर आजारावर बचाव करता येतो. (Prolapse of Rectum) विकारा पासून सुध्दा बचाव करता येतो. 
  13. आपण व्हेरिकोज व्हेन्स (Vericose Veins) चे नाव ऐकले  असेलच. व्हेरिकोज व्हेन्स म्हणजे आपल्या पोट-यामधील शिरांमध्ये अशुद्ध रक्ताचा झालेला गोळा असतो.  त्या नसा कडक किंवा निळ्या झालेल्या  असल्यामुळे हे अशुद्ध रक्त हृदयाकडे जाण्यास असमर्थ होते. ह्या शिरा कोरड्या (सुकलेल्या)  झालेल्या असल्या मुळे तीव्र पीडा व भयंकर वेदना होत असतात‌. अशा आजारावर औषध क्वचितच आढळते. ऑपरेशन हा कायम पर्याय नाही. वज्रासन केल्यामुळे हा आजार होत नाही किंवा झाला तरी तो त्वरित ठीक होतो.
  14. आमच्या पायाच्या पोटऱ्या हे हृदयाचे कार्य करीत असतात. ते हृदयापर्यंत अशुद्ध रक्त  पोहोचण्याचे कार्यास सक्षम करीत असतात. म्हणून पायाच्या पोट-यांना दुसरे हृदय (Peripheral Heart) सुद्धा म्हणतात. जेव्हा हृदयाची बायपास सर्जरी (Bye Pass Surgery) होते, तेव्हा याच रक्तवाहिन्यांचाच उपयोग केल्या जातो. वज्रासना मुळे पोट-यांच  फक्त स्वस्थ होत नसून आपले  हृदय देखील  स्वस्थ होत असते. रक्तसंचार योग्य राहत असल्यामुळे उच्च/ निन्म रक्तदाबाच्या  समस्या नियंत्रित असतात.  वज्रासना मध्ये बसल्यानंतर अशुद्ध रक्त स्वतः वरती (हृदयाकडे) जाणे प्रारंभ होत असल्यामुळे हृदयाची पंपिंग प्रणाली ला खूप आराम मिळतो. व हृदय स्वस्थ होते, म्हणजेच हृदय दाब योग्य प्रमाणात राहतो.
  15. वज्रासनात थोडे जास्त वेळ बसल्यानंतर पाय सुन्न होऊन त्रास व्हायला लागतो. कारण की तेथील  रक्तसंचार  थोड्या वेळापुरता थांबलेला असतो किंवा कमी झालेला असतो. परंतु जेव्हा आपले पाय सरळ करतो. तेव्हा पायाच्या नसा नसा मधून  तीव्रतेने रक्तसंचार प्रारंभ होतो. या क्रियेमुळे पायातील सर्व रक्त नाड्या लवचिक बनतात. प्राणायामात जो कुंभका चा लाभ होतो, तोच लाभ येथे पायांना प्राप्त होतो.
  16. वज्रासनामुळे मूलाधार, स्वाधिष्ठान, मणिपूर आणि अनाहत चक्र हे प्रभावित होतात. व या चक्रा संबंधित सर्व अंग गतिशील होतात. अनाहत चक्राचा संबंध श्वसन व रक्तसंचार प्रणाली (वायू तत्व), मणिपुरचक्रा चा संबंध पूर्ण पाचन प्रणाली (अग्नी तत्त्व), स्वाधिष्ठान चक्राचा संबंध सुजन, प्रजनन प्रणाली (जल तत्व) व मूलाधार चक्राचा संबंध निष्काषण प्रणाली, अस्थी व मांसपेशी प्रणाली  (पृथ्वी तत्व) आहे. ह्या सर्व  प्रणाली स्वस्थ होऊन जातात. या ४ चक्राचा संबंध वरील ३ चक्र- विशुद्धी, आज्ञा व सहस्त्रार चक्रा  सोबत असतो.   त्यामुळे ते सुद्धा जागृत होतात.  सातही चक्राच्या क्रियाशीलतेमुळे  स्नायू प्रणाली सुद्धा ठीक होऊन जाते. आणि मानसिक रोग  निघून जातात. नकारात्मक विचार दूर होतात. आणि अध्यात्मिक प्रगतीच्या सर्व अडचणी दूर होऊ लागतात.
  17. या चक्रांसोबत वायूतत्व, अग्नी-तत्व, जलतत्त्व, पृथ्वीतत्व तसेच आकाशतत्व यांचा समन्वय  झाल्यामुळे  आपले शरीर संपूर्णतः स्वस्थ होऊन जाते. सरते शेवटी वज्रासनाचा अर्थ- हा संपूर्ण तन व मनाचा व्यायाम आहे.
  18. आमच्या शरीरातील सर्व गतिविधी सूर्य व  चंद्र नाडीवर अवलंबून असतात. वज्रासनामुळे या  २ नाड्यांचे संतुलन बनून राहते. जी व्यक्ती सकाळी अर्धा तास व सायंकाळी अर्धा तास वज्रासनात बसून अभ्यास करीत असेल ती व्यक्ती कधीही आजारी होऊ शकत नाही. वज्रासनात बसून जर दीर्घ व खोल श्वसनाचा अभ्यास किंवा अनुलोम-विलोम प्राणायाम चा अभ्यास केला तर प्राणायाम आणि वज्रासन ह्या दोघांचाही लाभ एकत्र प्राप्त होऊ शकेल.
  19. वज्रासना मध्ये बसल्यामुळे शरीरात ऊर्जा चे संतुलन राहते. तसेच शरीरातील  सर्व अंगामध्ये शक्तीचा संचार होतो. शरीर व मन दोन्हीही शक्तिशाली बनतात. 
      आता तरी  आपणास विश्वास निर्माण झाला असेल की वज्रासन हे आरामाचे आसन असून त्यामुळे व्यायामाचे सुद्धा पूर्ण फायदे प्राप्त होतात. 
सावधानी:- ज्या लोकांना गुडघ्याचा त्रास आहे त्या व्यक्तिंनी वज्रासनात बसू नये. 
       परंतु ज्यांचे गुडघे स्वस्थ आहेत, त्यांचे गुडगे वज्रासनामुळे आणखी मजबूत  होतील‌‌. कारण गुडघे व जाघांच्या मासंपेशी लवचिक बनतात. जाघेंच्या नाड्या वज्राप्रमाणे मजबूत होतं जातात.



■■■■■■■■■■■■■■■■■■■■■■■■■■■■

दि.८ जून २०२०

आसने.                                   
१) पवनमुक्तासन 
२) सायकलिंग 
३) रोलिंग 
४)उत्थित पादासन 
५) तडागी 
६) शलभासन 
७) उत्थित पाद कटीचक्रासन (कैची) 
८) नौकासन ४ पत्रकार 
९) सर्पासन व भुजंगासन ४ प्रकार 👍🏾

■■■■■■■■■■■■■■■■■■■■■■■■■■■■

दि.९जून २०२०

🧎🏽🧎🏽‍♀️🧎🏻‍♂️👌🏼🤘[Keshavrao Chetule : 8.01am]
*मधुमेहीवर योगासनाचे परीणाम*.
योगीक क्रीया व योगासनाने मधुमेह कसा नियंत्रीत करता येतो, प्रात्यक्षिक व सुंदर विस्तृत विवेचन आज सादर केले.🌹🙏🏼 
आवाज पुर्ण स्पष्ट ऐकु येत आहे. 

समाज बांधवांनी मोठ्या प्रमाणात सहभागी होऊन  संधीचा लाभ घ्यावा
ही विनंती.  🌹🙏🏼🌹
■■■■■■■■■■■■■■■■■■■■■■■■■■■■

🙏 *योगगुरू योगाचार्य श्री रामकृष्ण ठवकर साहेब दररोज* *योगाप्रमाने आजचा योगा सुद्धा छांन आवाज तर एकदम मस्त स्वच्छ आजचा योगा मुख्यत्वे साखर (diabetes) रोगाचे निर्मूलन करण्याकरिता खूपच उपयुक्त करीता फायदेशीर ठरनारा आहे*
🙏🌹👌👌💐
🌹 *धन्यवाद साहेब* 🌹

 - *गजानन तिजारे,पुणे*
■■■■■■■■■■■■■■■■■■■■■■■■■■■
दि.१० जून २०२०

  



शुध्दी क्रिया (षट् कर्म)
गृहिणी आपले घर रोज स्वच्छ करते.  जमा झालेला कचरा बाहेर टाकते. ते घर २४ तास प्रसन्न राहते. सुशिक्षित मानव आपल्या शरीरातील जमा झालेला कचरा बाहेर टाकत नसल्यामुळे त्याला रोग होतात. ‌ शरीर व मन हे अंतर्बाह्य शुद्धीकरणासाठी योगामध्ये ६ प्रकारच्या शुध्दी क्रिया सांगितल्या आहेत. म्हणून त्यास षट् क्रिया म्हणतात. आरोग्य साठी या षट् कर्माचे अनन्यसाधारण महत्त्व आहे.
“सर्वे रोग: प्रजायन्ते जायन्ते मल संचयात्” |
आयुर्वेदाचा आधार वात-पित्त-कफ हाच आहे.
आयुर्वेदाचे दोन सूत्र 
  1. स्वास्थस्य सर्वार्थ रक्षणम् |  रोग आयुष्यभर होऊ नये. 
  2. आतुरस्य विकार रोग झाल्यास तो निवारण करून निसर्गासह जीवेम शरदः शतम् आयुष्य जगण्यासाठी सहकार्य करणे.
             योगशास्त्राचे हेच उद्दिष्ट असते. आपले शरीर वात, पित्त व कफाने बनलेल्या आहे. या तीन अनावश्यक दोष आरोग्याचे दृष्टीने प्रमाणबद्ध म्हणजेच, समान करणे हा महत्त्वाचा मार्ग आहे, त्यामुळे आपले शरीरात सप्त रस तयार होतात आणि जो अनुपयुक्त ‘मळा’चा भाग बाहेर फेकला जावयास हवा तो तसाच शिल्लक YHराहिल्यास, त्याचे इतर अंगावर परिणाम होतात. आपल्या शरीरातील डॉ. आपणास वेळोवेळी सूचना देत असतो. त्याकडे लक्ष न दिल्यास त्याचे गंभीर परिणाम होऊ लागतात‌. मग आपण औषधे, इंजेक्शन व अँटिबायोटिक्स (Antibiotics) घेत असतो. अँटिबायोटिक्स चे परिणामाने मुत्रपिंड, हृदय आणि लाल रक्तपेशी सुद्धा मरतात. आजच्या युगातील व्यक्तींना झटपट आराम हवा असतो. वनस्पतीजन्य आणि खनिज औषधाने चांगला परिणाम होतो.  ऍलोपॅथी ने रोगाला दाबण्याचा प्रयत्न होतो. पुढे त्याच रोगाचे स्वरूप पूर्वीपेक्षा उग्र  होते.
विजातीय (वात-पित्त-कफादी) औषधाशिवाय बाहेर काढण्याचा एकच उपाय आहे. तो म्हणजे  षट् कर्माचा (अभ्यास) मार्ग होय. ह्यामुळे विजातीय तत्व बाहेर फेकल्या जातात. त्यामुळे अन्ननलिका, श्वसन नलिका,
 नाड्या तंत्र मलरहीत होऊन शरीर निर्मळ बनते.
‘धौतिर्बस्तिस्तथा नेतिस्त्रटकं नौलिकं तथा ||
कपालभातिश्चैतानि षट्कर्माणि प्रचक्षते' || ||२-२२||
  1. धौति
    1. बाह्य शुद्धी 
      1. स्नान
      2. किरण स्नान
      3. मालिश
    2. अंतर शुद्धी 
      1. जल धौति
      2. वस्त्र धौती
  2. नेति 
    1. सुत्र नेती 
    2. रबर नेति
  3. कपालभाति 
    1. आध्यात्मिक
    2. शारीरिक
  4. नौली 
    1. मध्य नौली
    2.  वाम नौली
    3. दक्षिण नौली
  5. बस्ती 
    1. बास जलबस्ती
    2. महा बस्ती
    3. वायु बस्ती
  6. त्राटक 
    1. आंतर त्राटक
    2. मध्यम त्राटक 
      1. बिंदू त्राटक
      2. ज्योती त्राटक
    3. बाह्य त्राटक
शुद्धिक्रिया तर ६ आहेत. परंतु त्याच्या सोबत शुद्धी कर्म आणि शोधन कर्म सुद्धा सांगितलेले आहेत. हेही शुद्धि क्रियांचे भाग आहेत. 

नेत्र स्नान:-  

सुप्रभाती उठल्यानंतर आपण, एक सुभाषित, दोन्ही हाताच्या तळव्याचे दर्शन घेऊन, तसेच दोन्ही हाताचे घर्षण करून, तोंडावरून हात फिरवून ही प्रार्थना म्हणतो. 
‘कराग्रे वसते लक्ष्मी|  करमध्ये सरस्वती ||
करमुलेश्च गोविंदा | प्रभाते कर दर्शनम्' ||
त्यानंतर अंथरून सोडावे. ताबडतोब  हंड्यातील अथवा नळाचे पाणि  तोंडात मावेल तितके, गाल फुगवून, डोळे उघडे ठेवून, एका हाताचे ओंजळीने वारंवार दुसऱ्या पाण्याने डोळ्यावर हबके मारावेत, जीव घाबरा झाल्यास तोंडातील पाणी टाकुन देउन परत तोंडात पाणी भरा व वरीलप्रमाणे डोळ्यावर २०-२० हक्के तीन टप्प्याने मारा. या कृतीला नेत्र स्नान असे म्हणतात. नेत्र स्नान सकाळी झोपेतून उठल्यावर, रात्री झोपायच्या आधी उन्हातून आल्यानंतर आणि मुले जेव्हा अभ्यासाला बसतात त्यापूर्वी, करावयाचे आहे. यामुळे डोक्यातील उष्णता कमी होऊन डोके शांत व थंड होते.  डोळ्याची जळजळ, उष्णता कमी होते. आळस जाऊन उत्साह निर्माण होतो. डयोळ्याचे गरमीचे विकार नष्ट होतात‌‌. मुलांनी अभ्यासापूर्वी हे केल्यास मन एकाग्र होते. रात्री झोप शांत लागते‌. दृष्टी स्वच्छ होते‌‌. यानंतर शौच विधी वगैरे आटपून पुढील प्रमाणे जलधौतिची क्रिया करावी.

जलधौति:-
जलधौतिचे मुख्य दोन प्रकार आहेत. १) बाह्य शुद्धी (Outer Cleaning) आणि २) अंतर शुद्धी (Internal Cleaning) या बाह्य शुद्धीत किरण स्नान (Sun Bath) आणि मालिश यांचा समावेश होतो

स्नान (Bath)
आपल्या शरीरावर असंख्य रध्रै आहेत. शरीरात निर्माण होणारा मळ घामाच्या रुपाने या रंध्रातून बाहेर पडतो. निसर्गाने या शरीरात एक अशी यंत्रणा सुस्थापित केली आहे. ज्यामुळे मल-मूत्र आणि घामाच्या रूपात विजातीय सतत बाहेर फेकले जाते. स्नानाचा उद्देश त्वचा व त्यावरील छिद्रे स्वच्छ करणे होय. आजकाल स्नानाला तरी कुठे वेळ आहे? जरी केले तरी झटपट उरकावे लागते. त्यामुळे फक्त त्याच्या त्वचा थोडीफार स्वच्छ होते. पण त्यावरील छिद्रे मळाने भरलेलीच असतात. असाच क्रम सतत चालू असतो. कालांतराने त्वचेवरील छिद्रे बंद पडल्यामुळे अशुद्धी वाढते व चामडीच्या विकारापासून अनेक विकार उद्भवूण्याचा संभव असतो. करीता कधितरी सवडीत  मधून मधून शरीराला अंघोळी आधी १५ मिनिटे तेलाने रगडल्यास शरीर गरम होते व त्वचे वरील छिद्रातील मळ सुटतो व नंतर गरम पाण्याने अंघोळ केल्यास त्वचा मलरहित होते. तेलाचा मसाज खालून वर उलट्या दिशेने केला पाहिजे. तेलाचा मसाज आठवड्यात एक दिवस केला तरी चालेल व त्याच दिवसापुरता गरम पाण्याचाही उपयोग केला तरी चालेल. इतर वेळी स्नान थंड पाण्याने करणे आवश्यक आहे. थंड पाण्याने स्नान करताना प्रथम पायाची बोटे, पायाचा वरचा भाग, घोटा, पोटरी, गुडघा, मांड्या, कंबर, पोट, छाती, गळा, मान, चेहरा आणि नंतर डोके अशाप्रकारे खालून क्रम ठेवल्यास आपण हिवाळ्यात सुद्धा थंड पाण्याने आंघोळ केल्यास आपल्याला काहीही बाधा होत नाही. आपलं शरीर गरम होत जाते, उलट दिशेने अंघोळ केल्यास शहारे  येऊ लागतात. प्रात: स्नान कांती आणि उत्साहवर्धक असते. रक्तदोष पित्तदोषाचे निर्मूलन होऊन इंद्रिये शांत व प्रसन्न होतात.

किरण स्नान (Sun Bath)

भारत देशात ३५०-३५५ दिवस सूर्यप्रकाश अस्तित्वात असतो. खनिजे- कॅल्शियम, मॅग्नेशियम, पोटॅशियम, सोडियम इ. सूर्यप्रकाशा शिवाय त्याचे शरीरात शोषण होऊ शकत नाही. थंड कटिबंधात राहणारे  किरण स्नानाचे (Sun Bath) महत्त्व जाणतात. भारता सारख्या उष्ण कटिबंधाताचे देशातही त्यांचे महत्त्व काही कमी नाही. 
‘आरोग्यं भास्कराविच्छेत्'| 
आरोग्य देणारा आणि अनारोग्य घालविणारा सूर्य १ महान चैतन्यशक्ती आहे. त्याच्या कोमल किरणांमध्ये सकाळी ८-१० वाजे पर्यंत २ तास उघड्या शरीराने पडून राहिल्यास आरोग्य वृद्धी होते. जगातील नामांकित डॉ रक्तशय पीडित रोग्यांना किरण स्नानाची खास शिफारीश करीत असतात. शहरी जीवनात ते शक्य नसल्याने त्यांना खेड्यात जाऊन ते करण्याचा सल्ला देतात. सूर्यकिरणांनी रक्त शुद्ध होऊन रक्ताभिसरण उत्तम प्रकारे होते व कडकडून भूक लागते. वैज्ञानिक दृष्टीने हाडांची मजबुती सूर्य प्रकाशावर अवलंबून आहे. सूर्यकिरणांनी शरीरात प्रक्रिया सुरू होऊन “ड” जीवन सत्व (Vit-D) तयार होते. त्याचा परिणाम मुडदूसचा (Rickets) विकार दूर होऊन आरोग्य लाभते.

मालिश

बाह्य शुद्धीच्या इतर इलाजा बरोबरच मालिशचा इलाज फारच लाभदायक ठरला आहे.
शुकेषु मे हरीमाणं रोपणाकासु दध्मसि | अथो हारीद्रवेषु हे हरीमाणं निदध्मसि || (सौर सूक्त १२)
वय वाढल्यानंतर स्नायू कठीण आणि कमजोर बनतात, त्वचा वाळते. तेलाचे मालिश केल्यास ते लवचिक व कार्यक्षम बनतात. रंध्रात लपलेले (साचलेले) अशुद्ध मलरूपाने बाहेर निघून जाते. परिणामतया त्वचा मऊ होते. अनियमित रक्ताभिसरण नियमित होऊन रक्ताचे अभिसरण वाढते.
‘अभ्यंगमाचरे नित्यं स जरा श्रम वातहा: | दृष्टी  प्रसाद पुष्ट्यायु: स्वप्नसुत्वकत्व दार्ढ्यकत्||||वाग्भट सूत्र||
नियमितपणे शरिराचे तेलाने मालिश केल्याने वृद्धावस्था लवकर लाभत नाही. त्याने वातविकार नाहीसे होऊन थकवा दूर होतो.  रक्ताभिसरण उत्तम चालते, शरीर पुष्ट होते, नजर तेज होते, शरीर स्वस्थ होऊन सुखाची झोप लागते. मनुष्य दीर्घायुषी होतो.

तेल मालिशचा प्रभाव
बाळंतपणानंतर मातेचा व बाळाचाही काही दिवसांपर्यंत तेलाचा मसाज करावा लागतो. हा मसाज त्याचे शरीरातील उष्णता वाढण्याचे काम करतो. स्त्रीचा थकवा दूर होऊन बाळाची कांती वाढते. रक्ताभिसरण चांगले होते. आजकाल इलेक्ट्रिकल मसाजचाही उपयोग केला जातो, परंतु तो एक सुष्क (Dry) (कोरडा) असा उपचार आहे. तेल मालिश शरीरातील नसनाड्या आणि अवयव मजबूत व लवचिक बनून खांद्याचे दुखणे दूर होते. आपणास कल्पना असेल की महात्माजी नेहमी तेलाचे मालिश करून घ्यायचे. त्यांचा परिणाम ते ७८ वर्षाचे वयातही ८-१० मैल  सहज न थकता चालू शकत होते. त्यांना रक्तदाब (Blood Pressure) चा त्रास  होता. तेलाच्या नियमित मालिशने त्यांनी तो विकार काबूत ठेवला होता. तेल मालिश हा एक स्वस्त व हितकारक असा इलाज आहे. अर्थातच हे सर्वांना शक्य नसले तरी अनेकांसाठी तो इलाज फायदेशीरच आहे.
‘शुष्कनापि काष्टानि  स्नेहस्नेदोष-पादनै:| नमयंति यथा न्यायं किं पुनर्जीवितोनरान्'||
सुकलेले लाकूड किंवा बांबूची काठी यांना तेलात थोडे भिजवून नंतर त्याला शेक दिला गेला तर ते नरम व मजबूत बनतात. त्याचप्रमाणे आपली हाडे मालिशने मजबूत व चिवट होतात. मृत जनावरांच्या कातड्याला तेल दिले जाते. त्याची मशागत केली जाते व नंतर तीच कातडी दुर्गंधरहित व चमकदार होते. लहान-मोठ्या यंत्रात तेल सोडूनच ती कार्यक्षम ठेवावी  जातात.
वरील प्रमाणे मालिश चे महत्त्व असाधारण आहे. तसा आमचा अनुभवही आहे. तापाच्या अवस्थेत मालिश करणे अहितकारक आहे. मालिश  एक प्रकारचे घर्षण आहे. त्याने शरीरात विद्युत निर्माण होते‌. अशुद्ध रक्‍त शुद्ध झाल्यानंतर लाल रक्तपेशी वाढत असतात व प्रतिकारशक्ती वाढून रोगाचे निवारण होते. शरीरामध्ये इलेक्ट्रॉन आणि प्रोटॉनची भरपूर वृद्धी होते. डुबळ्या  प्रकृतीच्या व्यक्तिमध्ये ते अगदी कमी असतात. ते वरीलप्रमाणे वाढविल्यास आरोग्यरक्षण होते. स्नान, मालिश हे  बाह्य शुद्धीत येत असल्याने संक्षिप्त माहिती याठिकाणी दिली गेली आहे. आता अंतर्शुध्दीचे प्रकाराकडे आपण वळू. 
अंतर शुद्धी चे २ प्रमुख प्रकार आहेत. जलधौति व वस्त्रधौति.

1. जलधौति

अं:तधौति वरील प्रमाणे २ प्रकाराने केली जाते. वास्तविक जो जलधौति करतो. त्याने वस्त्र धोती केलीच पाहिजे असे  नाही. अभ्यासाच्या दृष्टीने करावयास हरकत नाही. परंतु अनावश्यक वात-पित्त-कफ घालविण्यासाठी फक्त जलधौतिचा उपयोग सुद्धा पूर्ण फलप्रद होतो. जलधौति म्हणजे पोटात पाणी घेऊन वमनाद्वारे बाहेर काढणे व वस्त्रधौति म्हणजे पोटात कपडा गिळून बाहेर काढणे. वस्त्रधौतिचा उपयोग क्वचित प्रसंगीच करावयाचा असतो. 
नेत्र स्नानापासून आपण शुद्धीक्रिया सुरुवात करीत असतो. कोणतेही शुद्धीकरण प्रात:कालीन केलेले अधिक चांगले असते.
     सुरुवातीचे काही दिवस २ मोठे ग्लास कोमट पाणी घेऊन त्यात जरूर भासल्यास मीठ घालून ते पाणी प्यावे व लगेच उजव्या हाताच्या मधल्या ३ बोटांनी मोठ्या जिभेवर पडजीभेपर्यंत घर्षन करावे. प्यायलेले पाणी वमन करून बाहेर काढण्याचा प्रयत्न करावा. प्रथम सर्व पाणी बाहेर पडणार नाही. परंतु सवयीने २-४ दिवस प्यायलेले पाणी बाहेर पडताना ते पाणी कफ-पीतमिश्रित असल्याचा अनुभव येईल. सुरुवातीस थोडे पाणी पोटात राहून गेल्यास ते सौचा व लघवीद्वारे निघून जाईल. (जर आपणास लगेच बाहेर जावयाचे असल्यास काही पार्ले-बिस्कीट  किंवा कुरमुरे खाल्ल्यास त्या पाण्याचे शोषण होऊन आपणास बाहेर गेल्यानंतर सौच अथवा लघवीचा त्रास होणार नाही.) पाणी पडू लागल्यानंतर दर दिवशी थोडे थोडे पाणी वाढवून ८-१० ग्लास पाणी पिण्याची मजल गाठावी. सर्व पाणी बाहेर पडू लागेल. सवयी नंतर मीठ घालण्याची जरुरी नाही. तसेच सवय चांगली झाल्यानंतर प्रत्येक दिवशी जलदौती करण्याची जरुरी नाही. नंतर प्रसंगोपात तिचा उपयोग करावा. पुढे पुढे थंड पाणी घटाघटा पिऊन बिनास्पर्श बाहेर उलटी करून फेकून देता येते. सदरची क्रिया ओणवे होऊन अगर बसून करावी. बाहेर पडणार्‍या पाण्याबरोबर कधीकधी आपल्याला न पचलेले अन्न, आम्लपित्त, कडूपित्त, कफ आदी विजातीय बाहेर पडताना दिसेल. अभ्यासानंतर ही क्रिया करण्यास फक्त ५ मिनिटे पुरे आहेत‌. कोठा व अन्ननलिका साफ केली जातात. ‘त्रिदोष’ समान होऊन शरीर हलके होते. अपचनाचे रोग घालविले जावून. मेद कमी केला जातो‌. 
(सूचना:- शरीर क्षीण, जीर्ण ज्वर, घशात अगर छातीत काही विकार असल्यास जलधौति करू नये.) मेद वाढलेल्या व कफाने पछाडलेल्या व्यक्तीनेही धौती केलीस पाहिजे. ज्यांना संधिवात आहे म्हणजे गुडघेदुखी, सांधेदुखी असल्यास त्यांना जलधौतिचा खूप फायदा होतो. असे अनेक कल्पनातीत लाभ होतात.
विशेष सूचना:- जलधौति  करतांना जोर लावू नये. सहज पाणी बाहेर काढता येईल तेवढे काढावे. हाताच्या बोटाची नखे कापली नसल्यास टाळू ला लागून रक्त येऊ शकते. जोर लावल्यास कदाचित रक्ताचे थेंब पाण्याबरोबर आढळतात. तसे झाल्यास साधकाने घाबरू नये पुन्हा केव्हातरी प्रसंगानुसार केल्यास चालेल. पोटातील पाणी बाहेर काढता येत नसल्यास, अगर भीती वाटत असल्यास, पाणी पोटात राहिल्यास हरकत नाही. शौचा व लघवीवाटे ते निघून जाईल. त्याचाही चांगला परिणाम म्हणजे सौच संबंधी विकार ठीक होऊ लागतील.

जलनेती
जलनेती चे दोन प्रकार आहेत.१) जलनेती व २) सूत्रनेती. जलनेती म्हणजे नाकाने पाणी पिण्याची क्रिया. सूत्र नेती म्हणजे नाकात सुत धाग्याने बनवलेले सूत्र घालून, अगर रबरी कॅथेटर घालून नाक साफ करण्याची क्रिया. यात सूत्र नेतिचा उपयोग सर्वांनी केलाच पाहिजे असे नाही. अभ्यास आणि नाकाचे विशेष दोष घालविण्या साठी करावे.
   सर्वसाधारणपणे आरोग्यासाठी जल नेतिचा चांगलाच उपयोग होतो. प्रथम दिलेल्या जलधौतिचा  थोडा अभ्यास झाल्यानंतर, त्याची हळूहळू सवय करावी. जलनेती करावयास बसतानाच  एका वाटीत कोमट पाणी घेऊन, जरूर असल्यास त्यात थोडे मीठ घालून, वाटी दोन्ही नासिका पाण्यात बुडतील अशी धरावी. वाटीतील पाणी एकदम वर न ओढता जसे वरील तोंडाने पाणी पितो, त्याप्रमाणे ते नाकाने प्यावयाचे आहे अशी नुसती कल्पना करून सावकाशपणे पाणी वर ओढावे. सवयीने थोडे पाणी घशात आल्याचा अनुभव येईल. दुसरा एक प्रकार चिनीमातीचे किटली सारखे तोटी असलेले लहान भांडे घ्यावे. व 

वरीलप्रयाणे मीठ मिश्रित पाणी त्यात भरावे. भांड्याची तोटी एका नासिकेत घालून मान खाली तिरपी वाकवून इटलीतील पाणी नाकात सोडावे. तोंड उघडले  ठेवले म्हणजे ते पाणी दु स-या नासिकतून बाहेर पडेल. त्याचप्रमाणे दुसऱ्या नासिकेतुन तशी सवय करावी.
वरील प्राथमिक प्रयोग करताना २ दिवस थोडा त्रास सहन केला म्हणजे ८ दिवसात वाटीतील घेतलेले पाणी सहज दोन्ही नासिकेने  पिता येते. नासिकेने  ओढलेले पाणी तोंडातून बाहेर टाका अगर पोटात गेल्यास हरकत नाही. पोटात गेलेले पाणी जलधौतिने बाहेर काढता येईल. सवयी नंतर गरम पाणी घेण्याची अगर त्यात मीठ घालण्याची आवश्यकता नाही. दिवसात केव्हाही वाटल्यास १ ग्लास थंड पाणी नाकाने पिणे चांगले. चहा-कॉफी अगर थंडपेय पिऊन सुस्ती घालविण्यापेक्षा वरील प्रयोग अति उत्तम व आरोग्यप्रद आहे. त्याचे लाभ ही अप्रतिम आहे.
लाभ:-
नेती केल्याने सर्दी पडशाचे विकार नाहीसे  होऊन कपाळाची शुद्धी होते. अनेक वर्षांची डोकेदुखी थांबते, दिव्यदृष्टी लाभते. सायनस सारखे विकारात प्रसंगानुसार रोगाचे स्वरूप पाहून 'सूत्रनेति' चा ही उपयोग करता येतो. ज्यास नाकाने पाणी पिण्याची सवय झाली आहे, त्यास सुत्रनेति सहज करता येते. नाकातील मांसल भागात असलेली सूज वगैरे नाहीसे होऊन श्वसनलिकाची शुद्धी होते व नंतर कपालभाती चे विशेष कर्म करणे  सोपे जाते. जलनेतीचे रात्री जागरण करणाऱ्या, निद्रानाश असलेल्या व डोक्यात उष्णता वाढलेल्या व्यक्तींनी अवस्था अवश्य करावी. अनेक वर्षाची डोकेदुखी, अर्धशिशी वगैरे रोग नाश पावतात.

सूत्र नेति


थोडी कल्पना यावी या दृष्टीने सूत्र नेति देत आहे. अर्थातच या क्रिया  प्रत्यक्ष समजून घेणे फार महत्त्वाचे असते. सूत्रनेति १२ इंच लांबीचा सुताच्या ८-१० धाग्यांना एकत्र करून, त्याची दोरी बनवून त्या सूत्रनेतिस अगर रबराच्या कॅथेटरला एका बाजूने तूप किंवा मेंण लावून या नासिकेत घालून हळूहळू गळ्याच्या पडजिभेपर्यंत घेऊन जाण्याचा प्रयत्न करावा. नंतर एक टोक हातात धरून, दुसऱ्या हाताची तर्जनी व अंगुष्ट तोंडात घालून घशातुन थोडा हवेचा जोर द्यावा व आतील दुसऱ्या टोकाला पकडावे. दोन्ही हातांनी पकडलेल्या सूत्रनेतिने मागे पुढे हळूहळू घर्षन करावे. त्याचप्रमाणे दुसऱ्या नासिकेनेही करावे. नेतिकर्माचे लाभ वरील प्रमाणे.
(सूचना:- डोळे, नाक, कान व मस्तक यांच्यात काही त्रासदायक रोग असल्यास नेति करू नये.

नौली कर्म:- 
(दक्षता नौली कर्म करण्यापूर्वी ३ बंध- मुलबंध, उडियान बंध व जालंदर बंध तसेच अग्निसार आणि उड्डियान या क्रिया केल्या नंतरच याचा अभ्यास करावा.)
अग्निसार म्हणजे पोटाला श्वास रहित अवस्थेत हबके भरण्याची क्रिया.( या क्रियेला मुग्ध भस्त्रिकाही  म्हणतात.) या क्रियेने पोटाची चांगली मशागत होऊन ‘उड्डियानाची’ क्रिया साध्य झाली. आता या उड्डियानाचा अभ्यास करीत करीत पोटाचे  मध्यातील दोन्ही नळ वर उचलण्याचा प्रयत्न करावयाचा आहे‌ यावेळी बसून किंवा ओणवे उभे राहून ही क्रिया करावी. अभ्यासाने पोटातील मध्य नळ वर येतील. त्या क्रियेला मध्यनौली असे म्हणतात‌.  त्यानंतर गुडघ्यावर ठेवलेल्या दोन्ही हातांचा क्रमश: दाब हलका केला म्हणजे डावीकडील नळ स्पष्टपणे काढता येतील. याला वामनौली  किंवा दक्षिणनौली असे म्हणतात.
‘अमदावर्तवेगेन तुंदं सव्याप्त सव्यत||
 नतांसो भ्रामयेदेषा नौली: सिद्धै प्रचक्षते' ||||मठ.२/३३||
खांदे पुढे वाकवून बाहेर काढलेल्या नळांना, पाण्याला जसा भोवरा पडतो त्याप्रमाणे उजवीकडून डावीकडे व डावीकडून उजवीकडे चक्राप्रमाणे नौली फिरवायच्या कृतीला श्लोकात नौली म्हटले आहे‌. नौली चक्र फिरविण्याचा चांगला अभ्यास झाल्यानंतर रिकामे पोट असेल त्यावेळी अर्धा ग्लास कोमट पाणी त्यात थोडे मीठ व थोडे लिंबू पिळून ते पाणी पिऊन टाकावे व नंतर उभे राहून वरील प्रमाणे ‘चक्रावर्तन’ नौली करावी. एखाद्या काचेच्या बाटलीतील पाणी घालून ती स्वच्छ करण्याकरीता जशी क्रिया केली जाते त्याप्रमाणे पोटातील मळाची सफाई होते. जिज्ञासूंनी त्याप्रमाणे अनुभव घ्यावयाचा हरकत नाही.
लाभ:- पोटाचे कठीणत्व, वात, पित्तादी विकार संग्रहणी, अग्निमांद्यता, बद्धकोष्ठता आदी विकार नाश पावतात. प्राणवाहिनी नाडी ‘सुषुम्ना” चा मार्ग खुला होण्यास मदत होते. पोटातील आतडी सबळ बनवून पचन शक्ती वाढते. पोटात काही विजातीय गेल्याचा संशय असल्यासही प्रसंगानुसार ते विजातीय बाहेर काढण्याची उपरती होते. 
(सुचना:- अनुभवी व्यक्तिच्या मार्गदर्शना शिवाय करू नका. प्रत्यक्ष माहिती घ्या)

बस्ती क्रिया
वरील सर्व क्रियांचे नंतर बस्तीचा अभ्यास सांगितला आहे. बस्ती ३ प्रकारची केली जाते. १) बास बस्ती,  २) महाबस्ती ३) वायू बस्ती
सर्वसाधारण अभ्यासा साठी ‘बास बस्ती' चा अभ्यास केला जातो. बाकी बस्ती जरा कठीण आहेत‌. बस्तीचे स्थान मूलाधाराच्या जवळ आहे. त्याला साफ करण्याच्या क्रियेला ‘बस्ती’ म्हणतात.
विधी:- 
  1. बास जल बस्ती:- एक ६ इंचाची बांबूची चिकणी नळी घेऊन तिला स्निग्ध पदार्थ लावून ४ नळीचा गुदद्वारात प्रवेश करणे व नौली कर्माचा साहाय्याने खाली भांड्यात ठेवलेले पाणी त्या नळीने गुरुद्वारातून आत पोटात  ओढणे व ताबडतोब बाहेर काढून नौली कर्म करून पोटातील पाणी गुद द्वारा वाटे बाहेर टाकणे त्यांचे नाव बासजलबस्ती' असे आहे.
  2. महा बस्ती:- कमरेवर असलेल्या पाण्यात उभे राहून निव्वळ गुथद्वारे पाणि आंत ओढणे व सोडणे याला ‘महाबस्ती’ असे म्हटले आहे. ही बस्ती नदीत, तलावात केली जाते.
  1. वायुबस्ती:- जमिनीवर पाठीवर पडून दोन्ही हात पाय पोटावर आवळून गुथद्वारे बाहेरील वायु आंत ओढणे, सोडणे (अश्विनी मुद्रा करणे) याला “वायूबस्ती’  असे म्हटले आहे. हीच क्रिया पश्चिमोत्तानात बसूनही करता येते. सर्वसाधारणपणे काही अभ्यासू मंडळी बासजलबस्ती चा अभ्यास करतात. बाकी इतर जलबस्तीमुळे अज्ञानवश धोका पत्करावा लागतो म्हणून सावधान‌. काही विशेष लाभ शास्त्राने सांगितले आहेत ते असे-
‘गुल्मप्लीहोदरं चापि वात-पित्त-कफोद्भवा: || 
बस्ती कर्म प्रभादेन क्षीयंते सकलामया:'|| ||मठ २/२७||
अशा रीतीने बस्ती कर्म केल्याने, गुल्म विकार जलोदर व वात-पित्त-कफ यांनी निर्माण होणारे इतरत्र विकार संपूर्ण नष्ट होतात. शरीर हलके होते‌. मनुष्य वेगवान बनतो.
          
त्राटक’
 मानवाचे मनाचे विकार दूर करण्यासाठी योगातील शुद्धीकर्मात एक  महत्त्वाचे विशेष कर्म म्हणून अभ्यासावे लागते. ज्यामुळे या विधीने चित्ताचे एकाग्रतेपासून समाधीपर्यंतचा अभ्यास करता येतो.
मन या विषयात धर्मग्रंथात आपण कितीतरी आश्चर्यकारक अशी कथने वाचतो. संसारातील सर्व गोष्टींचा संबंध मनाशी असल्यामुळे त्या मनाला मानव कधी कधी संकटकाळी, निराशेच्या वेळी, पापी, चंचल, अधम अशा शब्दांनी संभोधतो. माणसाच्या सुखाला आणि दुःखाला कारण आहे मध.  म्हणूनच शास्त्राने केलेली मनाची व्याख्या सर्वांना पाठ आहे.
‘मन एवं मनुष्यांणा | कारण बंध मोक्ष यो:' ||
मानवाला प्रगतीच्या शिखरावर नेणारे आणि मुक्तीचे साधन मनच आहे. मनाची वृत्ती ज्यावेळी विषयभोगा कडे वळते त्याचवेळी ते पतनाला व दुःखाला कारण होते. पण जर मनाची गती उच्च विषय, उत्तम गुणांना संपादन करण्याकडे प्रवृत्ती होते त्यावेळी बुद्धी, ज्ञान, कर्म, आणि मुक्तिला ते  एक साधन म्हणून बनते. मनच भक्ति, ज्ञान, कर्म, मुक्ती, आत्मदर्शन (प्रभू दर्शन)  ह्याचे साधन आहे. याकरिता अध्यात्ममार्गात मनाला वश करण्या साठी, त्याला नियंत्रित करण्या साठी, उपयोगात आणण्यासाठी, “त्राटक” एक अती शक्तीशाली साधन आहे‌‌.
आता या महत्त्वपूर्ण “त्राटक” या विषयाचा या ठिकाणी आपण शोधनकर्माच्या दृष्टीनेच विचार करावयाचा आहे. म्हणजे “त्राटका”ने दृष्टीदोष व त्याबरोबरच त्यात संबंधित असे सूक्ष्म वाटणारे काही विकार यांचा नाश करायचा आहे. त्राटक हा विषय योगीजनांनी अतिमहत्त्वाचा व गुप्त असा मानला आहे. कारण त्याचे अध्यात्मिक महत्त्व फार मोठे आहे. सामान्य माणसास  त्याचा आरोग्याच्या दृष्टीने अभ्यास करावयाचा म्हटला तरी निराळ्या ग्रंथात व पुस्तकात ‘त्राटका’ बद्दल केलेल्या मार्गदर्शनाचा योग्य बोध होईलच असे सांगता येणार नाही. म्हणून सहज व सोपी अशी ही पद्धत त्याच्याच या ठिकाणी उल्लेख केलेला आहे 'त्राटका'ची शास्त्रीय ओळख व त्यांचे सुपरिणाम खालील सिद्धांता वरून स्पष्ट आहेत‌.
निरीक्षेत्रिश्चलदृशा सूक्ष्मलक्ष्यं समाहित: || 
अश्रूसंपातपर्यंतमाचार्यैस्त्राटकं स्मृतम्|| ||मठ.२/३१||
अर्थातच सिद्धासन, पद्मासन अगर सहज सुखासनात बसून एखाद्या सूक्ष्म वस्तूवर म्हणजेच ज्योती, बिंदू, आरशात आपल्या भूमध्य वर  डोळे उघडे ठेवून डोळ्यातून पाणी आले तरी टक लावून पाहण्याचा प्रयत्न करणे यास “त्राटक” असे म्हणतात.
मोचनं नेत्ररोगांणां तंद्रादिनां कपाटकम्||  
यत्नतस्त्रांटकं गोप्य यथा हाटक पेटकम्|| ||हठ.२/३२//
या श्लोकात त्याचे सुपरिणाम सांगितलेले आहे. याप्रमाणे त्राटक केल्याने ते नेत्ररोग नाशक असून तपोगुण आणि आळसाचा नाश करणारे साधन आहे. त्याला  सुवर्णाच्या पेटी प्रमाणे गुप्त ठेवले पाहिजे. घेरंड संहितेत याविषयी म्हटलेले आहे.
'एवमभ्यासयोगेन शाम्भवी जायचे ध्रुवम्||
नेत्रदोषाविनश्न्ति दिव्यदृष्टी: प्रजायते || || घे.१/५४||
“त्राटक” केल्याने नेत्र दोषाचे निवारण होऊन “शांभवी” भृकुटीमध्ये ध्यानाची अवस्था प्राप्त होते. व दिव्यदृष्टीचा लाभ होतो. त्राटकाच्या साधारण ३ पद्धती आहेत. १) आंतर त्राटक २) मध्य त्राटक ३) बाह्य त्राटक. 
  1. आंतर त्राटक:-
हे त्राटक करतांना डोळे बंद करुन ‘नाभि प्रदेश’ हृदय, भृकुटीचा मध्य वगैरे आतील इंद्रियावर आतून बघण्याची (अंतर्मुख होऊन नुसत्या कल्पनेने पहात राहण्याची) वृत्ती वाढविणे यास ‘आंतर त्राटक' असे म्हणतात.
  1. मध्य त्राटक:- डोळे उघडे ठेवून समोर ठेवलेल्या कागदावरील काळ्या बिंदूवर, एखादी दगडी लहान वस्तूवर, अक्षरावर, झाडांच्या हिरव्या लहान पानावर,  ज्योती वर टक लावून सतत पाहण्याचा अभ्यास करणे यास ‘मध्य त्राटक' म्हणतात.
  2. बाह्य त्राटक:- डोळे उघडे ठेवून लांब अंतरावरील म्हणजे आकाशा तील तारे, चंद्र व सूर्य उदयास्त, लांब पर्वतावरील अगर समुद्रातील दृश्यावर दृष्टी स्थिर करून पाहणे याला ‘बाह्य त्राटक' म्हणावे.
वरील प्रमाणे निरनिराळ्या वस्तू वर केलेल्या त्या त्राटकाचे वेगळे लाभ पण सांगितले आहेत. कोणत्या वस्तूवरील त्राटक कोणत्या व्यक्तीने किती वेळ, केव्हा व कसे करावे याबाबत साधकाने तारतम्य वापरले पाहिजे. सर्वाच गोष्टी लिखाणातून स्पष्ट होणे  शक्य नाही. म्हणून एखाद्या हट्टी साधकास त्यापासून लाभ होण्याऐवजी फार मोठे नुकसान सहन करावे लागते. उदाहरणार्थ  सूर्यावर त्राटक करायचे म्हटले म्हणजे सूर्योदय होत असतानाच काही सेकंदात पासून काही मिनिटेच ते करून नंतर लगेच थंड पाण्याने ‘नेत्रस्नान’ केले पाहिजे. याप्रमाणे नियम लक्षात घेता जर सूर्यावर जास्त वेळ त्राटक केले तर विशेष सिद्धी प्राप्त होईल या खुळ्या कल्पनेने साधक आपल्याच कल्पनेने कोणत्याही वेळी सूर्यावर त्राटक करून आपली दृष्टी गमावून बसले आहेत. तर कोणास मस्तक शूळचा  विकार उद्भवलेला आहे.  यातून आपणास एवढ्याच बोध घ्यावयाचा आहे की, त्राटकाचा आरोग्यापुरता फायदा  साधण्या साठी सूर्यादी कठीण दृश्यावर करण्याचा प्रयत्न न करता सोप्या दृश्यावर करावा.
मध्य त्राटकात  दिलेल्या विवेचनात अनुसरून खालील प्रमाणे त्राटकाची रीत प्रत्येकाने अभ्यासल्यास शंका व भीतीचे कारण राहणार नाही व कोणासही ५-२० मिनिटापर्यंत या त्राटकाचा आनंद लुटता येईल. या त्राटकाचे नाव आहे “ज्योती त्राटक“

“ज्य़ोती त्राटक”
स्नानादी कर्म आटोपल्यानंतर देवघरात अगर आपल्या बैठकीत जसे शक्य असेल त्याप्रमाणे तुपाचे अगर कापूर मिश्रित तिळाच्या तेलाचे निरांजन लावून तेथून ४-५ फुटाच्या अंतरावर आसनस्थ व्हावे. निरंजन ठेवण्याच्या जागेची उंची आपल्या डोळ्यासमोर “निरांजनाची ज्योत” येईल अशी असावी त्यासाठी तेवढ्या उंचीचे एक लाकडी स्टँड बनवून घेतल्यास चांगले. त्राटकात बसते वेळी एक थंड पाण्याची वाटी बाजूला भरून ठेवावी. त्राटक करावयाच्या जागी थोड्या वेळेपुरता अंधार असल्यास बरा वाऱ्याचा झोत सहसा निरंजना वर येऊ नये. ज्योत स्थिर व साधारण अर्धा इंच असावी. प्रसंगावर निरंजनाच्या अभावी मेणबत्तीही उपयोगात आणली तरी चालेल.
  आसनात बसल्यानंतर दोन्ही हातांची ओंजळ करून डाव्या हाताच्या तळव्यात उजव्या हाताची पाठ ठेवून आपल्या ओटीपोटाच्या पुढील बाजूस स्वाधिष्ठानाजवळ ते हात धरावेत. अगर दोन्ही मांड्यावर ध्यान मुद्रेत ठेवावे. नंतर ‘ज्योती' वर लक्ष्य केंद्रित करावे. सर्व विचारांना टाकून बाह्य दृश्यांना विसरण्याचा प्रयत्न करीत ‘ज्योती’ हे एकच लक्ष असावे. ज्योतीवर त्राटक करताना एकच भावना करावी की, डोळ्याचे ज्ञानतंतू बलवान होत आहेत. नेत्र प्रभावशाली व आकर्षक होत आहेत. जसजसे ज्योतीकडे पाहण्याचा प्रयत्न होईल तसतसे निरनिराळी दृश्यै आपल्यासमोर येतील. सिनेमाच्या फिल्म प्रमाणे एकामागून एक अशी मालिका लागेल. अभ्यास जसजसा दृढ होईल तसतशी ती दृष्ये कमी होत आहेत असा अनुभव येईल. नंतर आपणास ज्योतीशिवाय काहीही दिसणार नाही व याच वेळी साधकास नाटकाचा खरा अनुभवास येतो‌.२ मी‌. पासून ते १५ मी. पर्यंत अभ्यास साधावा. डोळ्यास पाणी आले तरी डोळे सहज बंद होणार नाहीत याची काळजी घ्यावी. पाणी आलेल्या अवस्थेतही डोळे न मिटता ज्योतीकडे पहात राहणे, नंतर थांबणे असह्य झाल्यास डोळे मिटून जितका वेळ आपण ज्योती कडे पाहत होतो, साधारण तितका वेळ डोळे बंद करून तेच ज्योतीचे दृश्य बघायचे आहे. नंतर दोन्ही डोळे उघडावयाचे तत्पश्चात एक डोळा त्या बाजूच्या हाताच्या तळव्याने बंद करून दुसऱ्या डोळ्यावर त्या बाजूकडील हाताने जवळ ठेवलेल्या वाटीतील पाणी घेऊन चार बोटांनी अगर पाण्यात भिजवलेला रुमाल घेऊन त्याने डोळ्याकडून नाकाकडे वारंवार फिरवावे. रुमाल फिरविते वेळी तो डोळा बंद राहील. हात डोळ्यांच्या कोपऱ्यात गेल्यावर डोळा उघडून त्याच उघड्या डोळ्याने ज्योतीकडे बघत रहावे तोपर्यंत हात कानाकडे गेलेला असेल. १०-१५ वेळा अशा तऱ्हेने पाणी फिरवल्यावर हाताने बंद केलेला डोळा उघडावा व पाणी फिरवलेल्या डोळा त्या बाजूच्या हाताच्या तळव्याने बंद करून उघडलेला डोळ्यावर वरील प्रमाणेच १०-१५ वेळा पाणी फिरवावे. दोन्ही डोळ्यावर अशा तऱ्हेने पाणी फिरवून झाल्यावर डोळ्याचे पाणी पुसून त्राटक बंद करावे‌. वेळच्या व साधनाच्या अभावी ज्योती त्राटक न जमल्यास अगरबत्तीच्या जळत्या भागावर अगर आरशात आपल्या भुवयांच्या मध्यभागी आज्ञाचक्रावर पाहूनही वरील प्रमाणे त्राटक करता येईल‌. या वेळी दोन ते अडीच फुटावरून त्राटक करावे. शक्यतो ‘ज्योती त्राटका‘ ने लाभ घ्यावा. 
(सूचना:- त्राटक करणाऱ्यांनी जलनेती चा अभ्यास केलाच पाहिजे.)

त्राटकाचे लाभ
आलस्याचा नाश होऊन मन स्थिर होते., शारीरिक व मानसिक उत्साह वाढतो‌. नेत्रदोष नाहीसे होतात. दृष्टी पवित्र व तेज होते. श्‍वासाची गती मंदावते.ब चंचलता कमी होते. त्राटक करणारा साधक आपले काम व क्रोध यांना बऱ्याच अंशी ‘अंकुश’ लावू शकतो. आंतरिक बलाची सिद्धी होते‌. योगात कुंभकांनी जो लाभ साधला जातो तो अर्थातच 'त्राटकां’ ने मिळतो. भावना आवरण्याची शक्ती प्राप्त होते‌. चित्ताची एकाग्रता स्वभाविक झाल्याने दृष्टी स्थिर होते. (पापण्यांची उघडझाप कमी होते.)
प्रौढ बुद्धीच्या विद्यार्थ्यांना त्राटकाचे कल्पनातीत लाभ होतात. त्यांची स्मरणशक्ती, एकाग्रता, सुविचारांची प्रवृत्ती, निश्‍चयीवृत्ती, (संकल्पशक्ती) यांची गाढ वाढ होते. निद्रानाश व डोक्याचे किरकोळ विकारही जातात. वृत्तीत्तीची अंतर्मुखता वाढते. मानसिक विकार नाहीसे होतात.
रोगनिवारण, मारण, तारण, वशीकरण, शक्तीसंचारण वगैरे सर्व त्राटकाच्या  सिद्धीने होतात. डोळ्यांची ताकद वाढून नेत्रसंकेताने कोणा व्यक्तीलाही  आपल्याकडे बोलण्याची कला सिद्ध होते. त्राटकांने मिळवलेल्या काही “संमोहनशक्तीने” लोककल्याणाच्याही गोष्टी साध्य होतात.
 संमोहनशक्ती:- या शक्तीला Personal पर्सनल अथवा एनिमल मॅग्नेटिझम (Animal Magnetism) (प्राण्यांची विद्युत) आणि फारशीमध्ये ‘शक्सी मिकनातीस' वा 'कशीश रुहानी' असे म्हणतात. ही शक्ती साधनेने जो वाढवू शकतो ती व्यक्ती प्रभावी, उत्साही, तेजस्वी, आत्मविश्वासी, कार्यकुशल, आशावादी अशा प्रकारची होते. मनुष्य आपल्याच विचारांनी बनलेला आहे. जसे ‘श्रद्धामयो$यं पुरूषो तो सच्छ्रध्द: स एव स:'| 
 ज्याचे जसे विचार तो तसाच बघतो. म्हणूनच वरील कमानी आरोग्याची भावना बाळगून 
ॐ आनंदम्, ॐ आरोग्यम् या जपाद्वारे रोगनिवारणाचा अनुभव होतो. या संमोहनशक्तीचे स्थान मस्तक असल्याने त्याचा प्रभाव साधकाचे चेहऱ्यावर नाक, डोळे, तोंड, हात, हाताची बोटे, यावर येतो. ही शक्ती दृष्टी व हाताच्या बोटांची अग्रे यातून बाहेर पडत असते. या शक्तीला ओजस आणि तेजस अशा संज्ञा आहेत. त्याला AURA आणि फारशीमध्ये जलाल आणि नुर असे म्हणतात. याला विद्युत प्रवाह आणि प्राणतत्व असेही म्हणतात. 
संमोहनशक्ति द्वारे प्रयोग:- संमोहनशक्तीला साधनेद्वारा वाढवून डोळ्याने त्राटकाद्वारा,  नाकाने श्वासामार्गे, तोंडाने फुंकर घालून, हाताने मार्जन (दीर्घ व लघु) करून, ज्याला इंग्रजीत पासेस (Passas) असे म्हणतात. मेंदूला दृढतापूर्वक सूचना (Suggestions) देऊन, शारीरिक व मानसिक रोगांची निवृत्ती केली जाते. ही विद्या भारतात रामायान कालापासून चालत आलेली आहे. याचे काही सिद्धांत शास्त्रात आहेत‌.
      पाश्चिमात्य राष्ट्रांमध्ये याचा आधुनिक अविष्कार मेस्मेरिझम (Masmerism) आणि हिप्नॉटिझम (Hipnotism) या नावाने जाहीर आहेच. ती शक्ती प्राप्त केल्यानंतर तिचा सदुपयोग व दुरुपयोग होऊ शकतो. पण अशा रीतीने मिळवलेली ‘आत्मशक्ति’ हीन गोष्टीकडे खर्च करणाऱ्या व्यक्तीला अध:पतनाच्या मार्गाकडे नेत असते. म्हणूनच अनेक सिद्धीवाले बाबा रसातळाला गेले. सिध्दिच्यापाठी लागणारे दुःखाच्या भोवऱ्यात गवसतातच.  
साधकाने ही ईश्वरीशक्ति ‘जनकल्याणार्थ’ व मानवतेच्या विकासासाठी  लावल पाहिजे‌. असा मनुष्य  पूजनीय व वंदनीय बनतो.
■■■■■■■■■■■■■■■■■■■■■■■■■■■
दि.११ जून २०२०
सूर्य नमस्कार-
३भागाची माहिती व प्रात्यक्षिक
■■■■■■■■■■■■■■■■■■■■■■■■■■■■

दि.१2 जून २०२०
आठवड्यात शिकविलेल्या आसनांची रिव्हिजन

■■■■■■■■■■■■■■■■■■■■■■■■■■■■

दि.१३जून २०२०

प्रश्नोत्तरे


■■■■■■■■■■■■■■■■■■■■■■■■■■■■

दि.१४ जून २०२०


शंख प्रक्षालन
शरीर आणि मन शुद्ध करण्याच्या सहा शुद्धिक्रिया  आपण पाहिल्याच आहेत.
आजच्या या धावपळीच्या जीवनात सर्वसाधारणपणे पाहिल्यास बस्तीविधी करणे जरा कठीणच असते. वेळेच्या अभावी ते अशक्य आहे.. बहुतेक व्यक्ति तसे करणे गौण समजतात आपल्याला सहज स्वास्थ्य लाभ होण्यासाठी बस्ती करण्याची जरुरी नाही‌. तसे केले पाहिजे असे बंधनही नाही आणि सर्वसाधारण व्यक्ती पोटाची नौलीकर्म करण्याचा अभ्यास साधू शकत नाही. त्याऐवजी आपल्या पूर्वजांनी सांगितलेली ‘शंखप्रक्षाल’ नाची क्रिया करू शकतो. ही क्रिया पाणी पिऊन करायची असते. कारण पाणी हेच जीवन आहे. तसेच पाणी हेच औषध आहे‌.‌ 
‘शरीरे जर्जरीभूते- व्याधीग्रस्ते कलेवरे | 
औषधं जानव्ही तोयं | वैद्यो नारायणो हरि ||
अर्थ:-  व्याधीग्रस्तास पाणी म्हणजे औषधच आहे.
     आपण जे अन्न खातो त्याचे शरीरात पाचन होण्यासाठी- तोंडापासून प्रत्यक्ष मळ बाहेर येईस्तो एकूण १४ अंगाचा उपयोग होतो. म्हणजे तोंडात दातांनी चर्वण केल्यानंतर त्यात लाळ मिसळून चोथा पुढे पुढे  जठरामध्ये जातो नंतर त्यावर HCL आम्लाची प्रक्रिया होते. पुढे लहान व मोठ्या आतड्यांमध्ये  त्यावर क्रिया होऊन, सप्त रस बाहेर पडतात आणि अनावश्यक वस्तू मळा द्वारे बाहेर पडत असते.  अशी संपूर्ण सहज क्रिया  झाल्यास मनुष्य निरोगी असतो. मात्र ही क्रिया अपूर्ण ह शरीराचा कोठा साफ न झाल्यास आपल्याला बद्धकोष्टता च्या आजारामुळे ९०% आजार उद्भवतात. याकरिता आपण विविध द्रव किंवा घन औषधाचा प्रयोग करतो. त्यातही यश प्राप्त होत नाही. यास पर्याय म्हणून शरीरातील मुख्य अंग-  जठर, लहान आतडे व मोठे आतडे यास आसनाच्या द्वारे कार्यक्षम केल्यास सहज सुटका होऊ शकते. त्याकरिता योगशास्त्रात सांगितलेला खात्रीलायक सहज व सोपा उपाय म्हणजे शंखप्रक्षालन होय.
याचे लघु शंखप्रक्षालन व महा असे दोन प्रकार आहेत. लघुशंख प्रक्षालनात आसनांची तयारी केली जाते. व महा शंखप्रक्षालनात पाणी पिऊन असनांचा प्रयोग केला जातो.
शंखात पाणी टाकल्यानंतर ज्याप्रमाणे पाणी चक्राकार फिरून ते वेगाने बाहेर पडते, त्याप्रमाणे तोंडाने पाणी प्यायल्यानंतर ते पाणी थोड्या वेळा नंतर पोटातील मळासकट, आतड्यांना स्वच्छ करीत गुदद्वार बाहेर फेकले जाते. म्हणून या क्रियेला शंख प्रक्षालन असे म्हणतात.
लाभ:- या क्रियेने अनेक रोग दूर होऊन स्वास्थ्य सुधारण्यास आश्चर्यकारक प्रगती होते. बद्धकोष्टता, अग्नीमाद्यंता, पोटाचे सर्व विकार, मुळव्याध, मधुमेह, कफदोष आदी विकार घालविले जाऊन देह निर्मळ होतो. 
नुसती वरील आसने केल्यास मधुमेह, स्लिप-डिस्क, मनाचे विकार यावरही चांगला परिणाम होतो. ‘नाड्या मलरहीत झाल्यानेच पुढे प्राण संग्रह होतो. वायू इच्छेनुसार खेळविता येतो.
क्रियेची विधी:-
महा शंख-प्रक्षालन म्हणजेच पाणी पिऊन करण्याची क्रिया होय. त्या आधी आपणास लघु शंख-प्रक्षालनाची ४ आसनांची सवय करावी लागते. ८-१० दिवसात या आसनांची चांगली सवय होऊन, ती ४ आसने क्रमश:  सर्पासन, उर्ध्वहस्त कटीवक्रासन, समान हस्त कटिचक्रासन व कागासन आहेत.

सर्पासन:- 
दोन्ही हाताचे तळवे जमिनीवर संपूर्ण टेकून दोन्ही हातात २ फुटाचे अंतर ठेवून दोन्ही पाय एकमेकास जोडून कमरेपासून वरचा भाग सर्प फणा वर करून उभा राहतो त्याप्रमाणे दोन्ही हातास ताकद लावून भुजंगासनात येणे व वरील प्रमाणे ३-३ वेळा डावीकडे व उजवीकडे मान वळवून मागील पायांच्या टाचा पाहणे. हे करतांना गुडघे जमिनीला टेकल्यास हरकत नाही.

उर्ध्वहस्त कटीवक्रासन:- 
दोन्ही पायात २ फुटाचे अंतर ठेवून उभे रहा. दोन्ही हाताच्या दंडाचा कानाला स्पर्श होईल अशा दिशेने सरळ उभे करा. हाताची बोटे एकमेकात गुंतवून हाताचे तळवे उलटे आकाशाकडे करा. कमरेपासून वरचा भाग डावीकडे व उजवीकडे ३-३ वेळा वाकवा. दृष्टी मात्र समोर ठेवा.

समानहस्त कटिचक्रासन:- 

वरचे आसनाची हाताची मिठी सोडून दोन्ही हात आपल्या खांद्याशी समांतर आणा. दोन्ही हाताची बोटे (पंजा) ताठ असावी. त्याच स्थितीत दोन्ही  पायाच्या ताकतीवर जितका डावी-उजवीकडे कमरेला वळसा देता येईल. (चक्राप्रमाणे फिरवता येईल) तितका ३-३ वेळा फिरवावा. दृष्टी आपण ज्या बाजूला वळतो त्या बाजूच्या पंजा कडे असावी‌.

कागासन:- 
या असण्यासाठी खाली बसा. (जसे आपण पाणी पिताना बसतो) प्रथम डाव्या पायाचा गुडघा व पंजा जमिनीला टेकून गुडघा सरळ येईल असा ठेवावा. दोन्ही हात दोन्ही गुडघ्यावर ठेवून जो गुडगा वर आहे त्या बाजूने तीन वेळा दोन्ही हाताची ताकत लावून कावळ्या प्रमाणे मागे वळून पहावे. जसे आपण झोपून उठताना अंग पडतो त्याप्रमाणे उजव्या पायावरची  क्रिया तीन वेळा करावी.


(सूचना:- प्रत्येक वेळी क्रिया करताना श्वास घेउन क्रियेस सुरुवात करावी व क्रिया पूर्ण झाल्यावर म्हणजेच पूर्वस्थिती आल्यावर श्वास सावकाश सोडावा. चारही आसने डावी-उजवी कडे करावे, जेणेकरून जठर आणि इतर अवयवांना विळखा बसेल. 
महाशंख प्रक्षालन:-
लघु शंखप्रशालना मधील आसनांची ८-१० दिवस सवय केल्यानंतर, ज्या दिवशी आपणास महा शंखप्रक्षालन करावयाचे आहे. त्याचे आधले दिवशी रात्री साधे भोजन करावे. दुसऱ्या दिवशी सकाळी मुगांच्या डाळीची खिचडी तयार करावी‌. कारण ही क्रिया केल्यानंतर खूप सपाटून भूक लागते‌‌. एक तासाने गरम गरम खिचडी करावी व त्यात २०-२५ ग्रॅम चांगले साजुक तुप घालून भोजन करावे. जेवणात त्याशिवाय दुसरा कोणताही पदार्थ चालणार नाही. भोजन करतांना पाणी घ्यावयाचे नाही. एक तासानंतर पाणी प्यावे. भोजन झाल्यानंतर तोंड स्वच्छ करण्यासाठी चूळ वगैरे भरून १-२ घोट पाणी घेण्यास हरकत नाही. खिचडी खाल्ल्यानंतर ४ तासांनी नरम अशी गोड फळे खाण्यास हरकत नाही. तसे करणे चांगले आहे. ज्या दिवशी ही क्रिया करण्यास येते त्यावेळेस २४ तास पर्यंत दही-दुधाचे प्रकार किंवा दही-दूध घेता कामा नये. वरील क्रिया आवश्यकतेप्रमाणे वर्षातून-एकदा, सहा महिन्यातून-एकदा, ३ महिन्यातून-एकदा आपणास आवश्यकता वाटत असेल तर प्रत्येक महिन्यात एकदा सुध्दा करू शकता. मात्र रोज ४ आसणांची सवय ठेवावी.
महा शंखप्रक्षांलनाची कृती:-
प्रथम १ ग्लास पाणी प्यायल्यावर वरील ४ प्रकारची आसने आपण ३-३ वेळा केल्यानंतर चौथे आसन म्हणजे कागासन झाल्याबरोबर कदाचित कोणास ताबडतोब शौचास जावे लागेल. जर कोणास असा अनुभव आला नाही तर प १ ग्लास पाणी पिऊन पुन्हा ४ आसने परत करावीत यावेळी नक्कीच आपल्याला सौचाची घाई होणार, शौचाला बसताना पोटाला कागासणा प्रमाणे पीळ दिल्यास पोटाचे २-३ वेळा आत ओढणे (आकुंचन-प्रसरण) ढिले सोडणे केल्यास जास्त साहाय्यक ठरते. पहिली शौचास घट्ट होईल व नंतर पातळ होईल. सौच्याहून जाऊन आल्यानंतर परत दुसऱ्या वेळेसही २ ग्लास पाणी पिऊन परत ४ आसने पूर्वीप्रमाणे करावीत. पुन्हा शौचाला पातळ, पिवळसर अशी होईल आणि शेवटी जमल्यास तिसऱ्यांदा परत २ ग्लास पाणी पिऊन चारही आसने केल्यास या वेळी मात्र पोट साफ झाल्याचा आनंद होईल.
         वरील क्रिया केल्या नंतर मीठ न घातलेले गरम पाणी २-३ ग्लास पिऊन लगेच जलधौती करून परत पिणी काढून टाकावे. नंतर स्नान करावयाचे असल्यास थंड पाण्याने करू नये. गरम पाण्याने बंद जागी केल्यास हरकत नाही. न केल्यासही चालेल.
बद्धकोष्ट ते साठी काही उपयुक्त टिप्स:-
  • आपल्या जीवनशैली मध्ये बदल करा. आपल्या खाण्याच्या सवयी बदला.
  • प्रत्येक खाण्याची वस्तू भरपूर चाऊन खाव्यात. त्यात लाळेचे मिश्रण होईल.
  • झोप पूर्ण घ्या
  • शरीरातील पाणी कमी झाल्यास म्हणजे डीहायड्रेशन  (Dehydration) झाल्यास रोग होतो. म्हणून पाण्याचं योग्य ते प्रमाण राखा. पाण्याचे संतुलन ठेवा.
  •  उन्हातून आल्यावर, मेहनत केल्यानंतर व एसीमध्ये राहिल्यामुळे पाण्याची नेहमी कमतरता भासते. तसेच जेव्हा आपण आपली लघवी पिवळी होते‌. तेव्हा पाण्याची आवश्यकता आहे. असे समजू एक ते दीड ग्लास पाणी घ्या.
  • शरीरास कोमट किंवा गरम पाणी २४ तास उपयोग घ्या‌. पित्त प्रवृत्तीच्या व्यक्तींना गरम  पाण्याचा (अधिक वेळा घेतल्यास) त्रास होऊ शकतो. 

  • रोज व्यायाम व २०-३० मिनिटे, आठवड्याचे कमीत कमी ५ तास अवश्य घ्यावा.
  • मोकळ्या हवेत फिरणे हा सुद्धा व्यायामाचा प्रकार आहे.
  • अंकुरित अन्न (एकदल द्विदल), सलाद, भाजीपाला, भाज्यांचा फळांचा रस. सालासह फळे खाणे‌
  • रेषा किंवा फायबर मुळे पोट लवकर भरते मात्र पोटातील मळ साफ करण्यासाठी ते अतिशय उत्तम माध्यम आहे.
  • फळांमध्ये रेषा (Fibers)  फळाची साल, गर व फळांच्या बियांचे सेवन आवश्यक असते.
  • बद्धकोष्टता साठी सगळ्यात उत्तम पेरू, डाळिंब, सफरचंद केळी, बेल ,लिंबू, संत्रा
  • निरोगी राहण्यासाठी (Handfull Nuts) म्हणजे आपल्या मुठी मध्ये जितके सुकामेवा बसतील त्याचा उपयोग करणे‌.  भिजवून केल्ल्यास त्याचा गुणात्मक फायदा होतो‌
  • द्राक्ष, (वाळलेली द्राक्षे म्हणजे किसमिस ल मनुका) काळा मनुका हा अधिक प्रभावी आहे.  अंजीर, बदाम.
  • जवस (Flex Seed) ओवा, सोप, शेंडे मीठ, गाईचे तूप
हे पदार्थ घेऊ नयेत‌
  • तणाव (Stress) काळजी, चिंता
  • जंक फूड, स्ट्रीट फूड, फास्ट फूड, बंद डब्यातले पदार्थ, मॉल चे पदार्थ, दूध आणि दुधाचे पदार्थ, मिठाई, साखर मैद्याचे  पदार्थ, बिस्कीट, केक, नशेचे पदार्थ, बिडी-सिगरेट व गुटका
■■■■■■■■■■■■■■■■■■■■■■■■■■■■
दि.१५ जून २०२०
श्वसन क्रियेविषयी  माहिती

■■■■■■■■■■■■■■■■■■■■■■■■■■■■

दि.१६ जून २०२०

शुद्धी क्रिया रिव्हिजन-


1 comment:

  1. फारच छान, सविस्तर योगासने,व प्राणायाम आणि क्रिया विषयी दिलेली माहिती प्रतेक समाज बांधवांनी
    वाचुन बघावी, व त्या प्रमाणे घरीच आपल्या सवडीनुसार केल्यास निश्चितच आपणास 15 दिवसा मध्ये फरक जाणवतो.ह्यांची खात्री आहे

    ReplyDelete

पुसद जि. यवतमाळ येथे योगाचार्य डाॅ रामकृष्ण ठवकर यांचे योग व मुद्रा वर मार्गदर्शन*

योगाचार्य डाॅ रामकृष्ण ठवकर यांचे योग व मुद्रा  वर मार्गदर्शन                             मंगळवार दि.22/11/2023 ला दुपारी  गांधीनगर, पत्रे ल...