Monday, July 20, 2020

■आजीचा बटवा (भाग १)◆ काही टिप्स 👋कै. दादासाहेब टिचकुले ऑनलाईन योग वर्ग

 
टिप्स क्र. १ 
ORAC 
(Oxyzen Radical Absorbance Capacity)

कोरोना आजारावर अजून पर्यंत कोणतीही लस आलेली नाही. तरी आपण काळजी करू नका ORAC (Oxyzen Radical Absorbance Capacity) चे तत्व  फार उपयुक्त आहे. आणि त्यात कोणतीही दुष्परिणाम दिसून येत नाही.
शरीरातील महत्त्वाचा भाग म्हणजे रक्त. रक्त शुद्ध करण्याचे कार्य यामुळे होतं असते. ‌आणि रक्ताची कार्यक्षमता वाढविण्यासाठी  ORAC त्याचे तत्व
आपणास नेहमीच उपयुक्त पडते. आपली रोगप्रतिकारकशक्ती वाढविणे महत्त्वाचे असते आणि याकरिता भारतीय परंपरेनुसार प्रत्येक घरात मसाले आणि जडीबुटीचा दैनंदिन उपयोग केला जातो. याद्वारे ही रोगप्रतिकारशक्ती वाढविणे सहज शक्‍य होऊ शकते.
आता आपण प्रत्यक्ष ह्या वस्तुमध्ये ORAC ची क्षमता किती असते, ते पाहू या‌‌. त्यामुळे आपणास त्याचे महत्त्व समजण्यास सोपे जाईल.   
          ORAC      क्षमतेचा तक्ता
क्र
नांव
नांव
किंमत
०१
लवंग 
Clove
3,14,446
०२
दालचिनी
Cinnamon
2,67,537
०३
कॉफी
Coffee
2,43,000
०४
हळद
Turmeric
1,02,700
०५
कोका
Cocoa
80,983
०६
जीरा
Cumin
76,800
०७
ओवा
Parsley
74,349
०८
तुळशी
Tulsi
67,553
०९
अद्रक
Ginger
28,811
१०
ओव्याचे फुल
Thyme
26,426




अद्रक, तुळशी व हळद त्यांचे स्वत्व रसातील क्षमता दहापट असल्यामुळे ह्याचा अधिक उपयोग करावा.
प्राकृतिक विविध विविध फळे हिरव्या भाजीपाला, पत्तेदार भाज्या, मसाले, वनस्पती व जडीबुटी मध्ये आपणास भरपूर मात्रे मध्ये ORAC प्राप्त होते.
आहारातील खाद्यपदार्थ आणि पोषक तत्व, न्यूट्रिअन्स जसे आयर्न (लोह) omega-3 हे आपल्या शरीरात क्षमता व सुरक्षाकवच सुदृढ व मजबूत बनवित असतात.
तुळशी, अद्रक, काळेमिरे, हळद, दालचिनी, लवंग, याशिवाय ब्राह्मी, अश्वगंधा, शतावरी, मुलेठी, काळा-जिरा,  लहान व मोठी ईलायची यांचेकडे म्हणून वैज्ञानिकांचे आकर्षण झाले आहेत.
संगणकात जसे इंटेल (Intel) ची आवश्यकता असते अगदी तसेच आपल्या शरीरात रोग प्रतिकार शक्तीची आवश्यकता असते.
******”””***************”””***************”””*******
टिप्स क्र. २
‘जीवेम् शरदः शतम' 
सर्वच प्राकृतिक आहारात सातही घटक कमी अधिक प्रमाणात समाविष्ट असतात. प्राकृतिक आहार हा सर्व श्रेष्ठ आहार होय. भारतीय संस्कृतीमध्ये प्राकृतिक, ऋतुनुसार, नैसर्गिक, वनस्पतीजन्य, शाकाहारी आहाराला विशेष महत्त्व आहे.आपण जर निसर्गासह जीवन व्यतीत करीत असाल तर निसर्ग आपणास शंभर वर्षाचे आयुष्य प्रदान करतो. 
           निसर्ग प्रत्येक जीवसृष्टीसाठी त्या-त्या प्रदेशानुसार व ऋतुनुसार आहाराची निर्मिती करीत असतो. हा प्रादेशिक आहार होय. हा सर्व श्रेष्ठ आहार असतो. निसर्ग मानव, प्राणी मा्त्रावर त्यांचे कल्याणासाठीच निर्मिती करीत असतो. याचेच आम्ही स्वागत करावयास हवे. जसे-समुद्र किनाऱ्यावर भात, मासे, नारळ इत्यादी; थंड प्रदेशातील कडधान्य, फळे-भाजीपाला, तर; उष्ण प्रदेशातील कडधान्य फळे व भाजीपाला ह्यात भिन्नता असून विविधता आढळून येते
          पाश्चिमात्य ऋतुमान थंड नव्हे अतिथंड असते, त्या नैसर्गिक परिस्थितीनुसार तेथील निसर्गाने आहाराची निर्मिती केलेली असते.  सहाजिकच तो आहार भारतासारख्या उष्ण प्रदेशात योग्य व उपयुक्त होणार नाही. भारतामध्ये आपण डोळे झाकून पाश्र्चात्यांच्या भोजनाची नक्कल करण्याचे प्रकार ३-४ दशकांपासून प्रारंभ झाले आहेत. तर दुस-या बाजूला विज्ञान आणि तंत्रज्ञानामुळे बरीच प्रगती झाली. लोकांची जीवनशैलीत अतिशय सुधारणा झाली. हे चांगलेच आहे. मात्र त्यासोबत आवश्यक असलेल्या शरीराच्या हालचाली, चालणे, व्यायाम हे पूर्णता बंद झाले आहेत. प्रत्येक ठिकाणी घरात, गाडीत, लिफ्ट तथा ऑफिस मध्ये A C चा वापर करून सूर्यनारायणाला तर विसरून गेलोत‌. त्यातच जवळ-जवळ अधिकांश जनांनी बैठी जीवनशैली अनुसरल्यामुळे यांचा परिणाम सर्वत्र भयंकर आजार निर्मितीतच झाला आहे. मधूमेह, ह्रुदय-विकार, लठ्ठपणा, कॅन्सर, मानसिक आजार आणि आता तर कोरोनाचे सावट आले आहे. आजच्या परिस्थितीत यात बदल करणे आवश्यक आहे.
      खालील प्रकारचे आहाराचे सर्वसाधारण पणे रोज पालन करावे.
  • दिवसभर गरम पाणी पीत रहावे.
  • सकाळी कोमट पाण्यासह लिंबू + शहद.
  • कोणतेही एक आंबट फळ (Cytric Acid) संत्रा, पेरू, मोसंबी, पपई, लिंबू, आवळा यांचे ग्रहण करावे. ( तक्ता क्र ९ पहावे.)
  • अंकुरित धान्य  त्यासोबत हिरवी कोथिंबीर तसेच पालेभाज्याचा समावेश असावा.
  • सात्विक शाकाहारी भोजनाचा नियमित उपयोग करावा.
******************”””***************”””**********
टिप्स क्र. ३ 
 आहार घेऊ नये:- 
आपले शरीर प्राकृतिक व शाकाहारी आहारासाठी बनलेली असल्यामुळे ह्या वस्तूंचा वांरवार उपयोग केल्यास शरीरावर वाईट परिणाम म्हणजेच आपण आजारी पडतो. म्हणून हा आहार टाळण्यात यावा.
      आहार कोणता घेऊ नये.
तपशील
तपशील
राजसिक
तामसिक 
साखर
मीठ (टाटा नमक)
दारू/नशा युक्त 
थंडपेय 
जंक फूड 
स्ट्रिटफूट 
फास्ट फूड
सप्लीमेंट फूड
मांसाहारी
रिफायनरी
प्रोसेसिंग 
फॅक्टरी प्रॉडक्ट
डेअरी प्रॉडक्ट
बेकरी प्रॉडक्ट
मैद्याचे उत्पादन
प्रिझरव्हेटरी
मॉल मधील (बंद डबे)
भरपूर उष्णतेवर शिजवलेले
रासायनिक
*******************”””***************”””*********
टिप्स क्र ४ 
कापूर
प्राचीन काळापासून कापराचा उपयोग शुद्धीकरणासाठी केला जातो. कापुराची पाने लांब व गोलाकार असतात. खोडाला छिद्र केल्यास त्यातून रस प्रवाहित होतो तोच कापूर आहे कापूर कृमिनाशक शामक असतो पूजेसाठी व औषधीसाठी कापडाचा उपयोग केल्या जातात. 
  1. नेत्र ज्योतीवर्धक:-  कापराच्या काजळाचे अंजन करा.
  2. डोकेदुखी:- 4 गॅम कापूर 15 ग्रॅम नौसादर काचेच्या बाटलीमध्ये झाकून ठेवा. जेव्हा डोके  दुखत असेल तेव्हा फक्त त्याचा सुगंध घ्या
  3. डोके जड होणे:- कापूर  + लिंबाचा रस डोक्यास लावा.
  4. कान:- तुळशीच्या पाणाचा रस + कापूर कोमट गरम करुन २ थेंब कानात टाका.
  5. गळा बसणे:- 4 g कापूर + २ ग्रॅम दालचिनी +12 ग्रॅम मोठी ईलायची + 12 ग्रॅम मुलेहठी (ज्येष्ठमध) चे सत्व‌. गोळ्या बनवा २-२ गोळ्या दिवसातून ३ वेळा.
  6. पोट:- कापूर + जायफळ + हळद समभाग पोटावर लेप लावा.
  7. अजीर्ण अपचन:- २ ग्राम कापूर+ सेंधा नमक + ५० ग्राम भाजलेला ओवा.  चूर्ण अर्धा चमचा गरम पाण्यासोबत घेतल्याने अपचन व अजीर्ण ठीक होते.
  8. रक्तप्रदर:- ५ ग्राम कपूर+ २० ग्राम चंदन ३/४ चम्मच पाण्यामध्ये दिवसातून दोन वेळा घ्या.
  9. जुकाम:- कापराचा वास घ्या.
  10. खाज:- ८ ग्रॅम कापूर + 15 ग्रॅम गंधक +15 ग्राम कलमीशोरा +  २ ग्राम निळा थोता. वाटून त्यात ७ ग्राम सरसो तेल मिसळून तेथे लावून उन्हामध्ये बसा. त्यानंतर साबु व गरम पाण्याने साफ करा. ४ दिवसात त्रास नष्ट होतो.
  11. दाद:- १ ग्राम कापूर+ १ ग्राम गंधक, थोड्या रॉकेल मध्ये मिसळून  चट्ट्यावर  लावा.
  12. गठिया:- लसणाच्या रसामध्ये कापूर मिसळून मालिश करा.
  13. पित्त:- शरीरावर पित्त किंवा एलर्जी आल्यानंतर  खोबरेल तेलात कापूर मिसळून लावा. इंद्र मुद्रा करा.
  14. चमकदार त्वचा:- कापूर व ग्लिसरीन समभाग लावून चेहऱ्यावर व त्वचेवर लावा ते स्वस्थ व चमकिला बनतात.
  15. ऊवा:- खोबरेल तेलात कापूर विसरून लावा.
  16. मच्छर आणि माशा:- गरम लोखंडावर कापराची वडी ठेवल्यावर मच्छर व माशा निघून जातात.
  17. खटमल:- उषा बनवते  वेळी  त्यात कापराच्या वड्या टाका. गर्मीमध्ये त्या उबदार राहून, खटमल जात नाहीत.
  18. वातावरण शुद्धी:- कापरामुळे वातावरण शुद्धी होऊन विषाणू आणि जिवाणू नष्ट होऊन रोगप्रतिकार शक्ती वाढते.
       ***”**”******”””***************”””************

टिप्स क्र.५
महा भीमसेनि कापूर
  1. उर्जा वाढविणे:- पिण्याच्या पाण्यामध्ये थोडासा कापूर टाकून आपली ऊर्जा वाढू शकतो.
  2. प्राणवायू /  रोगप्रतिकारशक्‍ती:- उंच ठिकाणी किंवा मानस सरोवर यात्रेमध्ये प्राणवायूची कमतरता दूर करतो. कापरामुळे रोगप्रतिकारशक्ती सुद्धा वाढत असते.
  3. वातावरण शुद्ध:- देशातील वृक्षावर त्याची सुगंध व सुवास अवलंबून असतो. जीवाणू आणि विषाणू नष्ट करण्यासाठी याचा व वातावरण प्रसन्न व आल्ल्हादकारी करण्यासाठी उपयोग होतो.
  4. दमा / श्वसन:- यावर उत्कृष्ट उपाय  होतो
  5. जुलाब:- भीमसेनी कापूर ओवा व पेपरमिंट सारख्या प्रमाणात काचेच्या बाटली ठेवून उन्हात ठेवावे‌. थोड्या थोड्या वेळाने ती बॉटल  हलवत रहावे नंतर चार थेंब बताशा किंवा साखरेवर घ्यावे.
  6. पोटदुखी व अस्वस्थता:- कापूर + पेपरमिंट
  7. त्वचाविकार:- कापूर कोशिकांना मजबूत बनवितो. म्हणून त्वचा तजेलदार बनते.
  8. स्नायू दुखी / संधिवात:- २०० ML तिळाचे तेल + २५ ते ३० ग्रॅम भीमसेनी कापूर त्यात टाकून, त्या तेलाने मालिश केल्यास स्नायू व संधिवाताचे व इतर आजार सहज ठीक होतात.
  9. कोरोना आजार:- घरात वाटीत किंवा रुमाला मध्ये कापूर  ठेवून त्यामुळे विषाणू आणि जीवाणू नष्ट होतात‌‌. 
  10. त्वचेची खाज:- खाजी चे ठिकाणी कापूर लावावा.
  11. भाजणे:- जळणे किंवा भाजल्यावर त्या भागावर कापराचे तेल लावा‌. आग कमी होऊन, डाग नाहीसा होतो.
*****”*********”*******”””***************”””******
टिप्स क्र.६
अश्वगंधा
आपल्या देशात दुर्लभ  जडीबुटीचे भांडार आहे. त्यातील एक म्हणजे अश्वगंधा किंवा असगंध होय.अश्वगंधाच्या  मुळाचा  घोड्यासारखा गंध येतो म्हणून त्याला अश्वगंधा असे म्हंटले जाते. ह्याचे मूळ सुकल्यानंतर हा गंध निघून जातो
अश्वगंधाचे मूळ सुकवून औषधी  रूपात प्रयुक्त केली जाते. अश्वगंधा मुलत: राजस्थानच्या नागोर किंवा त्याच्या आजूबाजूला  प्राप्त होते म्हणून त्यास नागोरी अश्वगंधा सुद्धा म्हणतात.
अश्वगंधा ही १ बलवर्धक जडीबुटी आहे. अश्वगंधा १ वर्ष पर्यत सेवन केल्याने शरीरातील सर्व विकार बाहेर निघून, जीवन शक्तीत वाढ होत असते. ही वीर्यवर्धक, वात-रोग नाशक, यौन शक्तिवर्धक, वात-कफ शमन करणारी आहे. शरीराला पुष्ट व सुडौल करणारी, मेधावर्धक, तणाव-थकान, अनिद्रा, उच्च रक्तदाब, श्वास रोग, संधी-विकृती, मंदाग्नी, भ्रम, रक्तविकार आदि रोगावर लाभ कारक आहे.
कायाकल्प योगा मध्ये ही प्रमुख औषधी आहे. जरी ही कामोत्तेजकाची भूमिका निभावत  असली तरीसुद्धा शरीरावर याचा कोणताही वाईट प्रभाव पाहिल्या जात नाही. ही आयुष्य वाढणारी आहे. हिच्या प्रयोगामुळे रक्त व हिमोग्लोबिन वाढत जाते. अश्वगंधा मध्ये कॅन्सर थांबविण्याची क्षमता आहे.
अश्वगंधेचा कोणत्याही ऋतूमध्ये  वापर करता येतो. अश्वगंधा चूर्ण ३-६ ग्रॅम सकाळ सध्याकाळी सेवन करावे. अश्वगंधा आयुर्वेदिक दुकानांमध्ये प्राप्त होते.  या जडी-बुटी पासून बनणाऱ्या औषधामध्ये अश्वगंधा चूर्ण, अश्वगंधा रसायन, अश्वगंधारीष्ट,अश्वगंधा पाक व अश्वगंधा कॅप्सूल च्या स्वरूपात औषधाच्या दुकानात प्राप्त होतात. कोरोनाच्या आजारात काढा घेण्यासाठी याचा उपयोग करण्यात येतो.
उपचारार्थ प्रयोग:- 
१) वातविकार:-
अश्वगंधा + सुंठ + खडीसाखर समभाग वाटून १ चमचा चूर्ण सकाळ संध्याकाळी पाणी किंवा दुधासोबत घेतल्याने गॅसेस आणि पोटाचे विकार ठीक होतात. 
२) दुर्बलता:-  वरील चूर्ण ३-६ ग्रॅम दुधासोबत कमीत कमी ६ महिने घेतल्यास शरीरातील दुर्बलता निघून शरीर ह्रष्ट पुष्ट  होते.
३) वजन वाढणे:- अश्वगंधा, छोटी हरड, इसबगोल, शतावरी २०-२० ग्राम, श्वेत लोघ्र १० ग्राम, खडीसाखर ८० ग्राम याचे चूर्ण करून २ चमचे दुधासोबत घेतल्याने वजन वाढत राहते.
४) स्वेत प्रदर:- १ चमचा अश्वगंधा + खडीसाखर १-१ चमचा गोड दुधामध्ये घ्यावे अथवा अश्वगंधा २ ग्रॅम वंशलोचन अर्धा ग्राम मिळवून घेणे स्त्रियांचे स्वेत प्रदररोग दूर होऊ शकतात.
५) अनिद्रा:- १ चमचा अश्वगंधा चूर्ण तूप + खडीसाखर याचे सेवन केल्याने अनिद्रा रोग दूर होतो.
६) अर्ध सिसी:- अश्वगंधाची मूळी, पाण्यामध्ये भिजवून दगडावर घासून डोक्याला लेप करावा. तसेच १ चम्मच अश्वगंधा चूर्ण दुधासोबत सकाळ-संध्याकाळी घेतल्याने अर्धशिशीचे विकार दूर होतात.
७) दुग्ध वृद्धि:- अश्वगंधा व शतावरी समभाग वाटून १ चमचा चूर्ण सकाळ-संध्याकाळी दुधा सोबत घेतल्यामुळे स्थनाचा विकास व स्तनामध्ये दुधाची वृद्धि होते.
८) बद्धकोष्टता:- अश्वगंधा चूर्ण  गाईच्यादुधा सोबत ३ मासा चूर्ण झोपतांना घेतल्यास बद्धकोष्ठता दूर होते.
९) मुतखडा:- ताका सोबत ५ मासा चुर्ण सेवन केल्यास मुतखडा निघून जातो.
१०)कुल्ह्याचा त्रास:- अश्वगंधा चूर्ण साखर आणि तूप खालून १ तोळा रोज खाल्ल्यास हा त्रास निघून जातो.
११) स्वप्नदोष:- अश्वपिसून वाटून साखर किंवा खडीसाखरेत  मिसळून रोज सकाळी पाण्यासोबत ६ ग्रॅम ४० दिवस घेतल्याने शिग्रपतन स्वप्नदोष, हृदयाची धडकन, मूत्र रोग व अर्ध विक्षिप्तावस्थेत लाभ होते.
*****”*********”*******”””***************”””******
टिप क्र. ७
गिलोय
गिलोय किंवा गुळवेल  ही प्रसिद्ध जडीबुटी असून, याची वेल इतर झाडावर चढून 
वाढत असते. कडू लिंबाच्या झाडावर चढलेली गिलोय औषधी साठी अधिक गुण व प्रभावकारी असते. याचा स्वाद कडू आणि याची पाने खाण्याचे पाण्यासारखे असतात. हे रक्त शोधक आणि तापावर रामबाण औषध आहे.
उपचारार्थ प्रयोग:-
  1. जुना ताप:- १ तोळा हिरवी गुळवेल, ६ ग्रॅम देशी ओवा हे मातीच्या भांड्यामध्ये भिजवून, सकाळी कुटुन व गाळून घ्या. त्यात साखर मिसळून १ आठवडा सेवन केल्याने, जुन्यातला जुना ताप निघून जातो.
  2. उचकी:- गुळवेल + सुंठ समभाग घेऊन बारीक वाटावी याचा नाकामध्ये १-२ थेंब नस्य करावे. ताबडतोब उचकी बंद  होते.
  3. मलेरिया:- १ तोळा ताजा-गिलोय, १ मासा ओवा, ४ काळेमिरे,५० ग्रॅम पाणी, या सर्वाना थंडाई सारखे गोडगोड सकाळी सेवन केल्याने काही  दिवसात आराम होतो.
  4. पीतज्वर:- गुळवेल सत्व + साखर समभाग १-३ मास रोज पाण्यासोबत घेतल्यामुळे ठीक होतो.
  5. रक्तशोधक:- हिरवा गुळवेल + उन्नाव १-२ तोळा, पाण्यामध्ये मिसळून शरबत बनवून सकाळी सेवन केल्यामुळे रक्तविकार, फोडे-फुंसी व सर्व प्रकारचे चर्मरोग दूर होतात.
  6. वमन:- २ तोळे हिरवी गुळवेल, २ लिटर पाण्यामध्ये (अर्धे पाणी आटवल्यानंतर ते गाळून उलटी (वमन) झाल्यास थोडे-थोडे पाणी पिल्यास उलटी  बंद होते.
  7. खोकला:- १ तोळा हिरवे गुळवेल, १२५ मिली पाण्यामध्ये घोटून गाळून टाका. त्यात २ तोळे सहद मिसळून सकाळी सेवन केल्यामुळे खोकल्यावर आराम  होतो.
  8. गठिया:-सुकलेल्या गुळवेलास बारीक करून, छान गाळून घ्या. सकाळी ३ मासे  गाईच्या दुधा सोबत सेवन करा काही दिवसात  गाठीचे रोग ठीक होतात.
  9. कावीळ:- १ तोळा गुळवेल पाण्यामध्ये वाटून. ३ मासा सत्व, गाईच्या दुधाच्या ताकात घेऊन २-३ दिवसात घ्यावे कावीळ नष्ट होते.
  10. पोटातील किडे कुर्मी:- गुळवेल पानाचा रस काढून पाजल्यामुळे पोटातील किडे नष्ट होतात.
  11. सुखा रोग:- हिरव्या गिलोयच्या  पानाच्या हिरव्या रसात लहान मुलाचे कपडे रंगवून घ्या. मुलाला हाच कपडा अंगावर टाका काहीवेळात त्याचा कोरडा रोग निघून जातो.
*****””*************”””***************”””*********
टिप क्र.८   
निंबू 
निंबू हे संस्कृत नांव आहे. त्यालाच मराठीत लिंबू असे म्हणतात. निंबूक असेही याचे एक संस्कृत नाव आहे. याला लिंबू असे मराठीत म्हणतात. त्या फळाचे अनेक प्रकार आहेत.
मोठे लिंबू आणि लहान लिंबू अधिक बिया किंवा कमी बिया असणारे असेही प्रकार सांगता येतील.
  1. मोठे लिंबू बिजापूर अथवा बिजोरा:- हे अंडाकार असून, यात बिया फार असतात.
  2. बन बिजपुर
  3. मातुलुंग म्हणजे महाळुंग- हे तिन्ही विजो-याचे प्रकार आहेत.
  4. जंभीर
  5. लिंपाक अथवा कन्न लिंबू
  6. बृहद गंभीर
  7. मधु कुष्कुटी अर्थात गोड जंबीर
  8. साखर लिंबू
  9. मधुकर कर्कटी म्हणजे चकोतरा
  10. कागदी लिंबू:- कागदी लिंबू हेच या लिंबाच्या जातीत सर्वश्रेष्ठ होय.
लिंबू म्हटलं कि जिभेला चव देणारी आंबट चव तोंडात येते. अत्यंत उपयुक्त असूनही भरपूर येत असल्याने फार महाग नसते. फक्त उन्हाळ्यात रसवंती सुरू झाल्या की त्यांची किंमत वाढते. प्रत्येकाने आपल्या परसबागेत लावावं असे फळ. सकाळची सुरुवात लिंबू पाण्याने करण्यात खऱ्या अर्थाने ‘ताजगी का एहसास' तेच अनुभवू शकतात‌. बहुगुणी अशा या लिंबा कडे पाहिले तरी प्रसन्न वाटते.  पिवळाधम्मक रंग मोहवतो.  लिंबाच्या झाडाला दोन वेळा बहर येतो. आणि भारतात हे सर्वत्र उपलब्ध होते.
आहार मुल्ये
अशा या गुणधर्मही लिंबाचे मूल्य असे आहेत- 100 ग्रॅम लिंबातून खालील पोषक द्रव्ये मिळतात.
क्र
तपशील
आहार मूल्य
०१
उष्मांक
५.९ कॅलरीज
०२
प्रथिने
१.५ ग्रॅम
०३
स्निग्ध
१.० ग्रॅम
०४
फायबर
१.३  ग्रॅम
०५
कर्बोदके
१०.९ ग्रॅम
०६
कॅल्शियम
९.० मि. ग्राम
०७
फॉस्फरस
२० मि ग्राम
०८
लोह
०.३ मि ग्राम
०९
जीवनसत्वे क
६.३ मि.ग्राम
१०
बी कॉम्प्लेक्स
अत्यल्प असते

कोणत्याही रोगापासून रक्षण करते म्हणून आयुर्वेदातही लिंबाचे महत्त्व आहे. अनेक व्याधीमध्ये लिंबूरसात औषध घ्यायला सांगितलेली आहेत. विशेषता चरक आणि शारंगधर संहितेत  त्याचे संदर्भ आढळतात.
  • अजिर्ण व पित्तासाठी लिंबावर हळद व मीठ घालून शिजवून खावे.. थोड्या थोड्या वेळाने चाटले की २ तासात आराम पडेल.
  • लिंबातील ‘क’सत्व रोगप्रतिकारशक्ती वाढते त्यामुळे जखमा लवकर भरून येतात.
  •  लिंबू स्कर्ही वर रामबाण उपाय आहे.
  • दात पडणे, दातातून रक्त येणे, हिरड्या लाल होणे, सुजणे इत्यादी दंत विकारावर लिंबू हमखास उपयोगी पडते.
  • दात आणि दाढ यांच्या दुखण्यावर उपयुक्त आहे.
  •  पचण्याच्या अनेक तक्रारीवर लिंबू पाणी उपयुक्त आहे.
  •  नियमित लिंबूपाणी सेवनाने पोटात कृमीहि मरतात.
  •  बद्धकोष्ठतेवर लिंबू पाणी हा सर्वात सुंदर उपाय आहे. 
  • खूप जुलाब होत असल्यास साखर घातलेले लिंबाचे शरबत जलसंजीवनी सारखे घेतल्यास फायदा देते.
  •  आयुर्वेदात लिंबू पॅस्टीक अल्सर, रक्ती मूळव्याध, सुजलेले टॉन्सिल्स, डोळ्याच्या अनेक तक्रारी दूर होतात. 
  • स्थूलत्व एवढेच काय तर विंचू दंशावर त्याचा उपयोग होतो.
  •  आवळ्याचा रस घालून केसांना लावल्याने केस गळणे, कोंडा होणे या तक्रारी दूर होतात. केस काळेभोर होतात.
  •  परंतु लिंबाचा अतिवापर केल्यास दाताचे ॲनिमल झिजते. दात संवेदनशील होतात. दात लवकर आंबतात. 
  • कृमी, दाढ व पित्त, गर्भाशयाची शुद्धी, उचकी, शुल, वमन, ढाळ होणे,  गर्भाधरणेसाठी, हृदयशूळ, बहिरेपणा, मुतखडा, यकृत, मुख घाण, वात दोष, जडता, अरुचि इ.
  •  सौंदर्यप्रसाधनात तर लिंबू अत्यंत गुणकारी आहे.
  •  लिंबामध्ये सायट्रीक ॲसिड, फल-शर्करा, कॅल्शियम, फॉस्फरस आणि भरपूर जीवनसत्व असते.
  •  शक्‍यतोवर लिंबू रस पाण्यात मिसळून घेणे इष्ट. चटण्या, कोशिंबीर, पचडी, लोणची यात लिंबु वापरतात.
  •  लिंबूतील आम्लतेमुळे  भाज्यांचे रंग कायम राहतात‌.  
  • उग्र पदार्थ कमी होतात. 
  • लिंबामुळे पदार्थाची पचनीयता वाढते.
  •  पचन सुलभ होते. गॅसेस, अपचन, आंबट ढेकर यावर लिंबूरस आणि खाण्याचा सोडा घेतला की बरे वाटते‌.
  •  उन्हामुळे घाम येऊन थकवा आल्यास लिंबूपाणी उत्साह देते. दुधात लिंबू पिळून आणि थोडे ग्लिसरीन घालून लावल्यास चेहरा उजळतो. अधिक सुंदर दिसतो. हाता-पायांना लागल्यास सुष्कपणा कमी होऊन, भेगाही कमी होतात.
  •  लिंबाच्या एवढ्या औषधी  उपयोगा मुळेच त्याला पवित्र फळ म्हणत असावेत.



4 comments:

  1. छान आजीबाईचा बटवा
    उपयुक्त माहिती.

    ReplyDelete
  2. खुप छान टिपस धनयवाद

    ReplyDelete
  3. Correct sir,Appropriate, appreciative, useful & most beneficial health tips as per weather conditions including (Aurvedic method) in this Aajibai chaa batwa..

    ReplyDelete
  4. Correct sir,Appropriate, appreciative, useful & most beneficial health tips as per weather conditions including (Aurvedic method) in this Aajibai chaa batwa..

    ReplyDelete

पुसद जि. यवतमाळ येथे योगाचार्य डाॅ रामकृष्ण ठवकर यांचे योग व मुद्रा वर मार्गदर्शन*

योगाचार्य डाॅ रामकृष्ण ठवकर यांचे योग व मुद्रा  वर मार्गदर्शन                             मंगळवार दि.22/11/2023 ला दुपारी  गांधीनगर, पत्रे ल...