समाजातील सर्व गरजू विद्यार्थ्यांना शैक्षणीक मदतीची सुवर्ण संधी-
याचा अवश्य लाभ घ्यावा.U
🙏*नम्र आवाहन*👏🏼
बावणे कुणबी समाजातील विशेषत: *ग्रामीण भागातील गरीब विद्यार्थ्यांना* शिक्षणाकरीता वा उच्च शिक्षणाकरीता शहरात राहण्याची सुविधा,शैक्षणिक व आर्थिक मदतीची गरज असल्यास तसेच शैक्षणिक मार्गदर्शना करीता खालील व्यक्तींशी संपर्क साधावा.
*अटी->* १. आपल्या शैक्षणिक गुणवत्तेची कागदपत्रे.
२. प्रवेश घेत असलेल्या अभ्यासक्रमाचा पुरावा.
३.स्पर्धा परीक्षेची तयारी करणाचे हमीपत्र.
👇 *संपर्क* 👇
-----------
१.डॉ. गोपी निंबार्ते
मो.-9373045542
२.डॉ.अविनाश तितरमारे
मो.-9834749602
३.श्री.विठ्ठल मते.
मो.- 9423633351
*धन्यवाद*
-----------------------------------------------------
कै दादासाहेब टिचकुले योगा शिबीर -
*योगाचार्य व आमचे योगगुरू श्री. रामकृष्ण ठवकर साहेब* यांनी सुरू केलेलं *योगा शिबीर आमच्या शारिरीक व मानसिक परिपक्वता* करिता खूपच महत्वाचे व *फलदायी* ठरत आहे ह्या त्यांच्या देत असलेल्या *योगदानासाठी* व सामाजिक कार्याचे *उद्दीष्ट पूर्ततेकरिता* व आपल्या समाजाचे समाजकार्यचे *जनक* असे *मानस* प्राप्त झालेले *महान व्यक्तिमत्व* असलेले *कै.दादासाहेब टीचुकले साहेब* यांच्या *स्मुर्ती पित्यर्थ* व ते सर्वांच्या *सदैव स्मरणात* राहावे अशी *ईच्छा व आशा बाळगून* हे *शिबीर* त्यांनी समाजकार्य या *हेतु पुरस्कृत* सुरू केलेलं आहे तरी सर्वांनी याचा *फायदा घ्यावा व भरभरून प्रतिसाद* द्यावा अशी सर्वांना कळकळीची विनंती करिता त्यांना *मनःपूर्वक अनंत हार्दिक शुभेच्छा* पूनच: *शतशः प्रणाम* करून 🌹 *धन्यवाद* 🌹देतो.
🙏💐🙏🌹🤝🏻🙏🌹👍🏻
*योगासन शिबिराचे दररोज Live प्रसारण Zoom Apps द्वारे आम्हाला घर बसल्या योगासन*, *प्राणायाम, व ध्यानधारणा*, इत्यादीचे *प्रात्यक्षिक पाहायला व करायला मिळतात* तेही पूर्णपणे *मोफत* याला म्हणतात खर *सामाजिक कार्य असे ते महान श्री श्री देवरावजी मते साहेब सामाजिक कार्यकर्ते व समाज भारतीचे मुख्य संपादक यांना त्यांच्या महान कार्यास 🌹🌹शुभेच्छा 🌹व दंडवत*💐💐
आम्ही तर याचा आमच्या *शारिरीक तंदुरुस्तसाठी* व *मानसिक स्थिरता* *प्राप्त* करण्यासाठी व करिता उपयोग करून घेत आहोत तर आपण का नाही चला तर मग लवकरात लवकर योग शिबीर मधे *join करा व शारिरीक Fit व्हा*
|| *All The Best*||
- *Gajanan Tijare,Pune*
*संचालक बावणे कुणबी सामाजिक संस्था पुणे*
---------------------------------------------------
In front of mirror
विवेक कुकडे, (दिग्रस/पुणे)
खूप दिवसच काही तरी लिहावे असा वाटत होतं , शिर्षक पण सुचलं पण काय लिहावं ते कळत नव्हतं म्हणून आज मनात येईल ते मोकळे पणाने लिहावं असा वाटतंय,
खूप दिवसच काही तरी लिहावे असा वाटत होतं , शिर्षक पण सुचलं पण काय लिहावं ते कळत नव्हतं म्हणून आज मनात येईल ते मोकळे पणाने लिहावं असा वाटतंय,
एक चांगला अभिनेता सुशांत सिंग राजपूत याने आत्महत्या केली, ही बातमी कळताच पूर्ण देश हादरला, सगळ्यांना नवल वाटलं की एखादा यशाचा इतक्या उच्च शिखरावर असणारा व्यक्ती ज्याने इतक्या कमी म्हणजे 34 वय असताना इतका काही गाठलं जिथे पोहचायला इतरांना आयुष्य खर्च करावा लागत ,मग नेमका काय झालं असेल ते तर तोच सांगू शकत होता ,पण त्या वेळी माझा मनात आला की ज्यासाठी आपण दिवस रात्र मेहनत करतो आपलं मूळ गाव सोडून मोठ्या शहरात येतो काय तर आपले स्वप्न पूर्ण करायला मोठा व्हायला ,समाजात नाव पैसे कमवायला आणि आपल्या आपल्या मेहनत आणि नशिबाचा जोडीने ते मिळते सुद्धा पण हे सगळे करताना आपण कुठे तरी आपण स्वतः पासून दूर जात आहे का ? आपण आपले मित्र आपले नातेवाईक याना विसरत चाललो का ? आपण लाखो करोडो लोकांचा शहरात एकटे पडत चाललो का ?असे अनेक विचार मनात येत असतात , आणि जर असा घडत असेल तर मग यश म्हणजे नक्की काय ,ज्या सुखासाठी आपण धावतो ते कुठे आहे ,याचा विचार आपण का करत नाही ,सगळं जग धावत असत पैसे कमवायला पण ते कमवत असताना माणुसकी मात्र कुठे तरी हरवली जाते ,मी बरेचदा बघितलं आहे की रस्त्यात अपघात होतात तर लोक थांबत सुद्धा नाही कारण त्यांना ऑफिस जास्त महत्वाचं वाटतं मग जर अशी वेळ आपल्यावर अली तर कसा होणार मला सतत वाटते की याचा विचार करायला हवा ,whatsapp ग्रुपला हजार मित्रा ठेवण्या पेक्षा समोर मित्र बनवा ,मी का फोन करू त्याने करायला हवा किंवा मी काय कमी आहे का असा विचार सोडून फोन करायला शिका ,जर पैशाची मदत करू शकले नाही तरी भावनेची आपुलकी ची मदत करा ,आपण नेहमी ओळखीचा व्यक्ती सोबत बोलतो पण कधी तरी अनोळखी व्यक्तीला पण विचारपूस करून बघा तरच आपण कुठे तरी या समाजातील दुरावा कमी करू शकतो ,मी स्वतः काही वर्ष झाले पुण्यात काम निमित्त राहतोय मला हे कळलंय की इथे घर नाही तर फक्त भिंती बनल्या आहेत ,माणसा माणसमध्ये दुरावा निर्माण झाला आहे ,सध्या जगात करोना मुळे लोकांची आर्थिक आणि मानसिक परिस्तिथी खूप वाईट होत चालली आहे ,म्हणून मला वाटते की दुसऱ्याची वाट न बघत आपण सगळ्यांनी पुढे येऊन एकमेकांना समजून घ्यावं जेणे करून पुन्हा कोणी आपल्या अवती भोवती कोणी मानसिक नैराश्याच्या बळी पडू नये ,,,,,,,,,,,,,विवेक कुकडे
■■■■■■■■■■■■■■■■■■■■■■■■■■■■
॥ ॥ समाजहित ॥ ॥
संघटनआता समाजाचे
घडणे अपरिहार्य आहे .
मनामनात जागृती होऊन
समाजहित जोपासनेआहे
भूतकाळी ज्या घडल्या चुका ,
त्यास तिलांजली देणे आहे .
भविष्याची यशोगाथा
लिहिणे आपल्या हाती आहे .
मते-मतांतरे होतच असते
वादविवाद सोडणे आहे .
सुसंवादी भाषेमध्ये ,
मनोमिलन घडणे आहे .
समता आणि बंधूतेचा ,
मार्ग आता जपणे आहे .
वैज्ञानिक द्रुष्टीकोणाची
कास आता धरणे आहे .
स्त्री-पुरुष समानतेचे
मूल्य अंगिकारणे आहे .
समाज आणि देशासाठी
एकनिष्ठ होणे आहे .
नित्य नव्या विचारांची
पुजा आता करणे आहे .
कर्तव्याची दीक्षा घेऊन
समाजासाठी जगणे आहे
🤝🤝🤝🤝🤝🙏🏻🙏🏻🙏🏻🎻🎻🌹👍
सुभाष धांदे सर , यवतमाळ .
दिनांक :04/06/2020
■■■■■■■■■■■■■■■■■■■■■■■■■■■■
अमरावतीचे जुने शहर म्हणजे एक भुईकोट किल्ला आहे. एकेकाळी या संपूर्ण शहराला परकोट होता हे अनेकांना माहिती नाही किंवा माहिती असले तरी हा परकोट कुणी? केंव्हा? व का बांधला? याबाबत फारशी माहिती नाही. घरकी मुर्गी दाल बराबर.... या उक्ती प्रमाणे हा परकोट बघायला अमरावतीमधील फारसे कुणी जात नाही. काही हौसी व अभ्यासक मंडळी मात्र या परकोटास भेट देण्यास खास येत असतात.
या अमरावती गावाचा मोठी बाजारपेठ म्हणून उदय व भरभराट झाली ती साधारणता ई.स. १७२२ नंतर. तत्पूर्वी उमरावती हे गाव प्रगणे बडनेरा मधील फक्त एक कसबा होता. बडनेरा परगणा असल्यामुळे त्यास जास्त महत्व होते. उमरावती या कसब्यातील आठवडी बाजारासाठी आजूबाजूच्या गावातील लोक खरेदीसाठी येत असत. ई.स. १७१९ मध्ये राणोजी भोसले याने येथील निम्मी पाटीलकी खरेदी केली व पुढे छत्रपती शाहू महाराज यांनी रानोजीस बडनेरा परगणा व उमरावती इनाम दिले व काही गावे लष्करी खर्चासाठी दिल्याने, राणोजी येथील मोकासदार झाला. त्यानंतर राणोजीने आपले मुख्य ठिकाण अमरावतीला हलवले व येथील उन्नतीसाठी कसोशीने प्रयत्न केला. लवकरच उमरावती पेठ बनले.
अठराव्या शतकात अमरावती हे गाव वऱ्हाडातील प्रमुख व्यापारी केंद्र म्हणून उदयास आल्यानंतर येथे सावकार व व्यापाऱ्यांजवळ भरपूर संपत्ती गोळा झाली होती. त्याचवेळी वऱ्हाडावर नागपूरकर भोसले व हैदराबाद या दोन्ही सत्ता आपला हक्क सांगत होत्या, त्यामुळे सर्वत्र अराजकता माजली होती, संरक्षणासाठी मात्र काहीही उपाय केल्या जात नव्हते. त्याचा फायदा घेत उमरावतीला ठग व पेंढाऱ्या अनेकदा लुटले. या लुटी किती भयंकर असत ते ब्रिटीश अधिकारी व लेखक कॅ. मेडोज टेलर याने लिहिलेल्या “द कन्फेशन ऑफ ठग” या पुस्तकात दिलेल्या माहितीवरून दिसून येते. या लुटालुटी व अराजकतेमुळे येथील सावकार व व्यापाऱ्यांनी निझाम दरबारी वेळोवेळी केलेल्या तक्रारी व विनंत्याची दखल घेतल्या गेली ती ई. स. १८०३ च्या ब्रिटीश–मराठे युद्धा नंतरच. ब्रिटिशांनी हे युद्ध जिंकून वऱ्हाड प्रांत हैदराबादच्या निजामास भेट देऊन टाकला व येथून पुढे वऱ्हाडावर निजमची निरंकुश सत्ता प्रस्थापित झाली. यानंतर ब्रिटीश अधिकारी कर्नल क्लोज हा उमरावतीस आला असावा त्याने येथील भरभराट पाहून व झालेल्या लुटीची माहिती घेऊन, हैदराबादचा रेसिडेंट कर्नल पेट्रिक यास शहराच्या संरक्षनार्थ परकोट बांधण्याचा वयक्तिक सल्ला दिला. त्यानंतर कर्नल पेट्रिक याने निजामाचा दिवान मीरआलम यास राजी करून ई.स. १८०५ मध्ये तसा हुकुम काढावयास लावला. त्याप्रमाणे येथील सुभेदार महीपतराम याने कामास सुरुवात केली. पुढे निझाम सरकारच्या खर्चाने ई.स. १८०६ ला संरक्षणासाठी परकोट बांधण्यास सुरवात झाली. हे बांधकाम १६ वर्षे चालले व १८२१ मध्ये परकोट बांधून पूर्ण झाला. या बांधकामास त्याकाळी सुमारे चार लक्ष इतका खर्च झाला.
-संकलित
■■■■■■■■■■■■■■■■■■■■■■■■■■■■
नांदा सौख्यभरे
[9:22 AM, 6/14/2020] Deorao Mate: चि.निलेश दिगांबरराव आगाशे
रा. कासमपुर पो.पथ्रोट ता अचलपूर जि. अमरावती
चि. सौ.कां. सिमा मनोहरराव आंबोने
मु.सौजना ता.बाभूळगांव जि. यवतमाळ
१९ मे २०२० सौजना येथे
[9:32 AM, 6/14/2020] Deorao Mate: चि.चंद्रशेखर उर्फ निळकंठ जगतराव डोरस
रा.पो. पिंपलोद ता दर्यापूर जि. अमरावती
चि. सौ.कां. सविता उर्फ टुमदेवी राजेंद्र मोहतुरे
मु.पो.भुलाई ता. दारव्हा जि. यवतमाळ
१४ मे २०२० भुलाई येथे
[9:45 AM, 6/14/2020] Deorao Mate: चि.सौ.कां. प्रीतीताई रमेशराव झुरमुरे
रा. कलगव्हान ता. अंजनगाव सुर्जी जि अमरावती
चि. प्रविण रुपरावजी ठवकर
रा.कुष्ठा lबुl ता.अचलपूर जि. अमरावती
शुभ लग्न संपन्न झाले दि. १४ मे २०२० रोजी, काळगव्हान येथे
[10:03 AM, 6/14/2020] Deorao Mate: चि. मोहन उर्फ पराग
सौ. सुमनताई व श्री. सुरेशराव वनवे
रा. विदर्भ मिल्स अचलपूर जि अमरावती ह.मु. पिंपळोद ता. दर्यापूर जि. अमरावती
चि.सौ.कां. गुंजन उर्फ निकिता
सौ. संगीता व श्री रविंद्र शेलोकर
रा. हिंगणवाडी जि. वाशिम ह.मु. अकोला
विवाह संपन्न २४ मे २०२० अकोला येथे
[10:42 AM, 6/14/2020] Deorao Mate: चि.विनोद
श्री. ग्यानीराम शेंडे
मु.बेटाळा ता. मोहाडी. भंडारा
यांचे चिरंजीव
चि.सौ. कां. काजल
श्री. देवीदास चेटूले मु.मानेगाव सडक. ता. लाखनी यांची कन्या
विवाह संपन्न दि. १२/५/२०२० रोजी संपन्न झाला.
[10:43 AM, 6/14/2020] Deorao Mate: ♦️♦️♦️
[6:45 PM, 6/14/2020] Deorao Mate: 🙏लॉकडाउनमध्ये साध्या पद्धतीने विवाह सम्पन्न💐👏🏼शेबे रा.वरुड भक्त व उरकुडे रा.हींगणगांव जि.अमरावती येथील कुटुंबाने मांडला समाजासमोर आदर्श-*
चि.सौ.कां.अंकीता र.शेबेआणि श्री शामरावजी उरकुडे यांचा मुलगा चि.सचीन उरकुडे यांचा विवाह अवाढव्य खर्च न करता किंवा बडेजाव न करता अगदी साध्या पद्धतीने श्री.रवींद शेंबे वरूड भक्त यांनी दि.14.6.2020ला सकाळी ११.३० वा.घरीच आयोजीत केला. शेबे व उरकुडे कुटुंबामध्ये अगदी २०-२५ वऱ्हाडया मध्ये शुभ मंगलमय विवाह सोहळा सम्पन्न झाला.लग्नसोहळा हा लॉकडाउनमध्ये आल्यामुळे दोन्ही कुटुंबांनी प्रशासनाचे निर्देशाचे काटेकोरपणे पालन करीत विवाहसोहळा पार पाडून समाजासमोर एक आदर्श ठेवला, त्यांचे या उपक्रमाबद्दल सर्वत्र अभिनंदन करण्यात येत आहे. 👏🏼
चि.सचीन व चि.सौ. अंकीता यांचे अभिनंदन 💐आणि त्यांचे यशस्वी भावी जीवनाकरीता मंगलमय शुभेच्छा.🙏
🙏🙏💐💐🕉💐💐🙏🙏
[6:46 PM, 6/14/2020] Deorao Mate: चि.सौ.कल्याणी व चि. मयूर यांचा शुभविवाह, आदर्श मंगलमय सोहळा आळंदी येथे कोरोना लॉकडाउन पार्श्वभूमीवर संचारबंदीचे काळात प्रशासन नियमाचे अगदी काटेकोरपणे पालन करून, कुटुंबातील स्थानिक नातेवाईकासह संत गजानन महाराज सभागृह,आळंदी येथे सम्पन्न. नववरवधूचे अभिनंदन आणि भावी यशस्वी वैवाहिक जीवनास मंगलमय शुभेच्छा.
सर्वश्री.विजय महादेवराव बांडेबूचे परिवार रा.रासेगाव ह.मु.आळंदी जि. पुणे यांचे अभिनंदन.
🙏💐💐💐🙏
विष्णुदास कांबे सचिव
संचालक, बा.कु.स. मंडळ अमरावती
[8:59 PM, 6/15/2020] Deorao Mate: आज दिनांक 14/06/2020ला चिं .अमोल गणेशराव धांदे रा .व-हा ता .तिवसा जि .अमरावती यांचा शुभविवाह चिं .सौ .कां .तेजस्विनी किशोरराव अतकारी रा .तिवसा यांचेशी वधूचे घरी तिवसा येथे ' ' सामाजिक अंतराचे भान ठेऊन कायद्याच्या नियमांनुसार ' लग्न सोहळा पार पडला .....त्यांना पुढील वैवाहिक जीवनात सुख , सम्रुधी , शांती आणि आनंद लाभो 👍👌🏻💐💐🎻🎻B K उपवर वधू संपर्क ग्रूपचे आम्ही धांदे परिवार विशेष आभारी आहोत .🙏🏻🙏🏻🙏🏻💐शुभेच्छुक -सुभाष धांदे व परिवार , यवतमाळ .
राघोर्ते परिवार , अमरावती .
भोयर परिवार , सारंगपूर
मुलंडे परिवार दाभा व यवतमाळ .
शेलोकर परिवार , अमरावती
बेदरकार परिवार , बडनेरा .
सारवे परिवार , व-हा .
ढोरे परिवार , शीरपूर
💐💐🎻🎻🤝👍🙏🏻
[8:59 PM, 6/15/2020] Deorao Mate: ♦️♦️♦️
[9:00 PM, 6/15/2020] Deorao Mate: ♦️♦️♦️
[9:01 PM, 6/15/2020] Deorao Mate: श्री.श्रीकृष्णराव खोकले रा.नांदगाव पेठ ह.मु.नाशिक यांचे चि.निखिल व श्री.नरेंद्रजी घरजारे रा.न्यू कॉलनी,अमरावती यांची कन्या चि. सौ.अस्विनी यांचा आदर्शविवाह अगदी साध्या पद्धतीने दि.१५.६.२०२० रोज सोमवारला राहते घरी न्यू कॉलनी,अमरावती येथे लॉकडाउन पार्श्वभूमीवर प्रशासकीय नियमांचे काटेकोर पालन करून मोजक्याच नातेवाईक वऱ्हाडयाचे उपस्थितीत सम्पन्न झाला. खोकले आणि घरजारे कुटुंबियांचे अभिनंदन.🙏💐🙏
चि.निखिल व चि.सौ.अश्विनी यांचे विवाहाप्रित्यर्थ मनापासून अभिनंदन तसेच नववरवधुचे भावी यशस्वी,सुखी जीवनाकरीता मंगलमय शुभेच्छा.
🙏💐💐💐💐💐🙏
संचालक,बा.कु.स. मंडळ अमरावती
(वार्ता-विष्णुदास कांबे)
[9:01 PM, 6/15/2020] Deorao Mate: ♦️♦️♦️
[11:32 PM, 6/15/2020] Deorao Mate: श्री सुरेश राव बोंद्रे रा वर्धा यांची जेष्ठ कन्या व श्री सुभाष रावजी आसोले रा दारव्हा यांचे चिरंजीव चंद्रकांत यांचाआदर्श विवाह अगदी साध्या पद्धतीने दि.१५.६.२०२० रोज सोमवार ला राहते घरी वर्धा येथे लॉक डाउन पार्श्वभूमीवर प्रशासकीय नियमांचे काटेकोर पालन करून मोजक्याच नातेवाईकांमध्ये उपस्थित संपन्न झाला
बोंद्रे परिवार वर्धा व आसोले परिवार दारव्हा कुटुंबाचे हार्दिक अभिनंदन 👏👏👌
[11:32 PM, 6/15/2020] Deorao Mate: ♦️♦️♦️
[8:21 AM, 6/17/2020] Deorao Mate: ▪️दुःखद बातमी▪️
कळविण्यात दुःख होत आहे की मुंबई मंडळाचे सक्रिय कार्यकर्ते श्री सुभाषराव ठवकर, शहापूर यांच्या आई श्रीमती निर्मलाबाई भीमरावजी ठवकर (रा. मीर्चापूर तरोडा जि अमरावती. ह. मुक्काम शहापूर) यांचे आज दि १६-६-२०२० रोजी सकाळी ११ वाजता वृद्धापकाळाने दुःखद निधन झाले.
कोरोना संक्रमना मुळे मोजक्या नातेवाईकाच्या उपस्थितीत अंत्यसंस्कार आज दुपारी ४ वाजता शहापूर येथे पार पडले.
ठवकर कुटुंबियांच्या दुःखात आम्ही सहभागी असून समाज भारती परिवारातर्फे भावपूर्ण श्रद्धांजली💐
-संपादक समाज भारती
[3:51 PM, 6/17/2020] Deorao Mate: श्री. गजाननराव गाढवे रा.रासेगाव यांचे
चि. पवन व गोपालराव खाटकर रा.कुष्टा
यांची कन्या चि.सौ.स्नेहा यांचा शुभविवाह कोरोना लॉकडाउन पार्श्वभूमीवर साध्या पध्दतीने नियमाचे काटेकोरपणे पालन करून मोजक्या कुटुंबातील वऱ्हाडयामध्ये सम्पन्न झाला. त्याप्रीत्यर्थ नववरवधूचे अभिनंदन आणि सुखी वैवाहिक जीवनाकरीता मंगलमय शुभेच्छा.
🙏💐💐💐💐💐🙏
विष्णुदास कांबे सचिव
संचालक, बा.कु.स. मंडळ अमरावती
[3:51 PM, 6/17/2020] Deorao Mate: ♦️♦️♦️
[2:47 AM, 6/19/2020] Deorao Mate: ♦️♦️♦️
[9:22 AM, 6/14/2020] Deorao Mate: चि.निलेश दिगांबरराव आगाशे
रा. कासमपुर पो.पथ्रोट ता अचलपूर जि. अमरावती
चि. सौ.कां. सिमा मनोहरराव आंबोने
मु.सौजना ता.बाभूळगांव जि. यवतमाळ
१९ मे २०२० सौजना येथे
[9:32 AM, 6/14/2020] Deorao Mate: चि.चंद्रशेखर उर्फ निळकंठ जगतराव डोरस
रा.पो. पिंपलोद ता दर्यापूर जि. अमरावती
चि. सौ.कां. सविता उर्फ टुमदेवी राजेंद्र मोहतुरे
मु.पो.भुलाई ता. दारव्हा जि. यवतमाळ
१४ मे २०२० भुलाई येथे
[9:45 AM, 6/14/2020] Deorao Mate: चि.सौ.कां. प्रीतीताई रमेशराव झुरमुरे
रा. कलगव्हान ता. अंजनगाव सुर्जी जि अमरावती
चि. प्रविण रुपरावजी ठवकर
रा.कुष्ठा lबुl ता.अचलपूर जि. अमरावती
शुभ लग्न संपन्न झाले दि. १४ मे २०२० रोजी, काळगव्हान येथे
[10:03 AM, 6/14/2020] Deorao Mate: चि. मोहन उर्फ पराग
सौ. सुमनताई व श्री. सुरेशराव वनवे
रा. विदर्भ मिल्स अचलपूर जि अमरावती ह.मु. पिंपळोद ता. दर्यापूर जि. अमरावती
चि.सौ.कां. गुंजन उर्फ निकिता
सौ. संगीता व श्री रविंद्र शेलोकर
रा. हिंगणवाडी जि. वाशिम ह.मु. अकोला
विवाह संपन्न २४ मे २०२० अकोला येथे
[10:42 AM, 6/14/2020] Deorao Mate: चि.विनोद
श्री. ग्यानीराम शेंडे
मु.बेटाळा ता. मोहाडी. भंडारा
यांचे चिरंजीव
चि.सौ. कां. काजल
श्री. देवीदास चेटूले मु.मानेगाव सडक. ता. लाखनी यांची कन्या
विवाह संपन्न दि. १२/५/२०२० रोजी संपन्न झाला.
[10:43 AM, 6/14/2020] Deorao Mate: ♦️♦️♦️
[6:45 PM, 6/14/2020] Deorao Mate: 🙏लॉकडाउनमध्ये साध्या पद्धतीने विवाह सम्पन्न💐👏🏼शेबे रा.वरुड भक्त व उरकुडे रा.हींगणगांव जि.अमरावती येथील कुटुंबाने मांडला समाजासमोर आदर्श-*
चि.सौ.कां.अंकीता र.शेबेआणि श्री शामरावजी उरकुडे यांचा मुलगा चि.सचीन उरकुडे यांचा विवाह अवाढव्य खर्च न करता किंवा बडेजाव न करता अगदी साध्या पद्धतीने श्री.रवींद शेंबे वरूड भक्त यांनी दि.14.6.2020ला सकाळी ११.३० वा.घरीच आयोजीत केला. शेबे व उरकुडे कुटुंबामध्ये अगदी २०-२५ वऱ्हाडया मध्ये शुभ मंगलमय विवाह सोहळा सम्पन्न झाला.लग्नसोहळा हा लॉकडाउनमध्ये आल्यामुळे दोन्ही कुटुंबांनी प्रशासनाचे निर्देशाचे काटेकोरपणे पालन करीत विवाहसोहळा पार पाडून समाजासमोर एक आदर्श ठेवला, त्यांचे या उपक्रमाबद्दल सर्वत्र अभिनंदन करण्यात येत आहे. 👏🏼
चि.सचीन व चि.सौ. अंकीता यांचे अभिनंदन 💐आणि त्यांचे यशस्वी भावी जीवनाकरीता मंगलमय शुभेच्छा.🙏
🙏🙏💐💐🕉💐💐🙏🙏
[6:46 PM, 6/14/2020] Deorao Mate: चि.सौ.कल्याणी व चि. मयूर यांचा शुभविवाह, आदर्श मंगलमय सोहळा आळंदी येथे कोरोना लॉकडाउन पार्श्वभूमीवर संचारबंदीचे काळात प्रशासन नियमाचे अगदी काटेकोरपणे पालन करून, कुटुंबातील स्थानिक नातेवाईकासह संत गजानन महाराज सभागृह,आळंदी येथे सम्पन्न. नववरवधूचे अभिनंदन आणि भावी यशस्वी वैवाहिक जीवनास मंगलमय शुभेच्छा.
सर्वश्री.विजय महादेवराव बांडेबूचे परिवार रा.रासेगाव ह.मु.आळंदी जि. पुणे यांचे अभिनंदन.
🙏💐💐💐🙏
विष्णुदास कांबे सचिव
संचालक, बा.कु.स. मंडळ अमरावती
[8:59 PM, 6/15/2020] Deorao Mate: आज दिनांक 14/06/2020ला चिं .अमोल गणेशराव धांदे रा .व-हा ता .तिवसा जि .अमरावती यांचा शुभविवाह चिं .सौ .कां .तेजस्विनी किशोरराव अतकारी रा .तिवसा यांचेशी वधूचे घरी तिवसा येथे ' ' सामाजिक अंतराचे भान ठेऊन कायद्याच्या नियमांनुसार ' लग्न सोहळा पार पडला .....त्यांना पुढील वैवाहिक जीवनात सुख , सम्रुधी , शांती आणि आनंद लाभो 👍👌🏻💐💐🎻🎻B K उपवर वधू संपर्क ग्रूपचे आम्ही धांदे परिवार विशेष आभारी आहोत .🙏🏻🙏🏻🙏🏻💐शुभेच्छुक -सुभाष धांदे व परिवार , यवतमाळ .
राघोर्ते परिवार , अमरावती .
भोयर परिवार , सारंगपूर
मुलंडे परिवार दाभा व यवतमाळ .
शेलोकर परिवार , अमरावती
बेदरकार परिवार , बडनेरा .
सारवे परिवार , व-हा .
ढोरे परिवार , शीरपूर
💐💐🎻🎻🤝👍🙏🏻
[8:59 PM, 6/15/2020] Deorao Mate: ♦️♦️♦️
[9:00 PM, 6/15/2020] Deorao Mate: ♦️♦️♦️
[9:01 PM, 6/15/2020] Deorao Mate: श्री.श्रीकृष्णराव खोकले रा.नांदगाव पेठ ह.मु.नाशिक यांचे चि.निखिल व श्री.नरेंद्रजी घरजारे रा.न्यू कॉलनी,अमरावती यांची कन्या चि. सौ.अस्विनी यांचा आदर्शविवाह अगदी साध्या पद्धतीने दि.१५.६.२०२० रोज सोमवारला राहते घरी न्यू कॉलनी,अमरावती येथे लॉकडाउन पार्श्वभूमीवर प्रशासकीय नियमांचे काटेकोर पालन करून मोजक्याच नातेवाईक वऱ्हाडयाचे उपस्थितीत सम्पन्न झाला. खोकले आणि घरजारे कुटुंबियांचे अभिनंदन.🙏💐🙏
चि.निखिल व चि.सौ.अश्विनी यांचे विवाहाप्रित्यर्थ मनापासून अभिनंदन तसेच नववरवधुचे भावी यशस्वी,सुखी जीवनाकरीता मंगलमय शुभेच्छा.
🙏💐💐💐💐💐🙏
संचालक,बा.कु.स. मंडळ अमरावती
(वार्ता-विष्णुदास कांबे)
[9:01 PM, 6/15/2020] Deorao Mate: ♦️♦️♦️
[11:32 PM, 6/15/2020] Deorao Mate: श्री सुरेश राव बोंद्रे रा वर्धा यांची जेष्ठ कन्या व श्री सुभाष रावजी आसोले रा दारव्हा यांचे चिरंजीव चंद्रकांत यांचाआदर्श विवाह अगदी साध्या पद्धतीने दि.१५.६.२०२० रोज सोमवार ला राहते घरी वर्धा येथे लॉक डाउन पार्श्वभूमीवर प्रशासकीय नियमांचे काटेकोर पालन करून मोजक्याच नातेवाईकांमध्ये उपस्थित संपन्न झाला
बोंद्रे परिवार वर्धा व आसोले परिवार दारव्हा कुटुंबाचे हार्दिक अभिनंदन 👏👏👌
[11:32 PM, 6/15/2020] Deorao Mate: ♦️♦️♦️
[8:21 AM, 6/17/2020] Deorao Mate: ▪️दुःखद बातमी▪️
कळविण्यात दुःख होत आहे की मुंबई मंडळाचे सक्रिय कार्यकर्ते श्री सुभाषराव ठवकर, शहापूर यांच्या आई श्रीमती निर्मलाबाई भीमरावजी ठवकर (रा. मीर्चापूर तरोडा जि अमरावती. ह. मुक्काम शहापूर) यांचे आज दि १६-६-२०२० रोजी सकाळी ११ वाजता वृद्धापकाळाने दुःखद निधन झाले.
कोरोना संक्रमना मुळे मोजक्या नातेवाईकाच्या उपस्थितीत अंत्यसंस्कार आज दुपारी ४ वाजता शहापूर येथे पार पडले.
ठवकर कुटुंबियांच्या दुःखात आम्ही सहभागी असून समाज भारती परिवारातर्फे भावपूर्ण श्रद्धांजली💐
-संपादक समाज भारती
[3:51 PM, 6/17/2020] Deorao Mate: श्री. गजाननराव गाढवे रा.रासेगाव यांचे
चि. पवन व गोपालराव खाटकर रा.कुष्टा
यांची कन्या चि.सौ.स्नेहा यांचा शुभविवाह कोरोना लॉकडाउन पार्श्वभूमीवर साध्या पध्दतीने नियमाचे काटेकोरपणे पालन करून मोजक्या कुटुंबातील वऱ्हाडयामध्ये सम्पन्न झाला. त्याप्रीत्यर्थ नववरवधूचे अभिनंदन आणि सुखी वैवाहिक जीवनाकरीता मंगलमय शुभेच्छा.
🙏💐💐💐💐💐🙏
विष्णुदास कांबे सचिव
संचालक, बा.कु.स. मंडळ अमरावती
[3:51 PM, 6/17/2020] Deorao Mate: ♦️♦️♦️
[2:47 AM, 6/19/2020] Deorao Mate: ♦️♦️♦️
वर्ष २०२० मध्ये पार पडलेले विवाह
कोरोनाचे पार्श्वभूमीवर रोज रविवार
दि.२४.५.०२० ला भानखेडा ता. जि अमरावती येथील सौ. विद्या व श्री.श्रीराम बांडाबुचे यांची कन्या चि.सौ.किरण आणि डोंगरी ता.तुमसर येथील श्री.यशवंत कनपटे यांचे चि. स्वप्नील यांचा विवाह समारंभ भानखेड येथे घरीच अत्यंत साध्या पध्दतीने पार पडला. चि. स्वनिल आणि कु.किरण यांचे शुभविवाह प्रित्यर्थ अभिनंदन व पुढील वैवाहिक आयुष्य सुख समृद्ध व आनंदाचे जावो हीच मनोकामना .💐🤝💐
■■■■■■■■■■■■■■■■■■■■■■■■■■■■
आदर्श विवाह
*सपुर्ण जगामध्ये कोरोणा सारख्या महामारीने थयमान घातले आहे .अशा परिस्थितीत महत्वपूर्ण काम सुध्दा ठप्प झालेली आहेत. अशातच जानेवारी ते जून या कालखंडा मध्ये आपल्या देशात मोठ्या प्रमाणात थाटामाटात विवाह सोहळे पार पडतात. या कालावधीमध्ये आपल्या सपुर्ण देशात लाँकडाऊन लागु झाले आहे. या लाँकडाऊन परिस्थिती मध्ये साध्या सरळ पध्दतीने हिंदू धर्म पध्दतीने विवाह सोहळे पार पडताना पाहायला मिळत आहे.*💐💐💐💐🌹🌹🌹🌹🌷🌷🌷🌷
* *नेर येथील वनविभाग कार्यालयात मध्ये कार्यरत कर्मचारी अशोकाराव विश्वनाथ कातोरे याचे चिरंजीव राजेंद्र (युवा. बा.कु.स.अध्यक्ष) रा. छत्रपती नगर नेर याचा विवाह कान्होबा (म्हसोला ) येथील मारोतराव ना. अतकारी याची कन्या भावना हिच्याशी हिंदू संस्कृती नुसार साध्या सरळ पध्दतीने दि २७ एप्रिल २०२० रोजी विवाह संपन्न झाला.*
🙂🙂🙂🙂 *कोरोणा पादुर्भाव रोखण्यासाठी शासन प्रयत्न करीत आहे, त्यामुळे प्रत्येकाने संचारबंदी च्या नियम पाळणे गरजेचे आहे. शासनाने दिलेल्या नियमानुसार त्याचे पालन करून विवाह सोहळ्याला वर-वुध सहित इतर दहा नातेवाईक तोडाला माक्स बांधले होते व तसेच सर्वांना करिता हात धुण्यासाठी हान्डवाश , सेनिटायझर उपलब्ध होते.*💐💐💐💐😷😷🤲🏻🤲🏻
*सर्व नागरिकांनी शासनाने दिलेल्या नियमांच काटेकोरे पालन करुन कोरोना संकटाला हरवले पाहिजे, प्रत्येकाने शुभ आरोग्यासाठी मास्क वापरने व वेळोवेळी साबणाने हात धुने तसेच गर्दीच्या ठिकाणी जाने टाळावे . आवश्यकता असल्यास प्रत्येक व्यक्ती पासुन कमीत कमी एक मिटर अंतर ठेवावे. वर_वधु नी अशा पध्दतीचा संदेश दिला. व उपस्थित असलेल्या मान्यवरांच्या आशीर्वाद घेतला.*
💐💐💐💐💐💐🌷🌷🌷🌷🌷🌹🌹🌹🌹🌹🌹🌹
*विशेष म्हणजे माझी पत्नी भावना वडिलांना बारा वर्षे नंतर झालेली एकुलती एक मुलगी असून तिच्या आई वडिलांची सहमती मिळणे म्हणजे खूप मोठी गोष्ट आहे*
यात रुसवा फुगवा राहत नाही रुसवा फुगवा पाहून आज आपण अनावश्यक खर्च करतो आज तो खर्च माझ्या घरी व सासुरवाडी ला खूप समोर जाण्यास हातभार लावेल
मी माझ्या जीवनाच्या वाटते खूप काही करण्यास सक्षम होत आहे,
यात माझा पैसे व कुटुंबाची ओढताण थांबली
माझ्या कुटुंबावर कुठल्याही प्रकारे दडपण राहिले नाही
[6/5, 8:42 PM] smj_Yat_Katore Ashok Vishwanath: सदर विवाह
आदरणीय तहसीलदार आर्णी धीरज स्थूल यांनी स्वतःच्या उपस्थित लावला ही एक माझ्यासाठी गर्वाची बाब आहे
■■■■■■■■■■■■■■■■■■■■■■■■■■■■
■■■■■■■■■■■■■■■■■■■■■■■■■■■■
*शुभ विवाह* 🙏
स्व.रमेशराव शेंडे वाठोडा खुर्द ता.तिवसा यांची कन्या *चि.सौ.का. स्नेहल* आणि श्री भगवंतराव गोमासे रा.मांजरी म्हसला यांचे *चिरंजीव अमित* यांचा विवाह सोहळा आज दि.31 मे रविवार ला lockdown नियमावलीत वधू मंडपी वाठोडा येथे पार पडला...!
*उभयतांना विवाहाच्या हार्दिक शुभेछ्या...!*
💐💐🙏🙏
💐💐🙏🙏
■■■■■■■■■■■■■■■■■■■■■■■■■■■■
मु.काळगव्हाण येथील *श्री.अंबादास कुकडे यांची मुलगी चि.सौ.कां. कोमल आणि टवलार येथील श्री.अरविंदराव टाले यांचे चि. अंकुश* यांचा विवाह काळगव्हाण येथे शुक्रवार दि.२९.५.२०२० रोजी प्रशासनाचे निर्देशानुसार कोरोना नियमाचे काटेकोरपणे पालन करून अगदी ८-१० वर्हाडयामध्ये सम्पन्न करून दोन्ही कुटुंबांनी समाजासमोर एक आदर्श ठेवला.
*चि.अंकुश आणि सौ.कोमल यांचे आदर्श शुभविवाहाप्रित्यर्थ अभिनंदन आणि भावी जीवनाकरीता *मंगलमय शुभेच्छा.*
■■■■■■■■■■■■■■■■■■■■■■■■■■■■
■■■■■■■■■■■■■■■■■■■■■■■■■■■■
■■■■■■■■■■■■■■■■■■■■■■■■■■■■
कविता-
सूर्य भाकरीचा
दुबळा माणूस / विषाणूचं भय
जगण्याची लय / हरवली..
जगरहाटीचं / थांबलेलं चाकं
काळाची ही हाक / ओळखावी..
यंत्राचा महिमा / पडलाय फिका
मातीचाच टिका / गोंदू भाळी ..
आले जरी किती / भयाण वादळे
पिकवितो मळे / बाप माझा..
सूर्य भाकरीचा / रोज उगवतो
जग जगवतो / भुकेजले..
वावरं धु-याचं / करू या पूजन
मातीचं भजन / गाऊ चला..
.. गजानन मते
■■■■■■■■■■■■■■■■■■■■■■■■■■■■
कधीची सोडली चिंता
मनातुन काढली चिंता
भुकेच्या भाकरी साठी
इथे मी जाळली चिंता
सुखाला भेटण्या साठी
कितीदा भांडली चिंता
सदा डोक्यातअसते ती
जणू की सावली चिंता
कमी केल्यास होईना
अशी ती वाढली चिंता
तुझी माझी नकोशी पण
किती ही लाडली चिंता
ओ म प्र का श ढो रे
🙏🏻🙏🏻भूक 🙏🏻🙏🏻
भूक क्षमविण्यासाठी मी मार्ग शोधतो आहे ।
जगण्याच्या खडतर मार्गी , मी घायाळ होत आहे ॥ धृ ॥
अस्तित्व जीवनाचे
टिकण्यास अर्थ आहे .
यशाच्या शिखरावरती ,
चढण्यात गर्व आहे .
भूक अशी शिक्षणाची ,
मी शोधण्यात व्यस्त आहे ॥ 1॥
कष्टाचे ओझे वाहता ,
सारे शरीर जीर्ण झाले .
या टीचभर पोटासाठी ,
काळीज चर्रर्र झाले .
पोटातली भूक माझी आता भाकर शोधते आहे ॥ 2॥
संसारी जीवनात ,
कुणी प्रेमास मुकले आहे
प्रेमाची भूक त्यांची ,
दास्यात फसली आहे .
त्या फसव्या प्रेम क्षणाला
मी हाक देत आहे .॥ 3॥
धुंदीत चाले कुणी ,
गर्वाचे सारे धनी .
पैशाच्या भुकेपायी ,
जिंदगी घाले कुणी .
मदमस्त त्या भुकेचा , मी गुलाम होत आहे ॥ 4॥
नेत्यांची फौज मोठी ,
सत्येची भूक मोठी .
खोट्या आश्वासनांची ,
खैरात वाटे मोठी .
' दळभद्री ' अशा नेत्यांची मी ' जात ' शोधतो आहे ॥ 5॥
शेतात बाप माझा ,
आटवतो रक्त त्याचे .
साऱ्याच भुकेल्यांच्या , पोटात अन्न त्याचे .
' अन्नदात्यास ' अशा मी , प्रणाम करतो आहे ॥ 6॥
भूक क्षमविण्यासाठी मी मार्ग शोधतो आहे .
जगण्याच्या खडतर मार्गी मी घायाळ होत आहे .....
$सुभाष धांदे , यवतमाळ
■■■■■■■■■■■■■■■■■■■■■■■■■■■■
: ऋणानुबंध 💓💓
ऋणानुबंधाचे नकळत जुळले धागे
भेटण्यास मन धाव घेई वेगे.
पूर्व जन्मीचे असतील संचित
प्रेम लाभले अकल्पित अवचित.
असेच लाभो आशिष तुमचे
सार्थक होईल मम जन्माचे.
सेवेसाठी अर्पण जीवन
तुमचे जीवन माझे दर्पण.
अदृश्य भावना अदृश्य बंधन
न कसली आशा फक्त समर्पण.
न जोडता हे बंध जुळती
ना कुठली ओळख ना कसली नाती.
ऋणानुबंधाचे नकळत नाते
स्व अस्तीत्व हरवून जाते.
रक्तता पलीकडच्या विश्वासाचा
जपून ठेवा, ठेवा हा मोलाचा..२
सौ.मीरा शेबे
. भंडारा.
■■■■■■■■■■■■■■■■■■■■■■■■■■■■
।।ऋणानुबंध।।
काही ऋणानुबंध असतात पूर्वजन्मीचे।
काही असतात नव्या नवलाईचे।।
सुटता गुंतता गोड कोडी ऋणानुबंधाचे।
धागे,दोरे भेटत जातात मनामनाचे।।
अडकून पडतो माणूस ऋणानुबंधात।
अन मन अडकते कित्येक द्वंद्वात।।
साधू संत सांगतात भान असावे बंधनांत।
देहांतानंतर ऋण विसावते पांडुरंगात।।
जन्मदाते व विधात्यातून मिळालेला मुक्त होण्याचा अर्थ।
धन्यवाद देऊनी,क्षमा मागुनी, क्षमा मागुनी धन्य होऊन जाणे हेच ऋणानुबंधाचे सार्थ।।
-सौ. रेखा ढबाले
पुणे
■■■■■■■■■■■■■■■■■■■■■■■■■■■■
।। अस्तीत्व ।।
अस्तीत्वाच्या या लढाईत,
कोण जिंकेल,कोण हरेल माहीत नाही।
पण अस्तीत्व टिकविण्याची ,
स्पर्धा मात्र जीवघेणी आहे।।
ब्रम्हाडांतील सारेच जिवजंतू,
अणूरेणू अस्तीत्व जपण्यासाठी
सरसावले आहेत।
कोण जिंकेल कोण हरेल माहीत नाही।।
अस्तीत्वासाठी लढते आहे
अस्तीत्वाची लढाई।
कोण जिंकेल,कोण हरेल माहीत नाही।।
अस्तीत्व टिकाया विश्र्व मोकळे,
परि कर्तुत्व कराया मन तोकडे।
कोण जिंकेल, कोण हरेल माहीत नाही।।
परि सद्य स्तीती जो घरी राहील
त्याचे अस्तीत्व टिकेल।
अस्तीत्वाच्या या लढाईत,
कोण जिंकेल, कोण हरेल माहीत नाही।।
सौ. के. बी. सार्वे भंडारा.
■■■■■■■■■■■■■■■■■■■■■■■■■■■■
जीवन गाणे-----
जीवन गाणे गातच राहावे
झाले गेले विसरुनी जावे
पुढे पुढे चालावे ।।
जीवनाच्या वाटेवरती
सुख दुःखाच्या वेली
कधी निथळते
हळूच पाणी गाली
तरी ओंजळ भरुनी, देवाला स्मरावे ।।
जीवन गाणे गातच राहावे ----
अचानक वादळ सुटले
धो धो पाऊस आला
संसार भिजला
चूल थोडी अन काड्यानचे पेर राहिले
पण न हरता , ताठ उभे राहावे ।।
जीवन गाणे गातच राहावे -----
पक्षी किलबिलती
पिलांसाठी चोचीत दाणे टिपती
ना तक्रार ,रुसवा कधी
फुगवा कधी
त्यांच्यापासून बरेच आम्ही शिकावे ।।
जीवन गाणे गातच राहावे ----
सूर्याचा ast होऊनी
नवी पहाट होते
चैतन्याची उषा नव्याने
जिणे शिकविते
राविकिरणांच्या तेजाने, पुन्हा प्रफुल्लित व्हावे ।।
जीवन गाणे गातच राहावे ----
या हातावर पोट हो त्यांचा
आज कमावले नाही
उद्या भुकेने व्याकुळ मुले
नयनी बांध फुटला राही
तरी ओठ सदा , हसरे दिसावे ।।
जीवन गाणे गातच राहावे
झाले गेले विसरून जावे
पुढे पुढे चालावे -----
मंगला डहाके, भंडारा
■■■■■■■■■■■■■■■■■■■■■■■■■■■■
असे गावे जीवनगाणे, पेलत अंगार हाती.
नजरेत असाव्या ज्वाला, अन् शब्द मृदु ओठी..
नको गुलामी जातीपातीची,डोळ्यांवरी पट्टी अंधाराची
आयुष्याला सामोरे जाताना मित्र, देतिल साथ आधाराची...
कडी कडी जोडत जावी, समाज करावा बलशाली.
मार्ग तयाला मिळतिल सत्तर,इच्छा असावी दांडगी
पाय असावे जमिनीवरती, ओठी पेरावी साखर
इतरांना हसविताना ,शब्दांना जागावे निरंतर
माज नसावा जाण असावी, दु:खाना सावरताना
मिळतील अनेक दगड धोंडे, आयुष्यातुन उठवताना
करावे असे काहीतरी; नाव असावे सर्वाच्या मुखी
निरोप देताना शेवटचा, हळहळतील सारी....
स्वर होतिल कातर,काळही थांबेल क्षणभरी
नजरेत रोखुन नजर, गावे असे जीवनगाणे....
सौ जयश्री रेहपाडे
नागपुर.
■■■■■■■■■■■■■■■■■■■■■■■■■■■■
[5/31, 1:42 PM] Smj Bhand__Mangala Dahake Bhandara: ।। *जीवन गाणे* ।।
जीवनाच गाण हे
एकट्याच नसतं
कुटुबा सोबत ते
म्हणायच असतं
नाही तीथे तबला
नाही तीथे पेटी
दोघांनीही गाण म्हणायचं
असतं सुखी संसारासाठी
एकाचा जरी सुरू
बिघडला तरी
होते संसाराची माती
म्हणून मृदूलता असावी वाणीमध्ये
तरच लयबद्ध स्वर येतील ओठी
थकलो आता मी
उलटून गेली साठी
जिवणाच गाण म्हणत म्हणत
हाती आली काठी
नंदा भोयर
अमरावती
■■■■■■■■■■■■■■■■■■■■■■■■■■■■
[5/31, 1:50 PM] Smj Bhand__Mangala Dahake Bhandara: *किनारा*
समाजाच्या प्रोत्साहनाने
गवसला किनारा
किती तरी दिवस गेले
लेखनी होती बेसाहारा
तीला मिळाला किनारा
भेटली आपुलकीची मानस
लेखनीला आली धार
मा. धांडे सरांचे लाख लाख आभार
समाजाच्या सागरात
लेखनी होती तरंगत
किनारा तीला गवसला
आता ती कधीच नाही थांबत
समाजाची मी ऋणी
त्यांच्या मुळेच भेटले नविन बंधु भगिनी
आणि त्याच्याच प्रोत्साहनाने
हाती आली लेखणी
नंदा भोयर
■■■■■■■■■■■■■■■■■■■■■■■■■■■■
🌹🌹अभंग🌹🌹
गोड तुझे रूप ,गोड तुझे नाम
भेट कधी देशील पांडुरंगा ।
भेटीसाठी जीव कासावीस झाला
आतातरी दया दाखवावी ।।
आषाढीची वारी चुको न द्यावी देवा
डोळयात प्राण आणोनी वाट पाहे ।
तुळशीमाळ गळा, कपाळी चंदनाचा टिळा
हाती घेते देवा, झेंडा भगवा ।।
भक्तांचा मेळा, भरतसे वाळवंटी
खेळ खेळती बघ पाऊली ,फुगडी ।
दिंड्या पताकासवे, नाचती वैष्णव
घालती रिंगण चन्द्रभागेतिरी ।।
तुझ्या रुपावरी ,भाळले माझे मन
गोड न लागे मज ,अन्नपाणी ।
'प्रतिभा' म्हणे देवा, चित्त तुझ्या चरणी ।
स्मरावे तुझे नाम ,रात्रंदिनी ।।
सौ.प्रतिभा सोपान वाठ.
अकोला.
■■■■■■■■■■■■■■■■■■■■■■■■■■■■
जीवनसाथी
बघायला आलास तू मला तेव्हाच मी ठरवलं l
जीवनसाथी म्हणून तुला हृदयात बसवलं l l
संकट येतात पुष्कळ, उदास होत मन l
' मी सोबत आहे ' या वाक्याने निघून जातो क्षणl l
एकाने रुसवे दुसऱ्याने मनवावे यातच आहे मजा l
जोडीला तुझा विश्वास असता नाही कोणती सजा l
जग जरी विरोधात असलं तरी पर्वा नाही कश्याची l l
कारण माझ्या सोबत आहे माझा जीवनसाथी l l
रूपाली अमोल बोंद्रे
भंडारा ह. मू. महाड
■■■■■■■■■■■■■■■■■■■■■■■■■■■■
🎻जीवनसाथी 🎻
हृदयाच्या अंतरंगी
मी झाकून पाहतांना ,
दिसले पुन्हा नव्याने
ते प्रेम प्रकाशतांना .
नशिबाचे द्वंद्व माझ्या
शमवुन थंड केले .
जीवनसाथीने माझ्या ,
मजला क्रुतार्थ केले .
त्या ' आभाळमायेसाठी '
झिजलो असे कितीदा .
त्या तप्त श्वासांमध्ये मी
भिजलो असे कितीदा .
आयुष्य गोड जगती ,
हा विश्वास पेरतांना ,
संगतीत धुंद झालो ,
सजनीशी खेळतांना .
हळुवार पाहिले मी ,
असे बंध रेशमाचे .
बेधुंद होऊन गातो ,
मी गाणे तिच्या प्रीतीचे .
जगण्याची हौस माझी
मौजेत पुढे निघाली .
साथीचे हात धरता ,
नशिबी ' पहाट ' आली .
घनघोर संकटांची ,
तमा बाळगू कशाला ?
' या ' साथीच्या संगतीचा
हात असता उशाला .
सुभाष धांदे सर
यवतमाळ
दिनांक 12/06/2020
■■■■■■■■■■■■■■■■■■■■■■■■■■■■
ऑनलाईन काव्यमहोत्सवात सुप्रसिद्ध गझलकार कवी गजानन मते यांचा उत्कृष्ठ सहभाग
(सोबत फेसबुक लिंक दिली आहे)
फेसबुक लिंक-
https://www.facebook.com/Avvspa/videos/590207648278511/
■■■■■■■■■■■■■■■■■■■■■■■■■■■■
दुःखद निधन
भावपूर्ण श्रद्धांजली💐
बावणे कुणबी समाज मंडळाचे सदस्य व स्थायी समिती मनपा नागपूर चे माजी अध्यक्ष *श्री जयंतराव लुटे* यांचे काल दि ३०-५-२०२० ला सायंकाळी दुःखद निधन झाले
*समाज भारती तर्फे भावपूर्ण श्रद्धांजली💐*
■■■■■■■■■■■■■■■■■■■■■■■■■■■■
😭भावपूर्ण श्रद्धांजली😭*
कुही तालुक्याचे जेष्ठ पत्रकार,जनसामान्य माणसाच्या समस्येचा लेखणीतून बुलंद आवाज करणारे जेष्ठ सामाजिक कार्यकर्ते,देशोन्नतीचे पत्रकार *मा.श्री.देवीदासजी देशमुख मु कुही* यांचे दि.२-६-२०२०रोजी सायंकाळी ६ वाजता हृदयविकाराच्या तीव्र झटक्याने दुःखद निधन झाले. समाज भारतीचे ते सदस्य होते. *समाज भारती* कडून भावपूर्ण श्रद्धांजली💐
*-संपादक समाज भारती*
■■■■■■■■■■■■■■■■■■■■■■■■■■■■
आपणास कळविण्यात अत्यंत दुःख होत आहे की, श्री.शंकर यादवराव ढबाले , कृषी नगर दारव्हा ,वय ४८ वर्ष यांचे 7-6-2020 रोजी दुपारी दिर्ध आजाराने निधन झाले. त्यांच्या आत्म्यास शांती प्रदान करो,
शोकाकूल:_
बावणे कुणबी समाज, दारव्हा🙏💐💐💐
No comments:
Post a Comment